tag:blogger.com,1999:blog-77313769334875043022024-03-08T10:01:57.733-08:00Shyam ManavAnonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.comBlogger41125tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-24695547834752911512013-03-01T23:40:00.003-08:002013-03-01T23:40:24.303-08:00बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे काय?<table style="width: 100%px;"><tbody>
<tr><td><div class="haedlinesstory">
</div>
</td></tr>
<tr><td><div class="writerName">
</div>
</td></tr>
<tr><td><table align="left"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/02032013/02032013-md-au-6-2664-2-small.jpg" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" /></td></tr>
</tbody></table>
<span class="bodyd" style="color: #2c2c2c; font-family: arial;">अंधश्रद्धेच्या क्षेत्रात काम करत असताना, 'अंधश्रद्धा
निर्मूलन करून आपल्याला समाजात काय करायचं आहे?' असा प्रश्न आम्हांला
वारंवार विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर असं, की आम्हाला समाजामध्ये
वैज्ञानिक प्रक्रिया र्रूील्ल३्रा्रू टी३ँ िनिर्माण करायची आहे, वैज्ञानिक
दृष्टिकोन वृद्धिंगत करायचा आहे. आम्हाला बुद्धिप्रामाण्यवादी समाज बनवायचा
आहे, समाजामध्ये फं३्रल्लं'्र२े रुजवायचा आहे.<br /><br />हे सगळे शब्द वापरत
असताना, यांचा नेमका अर्थ काय होतो? समाजामध्ये बुद्धिप्रामाण्यवाद
रुजवायचा म्हणजे नेमकं काय? समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं
म्हणजे नेमकं काय? या दोन्ही गोष्टी एकच आहेत का? या प्रश्नांचा मुळातून
अभ्यास करणं ही आजच्या काळाची गरज आहे. त्याच पद्धतीनं अंधश्रद्धा निर्मूलन
चळवळीचीही ही अपरिहार्य अशी गरज आहे. ज्याला आपण इंग्रजीमध्ये
फं३्रल्लं'्र२े असं म्हणतो, त्याचंच मराठीत केलेलं भाषांतर म्हणजे
'बुद्धिप्रामाण्यवाद'! साधरणत: विसाव्या शतकात हा शब्द मोठय़ा प्रमाणावर रूढ
झाला, फं३्रल्लं'्र२े या नावाखाली मान्यता पावला. बुद्धिप्रामाण्यवाद
फं३्रल्लं'्र२े हा एखादा इझम आहे का? जसा टं१७्र२े, र्रूं'्र२े व
¬ंल्लँ्रि२े मराठीत यांना म्हणतात मार्क्सवाद, समाजवाद, गांधीवाद. या
व्यतिरिक्त आणखीही 'वाद' आहेत. या पद्धतीचा हा काही वाद आहे का? हा
सुरवातीला तुमच्या-माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल.पण ज्या अर्थाने
आपण इझम किंवा वाद हा शब्द वापरतो, त्या अर्थाने 'बुद्धिप्रामाण्यवाद' हा
कोणता वाद नाही. बुद्धिप्रामाण्यवाद यामध्ये 'वाद' हा शब्द जरी असला तरी
खर्या अर्थानं ही एक प्रक्रिया आहे. त्याला आपण बुद्धिप्रामाण्य प्रक्रिया
असं म्हणू शकतो. जीवनातल्या विविध अंगांच्या प्रश्नांची उत्तरं जरी
आपल्याला या प्रक्रियेतून मिळत असली, तरी ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या
वादांमध्ये जगाचं वा देशाचं अर्थशास्त्रं, समाजशास्त्र या अमूक पद्धतीचं
असावं, राज्यव्यवस्था अमूक पद्धतीनं चालावी या विशिष्ट वादानुसार ती
चालावी, असा आग्रह असतो. त्या पद्धतीनं बुद्धिप्रामाण्यवाद काही स्वतंत्र
इझम किंवा वाद नाही.<br /><br />बुद्धिप्रामाण्यवाद भारताला नवा नाही!<br /><br />भारतीय
परंपरेमध्ये बुद्धिप्रामाण्यवाद हा शब्द जरी नवा असला, तरी या पद्धतीची
प्रक्रिया मात्र नवी नाही. 'चार्वाक ऋषींची परंपरा' ही एक वेदकालीन परंपरा
आहे. चार्वाक त्या काळामध्ये विवेकवाद मांडत असत. ह्या विवेकवादाचं आजच्या
काळातलं आधुनिक स्वरूप म्हणजेच बुद्धिप्रामाण्यवाद, असं आपल्याला म्हणता
येईल.चार्वाकांचा विवेकवाद 'प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान' या स्वरूपाचा
होता. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान याच्या आधारावर जीवनातल्या
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. जीवनात जे सत्य आपल्याला
शोधायचं आहे, त्याचं उत्तर प्रत्यक्ष प्रमाण आणि त्याच्या आधारावर केलेले
अनुमान यातूनच आपल्याला मिळणार आहे किंवा तसं सत्य आपल्याला शोधता येणार
आहे, या पद्धतीची चार्वाकांची मांडणी होती.<br /><br />तुम्हाला माहित आहे, की
सत्य शोधण्याच्या प्रक्रियेतूनच धर्मांचा उदय झाला आहे किंवा किमान सगळ्या
धर्मांनी, 'आम्ही अंतिम सत्य शोधण्याचा प्रय▪करत आहोत' असा दावा तरी केला
आहे. प्रश्न एवढाच होता, की हे जे काही 'अंतिम सत्य' आहे ते म्हणजे नेमकं
काय आहे?<br /><br />मानव जातीला दीर्घ काळापासून, अगदी पाषाणयुगापासून या
विश्वासंबंधी विविध प्रश्न सतावत होते. जसे ही सृष्टी कशी निर्माण झाली?
