Saturday, 18 August 2012

ज्या गोष्टीची भीती वाटते त्याला सामोरे जा!


'भीती' अनेकांच्या जीवनाला पंगू बनवणारी, सारं जगणंच अधू बनवणारी भावना आहे. जोवर ती मर्यादेत असते तोवर ठीक आहे. कदाचित जीवित संरक्षणासाठी 'भीती' गरजेची आहे. समोर साप दिसला, तो चावू शकतो म्हणून भीती वाटून माणसानं सुरक्षित अंतरावर राहून त्याला जाऊ देणं ठीक आहे. वाघ, सिंह खाऊ शकतो म्हणून त्यांच्यापासून सुरक्षित अंतरावर स्वत:ला राखणं समजण्यासारखं आहे. पण कुणाला झुरळाची भीती वाटते. समोर झुरळ दिसले तरी जोरजोरानं किंचाळणं, छाती धडधडणं, शरीर थरथर कापणं सुरू होत असेल तर..? आता त्या व्यक्तीला माहीत आहे, की झुरळ चावत नाही. चावलं तरी माणूस मरत नाही. तरीही एखादी स्त्री प्रचंड घाबरत असेल तर त्याला आपण झुरळाचा फोबिया असं म्हणतो.

असे अनेक प्रकारचे फोबिया आपल्या जीवनात असू शकतात. झू फोबिया प्राण्यांची भीती, क्लॅस्ट्रो फोबिया बंद जागांची भीती, उघडय़ा जागांची भीती, अनोळखी माणसांची भीती, रक्ताची भीती, अंधाराची भीती, भीती वाटण्याचीच भीती अशा कितीतरी प्रकारच्या भीती मानवी जीवनात असतात. या तार्किकदृष्टय़ा अप्रस्तुत असतात. चुकीच्या असतात. प्रमाणाबाहेर असतात म्हणून खोटय़ा असतात. तरी अंतर्मनासाठी मात्र 100 टक्के खर्‍या असतात.

एक गृहस्थ गणपतराव एका जिल्हास्थळी राहतात. 20 मैलावर असणार्‍या एका गावातील शाळेत शिक्षक आहेत. रोज बसने जातात-येतात. बसस्टँडपासून त्यांचं घर केवळ 5-7 मिनिटं पायी अंतरावर आहे. पण ते कधीही पायी घरी जात नाहीत. जाऊ शकत नाही. रिक्षेवाला एवढय़ा कमी अंतरावर यायला तयार नसतो. पण रिक्षाला दुप्पट, कधी तिप्पट रक्कम मोजूनच ते घरी परततात. जातानाही हीच अवस्था. मुलांना बाबांसाठी रिक्षा पकडून आणावा लागतो. का? त्यांना कुर्त्यांची प्रचंड भीती वाटते.

एकदा रिक्षांचा स्ट्राईक होता. गणपतरावांना नाइलाजानं स्टँडवरून पायी घरी यावं लागलं. मोठी हिंमत करून, जीव मुठीत घेऊन ते पायी निघाले. गल्लीबोळात भरपूर मोकाट कुत्री. कुत्री पाहताच गणपतराव घाबरले. पाय थबकले. कुर्त्यांनी बरोबर ओळखलं. ते जोरजोरानं भुंकू लागले. गणपतराव आणखीच घाबरले. थरथर कापू लागले. कुर्त्यांनी भुंकून भुंकून रान उठवलं. आपल्या भाईबंदांना निमंत्रण धाडलं. पाहता पाहता 20-25 कुर्त्यांनी थरथर कापणार्‍या, जागच्याजागी थांबलेल्या गणपतरावांना गराडा घातला. आजूबाजूच्या माणसांचं लक्ष गेलं. त्यांना ओळखणार्‍या एका दुकानदारानं धाव घेतली. इतरांच्या मदतीनं कुर्त्यांना पिटाळून लावलं. पण गणपतरावांचं ब्लडप्रेशर एवढं वाढलं होतं, की त्यांना दवाखान्यात भरती करावं लागलं. नॉर्मल व्हायला 4-5 दिवस लागले. पण गणपतरावांचा फोबिया मात्र अधिक वाढला. ते अधिकच पंगू बनले. एरवी आपल्या जीवनात इतर कशालाही न घाबरणारा माणूस पण कुत्रा-फोबिया पायी अपंग झाला. घरी मोटारसायकल आहे. चालवता येते; पण चालवत नाही. कारण कुत्री मागे लागतात.

त्यांना कितीही समजावून सांगा, ''अहो, कुत्रा नेहमीच चावत नाही. हजारो माणसं रस्त्यावरून चालतात. सगळ्य़ांनाच कुत्रा चावतो कां? बरं चावला तर चावला अँण्टिरेबिज इंजेक्शन घेतलं की झालं. आजकाल तीनंच घ्यावे लागतात. त्याचा फार त्रासही होत नाही.'' गणपतराव म्हणतात, ''हे सारं मला माहीत आहे. मी शाळेत शिकवतो हे सारं. पण मला भीती वाटते.'' या ठिकाणी गणपतरावांचं कॉन्शस माइंड, जागृत मन घाबरत नाही, तर त्यांचं सबकॉन्शस माइंड अंतर्मन घाबरतं आणि अंतर्मनाला तर्कशास्त्र पटत नाही. कळत नाही. ते आपल्या अनुभवाला महत्त्व देतं.

गणपतराव 7 व्या वर्गात शिकत होते. तोवर तो एक नॉर्मल मुलगा होता. कुर्त्यांना फारसे घाबरत नसत. घरी ज्योतिषी आला. त्याने गणपतचा हात पाहिला. पत्रिका पाहिली. इतर भविष्य सांगताना सांगितलं, ''सावध राहा. चार पायांपासून सावध राहा. धोका संभवतो.''

आता ज्योतिष्यांचा धंदाच असा. असं सांगितल्याशिवाय चालणार कसं? गंडांतर टाळण्यासाठी ज्योतिष्यानं ताईत बनवून दिला. 500 रुपयांचा तो ताईत गणपतच्या गळ्यात बांधण्यात आला. त्या दिवसापासून घरातले सगळे, विशेषत: आजी त्याला 'चार पायांपासून सावध राहण्याची'सूचना वारंवार देऊ लागले.

एक दिवस शाळेतून घरी एकटंच येताना गणपतवर कुत्रं भुंकू लागलं. एरवीही असं घडायचं. त्या वेळी गणपत थांबायचा. दगड उचलून कुर्त्याकडे भिरकावला, की ते पळून जायचं. आज मात्र गणपतला आठवलं, 'चार पायांपासून सावध' कुर्त्यालाही चार पाय आहेत आणि घाबरून आपलं जड दफ्तर घेऊन पळत सुटला. कुत्रं मागे लागलं. इतरही कुत्री मागे लागलीत. एका कुर्त्यानं गणपतच्या पायाचा चावा घेतला. तेवढय़ात इतर लोक धावून आले. कुर्त्यांना पिटाळलं. 14 इंजेक्शन घ्यावे लागलेत आणि गणपतच्या आयुष्यात कुत्रा-फोबिया सुरू झाला. अजूनही तो 500 रुपयांचा ताईत गणपतच्या गळ्यात आहे. पण त्याला काही कुत्रे घाबरत नाहीत. फक्त ज्योतिष्याच्या पोटाची सोय झाली. पण गणपतच्या बोकांडी कुत्रा-फोबिया बसला.

अनेकांना आयुष्यात कुत्रे चावतात. सार्‍यांनाच कुत्रा-फोबिया होता कां? नाही ना? मग.. ज्योतिष्याच्या भाकितामुळं 'कुत्रा चावण्याचा अनुभव' गणपतच्या अंतर्मनावर अधिकच खोलवर परिणाम करून गेला आणि या भीतीला इतरांनीही अंधश्रद्धेपायी खतपाणी घातलं.

गणपतरावांना ही भीती घालवता येईल? कशी? गेली 22 वर्षे मी 'व्यक्तिमत्त्वविकास' कार्यशाळा चालवतो आहे. त्या माध्यमातून अक्षरश: हजारो माणसांची भीती, फोबिया घालविण्यासाठी मदत करता आली आहे. हजारोंना भीतीमुक्त होताना मी अनुभवतो आहे. पण मी स्वत: वयाच्या 19-20 वर्षापर्यंत अतिशय भित्रा होतो. मंत्रतंत्र-जादूटोणा प्रकारांना प्रचंड घाबरत असे. पायामध्ये चप्पल घातल्याशिवाय चालण्याची प्रचंड भीती वाटायची. 'पायाखालची कुणी माती घेतली आणि त्याची जारणमारणाची बाहुली बनवली तर..! तिकडे त्या मांत्रिकानं त्या बाहुलीची मान मोडताच इकडे आपली मान ताडकन तुटून पडेल' याची मला प्रचंड भीती वाटत असे. रस्त्यात काही मंत्रवलेलं पडलं असेल तर तिथून माघारी फिरत असे. दुसर्‍या रस्त्यानं जात असे. वडिलांची प्रचंड भीती वाटायची. मुलींची भीती वाटायची. खरं म्हणजे त्या काळात मला सगळ्याच प्रकारांची भीती वाटायची.

माझं वाचन प्रचंड होतं. माझा सर्वाधिक वेळ वाचन करण्यात जात असे. आपल्यात काही नाही. आपण नगण्य आहोत. आपल्याला विनोबा, आचार्य दादा धर्माधिकारी, जयप्रकाश नारायण, बाबा आमटे, प्राचार्य राम शेवाळकर यांच्यासारखं बनता यावं. थोडसं तरी त्यांच्यातलं काही आपल्याला साध्य करता यावं असं खूप तीव्रतेनं वाटत असे. तेवढय़ात एक वाक्य वाचनात आलं.

'या जगात भीती घालविण्याचा एकच मार्ग आहे. ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीला मुद्दाम फेस करा. सामोरे जा. वारंवार ती गोष्ट करा. मेलो तरी चालेल या जिद्दीनं सामोरे जा.' हे वाक्य मनाला भिडलं. कुणाचं होतं ते आठवत नाही. पण माझे प्रयोग सुरू झाले.

पहिला प्रयोग वडिलांबाबत. त्यांच्यासमोर मुद्दाम उभं राहायचो. त्यांचं लक्ष गेलं, की, ''काय रे, काय काम आहे?'' करडय़ा आवाजात ते विचारायचे. ''काही नाही,'' माझं उत्तर. चारपाचदा असं घडल्यावर त्यांचा स्वर खाली आला. मृदू आवाजात त्यांनी विचारलं, ''का रे, तुला काही हवं कां? काही बोलायचं आहे कां?'' त्यांचा तो मृदू आवाज ऐकताच मला वाटलं मी जिंकलो. ''काही नाही'' म्हणून निघून आलो. पण त्या दिवसापासून वडिलांविषयीची भीती मात्र कमी झाली. माझा उत्साह वाढला. मी वर्धेला सायन्स कॉलेजमध्ये शिकायचो. 1971-72 सालची गोष्ट. त्या काळात कॉलेजमध्ये मुलंमुली एकमेकांशी बोलत नसत. कॉलेज सुटलं, की मुलं मुलींना खूप त्रास देत. टॉण्टिंग करणं, फुलं, कागदी बाण फेकून मारणं, कधी सायकली आडव्या घालणं सर्रास चालायचं. सारे तरुण शम्मी कपूर वा जितेंद्रची अवलाद बनून वावरायचे. अशा वातावरणात मी एक शामळू, खादी घालणारा, मान खाली घालून चालणारा मुलगा म्हणून असेल कदाचित. पण एक दिवस आमचा वर्ग सुटल्यावर अचानक चारपाच मुलींचा घोळका समोर आला. मला म्हणाला, ''तुमची प्रॅक्टिकलची वही देता कां? आम्हांला काही प्रॅक्टिकल्स पूर्ण करायचे आहेत.'' मी घाबरलो. हडबडून ''हो'' म्हणाले. माझा गोंधळ उडाला. वही हातात घेतली; पण माझा हात एवढा थरथर कापू लागला, की मुलींच्या हातात ती जाण्याआधीच खाली पडली. सारे खो-खो हसू लागले. मुलीही हसल्या. मुलांनी खूप टिंगल केली. मला खूप वाईट वाटलं. मी फेस करण्याचा प्रयोग करायचं ठरवलं. पण जमेना. रोज ठरवायचो. 5-6 दिवस निघून गेले. एक दिवस एक मुलगी एकटी सापडली. वर्गातून बाहेर पडताना तिला म्हटलं, ''एक्स्क्यूज मी!'' ती थांबली. शांतपणे म्हणाली, ''काय काम आहे?'' मला सुचेना! आता काय म्हणावं? एवढं म्हणण्यासाठीच 5-6 दिवस लागले होते. मी म्हणालो, ''काही नाही, थॅक्स. जा.''आणखी दोनतीन मुलींबाबत हाच प्रयोग रिपीट केला. मुलींना कळेना काय प्रकार आहे. 'एक्स्क्यूज मी' म्हणतो, थांबवतो; जा म्हणतो.त्यांच्यात चर्चा सुरू झाली. पण तिथून दीडदोन वर्षानंतर मी जयप्रकाश नारायणांच्या तरुणशांती सेनेचा वर्धा जिल्हा संघटक होतो आणि मी

मुलांबरोबरच मुलींशीही छान संवाद साधू शकत असे. मोकळेपणानं बोलू शकत असे.

