Saturday 29 December 2012

मनातील भावनांचा मोकळेपणाने निचरा करा

'ताणतणावाचं नियोजन तुमच्याच हाती' हा गेल्या शनिवारचा लेख प्रसिद्ध झाला. सारखा फोन खणखणू लागला. ''आपल्या जीवनात खूप टेंशन आहे. ते हाताळणं जमत नाही. त्यामुळं त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात,'' असे सांगणारे असंख्य फोन आले. तर तुम्ही फार सुंदर मार्ग सांगितलात, टेंशन हाताळण्यासाठी खूप लोकांनी अभिनंदनही केलं. 'ताणतणाव नियोजन' हा आपणा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. आजचं युगच हे टेंशनचं युग मानलं जातं. प्रचंड धावपळीचं जीवन, जीवघेणी स्पर्धा, पैसे मिळविण्याचं वाढलेलं प्रेशर, यशस्वी होण्यासाठी धडपड करण्याची अपरिहार्यता या सगळ्यांचा परिणाम म्हणजे टेंशन, टेंशन, टेंशन. हे हाताळण्यासाठी, वेळोवेळी टेंशन कमी करण्यासाठी, त्याचा निचरा करण्यासाठी रिलॅक्सेशन तंत्र वापरणं अपरिहार्य आहे आणि संमोहन प्रक्रिया ही प्रभावी रिलॅक्सेशन निर्माण करणारी प्रक्रिया आहे.

मी नियमितपणे स्वसंमोहन व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा चालवितो. त्यामध्ये 'ताणतणाव नियोजन' हा विषय प्रभावीपणे तर शिकविला जातोच, पण सोबत संमोहन प्रक्रियाही शिकवली जाते. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात विदर्भात पाच-सहा ठिकाणी या कार्यशाळा होणार आहेत.

सुरुवातीला मनात निर्माण झालेलं टेंशन तसंच साचत गेलं, तर पुढे त्याचं रूपांतर अँनक्झायटीमध्ये- चिंता, काळजी, अस्वस्थता होतं. त्याचे शरीरावर, मनावर खूप दुष्परिणाम होतात.

शरीरावर होणारे दुष्परिणाम-विकार- कशरीं वशीशरीश, रक्तदाब - इश्रेव झीशर्ीीीश, मधुमेह- ऊळरलशींशी, सांधेदुखी, डोकेदुखी, अनेक प्रकारचे चर्मरोग, दमा-अस्थमा, निद्रानाश, इतर मनोविकार आजार.

मनावर होणारे दुष्परिणाम

बुद्धिकौशल्यावर प्रतिकूल परिणाम, निर्णयक्षमतेवर प्रतिकूल परिणाम, आत्मविश्वास ढासळतो, स्वत:वरचे नियंत्रण सुटते, स्मरणशक्ती खालावते.

मागच्या लेखात आपण ताणतणावावर नियंत्रण मिळविण्यासाठी वा ताणतणाव सहजासहजी आपल्या जीवनात निर्माणच होणार नाही यासाठी काय करायचे ते पाहिलं होतं. एकूण 11 उपाय आपण करू शकतो, वापरू शकतो याचा विस्तारानं आढावा घेतला होता. आता पुढील उपाय पाहू या.

वेळच्या वेळी आपल्याला आपल्या भावनेचा निचरा करता आला पाहिजे : काय होतं की, दरवेळी आपल्या सगळ्याच भावना आपल्या जीवनामध्ये व्यक्त करता येत नाहीत, कारण काही सामाजिक दडपणं आणि नीतिनियम असतात.

एवढंच नव्हे, तर सभ्यपणाच्या कल्पना असतात. त्यामुळे अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आपल्याला दाबून टाकाव्या लागतात आणि मग या जर तशाच साचत गेल्या तर अत्यंत वाईट असे दुष्परिणाम आपल्याला पुढच्या जीवनामध्ये भोगावे लागतात. त्यामुळे भावनेचा निचरा करणारे तंत्र आपल्या जीवनामध्ये असणं नितांत गरजेचं आहे. याला 'कॅथारसिस' असा शब्द इंग्रजीमध्ये वापरला जातो. 'परझीन'-'शुद्ध होणं.' एखादा स्पंज आहे. हा स्पंज ज्यावेळेस घाण गोळा करतो आणि या स्पंजला दाबून आपण ती घाण काढून टाकतो, त्या पद्धतीने आपल्या मनाचं शुद्धीकरण झालं पाहिजे, ही कल्पना या कॅथारसिसमागे आहे.

