Saturday 22 September 2012

'ज्योतिष' हा प्रकार थोतांडच!


'पुण्य नगरी'चा वाचक खूपच जागरूक आहे. सक्रिय आहे. जवळपास 17 वर्षे वेगवेगळ्या दैनिकांमधून आणि

साप्ताहिकांमधून मी लिहीत आलो. आता बर्‍याच वर्षाच्या अंतरानंतर दै. 'पुण्य नगरी'त लिहितो आहे. पण असा सक्रिय प्रतिसाद पूर्वी अनुभवला नव्हता. अर्थात, पूर्वी आजसारखी आधुनिक साधनं नव्हती. विशेषत: मोबाईल नव्हता. शनिवारी लेख प्रसिद्ध होतो. दिवसभर सारखा फोन खणखणत असतो. अभिनंदनही इतकं भरभरून असतं, की विचारू नका. त्यातून बळ मिळतं पुन्हा ताकदीनं लिखाण करण्याचं. खूप सूचना असतात. हे लिहा, ते लिहा, अमुक विषय हाताळा, तमुक विषयाबद्दल तुमचं मत काय, अशी प्रश्नांची सरबत्तीही असते आणि दुखावले गेले तर नाराजी, शिव्याही असतात, 'ईश्वर तुम्हांला सद्बुद्धी देवो.. इथपासून तर तुम्ही मरणार' असे आशीर्वादही असतात.

त्यामुळं कोणत्या विषयावर लिहावं, असा प्रश्न पडतो. पण खेळ मनाचा एक सुसंगत धागा ठरवणं गरजेचं आहे. सगळ्याच विषयांना योग्य न्याय देता येणं नितांत गरजेचं आहे. कारण माझं काम प्रबोधनाचं आहे. त्यामुळे वाचकांच्या मागणीनुसार विषयांची हाताळणी करतानाच प्रत्येक विषय व्यवस्थितरीत्या मांडला जाईल याची काळजी मला घ्यावी लागते हे आपण कृपया लक्षात घ्या. फलज्योतिषाविषयी खूप प्रश्न आलेत. तो आपल्या सामाजिक, धार्मिक जीवनाचा अविभाज्य झालेला विषय असल्यामुळं ते स्वाभाविकही आहे.

मागच्या लेखांमध्ये आपण पाहिलं, की पंचांगाचे दोन भाग असतात. अमावस्या, पौर्णिमा, ग्रहण, सूर्योदय, सूर्यास्त हा सारा खगोलशास्त्राचा भाग आहे. तो खरा असतो. शंभर टक्के खरा असायला हवा एवढं आपलं विज्ञान प्रगत झालं आहे.

मुहूर्त, शुभ-अशुभ आणि राशिभविष्य, हस्तसामुद्रिक,

मुद्रासामुदिक, अंक भविष्य, रमल, टॅरो कार्ड, क्रिस्टल गेझिंग, नाडी भविष्य इत्यादी भविष्यकथनाचे प्रकार फलज्योतिष अँस्ट्रॉलॉजी या विषयात मोडतात. या भविष्यप्रकारांना, ईंीेश्रेसूला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. वैज्ञानिक मान्यता नाही हे आपण विस्तारानं मागच्या लेखांमध्ये पाहिलं आहे.

या सगळ्यांमध्ये ज्योतिष्याच्या वतरुळातसुद्धा राशिभविष्य ईंीेश्रेसू हा उत्तम भविष्यकथनाचा प्रकार आहे असं मानलं जातं. त्यात अनेक शाखा, पद्धती आहेत. कृष्णमूर्ती, सायन, निर्मन वगैरे त्या तपशिलात न शिरता काही ठळक गोष्टी आपण समजून घेऊ.

पत्रिकेवरून भविष्य सांगणं हा सगळ्यात उत्तम प्रकार मानला जातो. ज्योतिष्याला जन्मवेळ आणि जन्मस्थळ मिळालं, की त्याआधारे त्याला कुंडली केीेीलेशि मांडता येते. या दोन गोष्टींशिवाय इतर कोणतीही माहिती देण्याची गरज नसते. आजकाल कॉम्प्युटरवरही कुंडली तयार करून मिळते. 12 राशींच्या 12 घरांत एकूण 9 ग्रह (परंपरेनुसार) मांडलेले आपणांस आढळतात. आजकाल ज्योतिषी आधुनिक झाल्याचं दाखविण्यासाठी युरेनस, नेपच्यूनही (काही प्लूटो) या घरात खेळवतात.

परंपरागत 9 ग्रह म्हणजे राहू, केतू आणि आपले सात वार रवि, सोम, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि. आपल्या प्रत्येकाच्या कुंडलीत हे ग्रह आहेत. माझ्याही कुंडलीत आहेत. लहानपणीच आईबाबांनी कुंडली बनवून घेतली होती.

