Monday 29 October 2012

मुख्यमंर्त्यांचा गणपती दूध प्यायला, त्याची गोष्ट !


तिकडे जिल्हा वाशीम 'फुलउमरी'जवळच्या 'श्याम की माता' देवीच्या डोळय़ांतून अश्रू येताना 2-4 लोकांना दिसलं. वार्‍यासारखी वार्ता पसरली. आधुनिक तंत्रज्ञानानं मोबाईलनं ही वार्ता वायुवेगापेक्षाही अधिक वेगानं पसरली. बंजारा समाजाचे तांडेच्या तांडे घराबाहेर आले. 'रात्रभर झोपायचं नाही. जो झोपेल तो उठणार नाही.' रात्री 'घरात थांबू नका, भूकंप येणार आहे.' विदर्भ-मराठवाडय़ातले अनेक जिल्हे, सुशिक्षित, अडाणी सारेच रात्रभर घराबाहेर जागत बसले.

मी मुंबईत. रात्रभर कुणाचा न् कुणाचा फोन येत होता. सर्वदूर मृत्यूचं, भूकंपाचं भय पसरलं. धर्म-जात-पंथ ओलांडून पसरलं. इकडे सप्तशृंगीच्या गडावरच्या देवीच्या डोळय़ांतूनही अश्रू यायला लागले. प्रचंड गर्दी उसळली. विदर्भात पोहरा देवी अतिशय प्रसिद्ध. भारतभरातील बंजारा समाज तिच्या दर्शनासाठी येतो. पण थोडय़ाच अंतरावरच्या 'श्याम की माता' कडे मात्र लोकांचं फारसं लक्ष नाही. यानिमित्तानं 'श्याम की माता' दर्शनासाठी दिवसभरात 25 हजारांपेक्षा जास्त लोक येऊन गेलेत. 'श्याम की माता' प्रसिद्ध झाली.

अशा अफवा का पसरतात? आसामात मुस्लिमांचं शिरकाण होतं. अफवा पसरवली जाते. मुंबईमध्ये तास-दीड तास नंगानाच चालतो. पोलिसांना नेम धरून मारलं जातं आणि काही दिवसांत इकडे देवीच्या डोळय़ातून वेगवेगळय़ा ठिकाणी एकाच वेळी अश्रू येतात. कधी कधी चर्चमधील मेरी मातेच्या डोळय़ातून अश्रू येतात आणि भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. आज मोबाईल, टीव्ही, इंटरनेट वापरणारा माणूसही या चमत्कारांना मोठय़ा प्रमाणावर बळी पडतो. अफवा पसरविण्याच्या प्रक्रियेचा सक्रिय भाग बनतो. भारतीय वातावरणात वाढलेल्या कोणत्याही धर्माचा माणूस असो, त्याला दैवी चमत्काराचं प्रचंड आकर्षण वाटतं. लहानपणापासून संस्कारातूनच हे बाळकडू त्याच्या मनात ठसलं असतं. हे चमत्कार प्रत्यक्षात घडत नाहीत. म्हणून ते घडावेत असं त्याला मनोमन वाटत असतं. त्यांच्यावर झालेल्या संस्कारांची ती गरज असते. म्हणून कोणत्याही प्रकारचा चमत्कार ऐकला रे ऐकला की त्याची मुळीच शहानिशा न करता 'आपणच तो चमत्कार प्रत्यक्ष अनुभवला' अशा थाटात तो सांगत सुटतो. मोबाईल, एसएमएस ही आधुनिक साधनं त्याच्या सांगण्याचा वेग वायुवेगापेक्षाही अधिक वाढवतात. निव्वळ चमत्कारापेक्षाही भयासोबत जुळलेला चमत्कार अधिक वेगानं पसरतो. तसं भारतीय समाजमन भित्रं आहे. संस्कारानं ते तसं बनलं आहे. एखादा राजा शिवाजी, महात्मा गांधी हे भय दूर करून काही काळ समाजमन निर्भय बनवून टाकतात. एरवी ते भय-प्रोन असतं. जेव्हा जेव्हा काहीतरी अरिष्ट येईल, आपण मरू या पद्धतीची भीती या चमत्कारासोबत जुळली असेल तेव्हा अफवा पसरवणारं हे मन जास्तच सक्रिय बनतं. 'भीती' ही भावना माणसाच्या मनाचा तत्काळ ताबा घेते. या भीतीच्या आहारी गेलेल्या माणसाला त्या अवस्थेत जे सांगितले जातं, जे तो ऐकतो वा त्याच्या मनात येतं ते एखाद्या प्रभावी सजेशनसारखं काम करतं. त्याला ते खरंच वाटायला लागतं आणि मग इतरांनी या आपत्तीला बळी पडू नये म्हणून तो सक्रियपणे ही भीती इतरांपर्यंत तत्परतेनं पोहोचवतो. 'रात्रभर झोपू नका, लहान मुलांनाही झोपू देऊ नका. शेजार्‍यांनाही झोपू देऊ नका. जो झोपेल तो उठणारच नाही,' हे सांगण्यामध्ये आपण इतरांचे जीव वाचवतो आहोत अशी त्याची प्रामाणिक भावना असते. अफवा पसरवणे, इतरांना घाबरवणे हा त्याचा उद्देशही नसतो आणि आपण असं काही करतो आहे याची त्याला कल्पनाही नसते. ज्या क्षणी भीती मनाचा ताबा घेते, त्या क्षणी 'लॉ ऑफ डॉमिनंट अफेक्ट' घडून येतो आणि वातावरणातील अफवा त्याच्यासाठी 'सत्य घटना' बनते. तो सामान्य माणूस या काळात 'हायली सजेस्टिबल' असतो. जर कुणी नकारात्मक सजेशन्स पेरलं, 'ते तुमचा जीव घेणार आहेत, त्यांनी तुमचा, तुमच्या मुलाबाळांचा जीव घेण्याआधीच त्यांना संपवा' तर हा सामान्य माणूस त्या विशिष्ट लोकांचा जीव घ्यायला, त्याचं घर जाळायला, खून करायला पुढे सरसावतो. याला आपण मॉब सायकॉलॉजी म्हणतो. पण ही फिअर सायकॉलॉजी असते. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी एरवी मुंगीही न मारणारा हा माणूस इतरांचे जीव घेऊन मोकळा होतो. ज्यांना हे मानसशास्त्र कळतं ते त्याचा उपयोग करून घेतात. दंगली घडवून आणतात. माणसांमधली माणुसकी उद्ध्वस्त करून टाकतात. शेजारी शेजार्‍याचा खून करतो. शेजारी शेजारील बाईवर बलात्कार करतो. माणसाचा जनावर बनतो. माणुसकीचा खून पाडतो म्हणून या अफवांकडं निरुपद्रवी अफवा म्हणून पाहू नये. त्यांना वेळीच सक्रियपणे अटकाव केलाच पाहिजे. 'श्याम की माता' प्रकरणातील अफवा आम्हाला आमच्या कार्यकत्र्यांना झपाटय़ानं आटोक्यात आणता आली. कारण त्या परिसरात आमचं सक्रिय काम आहे. पण सामान्य, भयग्रस्त माणूस अहेतूक अफवा पसरवीत असला तरी सुरुवातीस विशिष्ट हेतूनं अफवा पसरवणारा, एक स्वार्थी हेतू राखणारा हितसंबंधी वर्ग असतोच. हा जाणीवपूर्वक, फायद्यासाठी अफवा पसरवीत असतो. त्यामुळे दरवेळी पोलीस खात्यानं काळजीपूर्वक सखोल चौकशी करून अशी अफवा पसरवणार्‍यांना शोधून काढून गजाआड केलंच पाहिजे. तरच अशा अफवा पसरवणार्‍यांना खर्‍या अर्थाने अटकाव बसेल, जरब बसेल. पण या ठिकाणी आपलं पोलीस खातं फारच टची असतं. असल्या धार्मिक ठिकाणी ते बिलकूल पोलिसी डोकं वापरायला तयार नसतात. उलट अफवेपोटी उसळलेल्या गर्दीच्या बंदोबस्तासाठी मात्र त्यांना खूप मेहनत, वेळ खर्ची घालावा लागतो. कळत नकळत बदमाशांना साथ द्यावी लागते. काही वेळेस मुद्दाम चमत्कार घडवून आणले जातात. मुंबईतील गोष्ट. एका जैन मंदिरात मूर्तीवरचं चांदीचं छत आरतीच्या वेळी हलू लागलं. प्रचंड गर्दी, प्रचंड पैसा, देणग्या ओघ सुरू झाला. संबंधित पोलीस स्टेशनची मदत मागितली. त्यांनी 'नरो वा कुंजरो वा' भूमिका घेतली. मी, काही पत्रकार (त्यात म.टा.चे पत्रकार सुरेश वैद्यही होते) हा चमत्कार तपासण्यास गेलो. अतिशय उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून हा चमत्कार निर्माण केला होता. मी जयंत नारळीकरांच्या माध्यमातून त्यांनी सुचवलेल्या श्री. शर्मा नावाच्या 'अप्लाईड फिजिक्स'च्या एका शास्त्रज्ञाकडे गेलो. त्यांच्या मदतीनं आम्हाला चमत्कार कळला. आता फक्त एक छुपा जनरेटर पकडण्याची गरज होती. ते आम्हाला शक्य नव्हतं. पोलीस मदत करणार नाही हे कळत होतं. शेवटी संबंधितांना कसा चमत्कार घडवला ते जाहीर करण्याची धमकी द्यावी लागली. चमत्कार तत्काळ थांबला. पुन्हा हा चमत्कार घडवला तर रंगेहाथ पकडू अशी जाहीर धमकी दिली. गेल्या 20 वर्षांत पुन्हा असा चमत्कार घडला नाही. पण चमत्कार घडवणारे मात्र मोकळे सुटले. पण त्या मंदिराचं रिनोवेशन दिमाखात पार पडलं. यात ट्रस्टी, साधू सारेच गुंतले होते. पोलिसांनी मनात आणलं तर अशा अफवांना तत्काळ पायबंद घालण्याचं काम पोलीस खातं किती अप्रतिमरीत्या करू शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे. ते फारसं कुणाला माहीत नाही. म्हणून मुद्दाम सांगतो. गणपती दूध प्यायला लागले. तो दिवस आठवत असेल. रात्रभर प्रवास करून नागपूरहून मुंबईला नॉनस्टॉप पहाटे कारने पोहोचलो. झोपलो. सकाळी 6 वाजता फोन खणखणला. दिल्लीच्या टीव्हीच्या प्रतिनिधीचा फोन. 'तुम्हाला 7 च्या विमानानं दिल्लीत यायचं आहे. दिल्लीत रात्रभर ठिकठिकाणच्या मंदिरातील देवांच्या मूर्ती दूध पीत आहेत ते तपासायचं आहे.' कसंबसं, थोडय़ा वेळात संपर्क साधतो असं सांगून झोपलो. खूप थकलो होतो. पण थोडय़ा वेळानंतर सारखा फोन खणखणू लागला. झोपूच देईना म्हणून उचलला. एकदम करडा आवाज, 'एवढा वेळ फोन वाजतो. तासभर झाला. उचलत का नाही? बोला.. कमिश्नर साहेबांना बोलायचे आहे.' मुंबईचे अँडिशनल कमिश्नर पी.के.बी. चक्रवर्ती बोलू लागले, 'काय मानव साहेब तुम्ही झोपता आहात.' मुंबईत सगळय़ा मंदिरात रांगा लागल्या आहेत. आम्हाला भीती वाटते.. कुणी तरी मुद्दाम अफवा पसरवतो आहे. मंदिरात गर्दी गोळा करायची आणि बॉम्बस्फोट घडवायचे असं प्लॅनिंग असावं म्हणून रेड अँलर्ट घोषित केला आहे. गणपती दूध पितो हे प्रकरण तपासायचं आहे. माझ्या अधिकार्‍याकडे देतो त्यांना मदत करा.'