नाटक-सिनेमामधूनसुद्धा आपल्या भावनेचा सुंदर निचरा होतो. याकरिता मला एक उदाहरण तुम्हाला सांगावसं वाटतं. माझ्याकडं एक विदर्भातील बाई काम करायला होती. विजय कोंडकेचा 'माहेरची साडी' नावाचा सिनेमा लागला होता. ती मला म्हणायला लागली, ''साहेब, मी काही दोन-तीन दिवस कामाला येणार नाही. मी ममईला (मुंबईला) सिनेमा पाहायला चालले.'' मी म्हटलं, ''दोन-तीन दिवस कशाला पाहिजे?'' खरं म्हणजे, मी नालासोपार्‍याला राहायचो. मुंबई म्हणजे काही दूर नव्हती. ''तू एका दिवसात जाऊन पाहून ये आणि मग दुसर्‍या दिवशी कामाला ये.'' ''नाय जी, म्हणे दोन-तीन दिवस तर लागलंच मले. सिनेमा पाहून तर यायचंच आहे.'' आता ही बाई गेली आणि तब्बल चार-पाच दिवसांनी आली.

''काय गं, तू सिनेमा पाहायला गेली होती एक दिवसाकरिता आणि तीन-चार दिवसांनी परत येते म्हणजे काय?''

ती म्हणाली, ''अजी तुम्हाला काय सांगू, अरे इतका मस्त सिनेमा आहे ना? अवं, मी गेले सिनेमाले अन् आतमध्ये गेल्या गेल्या जी धो-धो रडायला लागली. सिनेमाभर रडत होती. लई बरं वाटलं. म्या म्हटलं काय, लई चांगला सिनेमा आहे. पुन्हा पाहिल्याशिवाय काय परत जायचंच नाही. लागली म्हणे लाईनीत. अहो कायची! लवकर सिनेमाची एक तिकीट मिळते का? एवढी मोठी रांग! चौथ्या दिवशीचं तिकीट भेटलं, मी राहिली तिकडं. चौथ्या दिवशीचा सिनेमा पाहूनच परत आली.'' आता 'माहेरची साडी' हा सिनेमा आहे, जो आतमध्ये शिरल्यापासून शेवटपर्यंत स्त्रियांना धो धो रडवतो. त्या सिनेमाने आजपर्यंतचे मराठीतले उत्पन्नाचे सगळे रेकॉर्ड्स मोडले, एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर हा सिनेमा चालला आणि या सिनेमाचा प्रेक्षकवर्ग नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक स्त्रिया होत्या, याचं कारण काय आहे?

मनामध्ये साचून असलेल्या सगळय़ा भावनांचा निचरा करण्याची संधी मिळते. धो धो रडूनसुद्धा आपलं मन निर्मळ झाल्यामुळे, परझीन झाल्यामुळे, कॅथारसिस झाल्यामुळे आपल्याला खूप बरं वाटतं. हीही मानवी जीवनातली एक नितांत आवश्यक गरज असू शकते. नाटक-सिनेमामधून कॅथारसिस घडतं याला अत्यंत महत्त्व आहे. त्याकरिता केवळ नाटक- सिनेमाच पुरेसे आहेत असं नव्हे. तुमच्या-

माझ्या जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळे मित्र-मैत्रिणी जोडता आले पाहिजेत. त्यांच्यासोबत छानपैकी आपल्याला आपल्या मनातलं बोलता आलं पाहिजे.

मनामध्ये जे काही आहे ते उत्तम पद्धतीनं व्यक्त करता आलं पाहिजे. याबाबत मी जेव्हा नेहमी सगळय़ांसोबत बोलतो. प्रामुख्याने ज्या वेळेस हिपनोथेरपिस्ट कोर्समध्ये संमोहन उपचारांचा भाग शिकवत असताना स्त्रियांच्या कौन्सिलिंगबद्दल काही गोष्टी मला सांगाव्या लागतात, तेव्हा एक गोष्ट मी आवर्जून सांगत असतो. भारतीय स्त्रीबाबत एक अडचण आहे. तिला आपल्या मनातलं इतरांजवळ बोलता येत नाही.