पुढे जयप्रकाशाजींचं आंदोलन प्रखर झालं. मीही देशभर हिंडू लागलो. आणीबाणी लागण्याच्या काही दिवस आधीची गोष्ट. मी बर्‍यापैकी निर्भय झालो होतो. 'हमला चाहे जैसा हो, हाथ हमारा नहीं उठेगा' असले नारे द्यायचो. संघटनेचं राज्यपातळीरचं नेतृत्व करण्याची जबाबदारी पेलत होतो. एकदा खेडय़ावर जावं लागलं. ट्रेन उशिरा पोहोचली. त्यामुळं स्टँडवर उशिरा पोहोचलो. 4 कि.मी.पर्यंत पायी जायचं. रात्रीची वेळ. मधे आमराई. त्यात एक पडकी विहीर. तिथे खूप भुतं असतात असं ऐकलेलं. मला दहाव्या वर्गात असताना भूत लागलेलं - ते मांत्रिकानं उतरवलेलं - मी प्रचंड घाबरलेलो. स्वत:ला बजावलं 'कितीही भुतं लागली तरी घाबरून पळून जायचं नाही. मोठय़ा मांत्रिकाकडे जाऊ.सारी भुतं काढून घेऊ; पण पळून जायचं नाही..'

अंधारी रात्र. निर्मनुष्य रस्ता. काळोख. रातकिडय़ांचा आवाज.. विहीर ओलांडता ओलांडता नकळत मी सुसाट पळत सुटलो. लक्षात आले आपण घाबरून पळतो आहे. थांबलो. परत आलो. विहिरीच्या कठडय़ावर बसलो. छाती धडधडत होती. भीतीनं शरीर थरथरत होतं. किती वेळ बसलो माहीत नाही. पण शरीराचं थरथरणं थांबलं. हृदयाची घरघर थांबली. भूतही लागलं नाही. (त्या वेळी या जगात भूत नसतं हे माहीत नव्हतं. कुणाच्या तोंडून ठामपणे तरी ऐकलंही नव्हतं) बस्स! तो भीतीचा शेवटचा दिवस. त्यानंतर कधीही भीती वाटली नाही. नाहीतर रोज हाणामारीचे जीवघेणे प्रसंग झेलत अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम एवढय़ा निर्भयपणे उभारताच आलं नसतं. 'ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट प्रत्यक्ष करा. फेस करा' याचा वापर करत मी माझी सगळ्या प्रकारची भीती घालवली. पण सगळ्यांनाच असं फेस करणं जमत नाही. मग, गणपतरावांना मी काय शिकवलं.. बेडवर पडल्या पडल्या.. संमोहनात गेल्यावर.. कल्पना करा, डोळ्यासमोर व्हिज्युएलाईज करा.. मी (गणपतराव) बसमधून उतरतो आहे. स्टँडवरून निर्भयपणे पायी चालत घरी जातो आहे. आजूबाजूला कुत्री आहेत. पण त्यांच्या समोरून अतिशय आत्मविश्वासानं निर्भयपणे चालतो आहे. ती भुंकताहेत.. तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत, निर्भयपणे कुर्त्यांकडे पाहत ठामपणे चालतो आहे. निर्भयपणे घरी पोहोचतो आहे. 0 मी नेहमी असाच निर्भयपणे, कुत्री असतील नसतील तरी, आत्मविश्वासानं चालत येतो-जातो. दिवसेंदिवस माझ्या मनातील कुर्त्यांची भीती निघून जाते आहे आणि मी अधिकाधिक निर्भय बनतो आहे.

दृश्यमालिका पाहिल्यानंतर वरील दोन सूचना अनेकदा रिपीट करायच्या. रोज दिवसांतून दोनतीनदा सराव करायचा. दीड महिन्याच्या सरावात गणपतरावांना आतून वाटायला लागलं, आता आपण पूर्वीसारखं कुर्त्यांना घाबरत नाही. त्यांनी हिंमत केली. प्रत्यक्ष स्टँडवरून घरी पायी चालत आले. जमलं. त्यांना खूप आनंद झाला. मला फोन आला. ''सर, मी घरी पायी चालत आलो. कुत्रे भुंकले. थोडीशी भीती वाटली; पण जमलं.'' मी म्हणालो, ''रोज सराव सुरू ठेवा. पण प्रत्यक्ष पायी येत-जात जा!''

15 दिवसांनी गणपतरावांचा पुन्हा फोन आला, ''सर, गेले 15 दिवस मी रोज पायी येतो-जातो. आज तर मोटारसायकलने शाळेवर गेलो-आलो.''

मी त्यांचं अभिनंदन केलं. ते पुढे म्हणाले, ''सर, मी गळ्यातला तो ज्योतिष्याचा ताईत काढून फेकला.'' मी पुन्हा अभिनंदन केलं. म्हणालो, ''आता तुम्ही खरे निर्भय झाला आहात!''

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्घा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.) भ्रमणध्वनी - 9371014832

Saturday, 11 August 2012

कल्पना व अंतर्मनाच्या सामर्थ्यावर भाषणशैलीची समृद्धी


कल्पनाचित्र निर्माण करण्याचे, तर्ळीरश्रळीश करण्याचं मनाचं अद्भुत सामर्थ्य आपण गेल्या शनिवारी समजून घेतलं. यात काही लोकांना करश्रश्र्रीलळपरींळेपी होतात. हे कल्पनेतील जिवंत अनुभव असतात. मनाला सत्य अनुभव आणि हे कल्पनेतील अनुभव असा फरक करता येत नाही. यामुळे दीर्घकाळापासून माणूस याला आधिभौतिक, पारलौकिक अनुभव मानत आला आहे. कळत नकळत यामुळं माणसाची फसवणूक झाली आहे.

पण आधुनिक काळात मात्र याच तर्ळीरश्रळीरींळेप सामर्थ्याचा उपयोग अनेक विधायक कामासाठी करण्याचं तंत्र माणसानं विकसित केलं आहे.

माणसाच्या मनाचे, चळपव चे दोन भाग मानले जातात. एक बाह्य मन, उेपीलर्ळेीी चळपव. हे विचार करण्याचं, तर्क, विश्लेषण, भाषा, लेखन, गणित करण्याचं सामर्थ्य असणारं मन. याविषयी आपल्याला पूर्ण जाणीव असते. सार्‍या शरीराचं जाणीवपूर्वक हे नियंत्रण करत असतं. साधारणत: आपल्या एकूण मनाच्या दहापैकी एकपट भाग या मनानं व्यापला असावा असं मानलं जातं.

दुसरं अंतर्मन, र्डीललेपलर्ळेीी चळपव यामध्ये कल्पना करण्याचं तर्ळीरश्रळीश करण्याचं, प्रतिमा पाहण्याचं, ओळखण्याचं सामर्थ्य असतं. एकूण मनाच्या दहापैकी नऊ भाग एवढा मोठा व्याप हा मनाचा आहे असं मानलं जातं. याच मनात लहानपणापासून आपल्यावर झालेले संस्कार, नीतिमूल्य, अनुभूती, विचार करण्याची पद्धती प्रोग्राम झाली असते, रेकॉर्ड झाली असते. हे प्रोग्रामिंग म्हणजेच आपलं व्यक्तिमत्त्व. यातूनच आपला स्वभाव, कृती, भावना, अनुभव घेण्याची प्रक्रिया व विचार करण्याची (सवयीनं) प्रक्रिया निर्माण होत असते.

आता हे मन कुठं असतं? ''हाय मेरा दिल'' असं म्हणताना आपण हृदयावर हात ठेवतो व प्रेम तिथं आहे, 'तुम मेरे दिल मे बसी हो' असं दाखवतो. पण तिथे फक्त रक्ताभिसरण करणारं हृदय असतं. प्रेम वाटणारं, फील करणारं मन हे मेंदूत असतं. खरं म्हणजे माणसानं प्रेम दाखवताना डोक्यावर हात ठेवायला हवा, हृदयावर नव्हे.

मेंदूत चालणारी कार्यप्रणाली म्हणजे मनर्. ीपलींळेपळपस ेष ींहश इीरळप ळी उरश्रश्रशव चळपव ही मनाची वैज्ञानिक व्याख्या आहे. आणि या मनात जे जे रेकॉर्ड झालं आहे, जे जे प्रोग्राम झालं आहे ते म्हणजे आपलं व्यक्तिमत्त्व. यातील काही गोष्टी आपल्या नकळत निर्माण होतात. काही गोष्टी आपण प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक निर्माण करतो. एकूण व्यक्तिमत्त्व कसं निर्माण होतं ते आपण पुन्हा कधीतरी पाहू. आता अंतर्मनाच्या र्डीललेपीलर्ळेीी चळपव च्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करू.

आपण एखादी नवी कला, कौशल्य कसं प्राप्त करतो? भाषण कला शिकायची आहे. कसं शिकतो आपण? माझ्या अनुभवापासून सुरुवात करतो. आपल्यापैकी प्रत्येक जण बालवयात बोलणं सहजतेनं शिकतो. आई-वडील, लोकांकडून सहजतेनं वय वाढीसोबतच भाषा-बोलणं आत्मसात करतो. इतरांशी आपण बोलतो, भांडतो, गप्पा मारतो, अनुभव सांगतो. यात काही कठीण वाटत नाही.

पण पन्नास-शंभर लोकांसमोर माईकवर उभं राहून बोलायला सांगितलं तर?

मला वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत असं मोठय़ांपुढे बोलता येत नसे. वर्गात शिक्षकांनी प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर देण्याची हिंमत होत नसे. कधी प्रयत्न केला. तेव्हा हातपाय थरथर कापायचे. शब्द सुचायचे नाहीत. तोंडातून धड वाक्यच बाहेर पडायचे नाहीत. बहुतेकांची अशीच अवस्था होते.

वयाच्या 19 व्या वर्षी मी जयप्रकाश नारायण यांच्या तरुण शांतिसेना नामक, तरुणांच्या संघटनेत अपघातानं सामील झालो. त्यावेळी 'शिक्षणात क्रांती' नामक आमचं आंदोलन सुरू होतं. माझे ज्येष्ठ सहकारी, अशोक बंग, दीपमाला कुबडे वगैरे कॉलेजा कॉलेजात जाऊन भाषणं देत असत. मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत असे. गेली दोन वर्षे आचार्य दादा धर्माधिकारी, प्राचार्य राम शेवाळकर, नारायणभाई देसाई, आचार्य राममूर्ती असल्या दिग्गज माणसांची, वक्त्यांची भाषणं ऐकत होतो. आधीही बाबासाहेब पुरंदरे, विद्यावाचस्वती विष्णूजी क्षीरसागर, रामचंद्र घंगारे यांची भाषणं ऐकली होती. बालपणात आचार्य विनोबा भावेंची बरीच भाषणं ऐकली होती. पण मला बोलता येत नाही याची दु:खद जाणीव होती.

वध्र्याच्या सायन्स कॉलेजमध्ये असताना माझा वर्गमित्र शिरीष गोपाळ देशपांडे आणि पेंडसे सरांची मुलगी छान बोलायचे. वादविवाद स्पर्धेत बक्षीस मिळवायचे. मला सारखं वाटायचं यांच्यासारखं मला बोलता आलं पाहिजे.

एक दिवस आम्ही वध्र्याहून आर्वीला बसने जाताना अशोक बंगने आदेश दिला ''श्याम आज तुला प्रस्तावना करायची आहे. 24 मिनिट तरी बोलायचं आहे.''