ही पृथ्वी कशी निर्माण झाली? सूर्य, चंद्र, तारे कसे निर्माण झाले? त्याच
पद्धतीनं, हे का निर्माण झाले? हा प्रश्न प्रामुख्याने पडत होता.आता, हे का
निर्माण झाले असावेत? आपोआप आणि विनाकारण तर हे नक्कीच निर्माण झाले
नसावेत! मग कुणाची तरी यामागे एक सुनियंत्रित अशी योजना असली पाहिजे, एक
कारण परंपरा असली पाहिजे आणि एका विशिष्ट उद्देशाने यांची निर्मिती झाली
असली पाहिजे, या पद्धतीची मांडणी होणं स्वाभाविक होतं. ज्या कारणांकरिता
सृष्टीची, माणसांची आणि इतर प्राण्यांची निर्मिती झाली, त्या कारणांचा शोध
घेणं म्हणजेच 'अंतिम सत्याचा' शोध घेणं हा धर्माचा खरा उद्देश आहे, अशी
मान्यता पुढे रूढ झाली.बरं, हे अंतिम सत्य म्हणजे काय? ईश्वर असेल, ब्रह्म
असेल, ब्रह्मंड असेल, त्याही पलीकडे जाऊन प्रेमस्वरूप असेल किंवा आणखी
काहीतरी असेल, या पद्धतीची मांडणी वेगवेगळ्या धर्मांनी आपापल्या पद्धतीनं
केली आहे.चार्वाकांचं म्हणणं असं होतं, की 'हे अंतिम सत्य वगैरे जे काही
आहे, त्याला मुळात अस्तित्वच नाही. या जागामध्ये अंतिम सत्य वगैरे काही
नसतं. पण सत्य शोधण्याचा एकमात्र मार्ग आहे आणि तो म्हणजे 'प्रत्यक्ष
प्रमाण' म्हणजे 'पुरावा' 'ढ१ा' ते 'ढ१ा' आणि त्याच्या आधारावर केलं जाणारं
अनुमान, या दोन गोष्टींपेक्षा आणखी तिसर्या कोणत्याही मार्गानं आपल्याला
खर्या अर्थानं सत्य गवसू शकत नाही किंवा सत्य शोधलं जाऊ शकत नाही'. या
पद्धतीची मांडणी त्या काळामध्ये चार्वाकांनी केली.<br /><br />प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान<br /><br />आता
हे आपण नेमकं समजून घेऊ, की प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय? त्याच्या
आधारावर केलं जाणारं अनुमान म्हणजे काय? आपल्याला कल्पना असेल, की आजच्या
काळामध्ये वैज्ञानिक प्रक्रिया रूढ झाली आहे म्हणून वादाचे मुद्दे फारसे
उरत नाहीत, पण ज्या काळामध्ये माणसाला या पद्धतीची वैज्ञानिक प्रक्रिया आणि
प्रगतीच माहीत नव्हती, त्या काळामध्ये तर्काच्या आधारावर ज्ञान मिळवणं
हाही ज्ञानाच्या मार्गांमध्ये एक मार्ग मानला जात होता. कवेळ तर्क करून एका
गोष्टीच्या आधारावर दुसर्या गोष्टीचं 'लॉजिक' आपण मांडत जायचं. तर्क करत
जायचं आणि याच्या आधारावर सुद्धा आपल्याला ज्ञान मिळू शकतं, सत्य शोधून
काढता येऊ शकतं, अशी मांडणी त्या काळामध्ये अनेक विद्वान, ऋषीमुनी आणि
वैज्ञानिक करत असत. चार्वाकांचं म्हणणं असं होतं, की केवळ तर्काच्या
आधारावर कोणतंही सत्य शोधलं जाऊ शकत नाही. हा तर्क किंवा अनुमान प्रत्यक्ष
प्रमाणावरच आधारलेला असला पाहिजे. तरच आपल्याला खर्या अर्थानं सत्य शोधता
येईल.प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे पुरावा. एखादी घडणारी घटना आपण पाचही
इंद्रियांनी प्रत्यक्ष अनुभवली, ती घटना घडते आहे याचा पुरावा आपल्याला
मिळाला, की त्याच्या आधारावर जे अनुमान आपण करू तेवढंच काय ते सत्य, बाकी
सगळच्या सगळं असत्य. या पद्धतीनं ही मांडणी केली जाऊ शकते. याकरिता एक
उदाहरण पाहू. समजा, जंगलामध्ये भटकत असताना आपण रस्ता विसरलो. कुठे जायचं
याची कल्पना येत नसल्यामुळे रात्रीच्या अंधारात कुठेतरी आडोसा शोधून आपण
बसलो आहोत. अशा अवस्थेत सकाळच्या झुंजूमुंजू वातावरणामध्ये सूर्याची किरणं
नुकतीच पसरायला लागली आहेत. अशा वेळेस त्या अंधुकशा प्रकाशात आपल्याला
कुठेतरी दूरवर धूर दिसतो. त्याबरोबर आपल्याला अत्यानंद होईल. आपण विचार
करू, 'त्या ठिकाणी धूर दिसतो म्हणजे नक्कीच त्या ठिकाणी मनुष्यवस्ती
असणार!' कडकडून भूक लागलेली आहे, प्रचंड तहान लागलेली आहे. त्या ठिकाणी