प्रश्नाचं गांभीर्य लक्षात आलं. खडबडून जागा झालो. फोनवरच आमचं काम सुरू झालं. मी विचारलं मूर्ती बदलवल्या का?' ' नाही. जुन्याच मूर्ती आहेत. बहुदा सार्‍या संगमरमरी.' पोलीस अधिकार्‍याने माहिती दिली. माझं काम सोपं झालं. मी सूचना दिली, 'पुजार्‍याच्या हातून मूर्ती पुसून घ्या. निर्माल्य वगैरे काढून टाका. देव्हारा कोरडा करा. मूर्तीजवळ लेडीज कॉन्स्टेबल उभ्या करा. रांगेतील लोकांना दूध पाजताना चमचा वाकडा करू देऊ नका. थोडा वेळ तरी लोक वाकडा करतील. त्याशिवाय दूध ओघळणार नाही. 25-50 लोकांनी दूध पाजलं की खाली गाभार्‍यातील दूध स्पंजने गोळा करा. बादलीमध्ये सगळय़ा भक्तांसमोर स्पंज पिळा. बादलीत दूध गोळा होईल.' खरं म्हणजे माझं म्हणणं त्या पोलीस अधिकार्‍याला पटलं नाही. त्याच्या बायकोच्या हातानेही गणपती दूध प्यायला होता. प्रत्यक्ष डोळय़ानं पाहिलं होतं. त्यानं तसं बोलूनही दाखवलं. पण साहेबांचा आदेश म्हणून त्यांनी माझी सूचना अमलात आणायची ठरवली. नाईलाजास्तव. तासभरातच या अधिकार्‍यानं खूप उत्साही आवाजात फोन केला, ''मानव साहेब, दहा-एक मंदिरात प्रयोग केला. बादलीत दूध गोळा होतंय. खरंच गणपती दूध पीत नाही.'' असे बोर्ड लावता येईल का याची आम्ही चर्चा केली. 12 नंतर अनेक ठिकाणी बोर्ड लागले. मंदिरामंदिरात पोलीस स्पंजने दूध गोळा करत होते. किमान 15-20 लाख लोकांना मंदिरात ओढून आणणार्‍या अफवेला पोलिसांनी अथक परिश्रमाने, सक्रियतेने अवघ्या 8-10 तासात थिजवलं होतं. थांबवलं होतं. संध्याकाळच्या बातम्यात प्रसिद्ध झालं- ''मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या घरचा गणपती दूध प्यायला.'' पोलिसांचा पुन्हा फोन, ''मानव साहेब, गणपती दूध पीत नाही, असं तुमच्या संघटनेच्या वतीने स्टेटमेंट काढा.'' ''मी म्हणालो, 'हा चमत्कार पोलिसांनी थांबवला आहे. पोलीस कमिश्नरने वा गृहमंर्त्याने स्टेटमेंट काढलं पाहिजे. तुम्ही तसा प्रयत्न करा. नाहीतर मी गृहमंर्त्यांशी बोलतो. पोलिसांना स्टेटमेंट काढणं योग्य वाटत नव्हतं. कारण मुख्यमंत्री स्वत: या चमत्काराचं समर्थन करत होते. तसं वक्तव्य त्यांनी जाहीररीत्या टीव्हीवरून केलं होतं. पण हे स्टेटमेंट काऊंटर करणं आवश्यक होतं. उपमुख्यमंत्री श्री. गोपीनाथजी मुंडे हे गृहमंत्री असल्यामुळे मुंबईत रेड अँलर्ट घोषित झाल्यामुळं सार्‍या प्रकारावर लक्ष ठेवून होते. त्यामुळे त्यांना वस्तुस्थितीची नीट कल्पना असायला हवी होती. पण मित्रपक्षाच्या मुख्यमंर्त्यांचं स्टेटमेंट काऊंटर करण्याची रिस्क उपमुख्यमंत्री घेतील का? अशी शंका पोलीस अधिकार्‍यांना आणि मलाही वाटत होती. त्यांच्याशी त्यावेळी माझी वैयक्तिक ओळख नव्हती. जयप्रकाश आंदोलनाच्या काळापासून मित्र असलेले प्रमोद महाजन यांची मदत मिळू शकली असती. पण.. त्याची गरज पडली नाही. काही तासातच गृहमंत्री, उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे यांचं स्टेटमेंट टीव्हीवरून प्रसारित झालं. 'पोलिसांनी ठिकठिकाणी मंदिरात दूध गोळा केलं. दूध गाभार्‍यात जमा होत होतं, गणपती दूध पीत नाही.'

आम्हा सार्‍यांचा जीव भांडय़ात पडला. पोलिसांच्या अथक परिश्रमाचं चीज झालं होतं. आजही मूर्ती दूध पिते आहे. डोळय़ातून अश्रू येताहेत अशा अफवा अधूनमधून पसरतात. पोलिसांनी ठरवलं तर ते किती प्रभावीपणे अशा दैवी वलय असणार्‍या अफवांनाही अटकाव करू शकतात याचा हा उत्कृष्ट वस्तुपाठ होता. पण मुंबई पोलिसांचाही तारीफ के काबील कामगिरी त्यावेळी फारशी जनतेला कळू शकली नव्हती, हेही सत्य आहे.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा

निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी 9371014832

Sunday 21 October 2012

मेडिटेशन, माईंड पॉवरच्या नावे होते फसवणूक


''सर, गेले अनेक दिवस मी संमोहनात सूचना देते आहे, पण मला अजून रिझल्टस् मिळतच नाहीत.'' एका मुलीचा फोनवरून आवाज आला.

''किती दिवस झालेत? केव्हा कार्यशाळा केली?'' मी. ''सर, 15 दिवसांपूर्वी सातार्‍यात मी तुमची कार्यशाळा केली. 15 दिवस सूचना देते आहे,'' मुलगी.

''पण मी महिनाभर कंपलसरी सीडीवर संमोहन-सराव करायला सांगितला होता ना? नंतरच टार्गेट निवडून सूचना द्यायच्या होत्या नां?'' मी.

''हो पण, मला इमर्जन्सी होती म्हणून मी त्वरित स्वतंत्र सूचना द्यायला सुरुवात केली,'' मुलगी.

''बरं ठीक आहे, पण 15 दिवसांतच तुला अपेक्षित रिझल्टस् मिळतील असं तुला कुणी सांगितलं? मी तर तसं सांगितलं नव्हतं नां? बरं काय सूचना देते आहेस?'' मी.

''सर, माझं एका मुलावर खूप प्रेम आहे, पण तो माझ्याकडे लक्षच देत नाही. गेले 15 दिवस संमोहनात सूचना देते आहे.. माझ्याकडे पाहा, लक्ष दे, माझ्यावर प्रेम कर, खूप खूप प्रेम कर... पण सर तो साधं वळूनसुद्धा पाहत नाही.,'' मुलगी.

मी उडालोच. माझा विश्वासच बसेना? माझ्या कार्यशाळेत शिकलेली एखादी विद्यार्थिनी असा प्रश्न विचारू शकते? असा विचार करू शकते?

मला राहावलं नाही, मी विचारलंच, ''का गं नक्की तू माझ्याच कार्यशाळेत शिकलीस नां? पाचही दिवस पूर्ण वेळ उपस्थित होती नां?''

''हो सर, पाचही दिवस, पूर्ण वेळ, तुमच्यासमोरच पहिल्या रांगेत बसली होती.''

''या पाच दिवसांत कधीतरी, असं दुसर्‍याचं नाव घेऊन अथवा त्याची प्रतिमा पाहून दुसर्‍याला अशा सूचना देऊन काही परिणाम साधता येतो असं मी शिकवलं का? सांगितलं का?''

''नाही सर, तुम्ही नाही सांगितलं. उलट असं काही करता येत नाही असंच तुम्ही सांगितलं, पण मला माहीत आहे नां! संमोहनात जाऊन अशा सूचना दिल्या की परिणाम मिळतो,'' मुलगी.

''तुला कसं माहीत?'' मी.

''तुमच्या आधी सातार्‍यात एक संमोहनतज्ज्ञ आले होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांचं व्याख्यान झालं. मी गेले होते व्याख्यानाला. त्यांनी काही संमोहनाचे प्रयोगही करून दाखवले होते. त्या वेळी त्यांनी सांगितलं होतं. आपण संमोहनात जशा सूचना देऊ तसा दुसर्‍यांवर परिणाम होतो. आपल्या इच्छेनुसार घडतं.''

''मग तू त्यांची शाळा न करता माझ्या कार्यशाळेत कशी आलीस?'' मी.

''त्यांचं व्याख्यान मला प्रभावी वाटलं नाही. तुमचं जास्त प्रभावी वाटलं. म्हणून मी तुमच्या कार्यशाळेला आले होते.''

''तू जे ऐकलंस वा तुला जे वाटतं तो तुझा गैरसमज आहे. आपण स्वत: संमोहनात जाऊन स्वत:ला सूचना देतो, वारंवार सूचना देतो. त्या आपल्या मेंदूत ठसतात, इंप्रिंट होतात. त्यानुसार आपली नवी सवय निर्माण होऊ शकते. आपला स्वभाव बदलू शकतो. आपली वर्तणूक बदलू शकते. आपल्यात बदल होऊ शकतो. पण आपण संमोहनात जाऊन दुसर्‍याची प्रतिमा डोळ्यांपुढे ठेवून कितीही सूचना दिल्या. हजारो-लाखो वेळा सूचना दिल्या तरी त्याचा त्या दुसर्‍या व्यक्तीवर काहीही परिणाम होत नाही, होणार नाही, होणं शक्य नाही. ही केवळ अंधश्रद्धा आहे, गैरसमजूत आहे.''