माझा सारा प्रवास अतिशय टेन्शनमध्ये गेला. 'काय बोलायचं' याचीच तयारी प्रवासात मी करत होतो. आर्वीच्या आर्ट्स-कॉमर्स कॉलेजच्या दीडशे-दोनशे मुलांपुढे माझं पहिलं 5 मिनिटांचं भाषण झालं. छाती धडधडत होती, हातपाय थरथर कापत होते. पण काही तरी बोललो. ''छान! छान बोललास! पुढच्या वेळेस अधिक चांगली तयारी करून बोल.'' अशी शाबासकीची थाप अशोक बंगने दिली आणि मला बळ मिळालं. वक्तृत्व कसं शिकायचं? चांगली तयारी कशी करायची? माहीत नव्हतं. कुणी सांगितलं नव्हतं. कुणाला विचारण्याची हिंमतही झाली नाही. पण आमचे प्रशिक्षक आचार्य दादा धर्माधिकारी अतिशय उत्तम, अप्रतिम वक्ते होते. त्यांची अनेक भाषणं ऐकली. ते नेहमी बोलताना समोर चिटोरा ठेवत असत. मी त्यांना खूप प्रश्न विचारायचो. एवढे विद्वान गृहस्थ. पण कधीही माझा उत्साह त्यांनी भंग केला नाही. माझ्या बर्‍यावाईट प्रश्नांनाही ते मनापासून उत्तरं देत असत. ''तुम्हे एवढे मोठे वक्ते आहात तरी समोर चिठ्ठी कां ठेवता?'' माझा प्रश्न.

''दर भाषणाच्या आधी मी ठरवतो. काय बोलायचं, किती वेळ बोलायचं. कोणत्या मुद्यांना अधिक प्राधान्य द्यायचं. भाषणाला नीट शिस्त यावी याकरिता चिठ्ठी उपयोगी पडते,'' दादांचं उत्तर.

खरं म्हणजे तेव्हा जर मी हिंमत करून विचारलं असतं की भाषणाची तयारी कशी करावी? उत्तम वक्ता असं बनावं? तर.. दादांनी नीट मार्गदर्शन केलं असतं. कदाचित पुढे माझे प्रचंड परिश्रम वाचले असते.

मग माझी तयारी सुरू झाली. एखाद्या विषयावरचं भाषण तयार करताना भरपूर वाचायचं. त्याचे मुद्दे निवडायचे. जेवढा वेळ भाषण द्यायचं तेवढय़ा वेळेचं अख्खं भाषण लिहून काढायचं. ते बोलण्याच्या भाषेत लिहायचं. मोठमोठय़ानं वाचायचं. पुन्हा पुन्हा लिहिलेलं भाषण दुरुस्त करायचं. लिहिलेलं भाषण जमलं असं समाधान झालं की ते भाषण एका बंद खोलीत मोठमोठय़ानं म्हणायचं. जाहीर सभेत भाषण देतो आहे या आविर्भावानं खुल्या आवाजात भाषण द्यायचं. खुपदा सराव झाला की मग त्या भाषणाचे शॉर्ट पॉईन्ट्स काढायचे. ते समोर ठेवून असंच बंद खोलीत भाषण गायचं. मग पुढे प्रत्यक्ष लोकांपुढे भाषण द्यायचं.

पुढचं काम माझ्यासाठी सोप होतं. तरुण शांतिसेनेची चळवळ सुरू होती. शिबिरांमध्ये, कॉलेजमध्ये भरपूर बोलण्याची संधी मिळत असे. पुढे मी वध्र्याच्या यशवंत महाविद्यालयात आर्ट्स विषयात दाखल झालो. डिबेटिंग सोसायटीचा अध्यक्ष या नात्यानं भरपूर कार्यक्रम आयोजिण्याची संधी मिळाली. स्वत:ही कष्टसाध्य पद्धतीनं वक्ता बनलो आणि इतर अनेक सहकार्‍यांमधून वक्ते घडवले. जोपर्यंत आपण 25-50 मोठय़ा सभांमधून यशस्वीपणे बोलत नाही तोपर्यंत आपण आत्मविश्वासानं छान बोलू शकतो असा आत्मविश्वास निर्माण होत नाही. याला 'सभाधैर्य' प्राप्त करणं म्हणू या.

जेव्हा आपण प्रत्यक्ष 100-200 माणसांपुढे यशस्वीपणे, आत्मविश्वासानं बोलतो तेव्हा तो अनुभव आपल्या अंतर्मनात रेकॉर्ड होतो. या पद्धतीचे 25-50 वेळा भाषण देण्याचे अनुभव आपल्या अंतर्मनात प्रोग्राम झाले की ती आपली 'सवय' बनते. ''आपल्या अंतर्मनात एखादी गोष्ट वारंवार, वारंवार प्रोग्राम झाली की तिचं रूपांतर सवयीत होतं,'' हा एक आपल्या अंतर्मनाचा महत्त्वाचा नियम आहे. अशा आपल्या सवयी निर्माण होतात. कोणतंही कौशल्य आत्मसात करणं म्हणजे त्या कौशल्याची सवय अंतर्मनात निर्माण होईल एवढा वेळ त्या गोष्टीचा अचूक सराव करणं.

सराव अचूक असायला हवा. चुकीचा सराव प्रोग्राम झाला तर सवयही

डिफेक्टिव्ह निर्माण होईल.

मी आधी डिबेटर म्हणून कॉलेजमध्ये व्याख्यानाला जायचो. नंतर वक्ता म्हणून जायचो. त्या काळी 1974 ते 1990 या काळात कॉलेज विद्यार्थी कधीही भाषणं शांतपणे ऐकायचे नाहीत. येनकेनप्रकारे वक्त्यांना पळवून लावण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. पण माझ्या आयुष्यात कधीही कुणाला माझं भाषण उधळता आलं नाही. उलट भाषण उधळण्यासाठी आलेल्यांनाच मी भाषणात गुंगवून टाकायचो. त्यातूनच अनेक कार्यकर्ते सापडले आहेत.

पण समजा अशा अशांत वातावरणात दोन-चार सभा जरी विद्यार्थ्यांना उधळता आल्या असत्या तर मनात भीती निर्माण झाली असती. या भयप्रद अनुभवाचा परिणाम असा झाला असता की वक्ता म्हणून पुन्हा उभं राहिलो नसतो वा चुकीचं प्रोग्रामिंग झाल्यामुळं वाईट, अर्धवट, घाबरट बनलो असतो.

आता मी चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळं मला बोलण्याची सहज संधी मिळायची.

पण सामान्य माणसाला 25-50 भाषणं देण्याची संधी कधी मिळणार? किती वर्ष लागणार?

आज 200 माणसांसाठी भाषण आयोजित करायचं म्हटलं तरी हॉलभाडे, जाहिरात, इतर व्यवस्था खर्च असा मिळून किमान 15 ते 35 हजार रुपये खर्च येतो. पन्नास सभांसाठी 8-12 लाख रुपये खर्च शिवाय एवढा खर्च करून लोक भाषण ऐकायला येतीलच याची खात्री नाही. मग..

वक्ता कसं बनायचं?

मी सांगितलं त्याप्रमाणं सुरुवातीला भाषणाची तयारी करायची. एकदा भाषणाची पूर्वतयारी झाली, भाषण तयार झालं की सभाधैर्यासाठी नव्या तंत्राचा वापर करायचा.

संमोहनाचा वा मेडिटेशनचा वापर करून अल्फा रिदमच्या अवस्थेत जायचं. घरी बेडवर पडल्या, पडल्या कल्पना (तर्ळीरश्रळीश) करायची, ''आपण एका मोठय़ा नाटय़गृहात भाषण देतो आहोत. नाटय़गृह प्रेक्षकांनी खचाखच भरलं आहे. आपण उत्तम बोलतो आहोत. प्रेक्षक तन्मयतेनं ऐकताहेत.. टाळ्या वाजवताहेत.. यशस्वीपणे, अचूकपणे भाषण देतो आहे.. असं नीट व्हिल्युअलाईज करायचं.''

या पद्धतीनं 5-10 भाषणं वेगवेगळ्या नाटय़गृहात. काही मोठय़ा मैदानात.. पन्नासावं भाषण मुंबईच्या शिवाजी पार्कात.. लाखभर लोकांसमोर.

हा पन्नास वेळा अंतर्मनाला झालेला काल्पनिक अनुभवसुद्धा अंतर्मनात प्रोग्राम होतो. त्याची सवय निर्माण होते. पुढे प्रत्यक्ष लोकांपुढे बोलताना सहज जमतं. आत्मविश्वास वाढतो आणि कमी खर्चात, पण मनाचा सराव उत्तम करून चांगलं 'सभाधैर्य' निर्माण करता येतं. नवी सवय निर्माण होते. आत्मविश्वासानं बोलण्याची.

याप्रमाणं तर्ळीरश्रळीरींळेप तंत्राचा वापर करून काय काय करता येईल?

(लेखक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन

समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

भ्रमणध्वनी - 9371014832

Friday, 3 August 2012

मनाचं सामर्थ्य जेवढं विधायक तेवढंच धोकादायक


मनाचा खेळ अद्भुत आहे. मानवीजीवनाच्या इतिहासात तो दीर्घकाळ अनाकलनीय होता. मानवप्राण्याची मूळ भाषा पाच इंद्रियांची. पाहणं, ऐकणं, स्पर्श, वास, चव या पाच इंद्रियांच्या अनुभव माध्यमानं आपण सारं जग समजून घेतो, ज्ञान प्राप्त करतो. आपण जे पाहतो त्याची प्रतिमा आपल्या मेंदूत उमटते. आपली इच्छा असेल तेव्हा ही मेंदूत उमटलेली प्रतिमा पुन्हा पाहता येते. याचाच आधार घेऊन मानवजातीला भाषा निर्माण करता आली आहे. समजा घोडा प्रत्यक्ष पाहिला. घोडय़ाची प्रतिमा मेंदूत प्रतिबिंबित झाली. त्याला माणसानं 'घोडा' या उच्चारासोबत जोडलं. जेव्हा जेव्हा तो घोडा प्रत्यक्ष पाहतो तेव्हा तेव्हा त्याला 'घोडा' हा उच्चार आठवतो. जेव्हा कुणीतरी 'घोडा' असा उच्चार करतो तेव्हा त्याला मेंदूत उमटलेला 'घोडा' प्रत्यक्ष (समोर नसतानाही) दिसतो. प्रत्यक्ष ती गोष्ट, घोडा समोर नसतानाही ती घोडय़ाची प्रतिमा आपण पुन्हा पाहू शकतो. याला आपण आजच्या काळात तर्ळीरश्रळीश करणं, चित्ररूप कल्पनेत पाहणं असं म्हणतो. माणसानं आपल्या याच सामर्थ्याचा उपयोग करून भाषा निर्माण केली आहे.