मी असं म्हटल्यानंतर, तुम्ही कदाचित मला हसाल. कारण स्त्रिया खूप बोलतात अशी आपली समजूत आहे. हे खरं आहे की, स्त्रिया खूप बोलतात. चार स्त्रिया एकत्र आल्या की प्रचंड बोलत बसतात; पण आपल्या मनातलं सोडून बाकी सगळं बोलतात. कारण लहानपणापासून त्यांना अनुभव आलेला असतो की, आपल्या मनातील एखादं गुपित कोणाला सांगितलं किंवा अगदी आतली गोष्ट कुणाजवळ सांगितली की, ती गोष्ट बाहेर फुटते आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे हळूहळू स्त्री हे शिकते की, सगळं बोलायचं, पण आपल्या मनातलं गुपित मात्र कोणाजवळ सांगायचं नाही. आपल्या मनात दबून असलेल्या भावना कुणाला सांगायच्या नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे या भावना मनामध्ये साचत जातात, साचत जातात, साचत जातात आणि त्याचे दुष्परिणाम मनोरुग्ण बनून मग त्यांना भोगावे लागतात किंवा वेगवेगळय़ा पद्धतीचे मानसिक आजार पुढे जाऊन भोगावे लागतात.

त्यामुळे मी नेहमी म्हणत असतो की, प्रत्येक स्त्रीला आपल्या मनातलं मोकळेपणाने बोलता येईल असं स्थान असण्याची गरज आहे; आणि जे थेरपिस्ट आहेत, कौन्सिलर्स आहेत त्यांचं हे महत्त्वाचं काम आहे की, त्यांनी विश्वासाचा एक असा खांदा स्त्रीला उपलब्ध करून दिला पाहिजे की, ज्या खांद्यावर डोकं ठेवून, विश्वासाने त्यांना जे सांगावसं वाटतं ते सांगता आलं पाहिजे आणि मोकळेपणानं रडता आलं पाहिजे. पण हे प्रत्येकालाच काही शक्य नाही किंवा दरवेळी आपल्याला कौन्सिलरची किंवा या पद्धतीच्या समंजस थेरपिस्टची मदत मिळेलच असं नाही. याकरिता दुसरा पर्याय आहे. स्त्रियांनीसुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा काही समंजस स्त्रियांसोबत मैत्री निर्माण केली पाहिजे की, ज्या समजून घेऊ शकतात, आपल्या मनातलं ऐकू शकतात आणि हे गुपित दुसर्‍याजवळ न सांगण्याइतपत समंजसपणा त्यांच्यामध्ये आहे, असा विश्वास तुम्हाला वाटतो. या पद्धतीचे काही चांगले मित्र-मैत्रिणी जोडणं हेसुद्धा आवश्यक आहे. त्यातून उत्तम पद्धतीने भावनेचा निचरा होऊ शकतो.

थोडक्यात, जी माणसं मनातल्या मनात साठवून ठेवतात, सहजासहजी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करत नाहीत, ती माणसं या पद्धतीच्या आजारांना म्हणजे एंग्झायटी प्रोन आजारांना मोठय़ा प्रमाणावर बळी पडत असतात. त्यामुळे या माणसांनी आपल्या भावना मोकळेपणाने इतरांजवळ व्यक्त केल्या पाहिजेत.

समजा, तुम्हाला एखाद्या व्यक्तीपुढे या भावना मोकळेपणाने व्यक्त करणं अडचणीचं वाटत असेल, तर आजच्या आधुनिक काळामध्ये काही दुसरेही पर्याय आहेत. उदाहरणार्थ,आपण एखाद्या मैत्रिणीशी किंवा मित्राशी बोलत आहात असं समजून बोलत जावं आणि टेपरेकॉर्डर ऑन ठेवावा. टेपरेकॉर्डरमध्ये आपण जे काही बोलतो ते नंतर एक-दोनदा ऐकावं. त्यातून बोलण्याचं समाधान मिळतं. पुन्हा ते ऐकल्यामुळे आपल्याला त्याची खात्री वाटते की, हे सगळं आपण बोललेलो आहोत. त्यातूनसुद्धा भावनेचा निचरा होऊ शकतो. दुसरा पर्याय 'लिखाण' हासुद्धा असू शकतो. आपण कागद-पेन घेऊन बसावं आणि आपल्याला जे वाटतं ते सगळंच्या सगळं कागदावर उतरवावं. त्यातूनसुद्धा आपल्या भावनेचा निचरा होऊ शकतो.