दोन वर्षापूर्वीची ही गोष्ट. पण तेव्हापासून सातत्यानं या प्रकारच्या प्रश्नांना, अंधश्रद्धांना मला तोंड द्यावं लागत आहे.

1990-91 साली जेव्हा पहिल्यांदा 'स्वसंमोहन व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा' मुंबईतून सुरू केल्या तेव्हाही मला सातत्यानं या प्रकारच्या अंधश्रद्धांशी, समजुतींशी सारखी लढाई करावी लागली.

संमोहन म्हणजे दुसर्‍याला वश करण्याचं, मोहित करण्याचं तंत्र अशीच समजूत होती. त्यामुळं सुरुवातीला काही वर्षे मोठय़ा संख्येनं पुरुष शिकण्यास येत असत, पण स्त्रियांची संख्या मात्र नगण्य, अल्प असे. माझे अनेक विद्यार्थी, विशेषत: विद्यार्थिनी म्हणत असत- ''सर, तुम्ही संमोहन न म्हणता या विषयाला मेडिटेशन म्हणा! जर दोन्ही अवस्था एकच आहेत, अल्फा रिदमच् आहेत, तर मेडिटेशन म्हणायला काय हरकत आहे? त्यामुळं सहभागींची संख्या वाढेल. मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळेल. स्त्रियाही मोठय़ा संख्येनं येऊ शकतील. एक चांगला, महत्त्वाचा विषय सगळ्यांना नीट आत्मसात करता येईल.''

मला कळत होतं. मेडिटेशन म्हटलं तर माझं काम जास्त सोपं होणार आहे. पण हा खोटेपणा झाला असता. त्याला दोन कारणं होती. एक म्हणजे मी शिकवतो ते मेडिटेशन नव्हतं. कारण भारतीय परंपरागत मेडिटेशनमध्ये, अल्फा रिद्मच्या अवस्थेत म्हणजे मेडिटेशनच्या अवस्थेत सूचना द्यायच्या नसतात. उलट आतलं सगळं मूळ आत्मास्वरूप बाहेर येऊ द्यावं अशी अपेक्षा असते. दुसरं मेडिटेशन हे आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात वापरलं जात असल्यामुळं त्यासोबत त्या त्या कल्टसंबंधीच्या अनेक अंधश्रद्धा जुळल्या आहेत. त्यांचीही सफाई मला करत बसावी लागली असती. शिवाय मी कुणी श्री श्री, बाबा, महाराज नसल्यामुळं आणि तसं दुरान्वयानंही बनायचं नसल्यामुळं मेडिटेशन शब्द न वापरताच संमोहन शब्द वापरूनच कार्यशाळा चालवायचं ठरवलं. त्यासाठी महाराष्ट्रभर हजारो विनामूल्य व्याख्यानं आयोजित करून लाखो लोकांच्या मनातील 'संमोहन' या विषयासंबंधीचे गैरसमज दूर केले, भीती, अंधश्रद्धा दूर केल्यात.

माझ्या आधी फक्त एक-दोघं जण संमोहनाचे स्टेज प्रोग्राम्स घेत असत. संमोहनात टाकून सूचना देत असत. त्यांनीही पुढे कार्यशाळा सुरू केल्या. त्या कार्यशाळेतही ते संमोहनात टाकून सूचना देणं आणि संमोहन प्रयोग करणं एवढंच करायचे. त्याचा 'व्यक्तिमत्त्व विकास' वगैरेशी फारसा संबंध नसे. त्यांच्या कामातूनही संमोहनासंबंधी अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा प्रसारित होत असत. पण मी ठरवलं होतं उगाच टीका करत बसण्यापेक्षा आपण या विषयासंबंधी विधायक प्रबोधन करत जायचं आणि तेच इतकी वर्षे करत आलो.

मोठय़ा प्रमाणावर मेडिटेशनच्या नावाखाली संमोहनाचा वापर अलीकडच्या काळात केला जाऊ लागला आहे, पण त्याची सुरुवात बर्‍याच वर्षापूर्वी सुरू झाली आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी या आध्यात्मिक कल्टने डायरेक्ट संमोहनाचा वापर मेडिटेशनच्या नावाखाली करायला फार पूर्वीच सुरुवात केली. त्यामुळं ही कल्ट खूप वाढली. संमोहनासारखं प्रभावी हत्यार वापरून ही कल्ट त्यांच्या साधकांचं पार ब्रेनवॉशिंग करून टाकतं.

दुसरं उदाहरण निर्मला माताचं. त्यांनीही सक्रियपणे संमोहनाचा वापर 'सहजयोगाच्या', मेडिटेशनच्या नावाखाली केला आहे.

या दोन्ही कल्टबद्दल, त्यांच्या ब्रेनवॉशिंगबद्दल पुढच्या लेखांमध्ये आपण विस्तारानं पाहू.

पण सध्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या नावाखाली चालणार्‍या ट्रेनिंग प्रोग्राम्सच्या माध्यमातून संमोहन वा मेडिटेशनच्या नावाखाली चालणार्‍या बदमाशीविरुद्ध लक्ष केंद्रित करू.

आपण आपली 'माईंड पॉवर' वापरून काहीही करू शकतो, असा दावा अनेक ट्रेनर करतात. त्यासाठी सुरुवातीला आपल्या विनामूल्य कार्यक्रमात अनेक सक्सेस स्टोरी दाखवतात. एखाद्या अपंगाचं यश, पाय नसलेला माणूस जिद्दीनं उभा कसा राहिला, सचिन तेंडुलकर, अंबानी, अमिताभ बच्चनपासून अनेक लोक कसे यशस्वी झाले. या सक्सेस स्टोरी सांगताना त्यांच्या 'माईंड पॉवर'मुळं ते यशस्वी झालेत असा आभास निर्माण केला जातो आणि मग आमच्या कार्यशाळेत या, आपली 'माईंड पॉवर' वापरा आणि सहजतेनं यशस्वी व्हा! असा उघड संदेश दिला जातो.

'माईंड पॉवर'चं स्पष्टीकरण देताना काय सांगतात? आपण एखादी प्रबळ इच्छा केली, विल पॉवर वापरली, पुन्हापुन्हा हे घडावं अशी इच्छा धरली की, ती इच्छा फलद्रूप होते, प्रत्यक्षात येते.

संमोहनात, मेडिटेशनमध्ये जाऊन एखादी गोष्ट घडावी अशी इच्छा केली, तसं घडताना चलचित्र पाहिलं, व्हिज्युअलाईज केलं की तसं खरंच घडतं, असं सांगितलं जातं.

थोडक्यात एखाद्यानं संमोहनात वा मेडिटेशनमध्ये जाऊन स्वत:ला सांगितलं, पाहिलं, ''मोठ्ठा इंडस्ट्रियालिस्ट झालो. मोठ्ठा कारखानदार झालो. (वा होतो आहे).''

असं रोज करत गेलं तर तो एक दिवस अंबानी सारखा इंडस्ट्रियालिस्ट बनेल.

एखाद्यानं ''मी मोठा नट बनतो आहे. अमिताभसारखा यशस्वी नट, हिरो बनतो आहे.,'' अशी प्रबळ इच्छा धरली, वारंवार इच्छा धरली तर तो खरंच मोठा, यशस्वी नट बनेल.

एखाद्यानं प्रबळ विल पॉवर वापरली तर त्याला बंगला, कारसुद्धा माईंड पॉवरमुळं प्राप्त होईल.

हे असले 'माईंड पॉवर'चे दावे करणारे खूप भोंदू निर्माण झाले आहेत. अहमदाबादचा 'माईंड पॉवर ट्रेनर' स्नेह देसाई आणि महाराष्ट्रातला देसाईची काळी डुप्लिकेट म्हणजे 'कार्बन कॉपी' दत्ता घोडे यांच्याविषयी आधी लिहिलंच आहे. हे दोघेही महाठग आहेत. त्यांच्या 'थर्ड आय, अँस्ट्रल ट्रॅव्हल, टेलिपथी' या दाव्यांना आपण जाहीर आव्हान टाकलंच आहे. त्यांनी पळ काढला म्हणून नागपूरमध्ये पोलिसांकडे तक्रार गुदरलीच आहे.

पण इतरही सगळ्या खोटे दावे करणार्‍या 'माईंड पॉवर'वाल्यांचा आपण टप्प्याटप्प्यानं भांडाफोड करणारच आहोत.

माझा साधा प्रश्न आहे. भारतातल्या किमान पाच कोटी तरुणांना कॅटरिना कैफ वा करिना कपूर हवी आहे. अडीच, अडीच कोटी तरुणांनी जर यापैकी एकीला प्राप्त करण्यासाठी रात्रंदिवस ध्यास घेतला, मन एकाग्र केलं, व्हिज्युअलाईज केलं तर अडीच कोटी लोकांना करिना आणि इतर अडीच कोटींना कॅटरिना प्राप्त होईल का? करिना-कॅटरिनाची हाडं तरी पुरतील का? अडीच कोटी तरुणांना हे शक्य आहे? मग माईंड पॉवर काय आहे?

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन

समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी- 9371014832

Thursday 18 October 2012

संमोहनात दुसर्‍याच्या इच्छेविरुद्ध काहीही करता येत नाही


'संमोहन' या विषयासंबंधी अनेक प्रकारचे समज गैरसमज आहेत. वशीकरण, मोहिनी विद्या आणि संमोहन हे एकाच प्रकारचे तंत्र-मंत्रादी प्रकार आहेत, अशी सर्वसामान्य माणसांची समजूत आहे. 'डोळय़ात डोळे घालून एखाद्या व्यक्तीला संमोहित करून लुबाडलं, तिचे दागिने काढून घेतले' अशा प्रकारच्या बातम्या अधूनमधून ऐकतो, कधी कधी वृत्तपत्रातूनही वाचतो. टी.व्ही. सिरियलमधूनही संमोहनाच्या माध्यमातून असे काही प्रकार घडताना, घडवताना आपण पाहतो. स्वत:ला तज्ज्ञ म्हणवणारे तथाकथित 'संमोहन तज्ज्ञ' तोंडाला येईल ते दावे करतात. स्टेज प्रोग्राम्सच्या माध्यमातून, मनोरंजनाचे प्रयोग सादर करून या क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण करण्यात मोलाची (?) भर घालतात. या तथाकथित संमोहन तज्ज्ञांना या विषयातलं फारसं कळतं असंही नाही. त्यांना एवढंच माहीत असतं, 'धर आणि टाक संमोहनात, दे सजेशन.' बस्स. संमोहनाच्या स्टेज प्रोगाम्सच्या दरम्यान निर्माण झालेल्या समस्यासुद्धा त्यांना कळत नाहीत. मग त्या समस्या हाताळण्याची क्षमता त्यांच्याजवळ कुठून असणार?