हे चित्ररूप कल्पनेत पाहणं, तर्ळीरश्रळीश करण्याचं सामर्थ्य प्रत्येक माणसात असतं. बालपणात ते विलक्षण असतं. पण आजच्या सुसंस्कृत व समृद्ध जगात वाढत्या वयासोबत हे तर्ळीरश्रळीश करण्याचं सामर्थ्य कमीकमी होत जातं. डोळ्यापुढे चित्रमालिका उभी करण्याचा प्रयत्न केला तर काही लोकांना चित्रमालिका कल्पनेत दिसत नाही. काही लोकांना कल्पना केल्यावर चित्रमालिका प्रत्यक्ष दिसते आणि काही लोकांना तर ही चित्रमालिका अतिशय जिवंत दिसते. प्रत्यक्ष अनुभव घेतल्यासारखी वाटते. इतकी की कल्पना व प्रत्यक्ष यातील फरकही करता येत नाही. माणसाच्या मनाच्या या सामर्थ्यानं दीर्घकाळापासून माणसाला भुरळ घातली आहे आणि कोडंही घातलं आहे. रोज रात्री आपण सात-आठ तासांच्या झोपेत 30 मिनिटांपासून ते 150 मिनिटांपर्यंत स्वप्न पाहत असतो. प्रत्येक जण रोज स्वप्न पाहतच असतो. स्वप्न पाहताना ती आपण जगत असतो. त्या क्षणी ती आपल्याला 100 टक्के खरीच वाटत असतात. खडबडून जागं झाल्यावर आपल्या लक्षात येतं, अरे, 'हे खरं नव्हतं हे तर स्वप्न होतं.' पण मनुष्यजात मात्र दीर्घकाळ स्वप्नांना खरं मानत असे. त्यांना वाटत असे आपला आत्मा प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेला होता, भटकून त्या पद्धतीचा अनुभव घेऊन तो शरीरात पुन्हा परत आला. माणसानं वेगवेगळ्या प्रार्थनेच्या, मनाच्या एकाग्रतेच्या प्रक्रिया शोधल्या. त्यांचा संस्कृती, धर्म, आराधना इत्यादींच्या नावाने वापर केला. त्यात नवेनवे प्रयोग केले. त्यातून वेगवेगळ्या मेडिटेशनच्या प्रक्रिया विकसित केल्या आणि त्याला अद्भुत खजिन्याचा शोध लागला. मनाच्या विशिष्ट अवस्थेत त्याला अधिक चांगली दृश्य मालिका दिसते. एरव्ही जागृत अवस्थेत जे दिसत नाही, कल्पना केल्यावरही दिसत नाही ते मात्र मेडिटेशनद्वारा विशिष्ट अवस्थेत गेल्यावर दिसतं. जिवंत दृश्य अनुभव घेतल्यासारखं दिसतं म्हणून याला आधिभौतिक, पारलौकिक अनुभव मानणं स्वाभाविकच होतं. स्वप्नांमध्ये सलगता नसते, प्रतिमा सारख्या बदलत असतात. अनेकदा स्वप्नांमध्ये प्रतिमा बदलत जाते, पण विचार मात्र तोच असतो. प्रतिमांशी न जुळणारा असतो. हा स्वप्नांचा अनुभव घेणार्‍या माणसाला हे मेडिटेशनमधलं तर्ळीरश्रळीरींळेप खूप प्रभावित करून घेतं. हे वरच्या दर्जाचं अनुभूतीचं क्षेत्र आहे असं त्याला वाटू लागलं. हे तर्ळीरश्रळीरींळेप त्याला खरी अनुभूती वाटू लागली. हजारो वर्षापासून, धर्माच्या उदयाच्या आधीपासून मानवजातीला या आधिभौतिक, पारलौकिक अनुभूतींनी झपाटून टाकलं. आपण आता एकविसाव्या शतकात जगत आहोत. विसाव्या शतकात या क्षेत्रात खूप अभ्यास झाला. सगळेच विषय वैज्ञानिक शिस्तीनं तपासायचे, त्यात काटेकोर संशोधनं करून निखळ सत्य स्वीकारायचं या सवयीमुळं याही क्षेत्रात संशोधने झालीत. त्यात गवसलेलं सत्य मी तुमच्यासमोर मांडत आहे. मन एकाग्र करणारी प्रक्रिया वापरली आणि एकाग्र अवस्थेत माणसाचं शरीर आणि मन पुरेसं रिलॅक्स झालं की माणूस अल्फा रिदम्च्या अवस्थेत जातो. म्हणजे त्याच्या मेंदूचे ए.ए.ऋ. तपासले तर या अवस्थेत ते 8 ते 12 सायकल्स परसेकंद असतात. प्रार्थना, मेडिटेशन, संमोहन, आराधना, भजन, कीर्तन या कोणत्याही माध्यमाद्वारे ही अवस्था माणूस गाठू शकतो. या अवस्थेत असल्यानंतर साधारणत: 50 ते 60 टक्के लोकांना उत्तम होतं आणि यातील 25 ते 35 टक्के लोकांना उत्तम करश्रश्र्रीलळपरींळेप (भ्रम) होतं, होऊ शकतं. तर्ळीरश्रळीरींळेप होणार्‍यांना आपण दृश्य मालिका पाहत आहोत असं दिसतं. तर करश्रश्र्रीलळपरींळेपी होणार्‍यांना जी दृश्य मालिका दिसते त्यासोबत त्यांना ऐकू येतं, वास येतो, स्पर्श जाणवतो, चवही येते. पाचही इंद्रियांचे अनुभव येतात. विशेष म्हणजे आपण प्रत्यक्ष तो अनुभव जगत आहोत असं त्यांना वाटतं. मी उदाहरणाच्या माध्यमातूनच हा मुद्दा अधिक स्पष्ट करतो. 1983 सालची गोष्ट. 1982 सालच्या डिसेंबर महिन्यात मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावे चळवळ सुरू केली. त्या वेळी मी पत्रकार होतो. माझा एक पत्रकार मित्र अशोक एकबोटे याने गोव्यात 10 अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमांचा दौरा आखला. त्या वेळी तो गोव्यातील महाराष्ट्र शासनाच्या परिचय केंद्रात अधिकारी म्हणून काम करीत होता. या आयोजनात त्याने काही डॉक्टर्स, प्राध्यापक यांना जोडून घेतलं होतं. पणजीतील 'बीडीएस' मेडिकलचे खूप विद्यार्थी-विद्यार्थिनी या दौर्‍यात सहभागी झाले. गोवा अंधश्रद्धांबाबत खूपच संवेदनशील प्रदेश आहे. छोटसं राज्य. सारा प्रदेश ढवळून निघाला. प्रचंड ताणतणावाखाली हा दौरा पार पडला. पुढे वर्षभर या दौर्‍याच्या क्रिया-प्रतिक्रिया गोव्यातील वृत्तपत्रांतून उमटत राहिल्या.

या 'बीडीएस'च्या तरुण विद्यार्थ्यांशी छान गट्टी जमली. माझ्या भाषणात 'संमोहनात अशा अनुभूती घेता येतात,' असा उल्लेख प्रत्येक भाषणात व्हायचा. सगळी तरुण मुलं मागे लागलीत म्हणून त्यांच्यावर संमोहन-प्रयोग करायचं असं आम्ही ठरविलं. तोवर माझा संमोहनशास्त्राचा थिअरॉटिकल चांगला अभ्यास होता, पण मी फारसे कुणावर प्रॅक्टिकल्स केले नव्हते. पण माझ्या 'देखा जायेगा' स्वभावाप्रमाणं प्रयोग करायचा निर्णय घेऊन टाकला. 40-50 तरुण मुलं-मुली आणि चार वयस्क मोठी माणसं या कार्यक्रमात सहभागी झालीत. त्यातील 20-25 मुलं-मुली व हे चार ज्येष्ठ नागरिक खोल संमोहनात गेले. बाकीच्यांना मी संमोहनातून बाहेर काढून प्रेक्षक बनवलं. (हे चारही ज्येष्ठ नागरिक अध्यात्माचा खूप अभ्यास करणारे होते. नियमित मेडिटेशनचा सराव करणारे होते, पण त्यांना आध्यात्मिक अनुभूती मात्र आल्या नव्हत्या. म्हणून आग्रहानं ते या प्रयोगात सामील झाले होते.)

बाकी तरुण मुलांवर मी प्रयोग सुरू केले. त्यावेळच्या स्वप्नसुंदरी हेमामालिनीच्या बंगल्यावर मुला-मुलींना पाठवलं. हिमालयात घेऊन गेलो, अंतराळात भटकवून आणलं. म्हणजे ते खोल संमोहनात असताना ''तुम्ही आता हेमामालिनीच्या बंगल्यात शिरता आहात. ती हसतमुखानं तुमचं स्वागत करीत आहे, हस्तांदोलन करीत आहे.. वगैरे..'' शब्दांमध्ये मी वर्णन केलं. ज्येष्ठ लोकांना

हेमामालिनीच्या बंगल्यावर पाठविणं योग्य नाही आणि त्यांना आध्यात्मिक अनुभूतीची ओढ आहे म्हणून त्यांना सांगितलं की आता तुम्ही ''बाळ कृष्णांच्या गोकुळात पोहोचला आहात. बाळकृष्ण रांगत रांगत तुमच्या मांडीवर येऊन बसले आहेत. त्यांचे हात दुधादह्यानं माखले आहेत. ते तुमच्या तोंडात दूधदही घालताहेत.. बाळकृष्णांसोबत तुम्ही खेळता आहात.. बाळकृष्णांसोबत तुम्ही आहात..'' असं म्हणून मी त्यांना सोडून दिलं. इतर तरुणांवर वेगवेगळे प्रयोग करू लागलो. तीन तासांचा कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांना मी अनुभव विचारू लागलो. माझ्या डायरीत नोंदवू लागलो. मी शब्दांत बोललो ते सगळ्यांनाच प्रत्यक्ष दिसलं, पण प्रत्येकाचा अनुभव वेगळा होता. एका तरुणाला आंघोळ करून टॉवेल गुंडाळून बाहेर आलेली ओलेती हेमामालिनी दिसली. त्याला लक्स साबणाचा वासही आला. दुसर्‍या एकाचं मध्येच आलेल्या धर्मेद्रशी भांडण झालं. मारामारी होता होता वाचली. हेमामालिनीनं या तरुणाची बाजू घेतली म्हणून तणतणत धर्मेद्र बाहेर गेला.. वगैरे..

चार ज्येष्ठांना मी अनुभव विचारला. एकाचे बाळकृष्ण रांगतेच राहिले. दुसर्‍याचे भगवद्गीतेपर्यंत पोहोचले. तिसर्‍याचे रासक्रीडेत रमले.. वगैरे. शेवटी मी विचारलं, ''हे अनुभव खरे होते का?'' यावर सगळी मुलं-मुली गंभीर होऊन म्हणाली, ''सर, आम्ही जे पाहिलं, अनुभवलं ते 100 टक्के खरं होतं असं वाटतं, पण पणजीतल्या एका हॉलमधून एवढय़ा कमी वेळात आम्ही मुंबईत- हेमामालिनीच्या बंगल्यावर, हिमालयात, अंतराळात कसं जाऊ शकणार? हा तार्किक विचार केल्यानंतर असं वाटतं की हे तुम्ही सांगता तसं (करश्रश्र्रीलळपरींळेप) भ्रम असावेत. पण आम्ही थोडसं संभ्रमात आहोत. अजूनही हिमालयातील बर्फाळ थंडी जाणवत आहे.. वगैरे.'' चार ज्येष्ठ नागरिक सांगत होते, ''सर, खूपच चांगला अनुभव आला. आम्ही इतके वर्षे मेडिटेशन करीत आहोत, पण कधी बाळकृष्णांचं दर्शन झालं नव्हतं. खूप सुंदर अनुभूती आली.''

एका ज्येष्ठाने मात्र माझ्या भ्रम (करश्रश्र्रीलळपरींळेपी) या शब्दाबद्दल आक्षेप घेतला. ते म्हणाले, ''मानव, याला भ्रम कसं म्हणायचं? अहो, बाळकृष्णांनी माझ्या तोंडात घातलेल्या दह्याची चव अजूनही माझ्या तोंडात रेंगाळत आहे. एवढं अवीट गोडीचं दही माझ्या आयुष्यात यापूर्वी मी कधी खाल्लं नाही.. कुरुक्षेत्रावर अजरुनाला गीता सांगताना भगवान कृष्णांना मी प्रत्यक्ष पाहिलं आहे. गीता सांगतानाचा कृष्णांचा आवाज मी ऐकला आहे. अजून ते शब्द, तो आवाज माझ्या कानात घुमतो आहे.. तरी याला भ्रम कसं मानायचं?'' मला महत्प्रयासानं हे भ्रमच आहेत, असं समजावून सांगावं लागलं. त्या वेळी ठामपणे ते मी सांगितलंही. पण डीप ट्रान्समध्ये जो करश्रश्र्रीलळपरींळेपी चा अनुभव येतो तो एवढा खरा वाटतो, जिवंत वाटतो की त्याला खोटा ठरवणं, भ्रम मानणं शक्य होत नाही हे त्या वेळी माझ्या लक्षात आलं. त्यानंतर मी ठरवून टाकलं. यापुढे संमोहनात कधीही देवाचं करश्रश्र्रीलळपरींळेपी सांगायचं नाही. हेमामालिनीच्या बंगल्यावर एवढय़ा दूर जाणं शक्य नाही. तिच्या बंगल्यावर सिक्युरिटी असते. असा सहज प्रवेश मिळू शकत नाही. हे पटू शकतं. पण देव कुठेही, केव्हाही भक्ताला भेटू शकतो या श्रद्धेमुळं अशा अनुभवांना भक्त भ्रम समजू शकत नाही हे माझ्या तीव्रतेनं लक्षात आलं. त्यानंतर मी पाच हजारापेक्षा जास्त तरुण-तरुणींना डीप ट्रान्समध्ये टाकून त्यांच्यावर प्रयोग केले. त्यांचे अनुभव रेकॉर्ड केले. त्यानंतर गेली 22 वर्षे मुंबईतून महाराष्ट्रभर व्यावसायिक पद्धतीनं ''स्वसंमोहन व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा'' चालवीत आहे. दीड लाख लोकं तरी कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. ''सुंदर बागेत भटकता आहात.. सुंदर पक्षी, फुलं, हरणं, ससे, पिसारे फुलवलेले मोर आहेत.. टूमदार घरात शिरता आहात. हे एक तर्ळीरश्रळीरींळेप आणि समुद्रकिनारी पोहोचलात.. वाळूवर मोठय़ा बलूनला एक सुंदर झोपडी लटकली आहे. त्यात बसून अंतराळात जाता आहात.. समुद्रपक्षी.. पृथ्वीचा सुंदर गोल, चंद्र, मंगळ, गुरू, शनी सगळ्यांजवळून जाता आहात..'' हे दोन्ही अनुभव प्रत्येक कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना देतो. त्यातील निम्मे लोकांना एकतर तर्ळीरश्रळीरींळेप होतं वा प्रत्यक्ष करश्रश्र्रीलळपरींळेपी होतं. अनेकांना हा अनुभव अद्भुत वाटतो. हेलावून टाकणारा, चक्रातून सोडणारा वाटतो, पण हा अनुभव खरा नाही.; हे केवळ भ्रम आहेत असं मी आधीपासून सांगत असल्यामुळं कुणाची फसगत होत नाही.25-35 टक्के लोकांना होऊ शकणारं इतकं खरं वाटतं की, तो भ्रम वाटतच नाही. पाचही इंद्रियांना अनुभव येतो. आपणच प्रत्यक्ष तिथे गेलो, पाचही इंद्रियांनी अनुभवून आलो असं वाटतं.