राहू, केतू ग्रह आहेत? आपण शाळेमध्ये जे ग्रह शिकलोत त्यात राहू, केतू नावाचे ग्रह नाहीत. सूर्यमंडळामध्ये मुळात नसलेले हे ग्रह आलेत कुठून? हजारो वर्षाआधी केवळ डोळ्यांच्या साहाय्यानं माणसानं ग्रह शोधले. त्या वेळी आपल्यापासून या ग्रहांचं अंतर किती असावं याचा त्याला अंदाज करता येणं शक्यच नव्हतं. म्हणून ग्रहणाचा अभ्यास करताना काहीतरी चंद्र आणि सूर्याला गिळंकृत करत असावं असा त्यानं अंदाज केला. राहू, केतू, साप आहेत वा राक्षस आहेत. विशिष्ट काळात ते चंद्राला वा सूर्याला गिळतात म्हणून चंद्रग्रहण व सूर्यग्रहण लागतं असा समज रूढ झाला. आजही पुराण ग्रंथांमधून तो वाचायला मिळतो.

सारे खगोलशास्त्री पूर्वी ज्योतिषी ईंीेश्रेसशी म्हणून ओळखले जात. ग्रीक शास्त्रज्ञ 'अँरिस्टार्कस ऑफ सॅमॉस' याने तेवीसशे वर्षांपूर्वी तारे व सूर्य स्थिर असून पृथ्वी आणि ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात,' असं मत मांडलं.

भारतातील महान ज्योतिषी आर्यभट्ट याने पाचव्या शतकाच्या शेवटी 'पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वी स्वत:च्या आसाभोवतीही फिरते' हे मत गणिताच्या आधारे मांडलं. पण डोळ्यांना पृथ्वीभोवती सूर्य फिरताना दिसत असल्यामुळं या ज्योतिर्विदांची मतं नाकारण्यात आली. उलट त्यांची खिल्ली उडवण्यात आली.

ब्रुनो, कोपर्निकस व दुर्बिणीचा शोध लावून तिचा वापर करणार्‍या 16व्या शतकातील गॅलिलिओनं गणिताच्या आधारावर सिद्ध केलेलं मत जगाला स्वीकारावं लागलं. 'पृथ्वी गोल असून ती सूर्याभोवती फिरते व पृथ्वी स्वत:च्या आसाभोवतीही फिरते' हे सत्य आज सार्‍यांनी स्वीकारलं आहे.

सूर्य आणि पृथ्वीच्या मधे चंद्र आला तर सूर्यग्रहण लागतं आणि सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली तर चंद्रग्रहण लागतं हे ज्ञान मानवजातीला झाल्यानंतर ज्योतिष्यांचे राहू, केतू म्हणजे साप व राक्षस या कल्पना हास्यास्पद ठरू लागल्या. म्हणून हुशार ज्योतिष्यांनी त्यांना 'इन्व्हिजिबल प्लॅनेट्स न दिसणारे ग्रह' ठरवलेत.

आश्चर्य म्हणजे न दिसणारे ग्रह ही कल्पना एका सत्यावर आधारित होती. युरेनस आणि नेपच्यून हे दोन्ही ग्रह शास्त्रज्ञांना आधी गणितात आढळले. त्यानुसार त्यांनी शोध घेतल्यानंतर त्या स्थानांवर हे ग्रह दिसले.प्लूटो हा ग्रह गणितानुसार असावा असे वाटल्यानंतर बर्‍याच काळानंतर तो सापडला, दिसला.

स्वाभाविकच ज्योतिष्यांची न दिसणारे राहू, केतू ग्रह ही चलाखी काही काळ चालली. पण त्या स्थानांवर राहू, केतू असूच शकत नाही. या निर्णयाप्रत खगोलशास्त्रज्ञ आल्यावर मात्र ज्योतिष्यांची फारच पंचाईत झाली. मग त्यांनी राहू, केतू हे 'इंटरसेक्टिंग पॉइंट्स' आहेत, असं सांगायला सुरुवात केली.

पृथ्वीपासून सर्व ग्रहतार्‍यांचं समान अंतर कल्पून त्यांच्या भ्रमणाचा काल्पनिक नकाशा तयार केला जातो. त्यानुसार राशी, नक्षत्र मानले जातात. खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी ही कल्पना दीर्घकाळ वापरली गेली आहे. यानुसार चंद्र आणि सूर्याच्या भ्रमणकक्षा जिथे छेद देतात त्या बिंदूंना राहू आणि केतू असं मानलं गेलं. आता हे छेदनबिंदू मुळातच काल्पनिक आहेत. कारण पृथ्वीपासून चंद्राचं अंतर एक फूट पकडलं तर पृथ्वी, सूर्य यांचं अंतर 385 फूट पकडावं लागेल. पृथ्वी मध्यबिंदूवरून 1

फुटावर फिरणार्‍या चंद्राची भ्रमणकक्षा 385 फुटांवरून फिरणार्‍या सूर्याच्या कक्षेला कधीही छेद देऊ शकणार नाही हे भूमितीच्या पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यालाही कळतं. त्यामुळं राहू, केतू हे छेदनबिंदू आहेत ही मांडणीसुद्धा ज्योतिष्यांचं पृथ्वीपासून सूर्य आणि चंद्र यांच्यातील अंतराबद्दल त्यांचं अज्ञान दर्शविणारी आहे, चुकीची आहे; काल्पनिक आहे.