सध्या या विषयाचं फारसं गांभीर्य आणि ज्ञान नसणार्‍या संमोहन तज्ज्ञांनी व या क्षेत्रात शिरलेल्या काही भोंदूंनी या विषयासंबंधीच्या अंधश्रद्धा आणि गैरसमज मोठय़ा प्रमाणावर निर्माण करून ठेवले आहेत.

दुसर्‍याच्या इच्छेविरुद्ध त्याच्या डोळय़ात डोळे घालून अथवा आवाज काढून त्याला संमोहनात टाकता येतं हेच मुळात खोटं आहे. संमोहनाच्या माध्यमातून मोहिनी घालता येते वा कुणाला वश करता येतं हेही धादांत खोटं आहे. दुसर्‍याच्या इच्छेविरुद्ध एखादी गोष्ट करायला लावणारं अथवा त्याला वश करणारं संमोहन, मोहिनी अथवा वशीकरण या जगात अस्तित्वातच नाही, हे सर्वप्रथम आपण समजून घेतलं पाहिजे.

आज मी ज्या 'संमोहन' विषयासंबंधी बोलतो आहे, तो म्हणजे 'हिप्नॉटिझम' या शब्दानं ओळखली जाणारी एक वैज्ञानिक शाखा आहे. हिप्नॉटिझम शब्दाचं भाषांतर म्हणून 'संमोहन' या शब्दाचा प्रयोग आपण करतो आहोत. बाकी आपल्या मराठी भाषेत त्यानं त्याला संमोहितच करून टाकलं. म्हणजे प्रभावित केलं, वश केलं, मंत्रमुग्ध केलं वगैरे अर्थानं हा शब्द वापरला जातो तो अर्थ इथे अभिप्रेत नाही. आज वैज्ञानिक युगात 'हिप्नोथेरपी' संमोहन उपचार पद्धती ही एक उपचार शाखा आहे. जगभर अनेक देशांत या शाखांमध्ये या विषयाचा संशोधनात्मक अभ्यास केला जातो. नियमितपणे पेशंट्सवर ही उपचार पद्धती वापरली जाते. किमान अडीच हजार वर्षापासून या विषयाचा वैज्ञानिक जगताला परिचय आहे. 2450 वर्षापूर्वी औषधीशास्त्राचा जनक हिप्पोक्रेट्स 'आर्ट ऑफ हिलिंग'च्या नावाखाली या पद्धतीची प्रक्रिया वापरत असे. हजारो लोकांना रोगमुक्त करण्यासाठी या प्रक्रियेचा उपयोग करत असे. मधल्या काळात, विशेषत: मध्ययुगीन काळात, अनेक विषयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अंधश्रद्धा, चुकीच्या समजुती निर्माण झाल्यात. याही विषयाचा प्रवास असाच जादुई, चमत्कारिक, आधिभौतिक समजुतीत गुरफटला. मॅग्नेटिझम्, इथेरियल, मेस्मेरिझम असा प्रवास करत करत तो शेवटी 'हिप्नॉसिस'पर्यंत येऊन पोहोचला. प्रामुख्यानं 18 व्या शतकात डॉ. जेम्स ब्रेड या शास्त्रज्ञानं दीर्घकाळ या विषयासंबंधी संशोधन करून काही महत्त्वाचे मुद्दे सिद्ध केले. सगळ्यात प्रथम त्याने अशा प्रकारच्या विषयाला 'हिप्नॉसिस' हा शब्द वापरला. हिप्नॉस नावाची ग्रिकांची एक झोप येण्यास कारणीभूत ठरणारी देवता होती. ही प्रक्रियासुद्धा झोपेच्याजवळ जाणारी आहे असं त्याला वाटल्यामुळं त्यानं 'हिप्नॉसिस' हा शब्द वापरला. आज हा शब्द जगन्मान्य झाला आहे. 'हिप्नॉसिस' या अवस्थेला ब्रिटिश इंग्लिशमध्ये 'ट्रान्स' असा शब्द वापरला जातो. पण ब्रिटनमध्येही 'हिप्नोथेरपी' हाच शब्द या विषयाच्या उपचार पद्धतीला मात्र वापरला जातो.

संमोहनाच्या शेकडो प्रक्रिया आहेत. मी माझ्या संमोहन उपचारक अभ्यासक्रम (क)मध्ये 50 एक पॉझिटिव्ह प्रक्रिया शिकवतो. आणखी पन्नास एक निगेटिव्ह प्रक्रिया मला माहीत आहेत. त्या मी शिकवत नाही अथवा इतरांवर उपचारांसाठी वापरतही नाही. याचाच अर्थ यापेक्षाही अधिक मला माहीत नसलेल्याही अनेक प्रक्रिया या जगात अस्तित्वात आहेत.

कोणतीही प्रक्रिया वापरून माणसाची बॉडी आणि माईंड दोन्ही रिलॅक्स झालं की माणूस संमोहित अवस्थेत जातो. या अवस्थेत माणसाची सूचना स्वीकारण्याची क्षमता वाढलेली असते. माणूस एका मानसिक संतुलनाच्या अवस्थेत जातो. काही काळ 10 ते 30 मिनिटं या अवस्थेत राहिल्यास माणसाच्या मनात साचलेल्या टेन्शन्स, अँग्झायटीचा, ताणतणावांचा निचरा होतो. माणूस शांत, अधिक शांत, अंतर्बाह्य शांत बनतो. त्यामुळं तो अधिकाधिक निरोगी बनतो. त्याच्या नकारात्मक स्वभावाचे कंगोरे कमी होतात. राग, चिडचिड, भीती, टेंशन, चिंता यांचं प्रमाण कमी होतं. केवळ रोज नियमितपणे काही काळ या संमोहन अवस्थेत राहिलं तरी हे फायदे एखाद्या बायप्रॉडक्टसारखे आपल्याला प्राप्त होतात.

शिवाय संमोहित अवस्थेत आपण 'हायली सजेस्टिबल' बनत असल्यामुळे, दिलेल्या सूचना प्रभावीपणे स्वीकारत असल्यामुळे या अवस्थेचा उपयोग आपण स्वत:चं माईंड प्रोग्राम करण्यासाठी करू शकतो. त्याद्वारा आपल्या स्वभावात, वर्तणुकीत, क्रियांमध्ये, विचार करण्याच्या पद्धतीमध्ये, भावनांमध्ये विधायक व आवश्यक ते बदल घडवून आणू शकतो. आपली व्यसनं, वाईट सवयी घालवू शकतो. नवे गुण आत्मसात करू शकतो. नवी कौशल्यं, नवे तंत्र, नव्या गोष्टी उत्तमपणे शिकण्यासाठी या प्रक्रियेचा उपयोग करू शकतो.

संमोहन ही एक आपल्या मनाची, माईंडची नैसर्गिक अवस्था आहे. मेंदूमध्ये चालणार्‍या कार्यप्रणालीला माईंड, मन असं म्हटलं जातं. आपल्या मेंदूत सातत्यानं काही प्रक्रिया चालत असतात. विद्युत लहरीसारख्या निघत (अेमिट) असतात. मेंदूच्या मज्जातंतूंमधून निघणार्‍या या विद्युत लहरींना मोजण्यासाठी आपण यंत्राचा उपयोग करतो. त्याला ई. ई.जी. घेणं असं म्हणतात. संमोहित अवस्थेत हे ई. ई. जी. नेहमी 8 ते 12 सायकल्स पर सेकंद असतात. त्याला 'अल्फा रिदम' असं म्हणण्याचाही प्रघात आहे. म्हणून संमोहनाला अल्फा रिदमची अवस्था असंही म्हटलं जातं.

खरं म्हणजे एकाग्रतेनं केलेल्या प्रार्थनेमुळं अथवा वेगवेगळ्या धर्मानी जोपासलेल्या मेडिटेशन्समुळं, ध्यान धारणेमुळंसुद्धा आपण या अल्फा रिदमच्या अवस्थेत जाऊन पोहोचतो. वैज्ञानिकदृष्टय़ा संमोहन, मेडिटेशन, ध्यानधारणा ह्या एकच अवस्था आहेत. या सगळ्याच अवस्थांमध्ये ई.ई. जी. नेहमी 8 ते 11 सायकल्स पर सेकंद असतात. तरी अनेक लोक मेडिटेशन म्हणजे काही तरी पवित्र आहे असं मानतात आणि संमोहन म्हणजे काहीतरी हिणकस, कमी प्रतीचं आहे असं त्यांच्यावर झालेल्या संस्कारामुळं समजत असतात.

मेडिटेशन, ध्यानधारणा या प्रक्रिया आपल्या संस्कारामधून आल्यामुळं त्या आपल्याला जवळच्या वाटतात. पवित्र वाटतात. पण परंपरागत भारतीय मेडिटेशन्समध्ये या अवस्थेत डायरेक्ट सूचना द्यायच्या नसतात. अशा सूचना देणं चुकीचं समजलं जातं. खरं म्हणजे या अवस्थेत आपली सूचना स्वीकारण्याची क्षमता प्रचंड वाढली असते. पण परंपरागत मेडिटेशन वापरताना आपण ही सुवर्णसंधी सोडतो, गमावतो.

भारतीय समाजात मेडिटेशन्स हे देवप्राप्तीकरिता आणि आध्यात्मिक उन्नतीकरिता वापरण्याचा प्रघात आहे. व्यावहारिक जीवनाकरिता वा व्यावहारिक उन्नतीकरिता त्याचा वापर करण्याचा प्रयत्न न झाल्यामुळे आजच्या जीवनासाठी सुसंगत असा त्यांचा विकास होऊ शकला नाही. पण संमोहनशास्त्र मात्र वैज्ञानिक पद्धतीनं अभ्यासलं जात असल्यामुळे, वापरलं जात असल्यामुळे अल्फा रिदमच्या हायली सजेस्टिबल असण्याचा उपयोग करून घेतआणि डायरेक्ट सूचना देऊन स्वत:मध्ये हवे आहे तसे बदल घडवून आणण्यासाठी माणसाच्या हाती एक प्रभावी साधन उपलब्ध करून देतं.