माणसाच्या मनाच्या या सामर्थ्याचे खूप विधायक फायदेही आहेत आणि चलाख बदमाशांच्या हाती लागलं तर फसवणुकीसाठी वापरलं जाऊ शकणारं प्रभावी हत्यारसुद्धा आहे. कसं? पुढे पाहू.

(लेखक श्याम मानव  अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832

Saturday, 28 July 2012

प्रबोधनकारांचे विचार रावते विसरलेत का?


हे जादूटोणाविरोधी बिल.. आमच्या हिंदू धर्माविरुद्ध आहे. उद्या आम्ही आमच्या घरी भक्तिभावानं, श्रद्धेपोटी सत्यनारायणाची पूजा केली तर तुम्ही म्हणाल तुमचं आर्थिक नुकसान झालं आणि आम्हाला सहा महिने जेलमध्ये पाठवाल. आमचे वारकरी श्रद्धेनं पंढरपूरला पायी जातात. तुम्ही म्हणाल तुमचं शारीरिक नुकसान झालं आणि वारकर्‍यांना जेलमध्ये पाठवाल. सहा महिने ते सात वर्षे. आम्ही भक्तिभावानं दोन तास पूजा केली तर तुम्ही म्हणाल आमचं मानसिक नुकसान झालं आणि तुम्ही आम्हाला जेलमध्ये पाठवाल..!''

एवढय़ात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार गुरुनाथ कुळकर्णी (ते वकीलही होते) उभे राहिलेत. म्हणू लागले, ''अहो रावते, असं या जादूटोणा बिलात काहीही नाही. कुठे आहे ते दाखवा. तुम्ही कुणाच्या आधारावर हे बोलता?''

''तुम्ही गप्प बसा! मला थांबवू शकत नाही. बिलावर आमदाराला बोलता येतं. कितीही बोलता येतं. हा माझा अधिकार आहे. तुमची वेळ येईल तेव्हा तुम्ही बोला. माझं म्हणणं खोडा, पण आता मी बोलणारचं.. असं म्हणत आ. दिवाकर रावते बोलत राहिले. आ. गुरुनाथ कुळकर्णी आणि इतरांनीही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण आ. दिवाकर रावते बोलत राहिले, हे बिल हिंदू धर्मविरोधी आहे असं सांगत राहिले. त्या दिवशी विधानपरिषदेतील त्यांचं हे भाषण अपूर्ण राहिलं. 2006 सालची ही गोष्ट. मुंबईचं अधिवेशन संपलं. अजूनही विधानपरिषदेत आ. दिवाकर रावते हे ऑनलेग आहेत. म्हणजे बिलावर पुन्हा दुसर्‍या अधिवेशनात चर्चा सुरू झाली तर आ. दिवाकर रावतेंच्या बोलण्यापासून त्याची सुरुवात होणार! आ. रावतेंच्या भाषणांच्या बातम्या मोठय़ा प्रमाणावर वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या.'जादूटोणाविरोधी बिल' हा खूप महत्त्वाचा विषय असल्यामुळं महाराष्ट्रभर बातम्या वृत्तपत्र माध्यमातून पसरल्या. पण असं बिलात काहीही नाही. हे मुद्दाम चुकीचं मत मांडलं आहे असं मात्र कुणाही वर्तमानपत्रानं सोबत लिहिलं नाही. याविरुद्ध मत मांडणारं दुसर्‍या कुणाचं भाषणच झालं नसल्यामुळं वृत्तपत्रातून तशी बातमी लोकांपर्यंत पोहोचलीच नाही.सनातन्यांच्या हाती आयतं कोलीत मिळालं. त्यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या दाखवून दाखवून वारकर्‍यांना, धार्मिक लोकांना भडकवलं. हे खोटंनाटं सांगून लोकांना भडकवणं आजही सुरू आहे. सनातन्यांचं मी समजू शकतो. कारण गोबेल्सप्रणीत अफवा पसरविण्याच्या यंत्रणेमध्ये ते तरबेज आहेत. त्यांच्या गुरूंनी त्यांना त्या पद्धतीनं 'ब्रेनवॉश' करूनच जनतेत सोडलं आहे. याची महाराष्ट्र सरकारच्या पोलीस खात्याला व त्यातील 'एटीएस'(अँन्टी टेररिस्ट स्कॉड) ला पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच महाराष्ट्र सरकारनं सनातन संस्था आणि तिचे मुखवटे असणार्‍या संघटनांवर बंदी आणण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. पण या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा प्रखर डोस पाजणार्‍या प्रबोधनकार ( म्हणूनच त्यांना 'प्रबोधनकार' ही पदवी लोकांनी बहाल केली.) ठाकरेंचा वारसा असणार्‍या शिवसेनेच्या (मा. बाळासाहेब ठाकरेंचे ते वडील आहेत) आ. रावतेंनी असा खोटा, चुकीचा, समाजविघातक प्रचार का केला?आ. दिवाकर रावते हे उत्तम संसदपटू आहेत. विरोधी पक्षाचे आमदार म्हणून विधानपरिषदेत अत्यंत लढाऊ पद्धतीनं, लोकांचे प्रश्न जिव्हाळय़ानं लावून धरताना, लोकांसाठी लढताना मी आणि महाराष्ट्रानं पाहिलं आहे.म्हणूनच जेव्हा सामाजिक न्यायमंर्त्यांनी विरोधी पक्षाच्या सहमतीनं हे बिल आणूया, त्यांच्याही सूचनांचा विचार करूया, असं ठरवलं. माझ्यावर काही जबाबदारी सोपवली. तेव्हा 2005 साली सगळय़ात पहिले मी आ. दिवाकर रावते यांना भेटलो. त्यांच्यासोबत छान चर्चा झाली. अंधश्रद्धा निर्मूलन याविषयासंबंधी बोलताना ते म्हणाले, ''अहो मानव, तुम्ही आता हे काम करता आहात, पण मी आधीपासून प्रबोधनकार ठाकरेंसोबत या परिवर्तनाच्या लढाईत सामील आहे. शिवसेनेच्या जन्माआधीपासून माझ्यावर हा संस्कार (प्रबोधनकार ठाकरेंचा) झाला आहे. आमच्यासाठी 'अंधश्रद्धा निर्मूलन' काही नवं नाही.'' त्यानंतर विस्तारानं त्यांच्यासोबत चर्चा झाली. मूळ बिलात बदलासंबंधी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी अतिशय अनुकूल प्रतिसाद दिला. त्यानंतर आ. सुभाष देसाईंशी चर्चा केली. त्यांनीही पहिल्या भेटीत अत्यंत मोलाच्या सूचना केल्या. एवढंच नव्हे, तर. डिसेंबर 2005 मधील अधिवेशनात हे बिल मांडण्याचं ठरलं. कॅबिनेटची सही झाली. बिल छपाईला जाण्याआधी मी आ. सुभाष देसाईंना दाखवलं. त्यांनी सुचवलं.''मानव,'दैवीशक्ती','देवी', 'देव' असे शब्द बिलात ठेवू नका. त्याऐवजी 'अतिंद्रिय शक्ती', 'अतिमानुष शक्ती' असे शब्द वापरा.'' केवळ सुचवलंच नाही तर माझ्यासोबत बसून ते शब्द जिथे-जिथे आहेत तिथे-तिथे आम्ही एकूण दहा बदल केले. त्यानंतर तडक मी कायदा विभागाचे सचिव श्री. शिंदेकरांकडे गेलो. त्यांना आ. सुभाष देसाईंनी सुचवलेले बदल सांगितले. त्यामुळं बिलात फरक पडत नाही. हे त्यांना पटल्यावर त्यांनी हे बिल रात्री 10 वाजता छपाईला पाठवलं. मुख्यमंर्त्यांशी फोनवर ते बोलले. आ. देसाईंनी सुचविलेल्या बदलासंबंधी सांगितलं. मुख्यमंर्त्यांनी संमती दिली. ना. हांडोरेंना सांगण्याची जबाबदारी माझ्यावर आली. कॅबिनेटची सही झाल्यावरसुद्धा 10 ठिकाणी बदल करण्यात आले. पंधरा दिवस आधी मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांच्या वतीनं बिलासंबंधी बोलण्यास मी मातोश्रीवर गेलो होतो. विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी पुढाकार घेतला होता. मातोश्रीवर वेगळंच वातावरण होतं. राज ठाकरे नाराज होऊन बाहेर पडणार अशी बातमी होती. बाळासाहेब ठाकरे फार वेगळ्या मूडमध्ये होते. शिवसेना नेत्यांची, आमदार, खासदारांची सारी धावपळ सुरू होती. त्यामुळं बाळासाहेब भेटू शकले नाहीत; पण त्याही वातावरणात उद्धव ठाकरे अर्धातास बोलले. '' हे काम आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंचं आहे, याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. बिलाच्या मथळ्यात 'अंधविश्वास' हा शब्द होता. ते पाहून ते म्हणाले, 'अंधविश्वास' हा शब्द कशाला ठेवता? मग श्रद्धा, अंधश्रद्धा ही भानगड येते. त्यापेक्षा 'अघोरी प्रथा' हा शब्द वापरा. उद्धव ठाकरेंशी त्या दिवशी नीट बोलणं होऊ शकलं नाही. त्यानंतर सोमवारी भेटायचं ठरलं, पण सोमवारी उद्धवजींचा फोन बंद होता. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन बॉम्ब फोडला होता. शिवसेनेमधलं कुणीच बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हतं आणि मला नागपूर अधिवेशनात पोहोचायचं असल्यानं थांबणं शक्य नव्हतं. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना उद्धव ठाकरेंची सूचना सांगितली. मुख्यमंर्त्यांनी आनंदानं संमती दिली. ''ठीक आहे, बिलाच्या मथळ्यातून 'अंधविश्वास' शब्द काढून टाका. त्याऐवजी 'अघोरी प्रथा' शब्द टाका.'' आणि मग बिलाचं नाव झालं, 'महाराष्ट्र जादूटोणा आणि अनिष्ट व अघोरी प्रथा यांचे समूळ उच्चाटन.' हा सारा इतिहास मी का सांगतो आहे? कारण सगळ्यांच्या सहमतीनं हे बिल संमत व्हावं असा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न होता. कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या सरकारनं हे बिल आणलं. भाजप पक्षानं 100 टक्के संमती दिली. शिवसेनेनं 100 टक्के संमती देण्याआधीच हे बिल सभागृहात मांडून 16 डिसेंबर 2005 साली विधानसभेत संमत झालं. पण तोवर शिवसेनेनं सुचविलेल्या अनेक सूचना या बिलात अंतर्भूत झाल्या आहेत. असं असताना आ. दिवाकर रावतेंनी या बिलाच्या विरोधात सनातन्यांची सुपारी का घेतली? ते सनातन्यांची भाषा का बोलतात? प्रबोधनकार ठाकरेंची भाषा ते विसरले आहेत काय? ते जे आज या बिलासंबंधी खोटंनाटं (होय, जाणीवपूर्वक हा शब्द मी वापरतो आहे) बोलताहेत ते पाहून प्रबोधनकार ठाकरेंच्या आत्म्याला (प्रा. रावते मानतात म्हणून) वेदना होत नसतील का? मला माहीत आहे, आ. दिवाकर रावतेंना बिल चांगलं कळतं. हा त्यांचा गैरसमज नाही. ते मुद्दाम खोटं बोलून बिलासंबंधी अपप्रचार करताहेत. त्यांनी खरं बोलून या बिलाला विरोध करावा, असं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. त्यांनी म्हणावं, परिशिष्टातील 12 कलमांना माझा विरोध आहे. भूत काढण्याच्या नावाखाली छळ होऊन माणसं मेली तरी चालतील, चमत्कारी बाबांनी लोकांना ठगवलं तरी चालेल, जादूटोण्याच्या संशयापायी छळ होऊन माणसं मेली तरी चालतील..वगैरे वगैरे. महाराष्ट्रातल्या सगळ्या सुबुद्ध जनतेला माझं जाहीर आवाहन आहे की, या बिलाला विरोध करणार्‍या सगळ्यांनाच आपण जाहीर धारेवर धरा. आडवेतिडवे प्रश्न विचारा, जाब विचारा, तुमच्याजवळ या बिलाची प्रत नसेल तर ती मी ु.रलरपी.ेीस.ळप(ही अ.भा.अंनिसची साईट आहे) या साईटवर टाकली आहे. तिथून प्रिंट करून ही प्रत मिळवा आणि सनातन्यांचं कारस्थान उधळून लावा. त्यांना या देशात पुन्हा चातुर्वर्ण आणायचा आहे. पुन्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही उतरंड निर्माण करायची आहे. सार्‍या प्रकारच्या अंधश्रद्धा पुन्हा समाजात रुजवायच्या आहेत. पुन्हा मनुस्मृतीचे कायदे या समाजावर लादायचे आहेत. अस्पृश्यतेचं समर्थन करणारीही मंडळी आहे हे लक्षात ठेवा. खोटं वाटत असेल तर 'सनातन प्रभात' वाचा, वर्षभराचे अंक चाळा. म्हणजे याचं खरं स्वरूप तुम्हाला दिसेल. म्हणूनच वारकर्‍यांचं आवरण ओढलेले छुपे सनातनी म्हणतात, ''आम्ही आधी हिंदू आहोत, नंतर वारकरी आहोत. मनुस्मृती चांगली आहे. म. फुले-सावित्रीबाई