रवी म्हणजे सूर्य. सूर्य हा तारा आहे. तारा स्वयंप्रकाशी असतो. ग्रह परप्रकाशी असतात. ग्रह हे तार्‍याभोवती फिरतात. तरीही ज्योतिषी अजूनही रवीला म्हणजे सूर्याला ग्रह मानून तुमच्या-माझ्या पत्रिकेत पृथ्वीभोवती हिंडवत असतात. सूर्य-रवी हा तारा आहे, ग्रह नाही हे विद्वान ज्योतिषी केव्हा स्वीकारणार?

सोम म्हणजे चंद्र. चंद्र हा उपग्रह आहे. तो ग्रह नाही. 1986 साली धुळ्याला अखिल भारतीय ज्योतिष संमेलन भरलं होतं. त्या काळी भास्कर वाघाची धुळ्यात खूप दहशत होती. काही पत्रकारांना त्यांच्या गुंडांनी भरचौकात मारलं होतं. ज्योतिष्यांच्या अधिवेशनाला या गुंडांचं पूर्ण संरक्षण होतं. मी आणि माझे कार्यकर्ते या अधिवेशनाविरुद्ध रान उठविण्याची हिंमत करणार नाही या हेतूनेच धुळ्याला आयोजन केलं होतं.

15 दिवस आधीपासून आम्ही वातावरण तापवायला सुरुवात केली. शाळा, कॉलेजमध्ये 'ज्योतिष एक थोतांड' या विषयावरील व्याख्यानांचा धडाका उडवून दिला. त्या पाश्र्वभूमीवर ज्योतिष महामंडळाची धुळ्याला प्रेस कॉन्फरन्स झाली. ''चंद्र हा ग्रह आहे का?'' पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. ''हो! आमच्या शास्त्रानुसार चंद्र हा ग्रहच आहे,'' असे उत्तर पदाधिकार्‍यांनी दिलं. ''पण शाळांमध्ये चंद्र हा उपग्रह आहे असं शिकवलं जातं. मग आपलं ज्योतिष महामंडळ काय करणार, सरकारला असं चुकीचं पाठय़पुस्तकात शिकवतात याबद्दल जाब विचारणार कां, पाठय़पुस्तकातील हा भाग बदलविण्यास भाग पाडणार का,'' अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.

''आम्ही या अधिवेशनात निर्णय घेऊ. चंद्र हा ग्रह आहे की उपग्रह ते ठरवू.'' असं उत्तर ज्योतिष्यांनी दिलं. आमच्या हाती कोलीतच मिळालं. प्रत्येक शाळेत, कॉलेजात, चौकाचौकांत आम्ही ग्रह, उपग्रहातील फरक समजावून सांगू लागलो. ग्रह हा तार्‍याच्या भोवती फिरतोआणि ग्रहाच्या भोवती फिरतो तो उपग्रह. ग्रह आणि उपग्रह हे केवळ शब्द नाहीत, तर या संकल्पना आहेत.

हजारोंच्या संख्येनं गावात ज्योतिषी यायला लागले. अधिवेशनाचा बिल्ला लटकवलेला ज्योतिषी दिसला, की शाळकरी वानरसेना विचारायची, ''ज्योतिषी काका, सोम ग्रह आहे की उपग्रह? रवी ग्रह आहे का? राहू, केतू कुठे आहेत?'' ज्योतिष्यांनी चुकीची वा अवैज्ञानिक उत्तरे दिली, की मग वानरसेना त्यांना निमंत्रण द्यायची, ''ज्योतिषी काका, आमच्या शाळेत शिकायला या. 9 पैकी 4 ग्रह तर अस्तित्वातच नाही! मग पत्रिकेला काय अर्थ?''

परिणाम असा झाला, की हजारोंच्या संख्येनं आलेले ज्योतिषी आपला बिल्ला काढून धुळ्यात वावरू लागले. त्या वेळी वातावरण एवढं तणावपूर्ण होतं, की डीआयजी अरविंद इनामदार नाशिक सोडून काही काळ धुळे मुक्कामी तळ ठोकून बसले. व्यक्तिश: त्यांचा ज्योतिषावर विश्वास होता. त्याबद्दल ते

माझ्याशी वादही घालत. पण पोलीस अधिकारी म्हणून आमच्या वादळी चौक सभांना पूर्ण संरक्षणही देत. पुढे ते महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक झालेत. 'ज्योतिषशास्त्र आहे सिद्ध करा. एक लाख रुपयांचे पारितोषिक जिंका अन्यथा फसवण्याचा धंदा बंद करा.' या आव्हानाच्या दबावातच धुळ्याचं ज्योतिष संमेलन पार पडलं. ज्योतिष्यांनी आव्हान स्वीकारलं का?

(लेखक हे अखिल भरतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832

No comments:

Post a Comment