शिवाय मेडिटेशनच्या प्रक्रिया जास्त कठीण आहेत. वेळखाऊ, लांबलचक आहेत. सगळ्यांनाच त्या जमत नाहीत. त्या मानानं संमोहन प्रक्रिया सोप्या, सुलभ आहेत. कमी वेळात या अवस्थेमध्ये नेणार्‍या आहेत. त्यामुळे सामान्य माणसाला संमोहन सुलभतेनं शिकता येतं. सहजतेनं वापरता येतं. त्याचा उपयोग करून आपलं मानसिक, शारीरिक आरोग्य सुधारता येतं. स्वत: चांगले बदल घडवून आणून ऐहिक आयुष्य संपन्न बनवता येतं. मेडिटेशन आणि संमोहनाची तुलना करताना मी नेहमी एक उदाहरण देत असतो. भरदुपारी अनवाणी पायानं एक माणूस चालत जातो. 5 हजार पायर्‍या चढतो. वरस्थळी पोहोचल्यावर त्याला सुंदर पक्वान्नं शिजवलेली दिसतात. पण ते न खाताच तो अनवाणी पायानं पायर्‍या उतरून खाली उतरतो. कारण त्याला उपवास असतो. दुसरा माणूस पायर्‍यांच्या बाजूनं असणार्‍या रस्त्यावरून मोटारसायकलने लवकर वर पोहोचतो. यथेच्छ पंचपक्वान्न खातो आणि सहजतेनं पुन्हा झरकन परत येतो. पहिला माणूस मेडिटेशन करणारा आहे तर दुसरा माणूस संमोहन वापरणारा आहे.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन

समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी 9371014832

Saturday 6 October 2012

ग्रहांचे खडे : ज्योतिष्यांचा पोट भरण्याचा धंदा


'' बाई, तू खरी अन्नपूर्णा! तू आहेस म्हणून हे घर, घर आहे! रात्रंदिवस तू राबराब राबतेस. दिवस पाहत नाही की, रात्र पाहत नाही. म्हणून या घराचं सारं वैभव आहे. बाई तुझ्यामुळं हे घर टिकून आहे! '' घरासमोर उभा राहून सरोदी (जोशी, गावागावांत फिरणारे ज्योतिषी) मोठय़ा आवाजात टाळी ठोकतो. घरातील बाई, हातातलं काम सोडून पदराला हात पुसत पुसत उजळत्या चेहर्‍यांनं दारात येते. सरोद्याला हात दाखवते.

तिचा हात हातात घेऊन बारकाईनं पाहत निरीक्षण करत ज्योतिष्याचं पुढचं भविष्यकथन सुरू होतं, '' बाई, तू लई भाग्याची. खाऊनपिऊन सुखी आहेस. (बाईचा चेहरा, दारातून दिसणारी घराच्या आतील परिस्थिती, बाईची शरीरकाठी न्याहाळत न्याहाळत भविष्यकथन रंगत जातं.) कसली तदात नाही, पण बाई हातात धन काही थांबत नाही. तुझी धनरेषाच सांगते. तू खूप कष्ट उपसते. पण बाई, तुझ्या कष्टाची कदर नाही. ज्यानं कदर करावी, तुझी किंमत करावी त्याचं अलीकडे पुरेसं लक्ष नाही.(लग्न होऊन काही वर्षे झाली असतील. बाई स्वत:च्या राहणीमानाकडे फार लक्ष देत नाही तर नवर्‍याचं लक्ष कमी झालंय, हे ज्योतिष्याला बरोबर कळतं.) बाई, खूप चिंता वाटते तुझ्या मनाला. पण बाई, यात तुझा काही दोष नाही. सारा साडेसातीचा खेळ आहे. साडेसाती सुरू झाली अन् मालकाचं तोंड दुसरीकडे वळलं. घरात बाहेरचे कलह येऊ लागले. बाई, कोर्टाच्या वार्‍या सुरू होण्याचे लक्षणं आहेत..''

''हो ना! यांच्या छोटय़ा चुलतभावानं कोर्टात केस घातली.'' घरधनीण माहिती पुरवते. '' पाहा बाई, मी म्हणतच होतो, हा सारा 'शनी'चा खेळ. शनीला शांत करावं लागतं. बाई मी सांगतो. ते करशील? पुढं फार बिकट वाट आहे. मोठ्ठं गंडांतर येऊ घातलं आहे..'' ज्योतिष्याची टकळी सुरूच असते. बाई पार घाबरून जाते. भीती तिच्या चेहर्‍यावर दिसू लागते., ''सांगानं, जोशीबुआ. काय करावं लागन?'' सावज कह्यात आल्याची खात्री पटताच ज्योतिष्याची पुढची आखणी सुरू होते. हळुवारपणे जाळं

फेकलं जातं, '' बाई, दर शनिवारी शनिदेवाला 50 ग्रॅम तेलाचा अभिषेक घालायचा.''

''बरं, बुआ ठीक आहे. दर शनिवारी अभिषेक घालीन.'' बाई आश्वासन देते. ''व्वा बाई, तू खरी धार्मिक! खरी भक्त आहे. म्हणूनच आजवर निभावलं. पण बाई पुढचं गंडांतर फार भयानक आहे. एखाद्याच्या जीवावर ना बेतावं म्हणजे झालं..'' मोठ्ठा पॉज घेत ज्योतिषी श्वास सोडतो. ज्योतिष्याच्या पुढच्या पॉजमुळं बाई खूपच घाबरते, मूर्तिमंत भीती, काळजी तिच्या चेहर्‍यावर झळकू लागते. ''बाई, शांती करावी लागते अन् ती इथे घरी करून नाही चालणार. त्यासाठी हरिद्वारला जोडीनं जाऊन शांती करावी लागते. गंगेच्या काठी असलेल्या शनिदेवासमोर शांती-पूजा करावी लागते. तरच पुढचं गंडांतर टळलं.''

''अहो, ज्योतिषीबुआ. ते तर शक्य नाही. आमच्या ह्यांना असल्या गोष्टी आवडत नाहीत. ते कधीच सोबत हरिद्वारला येणार नाही.'' बाई खूप काकुळतीनं सांगते.

''एक उपाय आहे, बाई. तुमच्याऐवजी दुसर्‍या जोडीनं, तुमच्या नावानं पूजा घातली तरी चालंल.. तुम्ही म्हणाल तर मी माझ्या बायकोसोबत जाऊन पूजा घालतो, तुमच्यासाठी. पण त्यासाठी खर्च मोठा.. दोन माणसांनी हरिद्वार जाणं, येणं. पूजा, खर्च. 10 हजारांचा तरी खर्च आहे.''

बाई लगबगीनं आत जाते. कपाट उघडते. खूप मेहनतीनं पै पै जोडून ठेवलेले पैसे काढते व मोजते. 8 हजारच भरतात. इकडेतिकडे ठेवलेले 260 रुपये सापडतात. ते घेऊन, हिरमुसला चेहरा करून बुआकडे येते. म्हणते, '' बुआ, एवढे 10 हजार तर नाही. माझ्याजवळ 8,260 रुपये आहेत. मालकाला तर मागण्याची सोय नाही. एवढय़ात जरा जमवा ना! माझ्यासाठी एवढं करा.''

ज्योतिषीबुआ थोडसं तोंड वेडंवाकडं करीत म्हणतो,''बाई, एवढय़ानं जमायचं नाही. पण तुमच्यावर येऊ घातलेलं अरिष्ट पाहून काळीज दुखतं. तुमची भक्ती पाहून तुमच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे असं वाटतं. ठीक आहे. गरज पडली तर स्वत:जवळची पदरमोड करीन, पण तुमच्यासाठी जोडीनं पूजा घालीन.''

8,260 रुपये घेऊन ज्योतिषी जातो.15 दिवसांनी येऊन बाईला एक 'सुरक्षाकवच' दंडावर (बाहीच्या आत) बांधण्यासाठी देतो. त्या सुरक्षाकवचाची बाजारातील किंमत असते 5 रुपये. हा किस्सा माझ्याच जवळच्या एका नातेवाईक बाईबाबत घडलेला. अ. भा अंनिसची चळवळ सुरू झाल्यावर मी अतिशय बारकाईनं या परंपरागत, गावोगाव भटकून भविष्य सांगणार्‍या ज्योतिष्यांचं भविष्य कथन ऐकलं आहे. टेपरेकॉर्ड केलं आहे. कोणत्याही आधुनिक, अभ्यासू, ज्योतिष्यांपेक्षा यांची भविष्यकथन पद्धती खूप जास्त प्रभावी आहे. गिर्‍हाईकांचं जास्तीतजास्त समाधान करणारी आहे.

पण सारेच ज्योतिषी 'शनी'ची साडेसाती, राहू, केतूचा कोप, ग्रहाची वक्री वा राहू काल, गंडांतर, अरिष्ट, गृहशांती सांगून समोरच्याला घाबरवितात आणि गृहशांतीच्या नावाखाली भरपूर मलिदा काढतात. तो त्यांचा खरा धंदा असतो. आजवर ग्रहशांती, गंडांतर सांगून लोकांना न लुबाडणारा व्यावसायिक ज्योतिषी मी पाहिला नाही. समजा 'शनी'ला आपण तेलाचा अभिषेक केला. कितीही तेल घातलं तरी पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर असणारा शनिग्रह कसा शांत होणार? पृथ्वीपेक्षा अनेक पटीनं, आकारानं मोठा असलेला शनिग्रह 50 ग्रॅम तेलात कसा स्नान करणार? अख्खं पृथ्वीवर उपलब्ध असलेलं तेल जरी 'शनी'वर ओतलं तरी त्याला स्नान घालता येणार नाही. एवढय़ा मोठय़ा प्रचंड आकाराचा तो ग्रह आहे. तरी आपण आजही 2012 सालात ग्रहशांती या प्रकारावर विश्वास ठेवतो. त्यापायी सातत्यानं लुबाडले जातो आणि ज्योतिष्यांची तुंबडी भरत जातो. ग्रहांचे खडे हा त्यातलाच एक प्रकार. आपल्या बोटात घातलेल्या चिमुकल्या खडय़ाचा आकाशस्थ ग्रहांवर कसा परिणाम होणार?

हा छोटासा खडा कसं आपलं संरक्षक कवच बनणार? या खडय़ात काय शक्ती आहे? ती कुठे सिद्ध झाली आहे? कुठेच नाही. याला कोणताच वैज्ञानिक आधार नाही. फक्त ज्योतिष्याचं पोट भरण्याचा हा धंदा आहे. यापलीकडे यात कवडीचंही सत्य नाही.

ग्रहशांती, साडेसाती, राहू काल, राशिरत्न ही सारी तुमच्या- माझ्यासारख्या सामान्य माणसाला लुबाडण्यासाठी वापरली जाणारी ज्योतिष्यांची हत्यारं आहेत.