फुले यांनी काहीच केलं नाही. या देशात स्त्रियांना स्वातंर्त्य, शिक्षण होतंच. सगळं वाईट

मुसलमानांमुळं झालं आहे. आधुनिक भारतातल्या पुरोगामी महाराष्ट्रात आपण हे चालू द्यायचं का? आजच्या पिढीनं हे ठरवायचं आहे. जादूटोणाविरोधी बिल हे केवळ निमित्त.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे

संस्थापक संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832

Monday, 23 July 2012

सनातनी विचारांच्या विषाची जाणीवपूर्वक पेरणी



गेल्या शनिवारी 'खेळ मनाचा' प्रसिद्ध झाला. मोबाईल खणखणू लागला. या जादूटोणाविरोधी बिलात तर विरोध करण्यासारखं काही नाही. तरी याला विरोध का? असे प्रश्न मला विचारले जाऊ लागले. पुण्याच्या एका कीर्तनकारांनी (ते तोपर्यंत बिलाला सक्रिय विरोध करत होते. फोनवर माझ्याशी दीर्घकाळ चर्चा केली. त्यांच्याजवळ बिलाची प्रत होतीच. त्यातील प्रत्येक मुद्याबाबत बारीकसारीक शंका काढून पूर्ण शंकानिरसन करून घेतलं. नंतर ते मला म्हणाले, ''मानव, तुम्ही छान समजावून सांगितलं. या बिलात विरोध करण्यासारखं काहीही नाही. उलट ते समाजहिताचं आहे. तुम्ही पुढाकार घेऊन सगळ्यांचं शंकानिरसन केलं पाहिजे म्हणजे सगळ्यांचा विरोध मावळेल.''

त्यांचा विरोध प्रामाणिक होता म्हणून त्यांचं समाधान झालं. मला खात्री आहे की, थोडीशीही समाजाविषयी कणव असणारा प्रत्येक प्रामाणिक माणूस या बिलाचं समर्थनच करेल. मग विरोध का? सनातन संस्थेच्या गोबेल्स, गणित, खोटय़ा प्रचाराविषयी मी मागच्या लेखात लिहिलं आहेच. त्यांच्या आक्रमक खोटय़ा प्रचाराला अनेक सरळ धर्मप्रेमी माणसं बळी पडतात आणि काही आपलं राजकारण सिद्ध करण्यासाठी वेड पांघरूण पेडगावला जातात.

आळंदीच्या एका मोठय़ा कीर्तनकारांचे खूप फोन यायचे. मला ते खूप शिव्या घालायचे. आवाजावरनं ते वयस्क कीर्तनकार आहेत हे माझ्या लक्षात आल्यामुळं एरवी कुणाचीही धमकी मुळीच ऐकून न घेणारा मी शांतपणे त्यांचं बांलणं ऐकत असे. शांतपणे त्यांचं शंकानिरसन करण्याचा प्रयत्न करत असे. ''तू हिंदूची औलाद नाही. मुसलमानाची औलाद आहे.'' अशी सुरुवात करणारे ते कीर्तनकार नंतर बरेच शांत होत असत. आळंदीला जाऊन मी त्यांच्यासोबतच चर्चा केली. बिलात काय आहे ते समजावून सांगितले. त्याची प्रत त्यांना दिली. त्यांचा एकच आग्रह मुसलमान.. मुसलमान.. मुसलमान. ते जे बोलत होते ते मी लिहिणं शक्य नाही. कुठलाही 'माणूस' त्याचा उच्चारही करू शकत नाही. म्हणून त्यांचे नाव जाहीर लिहीत नाही. शेवटी मी त्यांना म्हणलो, ''मी वारकरी संप्रदायाला खूप मानतो. तीन पिढय़ांपासून माझं घर वारकर्‍यांचं घर आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज या संतपरंपरेचं धर्मातील अंधश्रद्घा दूर करण्याचं मोलाचं काम करण्यासाठीच मी अ. भा. अंनिसची स्थापना केली. गेली 30 वर्षे ते काम करतो आहे. फक्त कीर्तन माध्यमाचा वापर न करता भाषण माध्यमाचा वापर करतो आहे. मी तुम्हांला, वारकर्‍यांना बापासारखा समजतो. आपला समजतो. म्हणून माझ्यावतीनं मी खूप तळमळीनं तुम्हांला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण जोवर या देशात मुसलमान आहेत तोवर एकही समस्या सुटू शकत नाही. तोवर कोणताही बदल, सुधारणा करता कामा नये असंच तुमचं मत असेल तर आधी या देशातील 22 कोटी मुसलमान मारून टाका. मगच आपण धर्मसुधारणा - अंधश्रद्घा निर्मूलन या विषयासंबंधी बोलू..''

माणसाला सहिष्णुता शिकवणार्‍या वारकरी संप्रदायाचा एखादा समुदाय एवढय़ा विषारी विचारांचा असू शकतो यावर माझा विश्वासच बसेना. पण हे सनातनी विचारांचं विष पेरण्याचं काम गेली अनेक वर्षे सुरू आहे आणि त्यांच्या हाती 'ब्रेन वॉशिंग'सारखं प्रभावी, आधुनिक हत्यार आलं आहे. यासंबंधी नंतर विस्तारानं लिहीनच. पण या बिलासंबंधी मुद्दाम गैरसमज पसरविण्याचं राजकीय कौशल्य कुणाचं? मला पहिल्यांदाच जाहीररीत्या सांगून टाकलं पाहिजे, की भारतीय जनता पक्षाचा या बिलाला संपूर्ण पाठिंबा होता. आजही असलाच पाहिजे. त्यांना विरोध करण्याचा नैतिक अधिकारच नाही. त्या वेळचे भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष नितीन गडकरी माझे जुने मित्र. विद्यार्थिदशेपासूनचे स्नेही. मी दै. 'तरुण भारत' (नागपूर) चा 'युवा स्तंभ' चालवत असे. त्या वेळी ते विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते. तेव्हापासूनची मैत्री. त्यांनी माझं काम एकदम सोपं करून टाकलं. जादूटोणाविरोधी बिलासंबंधी सारे निर्णय घेण्यासाठी भाजपतर्फे अशोक मोडक या आमदारांना प्रतिनिधी नेमून टाकलं. विधिमंडळाच्या भाजप कार्यालयात मा.गोपीनाथ मुंडे, विरोधी पक्षनेते पांडुरंगजी फुंडकर यांच्यासमोर नितीन गडकरींनी माझ्यासमक्ष विषय काढला आणि चारही प्रमुख नेत्यांनी अशोक मोडक म्हणतील तर भाजपचं अंतिम मत असेल, असं एक मतानं सांगितलं.

मा. अशोक मोडक अतिशय आग्रही. पण खूप प्रगल्भ विचारांचे असल्यामुळं आमचं काम फारच सोपं झालं. एका महत्त्वाच्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील, सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या उपस्थितीत अशोक मोडक यांनी या बिलावर अंतिम शिक्कामोर्तब केलं. त्यांनी सुचवलेले सारे बदल मान्य केले. मोडकांच्या आग्रहाखातर बिलात सार्वजनिक चळवळींना महत्त्वाचं स्थान देणारी एक तरतूद होती. तीही आम्ही काढून टाकली. त्यामुळं या बिलाला विरोध करण्याचा कोणताही नैतिक अधिकार भाजपला नाही. माझे स्नेही नितीन गडकरी नेहमी म्हणतात, ''मी दिलेला शब्द कधीही मोडत नाही.'' आता तर ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळं त्यांचा शब्द, त्यांच्या पक्षाचा अधिकृत शब्द खरा करण्याची जबाबदारी ते पार पाडतील याची मला खात्री आहे. 2005 सालच्या हिवाळी अधिवेशनाआधी झालेल्या याच महत्त्वाच्या बैठकीच्या वेळी भाजपचे आ. मंगलप्रसाद लोढा यांच्या नेतृत्वाखाली जैन धर्मीयांचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटायला आलं. खरं म्हणजे ते हे बिल मंजूर करू नका असं सांगण्यासाठी आले होते. मुख्यमंर्त्यांनी त्यांच्याशी मला चर्चा करायला सांगितली. सुरुवातीस आ. लोढा माझ्याशी बोलण्यास तयारच होईना. सनातन्यांनी त्यांना एवढं भडकवलं होतं, की ते मला बहुधा राक्षस (मानव नाहीच) समजत असावेत. सारं बिल शिष्टमंडळानं समजावून घेतल्यावर आ. मंगलप्रसाद लोढा म्हणाले, ''मानव, हे तर फारच चांगलं बिल झालं आहे. यात विरोध करण्यासारखं काहीच नाही. उगाच गैरसमज पसरविला जातो आहे. आम्ही धार्मिक माणसांचा गैरसमज दूर करण्यासाठीच या बिलात काही तरी टाका. चांगल्या धार्मिक रूढी-परंपरांना हे बिल लागू पडत नाही असं काहीतरी..'' मी त्यांना मुख्यमंर्त्यांना सांगायला सांगितलं. ''आपल्याला असं काही टाकता आलं तर टाका,'' असं मुख्यमंत्री म्हणाले. म्हणून आम्ही (मी, तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे, पी. एस. मिलिंद शंभरकर) त्या पद्धतीनं एक वाक्य तयार केलं. कायदा खात्याच्या माणसांना ते दिलं. 'या बिलात व्यक्तीचं शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान न करणार्‍या कोणत्याही चांगल्या रूढी-परंपरेचा समावेश नाही' अशी तळटीप टाकायचं आम्ही ठरवलं होतं. कायदा खात्यानं त्यांचं 13 वं कलम करून टाकलं. त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्याचं शब्दांकन तयार केलं. ते समजायला कठीण आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. पण वेळ नव्हता. नागपूर अधिवेशनात बिल मांडायचं असल्यामुळे आणि बिलाचं अंतिम रूप तयार करण्याची जबाबदारी व अधिकार कायदा खात्याचाच असल्यामुळं आम्ही गप्प बसलो.

2005 साली 26 डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात, विधानसभेत, बहुमतानं हे जादूटोणाविरोधी बिल संमत झालं. त्यावर काही भाषणं झाली. त्यात आ. देवेंद्र फडणवीस यांचंही भाषण झालं. आणीबाणी काळातील व

माझ्या नागपूर वास्तव्यातील आमचे एक जिंदादिल स्नेही गंगाधर फडणवीस यांचा तडफदार

मुलगा म्हणून देवेंद्र फडणवीस हा आम्हा सगळ्यांचा कौतुकाचा व औत्सुक्याचा विषय. पुढच्या

मुंबई अधिवेशनात त्यांनी या 13व्या कलमाकडे माझं लक्ष वेधून घेतलं. ते वकीलही आहेत. मी ते 13 वं कलम खूप गांभीर्यानं घेतलं.

काय आहे 'ते' कलम?