क्रिएटिव्हिटी : आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये निर्मितीचा आनंद देणारं काम असणं किंवा असला काही छंद असणं नितांत गरजेचं आहे. खरं म्हणजे आपण जे काम करतो, त्यातूनच जर आपल्याला निर्मितीचा आनंद मिळत असेल, तर डेफिनेटली आपल्या जीवनाचं सार्थक बनून जातं, कारण त्यातून आपल्याला इतका सुंदर आनंद मिळत राहतो की, एकूणच सगळय़ा रपुळशीूं आणि ींशपीळेप चा निचरा होत जातो आणि एक निरोगी, आनंदमय जीवन जगण्याची आपल्याला संधी मिळते. पण मॅक्झिमम लोकांना आपल्याला आवडेल किंवा निर्मितीचा आनंद देईल असं काम करण्याची संधी मिळत नाही. त्यावेळेस असे काही छंद आपल्याला जोपासता आले पाहिजेत. कितीतरी प्रकारचे, निर्मितीचा आनंद देणारे छंद असू शकतात. त्याला आपण चित्रकला-पेंटिंग म्हणतो किंवा मूर्तिकला म्हणतो, त्याशिवाय फोटोग्राफीसारखं तंत्र की, ज्यातून आपल्याला निर्मितीचा आनंद मिळू शकेल. संगीत आहे. लेखन आहे. साधं बागकाम आहे. एवढंच नव्हे, तर वेगवेगळ्या पद्धतीच्या कला आहेत. या कलांमधून हा आनंद आपल्याला मिळू शकतो. सगळं जाऊ द्या, साधा उत्तम स्वयंपाक करण्यातसुद्धा आनंद आहे. अशा कितीतरी क्रिएटिव्ह गोष्टी आपल्या जीवनात असू शकतात. ज्या आपल्याला आवडतात. ज्यातून आपल्याला आनंद मिळतो आणि त्या उपयुक्तसुद्धा आहेत. याचं जर कॉम्बिनेशन करता आलं तर पुन्हा रपुळशीूं आणि ींशपीळेप चा निचरा होण्यास प्रचंड मदत मिळते. कारण या सगळ्या क्रिएटिव्ह कामांमध्ये आपण पूर्ण एकाग्र होतो, समरस होतो आणि समरसतेने आणि एकाग्रतेने आपणास जो आनंद मिळायचा तो मिळतो.

आता आपल्याला या तेरा मुद्यांचा मी जो उल्लेख केला; हे सगळेच्या सगळे तेरा मुद्दे आपल्या जीवनात अंतर्भूत करता येतीलच असं नाही; पण किमान पहिले पाच मुद्दे कम्पलसरी आपल्याला जीवनात आणावे लागतात. एखादं रिलॅक्सेशन तंत्र, आपल्या विचारप्रक्रियेमध्ये विधायक विचार करण्याचा बदल, आयुष्याबद्दलचा एक विधायक दृष्टिकोन स्वीकारणं, स्वभावामध्ये अनुकूल बदल करणं आणि शांत, खोल, समाधानकारक झोप मिळणं हे पाच मुद्दे आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात आपल्याला अंतर्भूत करताच आले पाहिजेत. त्यानंतर पुढचे जे काही आठ मुद्दे आहेत, त्यापैकी किमान चार ते पाच मुद्दे आपल्या जीवनामध्ये अंतर्भूत करता आले म्हणजे, एकूण नऊ ते दहा मुद्दे जर आपल्या जीवनामध्ये असू शकले तर मग आपल्याला रपुळशीूं आणि ींशपीळेप पासून कायमचं दूर राहून अतिशय शांत-रिलॅक्स-आनंदी जीवन जगण्याची संधी घेता येते. मला वाटतं, जे काही मी तुमच्यापुढे मांडलं आहे त्याचा नीट विचार करा. आयुष्यामध्ये अशी मनोवृत्ती निर्माण करा की, कोणत्याच प्रकारचे रपुळशीूं आणि ींशपीळेप आपल्या मनामध्ये निर्माण होणार नाहीत. आपलं जीवन पाहिलं तर ते अतिशय सुंदर आहे, सोपं आहे, सहज आहे, आनंदाने जगण्यासारखं आहे. आनंदाने जगणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेन की, या मुद्यांचा नीट विचार करून आजपासूनच आपलं जीवन अतिशय शांत, रिलॅक्स, आनंदी अवस्थेत जगायचं, असं ठरवू या.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832

No comments:

Post a Comment