खिसेकापूही आपला खिसा कापतात, पण आपणास बेसावध गाठून. आपल्याला नकळत. आपल्याला कळल्यावर आपण खिसेकापूला शिव्यांची लाखोली वाहतो, पण ज्योतिषी मात्र दिवसढवळ्या समजून उमजून डोळय़ादेखत आपल्याला लुबाडतात आणि लुबाडले गेल्यावर आपण या ज्योतिष्यांचेच आभार मानतो. त्यांनीच उपकार केले असं मानतो. कारण तेही लुबाडणूक आपल्यावर झालेल्या धार्मिक संस्काराचा आधार घेऊन करीत असतात. त्यामुळं.. थोडक्यात सांगायचं तर आपणच फसायला तयार असतो. फसवणार्‍याला, ''ये मला फसव, माझा खिसा काप असं निमंत्रण देत असतो.'' कदाचित आपल्याला वाटत असेल की, आजचे आधुनिक सुशिक्षित ज्योतिषी असला फसविण्याचा धंदा करत नसतील. म्हणून एक जाहीर अनुभव सांगतो.

मुंबईतील गोष्ट. माझा मित्र जगदीश काबरे आणि मी एका व्याख्यान कार्यक्रमावरून त्याच्या दुचाकीवरून परत येत होतो. तो विज्ञान शिक्षक आहे. त्याला एका मुंबईतील नामवंत संस्थेनं पुरस्कार जाहीर केला होता. रस्त्यातच ते स्थळ असल्यामुळं मीही त्याच्यासोबत गेलो. त्या ठिकाणी कालनिर्णयकार जयंत साळगावकरांचं व्याख्यान सुरू होतं. त्यांचं व्याख्यान झाल्यावर 'उत्तम विज्ञान शिक्षकाचा' पुरस्कार जयंत साळगावकर यांच्या हस्ते काबरेंना दिला जाणार असं आयोजकांनी सांगितलं. विज्ञान शिक्षकाला एका ज्योतिष्याच्या हस्ते पुरस्कार? जगदीश काबरे चिडले. त्यांनी पुरस्कार घेण्यास नकार दिला. आयोजकांनी मार्ग काढला. काबरेंना दुसर्‍यांच्या हस्ते पुरस्कार देऊ, असं सांगितलं. आम्ही थांबलो. भाषण ऐकू लागलो. जयंत साळगावकर सांगत होते,'' होय, ग्रहशांती करता येते. ग्रहशांतीसाठी केल्या जाणार्‍या पूजेमुळं ग्रहांचे होणारे दुष्परिणाम कमी करता येतात, थांबवता येतात.''

जगदीश काबरेंनी उभं राहून विचारलं, ''हे कसं शक्य आहे? ग्रहांची भ्रमणकक्षा, अंतर ठरलेलं आहे.त्यांच्या भ्रमणानुसार, स्थानानुसार जर माणसांवर काही परिणाम होत असेल, तर ते होणारे परिणाम बदलणं शक्यच नाही. इकडे कितीही पूजा केली तरी 'शनी' वा कोणत्याही ग्रहाच्या अंतरावर वा भ्रमणावर काहीच परिणाम होणार नाही. यामुळे होणारा परिणाम बदलूच शकणार नाही. तेव्हा ग्रहशांती करणं शक्य आहे असं आपण कसं म्हणता?''

जयंत साळगावकर या प्रश्नाचं उत्तर न देता ''श्रद्धा, धर्मश्रद्धा..''वगैरे बोलायला लागले. तेव्हा शेवटी मी उभा राहून म्हणालो, ''काबरेंच्या प्रश्नांना उत्तर द्या! धर्मश्रद्धेच्या नावाखाली टाळू नका!'' जयंत साळगावकरांनी मला नाव विचारलं. मी एकदोनदा टाळलं. कारण नाव सांगितलं असतं तर सारं वातावरण बदललं असतं. फारच आग्रह धरल्यावर मी माझं नाव सांगितलं आणि भलतंच झालं. माझं बोलणं, प्रश्न विचारणं आव्हान ठरलं. साळगावकरांचा आत्मविश्वास पार ढासळला. श्रोते घोळका करून माझ्याभोवती गोळा झाले. प्रश्नोत्तरातून ज्योतिष्याची चिरफाड सुरू झाली. हे मी मुद्दाम केलं नव्हतं. अपघातानंच झालं होतं. पण एक कळलं. जयंत साळगावकरांसारखा मोठा ज्योतिषी, कालनिर्णयकारसुद्धा ग्रहशांती सांगून लोकांना..???

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन

समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी- 9371014832

ग्रहांचे खडे : ज्योतिष्यांचा पोट भरण्याचा धंदा


'' बाई, तू खरी अन्नपूर्णा! तू आहेस म्हणून हे घर, घर आहे! रात्रंदिवस तू राबराब राबतेस. दिवस पाहत नाही की, रात्र पाहत नाही. म्हणून या घराचं सारं वैभव आहे. बाई तुझ्यामुळं हे घर टिकून आहे! '' घरासमोर उभा राहून सरोदी (जोशी, गावागावांत फिरणारे ज्योतिषी) मोठय़ा आवाजात टाळी ठोकतो. घरातील बाई, हातातलं काम सोडून पदराला हात पुसत पुसत उजळत्या चेहर्‍यांनं दारात येते. सरोद्याला हात दाखवते.

तिचा हात हातात घेऊन बारकाईनं पाहत निरीक्षण करत ज्योतिष्याचं पुढचं भविष्यकथन सुरू होतं, '' बाई, तू लई भाग्याची. खाऊनपिऊन सुखी आहेस. (बाईचा चेहरा, दारातून दिसणारी घराच्या आतील परिस्थिती, बाईची शरीरकाठी न्याहाळत न्याहाळत भविष्यकथन रंगत जातं.) कसली तदात नाही, पण बाई हातात धन काही थांबत नाही. तुझी धनरेषाच सांगते. तू खूप कष्ट उपसते. पण बाई, तुझ्या कष्टाची कदर नाही. ज्यानं कदर करावी, तुझी किंमत करावी त्याचं अलीकडे पुरेसं लक्ष नाही.(लग्न होऊन काही वर्षे झाली असतील. बाई स्वत:च्या राहणीमानाकडे फार लक्ष देत नाही तर नवर्‍याचं लक्ष कमी झालंय, हे ज्योतिष्याला बरोबर कळतं.) बाई, खूप चिंता वाटते तुझ्या मनाला. पण बाई, यात तुझा काही दोष नाही. सारा साडेसातीचा खेळ आहे. साडेसाती सुरू झाली अन् मालकाचं तोंड दुसरीकडे वळलं. घरात बाहेरचे कलह येऊ लागले. बाई, कोर्टाच्या वार्‍या सुरू होण्याचे लक्षणं आहेत..''

''हो ना! यांच्या छोटय़ा चुलतभावानं कोर्टात केस घातली.'' घरधनीण माहिती पुरवते. '' पाहा बाई, मी म्हणतच होतो, हा सारा 'शनी'चा खेळ. शनीला शांत करावं लागतं. बाई मी सांगतो. ते करशील? पुढं फार बिकट वाट आहे. मोठ्ठं गंडांतर येऊ घातलं आहे..'' ज्योतिष्याची टकळी सुरूच असते. बाई पार घाबरून जाते. भीती तिच्या चेहर्‍यावर दिसू लागते., ''सांगानं, जोशीबुआ. काय करावं लागन?'' सावज कह्यात आल्याची खात्री पटताच ज्योतिष्याची पुढची आखणी सुरू होते. हळुवारपणे जाळं

फेकलं जातं, '' बाई, दर शनिवारी शनिदेवाला 50 ग्रॅम तेलाचा अभिषेक घालायचा.''

''बरं, बुआ ठीक आहे. दर शनिवारी अभिषेक घालीन.'' बाई आश्वासन देते. ''व्वा बाई, तू खरी धार्मिक! खरी भक्त आहे. म्हणूनच आजवर निभावलं. पण बाई पुढचं गंडांतर फार भयानक आहे. एखाद्याच्या जीवावर ना बेतावं म्हणजे झालं..'' मोठ्ठा पॉज घेत ज्योतिषी श्वास सोडतो. ज्योतिष्याच्या पुढच्या पॉजमुळं बाई खूपच घाबरते, मूर्तिमंत भीती, काळजी तिच्या चेहर्‍यावर झळकू लागते. ''बाई, शांती करावी लागते अन् ती इथे घरी करून नाही चालणार. त्यासाठी हरिद्वारला जोडीनं जाऊन शांती करावी लागते. गंगेच्या काठी असलेल्या शनिदेवासमोर शांती-पूजा करावी लागते. तरच पुढचं गंडांतर टळलं.''

''अहो, ज्योतिषीबुआ. ते तर शक्य नाही. आमच्या ह्यांना असल्या गोष्टी आवडत नाहीत. ते कधीच सोबत हरिद्वारला येणार नाही.'' बाई खूप काकुळतीनं सांगते.

''एक उपाय आहे, बाई. तुमच्याऐवजी दुसर्‍या जोडीनं, तुमच्या नावानं पूजा घातली तरी चालंल.. तुम्ही म्हणाल तर मी माझ्या बायकोसोबत जाऊन पूजा घालतो, तुमच्यासाठी. पण त्यासाठी खर्च मोठा.. दोन माणसांनी हरिद्वार जाणं, येणं. पूजा, खर्च. 10 हजारांचा तरी खर्च आहे.''

बाई लगबगीनं आत जाते. कपाट उघडते. खूप मेहनतीनं पै पै जोडून ठेवलेले पैसे काढते व मोजते. 8 हजारच भरतात. इकडेतिकडे ठेवलेले 260 रुपये सापडतात. ते घेऊन, हिरमुसला चेहरा करून बुआकडे येते. म्हणते, '' बुआ, एवढे 10 हजार तर नाही. माझ्याजवळ 8,260 रुपये आहेत. मालकाला तर मागण्याची सोय नाही. एवढय़ात जरा जमवा ना! माझ्यासाठी एवढं करा.''

ज्योतिषीबुआ थोडसं तोंड वेडंवाकडं करीत म्हणतो,''बाई, एवढय़ानं जमायचं नाही. पण तुमच्यावर येऊ घातलेलं अरिष्ट पाहून काळीज दुखतं. तुमची भक्ती पाहून तुमच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे असं वाटतं. ठीक आहे. गरज पडली तर स्वत:जवळची पदरमोड करीन, पण तुमच्यासाठी जोडीनं पूजा घालीन.''