13. शंका दूर करण्यासाठी याद्वारे उसे घोषित करण्यात येते की, ज्यामुळे व्यक्तीला मानसिक, शारीरिक वा आर्थिक बाधा पोहोचत नाही असे कोणतेही धार्मिक विधी व धार्मिक कृत्ये अंतर्भूत असलेल्या कृतींना या अधिनियमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.

याचा खरा अर्थ असा होतो की, परिशिष्टातील 12 कलमात एखादी रूढी, विधी, कृत्य येत असेल (कारण या 12व्या कलमाव्यतिरिक्त इतर कशालाच हे बिल लागू होत नाही असं व्याख्येत 2 (ख), स्पष्टच केलं आहे) आणि त्याद्वारे व्यक्तीला मानसिक, शारीरिक, आर्थिक बाधा पोहोचत नसेल तर त्यालाही हे बिल लागू होणार नाही. ती गोष्ट शिक्षापात्र ठरणार नाही.

चांगल्या रूढी-परंपरांना हे बिल लागू होत नाही हे सांगण्यासाठी हे 13 वं कलम समाविष्ट केलं आहे. त्याचा अर्थ हाच होता. फार गदारोळ व्हायला लागल्यानंतर मी पुन्हा सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांच्याकडे गेलो. कायदा खात्याच्या शब्दरचनेनुसार टाकलेलं हे 13वं कलम त्यांनी बारकाईनं पाहिलं आणि निर्वाळा दिला. ''भाषा उगीच क्लिष्ट केली आहे. न्यायमूर्तीनी अगदी सुरुवातीलाच मला समजावून सांगितलं होतं. बिलाची भाषा सोपी हवी. कुणालाही कळली पाहिजे. बिल मराठीतच तयार करायचं. मग त्याचं इंग्रजीत भाषांतर करायचं. नाहीतर इंग्रजीत बिल बनवतात. मग क्लिष्ट मराठीत त्याचं भाषांतर करतात ते योग्य नाही. त्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानला तयार केलेले कायदे वाचा.'' एवढय़ावर ते त्या वेळी थांबले नाहीत, तर अनेक तास माझ्यासोबत बसून त्यांनी या बिलातील महत्त्वाची कलमं सोप्या मराठी भाषेत तयार करून दिली होती. त्यामुळं या वेळी क्लिष्ट भाषेविषयी (13व्या कलमाच्या) त्यांनी नापसंती व्यक्त केली.

पण पुढे म्हणाले, ''पण अर्थ बरोबर आहे. व्यक्तीचं मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान न करणार्‍या रूढी-परंपरांना (विधी, कृत्ये) यातून सूट दिली आहे. त्या शिक्षापात्र ठरणार नाही असाच याचा अर्थ निघतो. व्यक्तीचं मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान करणार्‍या धार्मिक, विधी, कृत्यांना हे बिल लागू होतं असा अर्थ निघूच शकत नाही. कुणालाही तो काढता येणार नाही. कायद्याचा उलटा अर्थ काढता येत नसतो.'' सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती पी. बी. सावंतांनी हा निर्वाळा दिल्यावर मी रिलॅक्स झालो. ना.चंद्रकांत हांडोरेही रिलॅक्स झाले. पण मग ''उद्या आम्ही, आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा केली तर तुम्ही म्हणाल व्यक्तीचं आर्थिक नुकसान झालं. आम्हांला 6 महिने जेलमध्ये पाठवालं. पंढरपूरच्या वारीला पायी गेलो तर म्हणाल, शारीरिक नुकसान झालं. आम्हांला 6 महिने जेलमध्ये पाठवालं. आम्ही घरी देवाची 2 तास पूजा करत असलो तर म्हणालं तुमचं मानसिक नुकसान झालं. 6 महिने जेलमध्ये पाठवाल.'' असं कोण म्हणालं? का म्हणालं? वृत्तपत्रात मोठमोठे मथळे बातम्या छापून आल्यानं. असं बिलात कुठेही नसतानाही सनातन्यांच्या खांद्याला खांदा लावून या बिलाच्या विरुद्ध असा गोबेल्सप्रणीत खोटा प्रचार करण्याची सुपारी कुणी घेतली आहे? का घेतली असावी? पाहू पुढच्या शनिवारी.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्घा निर्मूलन

समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी : 9371014832

Saturday, 14 July 2012

'सनातन'च्या मुखवटय़ांचाच जादूटोणा विधेयकाला विरोध


जादूटोणाविरोधी विधेयकासंबंधी पुन्हा गदारोळ सुरू झाला. काही हिंदुत्ववादी संघटनांचे या विधेयकाविरुद्ध निषेध, मोर्चे सुरू झाले. या विधेयकामुळे ''आमच्या धर्मावर गदा येणार, वारीला जाणं, सत्यनारायण करणं, पूजा करणं गुन्हा ठरणार! हे विधेयक केवळ हिंदूंच्या विरुद्ध आहे,'' असाही आरडाओरडा सुरू झाला आहे.

खरंच या विधेयकात असं काही आहे का? हे विधेयक महाराष्ट्र सरकारचं विधेयक आहे. कोणतं तरी सरकार या पद्धतीचं, चांगल्या धार्मिक आचार-प्रथांना, पंढरपूर वारीसारख्या सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र आणणार्‍या, पुरोगामी महाराष्ट्राचा मानबिंदू असणार्‍या, 700 वर्षाच्या परंपरेला विरोध करणारं विधेयक आणण्याचं धाडस करील का?

मग हा विरोध का? गैरसमजावर आधारलेला आहे की वेड पांघरूण पेडगावला जाण्याचा हा प्रकार आहे?

विरोध करणार्‍या ह्या सगळ्यांचं नेतृत्व 'सनातन संस्था' करते. हिंदू जनजागरण समिती ते वारकरी संघटना हे याच सनातनचे मुखवटे आहेत. सनातन संस्था, हिंदू जनजागरण समितीतील काही कार्यकर्ते महाराष्ट्र, गोव्यात बॉम्बस्फोटासारख्या कृत्यात सहभागी असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

या लोकांनी जादूटोणाविरोधी विधेयकाला विरोध करणं स्वाभाविक आहे, आवश्यकच आहे. कारण त्यांना या महाराष्ट्रात, देशात पुन्हा सनातन धर्म रुजवायचा आहे. चातुर्वण्र्य पुन्हा प्रस्थापित करायचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताची नवी धर्मनिरपेक्ष तोंडवळ्याची राज्यघटना निर्माण करून पुरोगामी भारताची मुहूर्तमेढ रोवली. ही सगळी आधुनिकतेकडे, पुरोगामित्वाकडे वाटचाल करणारी चक्र उलटी फिरवून सनातन भारत निर्माण करणं हा त्यांचा उद्देश आहे.

मीही जन्मानं हिंदू आहे. अजूनतरी धर्म न सोडल्याने वा न बदलल्याने हिंदूच आहे. त्यामुळं मी प्रत्येक हिंदू आणि इतरही धर्मातील सगळ्या धर्मप्रेमी माणसांना विनंती करतो की, त्यांनी या सनातन संस्थेतर्फे प्रकाशित होणारं 'सनातन प्रभात' दैनिक, साप्ताहिक वाचावं. किमान वर्षभराचे अंक चाळावेत म्हणजे याचं खरं स्वरूप आपल्या लक्षात येईल. यांचा भुताखेतांपासून, मंत्रतंत्रादी सगळ्याच अंधश्रद्धांवर विश्वास आहे. नव्हे, ते या सगळ्या प्रकारांचा प्रसार-प्रचार करतात; पण अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं या गोष्टी सिद्ध करण्याचं 15 लाख रुपयांचं आव्हान आहे. ते मात्र स्वीकारून भूत, मंत्रतंत्र सिद्ध करण्याचं धाडस दाखवीत नाहीत.

महाराष्ट्र सरकारनं खरंतर आपल्या गुप्तचर यंत्रणेकडून सगळी माहिती गोळा केली तर यांच्या विरोधामागचं कारणंही सरकारला कळून येईल आणि मग त्यांच्या विरोधाला भीक घालण्याची गरज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांना वाटणार नाही. हे खरं आहे की, जादूटोणाविरोधी विधेयक संमत झालं तर सगळ्यात मोठा आघात 'सनातन संस्था-सनातन प्रभात' यांच्यावर होणार आहे. कायदा लागू झाल्यापासून त्यांना एकतर आमूलाग्र बदलावं लागणार आहे अथवा सरळ जेलची हवा खावी लागणार आहे. त्यामुळे त्यांनी जीव तोडून या विधेयकाला विरोध करणं स्वाभाविक आहे, अपरिहार्य आहे.

पण इतरांनी का विरोध करावा? काय आहे या बिलात?

त्या वेळचे सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने सध्याचे जादूटोणाविरोधी विधेयकाचे प्रारूप तयार झाले आहे.

16 डिसेंबर 2005 साली ते विधानसभेत, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पारित झाले होते. पुढे ते अडकले.

आता सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी पुन्हा ते विधानसभेत मांडले आहे. फक्त विधेयकाच्या नावात बदल केला. बाकी विधेयक जसेच्या तसे आहे.

सध्याच्या विधेयकातील शब्दन्शब्द विचारपूर्वक ठरविण्याची संधी माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्यासोबत मला मिळाली. ना. हांडोरे, त्यांचे खाजगी सचिव मिलिंद शंभरकर आणि मी अशा तिघांनी या विधेयकाचे अंतिम प्रारूप ठरविण्यात प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळं या विधेयकात आलेल्या प्रत्येक शब्दामागचा, बदलामागचा इतिहास मला ठाऊक आहे. तो वाचकांसोबत शेअर करण्याची संधी मी घेतो आहे.

अनेकांना वाटतं हे विधेयक फार कमजोर आहे. असं वाटणं चांगली गोष्ट आहे; पण गेल्या 30 वर्षात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ लढाऊपणे तळागाळातून चालविणार्‍या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहीत आहे की, हा कायदा अतिशय ताकदवान आहे. सरकारच्या कर्तव्याच्या आणि भारतीय राज्यघटनेच्या सध्याच्या मर्यादेत राहून यापेक्षा प्रभावी विधेयक तयार करणं शक्य नाही.

पण हा कायदा महाराष्ट्र सरकारचा आहे. आम्हा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळवाल्यांचा नाही. तसा तो असता तर फलज्योतिषापासून तर परामानसशास्त्रीय दावे करणार्‍यांपर्यंत सारे या विधेयकात ओढले गेले असते, पण ते शक्य नव्हतं.

कारण अंधश्रद्धा निर्मूलन करणं हे प्रबोधनाचं काम आहे. हे प्रबोधन आमच्या सारख्या कार्यकत्र्यांनी, प्रसिद्धिमाध्यमांनी व सरकारनेही केलं पाहिजे, पण राज्य सरकारनं जिथे माणसांची उघड फसवणूक होते, लुबाडणूक होते, जीव धोक्यात येतो तिथेच कायद्याद्वारा हस्तक्षेप केला पाहिजे. याचं नीट भान ठेवून सध्याचं प्रारूप तयार झालं आहे.

सध्याच्या विधेयकाचा मथळा आहे,''महाराष्ट्र नरबळी व अन्य अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम 2011''. अन्य अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा, नरबळी याचा अर्थ काय?

2. ख.नुसार याची व्याख्या सोपी करून टाकली. परिशिष्टात जोडलेली 12 कलमं म्हणजेच ''अमानवीय, अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा, नरबळी.'' या बाहेरची एकही गोष्ट या विधेयकात अंतर्भूत नाही.

अशी अपवादात्मक व सोपी सुटसुटीत व्याख्या सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्यामुळं करण्यात आली. त्यांनी खूप मेहनतीनं हे विधेयक सोपं, सुटसुटीत करण्यात मोलाचं मार्गदर्शन केलं.

सर्वसाधारण विधेयकात शब्दांची व्याख्या करावी लागते. त्यात खूप गोष्टी येऊ शकतात आणि म्हणून काही लोक अमानवीय, अघोरी, अनिष्ट प्रथा यात अनेक प्रथांवर बंदी येईल, अशी भीती व्यक्त करतात, पण केवळ व्याख्येद्वारा 12 कलमांच्या मर्यादेतच हे विधेयक बंदिस्त केले आहे. त्यात इतर प्रथा येत नाहीत. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा.

परिशिष्टातील 12 कलमासंबंधी कृती घडली की संबंधितांसाठी शिक्षा मात्र कठोर आहे. सहा महिने ते सात वर्षे कारावास आणि पाच हजार ते पन्नास हजार रुपये दंड. शिवाय या अपराधाचा प्रसार-प्रचार करणार्‍यासही एवढीच कठोर शिक्षा आहे.