8,260 रुपये घेऊन ज्योतिषी जातो.15 दिवसांनी येऊन बाईला एक 'सुरक्षाकवच' दंडावर (बाहीच्या आत) बांधण्यासाठी देतो. त्या सुरक्षाकवचाची बाजारातील किंमत असते 5 रुपये. हा किस्सा माझ्याच जवळच्या एका नातेवाईक बाईबाबत घडलेला. अ. भा अंनिसची चळवळ सुरू झाल्यावर मी अतिशय बारकाईनं या परंपरागत, गावोगाव भटकून भविष्य सांगणार्‍या ज्योतिष्यांचं भविष्य कथन ऐकलं आहे. टेपरेकॉर्ड केलं आहे. कोणत्याही आधुनिक, अभ्यासू, ज्योतिष्यांपेक्षा यांची भविष्यकथन पद्धती खूप जास्त प्रभावी आहे. गिर्‍हाईकांचं जास्तीतजास्त समाधान करणारी आहे.

पण सारेच ज्योतिषी 'शनी'ची साडेसाती, राहू, केतूचा कोप, ग्रहाची वक्री वा राहू काल, गंडांतर, अरिष्ट, गृहशांती सांगून समोरच्याला घाबरवितात आणि गृहशांतीच्या नावाखाली भरपूर मलिदा काढतात. तो त्यांचा खरा धंदा असतो. आजवर ग्रहशांती, गंडांतर सांगून लोकांना न लुबाडणारा व्यावसायिक ज्योतिषी मी पाहिला नाही. समजा 'शनी'ला आपण तेलाचा अभिषेक केला. कितीही तेल घातलं तरी पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर असणारा शनिग्रह कसा शांत होणार? पृथ्वीपेक्षा अनेक पटीनं, आकारानं मोठा असलेला शनिग्रह 50 ग्रॅम तेलात कसा स्नान करणार? अख्खं पृथ्वीवर उपलब्ध असलेलं तेल जरी 'शनी'वर ओतलं तरी त्याला स्नान घालता येणार नाही. एवढय़ा मोठय़ा प्रचंड आकाराचा तो ग्रह आहे. तरी आपण आजही 2012 सालात ग्रहशांती या प्रकारावर विश्वास ठेवतो. त्यापायी सातत्यानं लुबाडले जातो आणि ज्योतिष्यांची तुंबडी भरत जातो. ग्रहांचे खडे हा त्यातलाच एक प्रकार. आपल्या बोटात घातलेल्या चिमुकल्या खडय़ाचा आकाशस्थ ग्रहांवर कसा परिणाम होणार?

हा छोटासा खडा कसं आपलं संरक्षक कवच बनणार? या खडय़ात काय शक्ती आहे? ती कुठे सिद्ध झाली आहे? कुठेच नाही. याला कोणताच वैज्ञानिक आधार नाही. फक्त ज्योतिष्याचं पोट भरण्याचा हा धंदा आहे. यापलीकडे यात कवडीचंही सत्य नाही.

ग्रहशांती, साडेसाती, राहू काल, राशिरत्न ही सारी तुमच्या- माझ्यासारख्या सामान्य माणसाला लुबाडण्यासाठी वापरली जाणारी ज्योतिष्यांची हत्यारं आहेत.

खिसेकापूही आपला खिसा कापतात, पण आपणास बेसावध गाठून. आपल्याला नकळत. आपल्याला कळल्यावर आपण खिसेकापूला शिव्यांची लाखोली वाहतो, पण ज्योतिषी मात्र दिवसढवळ्या समजून उमजून डोळय़ादेखत आपल्याला लुबाडतात आणि लुबाडले गेल्यावर आपण या ज्योतिष्यांचेच आभार मानतो. त्यांनीच उपकार केले असं मानतो. कारण तेही लुबाडणूक आपल्यावर झालेल्या धार्मिक संस्काराचा आधार घेऊन करीत असतात. त्यामुळं.. थोडक्यात सांगायचं तर आपणच फसायला तयार असतो. फसवणार्‍याला, ''ये मला फसव, माझा खिसा काप असं निमंत्रण देत असतो.'' कदाचित आपल्याला वाटत असेल की, आजचे आधुनिक सुशिक्षित ज्योतिषी असला फसविण्याचा धंदा करत नसतील. म्हणून एक जाहीर अनुभव सांगतो.

मुंबईतील गोष्ट. माझा मित्र जगदीश काबरे आणि मी एका व्याख्यान कार्यक्रमावरून त्याच्या दुचाकीवरून परत येत होतो. तो विज्ञान शिक्षक आहे. त्याला एका मुंबईतील नामवंत संस्थेनं पुरस्कार जाहीर केला होता. रस्त्यातच ते स्थळ असल्यामुळं मीही त्याच्यासोबत गेलो. त्या ठिकाणी कालनिर्णयकार जयंत साळगावकरांचं व्याख्यान सुरू होतं. त्यांचं व्याख्यान झाल्यावर 'उत्तम विज्ञान शिक्षकाचा' पुरस्कार जयंत साळगावकर यांच्या हस्ते काबरेंना दिला जाणार असं आयोजकांनी सांगितलं. विज्ञान शिक्षकाला एका ज्योतिष्याच्या हस्ते पुरस्कार? जगदीश काबरे चिडले. त्यांनी पुरस्कार घेण्यास नकार दिला. आयोजकांनी मार्ग काढला. काबरेंना दुसर्‍यांच्या हस्ते पुरस्कार देऊ, असं सांगितलं. आम्ही थांबलो. भाषण ऐकू लागलो. जयंत साळगावकर सांगत होते,'' होय, ग्रहशांती करता येते. ग्रहशांतीसाठी केल्या जाणार्‍या पूजेमुळं ग्रहांचे होणारे दुष्परिणाम कमी करता येतात, थांबवता येतात.''

जगदीश काबरेंनी उभं राहून विचारलं, ''हे कसं शक्य आहे? ग्रहांची भ्रमणकक्षा, अंतर ठरलेलं आहे.त्यांच्या भ्रमणानुसार, स्थानानुसार जर माणसांवर काही परिणाम होत असेल, तर ते होणारे परिणाम बदलणं शक्यच नाही. इकडे कितीही पूजा केली तरी 'शनी' वा कोणत्याही ग्रहाच्या अंतरावर वा भ्रमणावर काहीच परिणाम होणार नाही. यामुळे होणारा परिणाम बदलूच शकणार नाही. तेव्हा ग्रहशांती करणं शक्य आहे असं आपण कसं म्हणता?''

जयंत साळगावकर या प्रश्नाचं उत्तर न देता ''श्रद्धा, धर्मश्रद्धा..''वगैरे बोलायला लागले. तेव्हा शेवटी मी उभा राहून म्हणालो, ''काबरेंच्या प्रश्नांना उत्तर द्या! धर्मश्रद्धेच्या नावाखाली टाळू नका!'' जयंत साळगावकरांनी मला नाव विचारलं. मी एकदोनदा टाळलं. कारण नाव सांगितलं असतं तर सारं वातावरण बदललं असतं. फारच आग्रह धरल्यावर मी माझं नाव सांगितलं आणि भलतंच झालं. माझं बोलणं, प्रश्न विचारणं आव्हान ठरलं. साळगावकरांचा आत्मविश्वास पार ढासळला. श्रोते घोळका करून माझ्याभोवती गोळा झाले. प्रश्नोत्तरातून ज्योतिष्याची चिरफाड सुरू झाली. हे मी मुद्दाम केलं नव्हतं. अपघातानंच झालं होतं. पण एक कळलं. जयंत साळगावकरांसारखा मोठा ज्योतिषी, कालनिर्णयकारसुद्धा ग्रहशांती सांगून लोकांना..???

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन

समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी- 9371014832

ग्रहांचे खडे : ज्योतिष्यांचा पोट भरण्याचा धंदा


'' बाई, तू खरी अन्नपूर्णा! तू आहेस म्हणून हे घर, घर आहे! रात्रंदिवस तू राबराब राबतेस. दिवस पाहत नाही की, रात्र पाहत नाही. म्हणून या घराचं सारं वैभव आहे. बाई तुझ्यामुळं हे घर टिकून आहे! '' घरासमोर उभा राहून सरोदी (जोशी, गावागावांत फिरणारे ज्योतिषी) मोठय़ा आवाजात टाळी ठोकतो. घरातील बाई, हातातलं काम सोडून पदराला हात पुसत पुसत उजळत्या चेहर्‍यांनं दारात येते. सरोद्याला हात दाखवते.

तिचा हात हातात घेऊन बारकाईनं पाहत निरीक्षण करत ज्योतिष्याचं पुढचं भविष्यकथन सुरू होतं, '' बाई, तू लई भाग्याची. खाऊनपिऊन सुखी आहेस. (बाईचा चेहरा, दारातून दिसणारी घराच्या आतील परिस्थिती, बाईची शरीरकाठी न्याहाळत न्याहाळत भविष्यकथन रंगत जातं.) कसली तदात नाही, पण बाई हातात धन काही थांबत नाही. तुझी धनरेषाच सांगते. तू खूप कष्ट उपसते. पण बाई, तुझ्या कष्टाची कदर नाही. ज्यानं कदर करावी, तुझी किंमत करावी त्याचं अलीकडे पुरेसं लक्ष नाही.(लग्न होऊन काही वर्षे झाली असतील. बाई स्वत:च्या राहणीमानाकडे फार लक्ष देत नाही तर नवर्‍याचं लक्ष कमी झालंय, हे ज्योतिष्याला बरोबर कळतं.) बाई, खूप चिंता वाटते तुझ्या मनाला. पण बाई, यात तुझा काही दोष नाही. सारा साडेसातीचा खेळ आहे. साडेसाती सुरू झाली अन् मालकाचं तोंड दुसरीकडे वळलं. घरात बाहेरचे कलह येऊ लागले. बाई, कोर्टाच्या वार्‍या सुरू होण्याचे लक्षणं आहेत..''

''हो ना! यांच्या छोटय़ा चुलतभावानं कोर्टात केस घातली.'' घरधनीण माहिती पुरवते. '' पाहा बाई, मी म्हणतच होतो, हा सारा 'शनी'चा खेळ. शनीला शांत करावं लागतं. बाई मी सांगतो. ते करशील? पुढं फार बिकट वाट आहे. मोठ्ठं गंडांतर येऊ घातलं आहे..'' ज्योतिष्याची टकळी सुरूच असते. बाई पार घाबरून जाते. भीती तिच्या चेहर्‍यावर दिसू लागते., ''सांगानं, जोशीबुआ. काय करावं लागन?'' सावज कह्यात आल्याची खात्री पटताच ज्योतिष्याची पुढची आखणी सुरू होते. हळुवारपणे जाळं

फेकलं जातं, '' बाई, दर शनिवारी शनिदेवाला 50 ग्रॅम तेलाचा अभिषेक घालायचा.''

''बरं, बुआ ठीक आहे. दर शनिवारी अभिषेक घालीन.'' बाई आश्वासन देते. ''व्वा बाई, तू खरी धार्मिक! खरी भक्त आहे. म्हणूनच आजवर निभावलं. पण बाई पुढचं गंडांतर फार भयानक आहे. एखाद्याच्या जीवावर ना बेतावं म्हणजे झालं..'' मोठ्ठा पॉज घेत ज्योतिषी श्वास सोडतो. ज्योतिष्याच्या पुढच्या पॉजमुळं बाई खूपच घाबरते, मूर्तिमंत भीती, काळजी तिच्या चेहर्‍यावर झळकू लागते. ''बाई, शांती करावी लागते अन् ती इथे घरी करून नाही चालणार. त्यासाठी हरिद्वारला जोडीनं जाऊन शांती करावी लागते. गंगेच्या काठी असलेल्या शनिदेवासमोर शांती-पूजा करावी लागते. तरच पुढचं गंडांतर टळलं.''

''अहो, ज्योतिषीबुआ. ते तर शक्य नाही. आमच्या ह्यांना असल्या गोष्टी आवडत नाहीत. ते कधीच सोबत हरिद्वारला येणार नाही.'' बाई खूप काकुळतीनं सांगते.

''एक उपाय आहे, बाई. तुमच्याऐवजी दुसर्‍या जोडीनं, तुमच्या नावानं पूजा घातली तरी चालंल.. तुम्ही म्हणाल तर मी माझ्या बायकोसोबत जाऊन पूजा घालतो, तुमच्यासाठी. पण त्यासाठी खर्च मोठा.. दोन माणसांनी हरिद्वार जाणं, येणं. पूजा, खर्च. 10 हजारांचा तरी खर्च आहे.''

बाई लगबगीनं आत जाते. कपाट उघडते. खूप मेहनतीनं पै पै जोडून ठेवलेले पैसे काढते व मोजते. 8 हजारच भरतात. इकडेतिकडे ठेवलेले 260 रुपये सापडतात. ते घेऊन, हिरमुसला चेहरा करून बुआकडे येते. म्हणते, '' बुआ, एवढे 10 हजार तर नाही. माझ्याजवळ 8,260 रुपये आहेत. मालकाला तर मागण्याची सोय नाही. एवढय़ात जरा जमवा ना! माझ्यासाठी एवढं करा.''

ज्योतिषीबुआ थोडसं तोंड वेडंवाकडं करीत म्हणतो,''बाई, एवढय़ानं जमायचं नाही. पण तुमच्यावर येऊ घातलेलं अरिष्ट पाहून काळीज दुखतं. तुमची भक्ती पाहून तुमच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे असं वाटतं. ठीक आहे. गरज पडली तर स्वत:जवळची पदरमोड करीन, पण तुमच्यासाठी जोडीनं पूजा घालीन.''

8,260 रुपये घेऊन ज्योतिषी जातो.15 दिवसांनी येऊन बाईला एक 'सुरक्षाकवच' दंडावर (बाहीच्या आत) बांधण्यासाठी देतो. त्या सुरक्षाकवचाची बाजारातील किंमत असते 5 रुपये. हा किस्सा माझ्याच जवळच्या एका नातेवाईक बाईबाबत घडलेला. अ. भा अंनिसची चळवळ सुरू झाल्यावर मी अतिशय बारकाईनं या परंपरागत, गावोगाव भटकून भविष्य सांगणार्‍या ज्योतिष्यांचं भविष्य कथन ऐकलं आहे. टेपरेकॉर्ड केलं आहे. कोणत्याही आधुनिक, अभ्यासू, ज्योतिष्यांपेक्षा यांची भविष्यकथन पद्धती खूप जास्त प्रभावी आहे. गिर्‍हाईकांचं जास्तीतजास्त समाधान करणारी आहे.

पण सारेच ज्योतिषी 'शनी'ची साडेसाती, राहू, केतूचा कोप, ग्रहाची वक्री वा राहू काल, गंडांतर, अरिष्ट, गृहशांती सांगून समोरच्याला घाबरवितात आणि गृहशांतीच्या नावाखाली भरपूर मलिदा काढतात. तो त्यांचा खरा धंदा असतो. आजवर ग्रहशांती, गंडांतर सांगून लोकांना न लुबाडणारा व्यावसायिक ज्योतिषी मी पाहिला नाही. समजा 'शनी'ला आपण तेलाचा अभिषेक केला. कितीही तेल घातलं तरी पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर असणारा शनिग्रह कसा शांत होणार? पृथ्वीपेक्षा अनेक पटीनं, आकारानं मोठा असलेला शनिग्रह 50 ग्रॅम तेलात कसा स्नान करणार? अख्खं पृथ्वीवर उपलब्ध असलेलं तेल जरी 'शनी'वर ओतलं तरी त्याला स्नान घालता येणार नाही. एवढय़ा मोठय़ा प्रचंड आकाराचा तो ग्रह आहे. तरी आपण आजही 2012 सालात ग्रहशांती या प्रकारावर विश्वास ठेवतो. त्यापायी सातत्यानं लुबाडले जातो आणि ज्योतिष्यांची तुंबडी भरत जातो. ग्रहांचे खडे हा त्यातलाच एक प्रकार. आपल्या बोटात घातलेल्या चिमुकल्या खडय़ाचा आकाशस्थ ग्रहांवर कसा परिणाम होणार?

हा छोटासा खडा कसं आपलं संरक्षक कवच बनणार? या खडय़ात काय शक्ती आहे? ती कुठे सिद्ध झाली आहे? कुठेच नाही. याला कोणताच वैज्ञानिक आधार नाही. फक्त ज्योतिष्याचं पोट भरण्याचा हा धंदा आहे. यापलीकडे यात कवडीचंही सत्य नाही.

ग्रहशांती, साडेसाती, राहू काल, राशिरत्न ही सारी तुमच्या- माझ्यासारख्या सामान्य माणसाला लुबाडण्यासाठी वापरली जाणारी ज्योतिष्यांची हत्यारं आहेत.

खिसेकापूही आपला खिसा कापतात, पण आपणास बेसावध गाठून. आपल्याला नकळत. आपल्याला कळल्यावर आपण खिसेकापूला शिव्यांची लाखोली वाहतो, पण ज्योतिषी मात्र दिवसढवळ्या समजून उमजून डोळय़ादेखत आपल्याला लुबाडतात आणि लुबाडले गेल्यावर आपण या ज्योतिष्यांचेच आभार मानतो. त्यांनीच उपकार केले असं मानतो. कारण तेही लुबाडणूक आपल्यावर झालेल्या धार्मिक संस्काराचा आधार घेऊन करीत असतात. त्यामुळं.. थोडक्यात सांगायचं तर आपणच फसायला तयार असतो. फसवणार्‍याला, ''ये मला फसव, माझा खिसा काप असं निमंत्रण देत असतो.'' कदाचित आपल्याला वाटत असेल की, आजचे आधुनिक सुशिक्षित ज्योतिषी असला फसविण्याचा धंदा करत नसतील. म्हणून एक जाहीर अनुभव सांगतो.

मुंबईतील गोष्ट. माझा मित्र जगदीश काबरे आणि मी एका व्याख्यान कार्यक्रमावरून त्याच्या दुचाकीवरून परत येत होतो. तो विज्ञान शिक्षक आहे. त्याला एका मुंबईतील नामवंत संस्थेनं पुरस्कार जाहीर केला होता. रस्त्यातच ते स्थळ असल्यामुळं मीही त्याच्यासोबत गेलो. त्या ठिकाणी कालनिर्णयकार जयंत साळगावकरांचं व्याख्यान सुरू होतं. त्यांचं व्याख्यान झाल्यावर 'उत्तम विज्ञान शिक्षकाचा' पुरस्कार जयंत साळगावकर यांच्या हस्ते काबरेंना दिला जाणार असं आयोजकांनी सांगितलं. विज्ञान शिक्षकाला एका ज्योतिष्याच्या हस्ते पुरस्कार? जगदीश काबरे चिडले. त्यांनी पुरस्कार घेण्यास नकार दिला. आयोजकांनी मार्ग काढला. काबरेंना दुसर्‍यांच्या हस्ते पुरस्कार देऊ, असं सांगितलं. आम्ही थांबलो. भाषण ऐकू लागलो. जयंत साळगावकर सांगत होते,'' होय, ग्रहशांती करता येते. ग्रहशांतीसाठी केल्या जाणार्‍या पूजेमुळं ग्रहांचे होणारे दुष्परिणाम कमी करता येतात, थांबवता येतात.''

जगदीश काबरेंनी उभं राहून विचारलं, ''हे कसं शक्य आहे? ग्रहांची भ्रमणकक्षा, अंतर ठरलेलं आहे.त्यांच्या भ्रमणानुसार, स्थानानुसार जर माणसांवर काही परिणाम होत असेल, तर ते होणारे परिणाम बदलणं शक्यच नाही. इकडे कितीही पूजा केली तरी 'शनी' वा कोणत्याही ग्रहाच्या अंतरावर वा भ्रमणावर काहीच परिणाम होणार नाही. यामुळे होणारा परिणाम बदलूच शकणार नाही. तेव्हा ग्रहशांती करणं शक्य आहे असं आपण कसं म्हणता?''

जयंत साळगावकर या प्रश्नाचं उत्तर न देता ''श्रद्धा, धर्मश्रद्धा..''वगैरे बोलायला लागले. तेव्हा शेवटी मी उभा राहून म्हणालो, ''काबरेंच्या प्रश्नांना उत्तर द्या! धर्मश्रद्धेच्या नावाखाली टाळू नका!'' जयंत साळगावकरांनी मला नाव विचारलं. मी एकदोनदा टाळलं. कारण नाव सांगितलं असतं तर सारं वातावरण बदललं असतं. फारच आग्रह धरल्यावर मी माझं नाव सांगितलं आणि भलतंच झालं. माझं बोलणं, प्रश्न विचारणं आव्हान ठरलं. साळगावकरांचा आत्मविश्वास पार ढासळला. श्रोते घोळका करून माझ्याभोवती गोळा झाले. प्रश्नोत्तरातून ज्योतिष्याची चिरफाड सुरू झाली. हे मी मुद्दाम केलं नव्हतं. अपघातानंच झालं होतं. पण एक कळलं. जयंत साळगावकरांसारखा मोठा ज्योतिषी, कालनिर्णयकारसुद्धा ग्रहशांती सांगून लोकांना..???

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन

समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी- 9371014832