शिवाय हा अपराध दखलपात्र व अजामीनपात्र आहे. त्यामुळं पोलिसांना गुन्हा नोंदवावाच लागेल व जामीन न्यायालयातून घ्यावा लागेल.

पण अपराध काय? परिशिष्टातील ही 12 कलमे वाचा

1. भूत उतरविण्याच्या बहाण्याने, बांधून ठेवून वा अन्यरीत्या मारहाण करणे, मिरचीची धुरी देणे, पादत्राणे भिजवलेले पाणी पाजणे, छताला टांगणे, तापलेल्या वस्तूंचे चटके देणे, जबरदस्तीने मूत्र, विष्ठा पाजणे, केस उपटणे.

(भूत उतरविण्यासाठी मंत्र-प्रार्थना, पूजा करणे गुन्हा नाही.)

2. एखाद्या व्यक्तीने (जिवंत) तथाकथित चमत्कार करून आर्थिक प्राप्ती करणे, फसविणे, ठकविणे, दहशत बसविणे.

3. जिवाला धोका निर्माण होतो किंवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात अशा अनिष्ट व अघोरी प्रथांचा अवलंब करणे, उत्तेजन देणे, सक्ती करणे.

4. कोणतेही अमानुष कृत्य करणे, नरबळी देणे, सल्ला देणे, प्रोत्साहन देणे, प्रवृत्त करणे.

5. अतिंद्रिय शक्ती संचारली असे भासवून भीती निर्माण करणे, न ऐकल्यास वाईट परिणाम होतील, अशी धमकी देणे.

(केवळ देव-देवी अंगात येणे गुन्हा नाही.)

6. एखादी व्यक्ती करणी करते, काळी विद्या करते, भूत लावते, जनावरांचे दूध आठविते, अपशकुनी आहे, रोगराई पसरविते, सैतान आहे असे जाहीर करणे व त्या व्यक्तीचे जगणे त्रासदायक करणे.

7. करणी, चेटूक केले या सबबीखाली मारहाण करणे, धिंड काढणे, वाळीत टाकणे.

8. भुतांची भीती घालणे, शारीरिक इजा भुतामुळे झाली सांगणे, वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून मंत्रतंत्र-अघोरी उपाय करणे, मृत्यूची भीती घालणे.

9. कुत्रा, साप, विंचू चावल्यास वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे सारखे उपचार करणे.

(कुर्त्यावर अँन्टीरेबीज, अँन्टीव्हेनम (स्नेक) इंजेक्शन्स वेळीच घेतल्यास माणसं वाचू शकतात. कोकणातल्या विंचूदंशानं माणूस मरू शकतो, पण वैद्यकीय उपचारांनी वाचू शकतो.)

10. बोटाने शस्त्रक्रिया करतो वा गर्भवती स्त्रीचे गर्भलिंग बदलवितो असा दावा करणे.

11. अवतार असल्याचे सांगून व पूर्वजन्मी प्रियकर, प्रेयसी, पती, पत्नी असल्याचे सांगून लैंगिक संबंध ठेवणे.

12. मंदबुद्धीच्या व्यक्तीमध्ये शक्ती आहे असे भासवून त्या व्यक्तीचा धंदा व व्यवसाय करणे.

आता या बारा कलमात विरोध करण्यासाठी काय आहे? कुणीतरी सुबुद्ध माणूस याला विरोध करणं शक्य आहे का?

ही 12 कलमं म्हणजेच कायदा आहे. मग हे सत्यनारायण, वारी, पूजेला कायदा विरोध करतो हे कुठून आलं? त्याला आधार काय?

(क्रमश:)

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन

समितीचे संस्थापक संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी - 9371014832

Saturday, 7 July 2012

भोंदूंना सारे मिळून धडा शिकवू या!


'व्यक्तिमत्त्व विकास' हा मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. माझं स्वत:चं व्यक्तिमत्त्व वयाच्या 19-20 वर्षापर्यंत अत्यंत खुजं होतं, निराशावादी 'मेलॉनकॉलिक' होतं. कसलाही आत्मविश्वास, हिंमत नव्हती. खूप न्यूनगंड होता. स्वभाव भित्रा, हळवा, दुबळा, रडका, एकलकोंडा होता.

खूप मेहनतीनं, प्रयत्नपूर्वक, दीर्घकाळाच्या तपश्चर्येनं स्वत:चं व्यक्तिमत्त्व आमूलाग्र बदललं. पुढे 14-15 वर्षे वेगवेगळय़ा वृत्तपत्रांचे 'युवा स्तंभ' चालवीत असताना आणि 1982 सालापासून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावे ही चळवळ चालवीत असताना हजारो युवक-युवतींचं व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न केला. त्यातून हजारो व्यक्तिमत्त्वांना आकार आला. त्यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाच्या वेगवेगळय़ा, जगभर चालणार्‍या विविध पद्धतींचा, प्रक्रियांचा सखोल अभ्यास केला.

हा विषय खूपच मोलाचा वाटल्यामुळं नागपूरचा मुक्काम हलवून मी मुंबईत 1990 साली राहायला गेलो. तिथून 1991 सालापासून महाराष्ट्रभर 'व्यक्तिमत्त्व विकासा'ची कार्यशाळा चालवतो आहे.

1990-91 साली व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा इंग्रजी भाषेतूनच चालत. पंचतारांकित वा मोठय़ा, महागडय़ा हॉटेलमध्ये त्यांचं आयोजन करून भरमसाठ फी आकारली जात असे. मी इंग्रजी विषयाचा प्राध्यापक, इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी. पण सामान्य लोकांपर्यंत हा विषय पोहोचवता यावा म्हणून मुद्दाम मराठी भाषेत, कमी खर्चात ही कार्यशाळा हजारो लोकांपर्यंत पोहोचवली. त्यातून हजारो माणसांचं व्यक्तिमत्त्व घडताना अनुभवलं. सोबत अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुरूच होतं. बुवाबाजीविरुद्धची लढाई सुरूच होती.

आज ही समाजातील बुवाबाजी उघड पद्धतीनं व्यक्तिमत्त्व विकासाच्या क्षेत्रात शिरल्यामुळं मनाला प्रचंड वेदना होतात. म्हणूनच या बुवाबाजीविरुद्ध दंड थोपटून उभं राहण्याचा, या बुवाबाजांना धडा शिकवण्याचा निश्चय केला. त्याचाच दृष्य परिणाम स्नेह देसाई, दत्ता घोडे यासारख्यांना जाहीर आव्हानं टाकणं, त्यांच्याविरुद्ध निदर्शनं आयोजित करून निषेध करणं हे मार्ग अनुसरावे लागले.

स्नेह देसाई तर पळून गेला. पण दत्ता घोडेनं नागपूरच्या हिंदी मोरभवन समोर आमची निदर्शनं सुरू असतानाच (त्याची कार्यशाळा सुरू होण्याच्या वेळी) फोनवरून माझ्याशी संपर्क साधला. नंतरही एक दोन वेळा फोनवरून संपर्क साधला.

''सर मी तुमचा विद्यार्थी. पुण्याला आपण प्रत्यक्षही भेटलो आहे. स्नेह देसाईंसारखे लोक असेच थर्डआयसारखे दावे करतात. त्यामुळं कार्यशाळांना लोक गर्दी करतात. मोठा व्यवसाय होतो. म्हणून इतरांसारखाच मीही टेलिपॅथीचा दावा केला. माझी चूक झाली. पुन्हा असं करणार नाही. मी आता काय करू? तुम्हीच सांगा. माझं खूप आर्थिक नुकसान झालं. पण तुम्ही म्हणाल तसं करेन. आपले कार्यकर्ते कार्यशाळेत येऊन तर काही करणार नाही ना?'', दत्ता घोडे काकुळतीनं मला सांगत होता.

मी त्याला स्पष्टच शब्दात सांगितलं, ''व्यवसाय चालावा म्हणून व्यक्तिमत्त्व विकासाच्या नावाखाली असलं खोटंनाटं सांगून लोकांना फसवण्यापेक्षा सरळ बाबागिरीचा धंदाच सुरू कर ना?''

''मग तर तुम्ही मला मुळीच सोडणार नाही,'' त्यावर घोडेचं उत्तर.

29 जूनला, शुक्रवारी आम्ही दत्ता घोडेविरुद्ध निदर्शनं केली आणि त्याच दिवशी रात्री श्रीमती छाया सावरकर, सुरेश सुरमुरे, प्रशांत सपाटे यांनी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये दत्ता घोडेविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली.

रविवार 1 जुलैला दत्ता घोडेचा फोन आल्यावर त्याला स्पष्टच सांगितलं; ''तूच म्हणतो की मी तुमचा विद्यार्थी आहे. मग मी एवढं वैज्ञानिक पद्धतीनं तुला शिकवलं असताना, एवढे धादांत असत्य दावे तू केले आहेस. तुझ्यापुढे दोनच पर्याय आहेत. एक तर आमचं 15 लाखांचं आव्हान स्वीकारून तुझ्यात टेलिपॅथीची (म्हणजे दूर अंतरावरच्या माणसाच्या मनाशी बोलणे, त्याचे विचार आपोआप ओळखणे) क्षमता आहे हे सिद्ध करणे. नाहीतर जनतेची जाहीर माफी मागणे. त्यासाठी तू नागपुरात प्रेस कॉन्फरन्स घे. माझ्यात टेलिपॅथीची क्षमता नाही. अशी शक्ती कुणाला प्राप्त करता येत नाही. मी खोटा दावा केला होता. पुन्हा असं करणार नाही, अशी स्पष्ट कबुली देऊन त्या प्रेस कॉन्फरन्समधल्या निवेदनाची एक प्रत जोडून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला व सीताबर्डी पोलीस स्टेशन नागपूरला माफीनाम्यासह एक विनंतीपत्र दे. प्रत्येक माणसाला सुधारण्याची संधी दिली पाहिजे. तुलाही आम्ही देतो.''

सोमवारी दि. 2 जुलैला मी हे सारं करतो असं दत्ता घोडे म्हणाला, मला कबूल केलं. मला वाटलं खरंच हा तसं करेल. पण दत्ता घोडेचा मंगळवारी, 3 जुलैला फोन आला, तो धुळय़ावरून. ''सर मी धुळय़ाला आलो. मी इथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगू का?''

म्हणजे दत्ता घोडेला गांभीर्य नाही. इतकी वर्षे आपण लोकांची फसवणूक केली त्याची खंत नाही. नागपूरला केलेल्या फसवणुकीची कबुली धुळय़ाला देऊ का असं म्हणतो? म्हणजे फक्त वेळ मारून नेण्याचा हा प्रकार आहे.

फसवून पैसे कमावण्याची चटक लागल्यानंतर प्रामाणिक मार्गावर येणं तसं कठीणच. स्नेह देसाई असो की दत्ता घोडे असो यांना धडा शिकवण्याशिवाय पर्यायच नाही. स्नेह देसाईचा सहकारी असणार्‍याची एक कार्यशाळा नागपूरच्या सेंटर पॉईंटला 7-8 जुलैला आहे. अ. भा. अनिस तर आपलं काम करेलच. पोलीस यंत्रणाही आपलं काम करेल. पण प्रत्येक नागरिकानंही खडसावून जाब विचारला पाहिजे.

आता तुमच्या गावात कुणीही व्यक्तिमत्त्व विकासाच्या नावाखाली थर्ड आय, अँस्ट्रल ट्रॅव्हल, टेलिपॅथी, लेव्हिटेशन (हवेत तरंगणं), मनी अट्रॅक्शन, सिकेट्र, पास्ट लाईफ रिग्रेशन असे दावे करायला लागले तर सरळ त्यांना त्या क्षमता सिद्ध करण्याचे आव्हान द्या. आमच्या वतीनं 15 लाख रुपयांचे बक्षीस मिळवण्याचे आव्हान द्या. त्यांचे खोटे दावे त्यांच्याच घशात घाला. आव्हान स्वीकारले तर आम्ही आहोतच.

मुंबईला पोहोचताच गृहमंत्री आर. आर. पाटलांना भेटून या सगळय़ा फसवणूक करणार्‍या भोंदूविरुद्ध पोलीस यंत्रणा सक्रिय करण्याची विनंती करणारच आहोत. आणि ते अँक्शन घेतील याची खात्री आहे.

पण आपणा वाचकांचीही जबाबदारी आहेच. असल्या भोंदूंना सारे मिळून धडा शिकवू या!

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत)

भ्रमणध्वनी : 9371014832