मनुष्यवस्ती असल्यामुळे या दोन्ही गोष्टी मिळण्याची शक्यता आहे. तसेच मला
आता एकटेपणाची भीती जाणवू लागली आहे. मी अडकून पडलो आहे. कदाचित मी
हिंस्त्र श्वापदांना बळी पडेन. रात्रभर मी स्वत:ला कसंबसं वाचवलं आहे आणि
आता मला त्या ठिकाणी तो निवारा, आसरा मिळण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या
मनामध्ये अतिशय आनंद निर्माण होईल.<br /><br />(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.)<br /><br />भ्रमणध्वनी -९३७१0१४८३२<br /><br />२ँ८ेंल्लं५.ु'ॅ२स्र३.्रल्ल</span></td></tr>
</tbody></table>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-89366740279716973222013-02-26T05:26:00.000-08:002013-02-26T05:26:07.862-08:00ज्योतिष्यांनो, या १४ प्रश्नांची उत्तरे द्या!<table border="0" cellpadding="0" cellspacing="0" style="width: 350px;"><tbody>
<tr><td border="0" id="content" style="padding-left: 5px;" valign="top">
<div align="left" id="contentxml" style="border-bottom: red 0px solid; border-left: red 0px solid; border-right: red 0px solid; border-top: red 0px solid; overflow: auto; padding-bottom: 5px; width: 434px;" valign="top">
<span style="font-family: arial; font-size: xx-small;"> <span style="color: blue; font-size: xx-small;"><span alt="Increase and Decrease Font" class="hand" title="Increase and Decrease Font">A</span></span> <span style="color: blue; font-size: x-small;"><span alt="Increase and Decrease Font" class="hand" title="Increase and Decrease Font">A</span></span> <span class="hand" style="font-family: arial; font-size: xx-small;"><< Back to Headlines</span> </span>
<table style="width: 100%px;">
<tbody>
<tr><td><table align="left"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/23022013/23022013-md-ng-4-3346-2-small.jpg" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" /></td></tr>
</tbody></table>
<span class="bodyd" style="color: #2c2c2c; font-family: arial;"><b>ज्योतिष किती खरे? किती
खोटे? फलज्योतिष विज्ञान आहे काय? या विषयावर अखिल भारतीय अंधश्रद्धा
निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव आणि ज्योतिष महामंडळाचे
अध्यक्ष नंदकिशोर जकातदार आज खामगावात आमनेसामने भिडणार आहेत. बुलडाणा
जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांनी खामगावातील नॅशनल हायस्कूलच्या
मैदानावर सायंकाळी ५.३0 वाजता हे आयोजन केले आहे. गेल्या २५ वर्षांत
ज्योतिष हे शास्त्र असेल तर ते सिद्ध करा आणि १५ लाख रुपयांचे पारितोषिक
मिळवा, हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान स्वीकारण्यासाठी कुठलाही
ज्योतिषी वा ज्योतिषी महामंडळाचा पदाधिकारी पुढे आला नाही. त्या
पार्श्वभूमीवर नंदकिशोर जकातदारांनी ज्योतिष हे विज्ञान आहे? या विषयावर
बोलण्याची तयारी दाखविली, हे महत्त्वाचे आहे. अंनिसच्या वतीने जगभरातील
ज्योतिष्यांना सोबतच्या लेखातील १४ प्रश्न नेहमी विचारले जातात. आजपर्यंत
त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं कोणीही देऊ शकले नाहीत. बघूया आज काय
होते ते.- संपादक</b>१) फलज्योतिष
हे शास्त्र आहे का? २) पूर्वी फलज्योतिष आणि खगोलशास्त्र एकत्र होते.
ग्रीकांपासून, आर्यभट्टापासून ते गॅलिलिओ-कोपर्निकसपर्यंत अनेक सुप्रसिद्ध
खगोलशास्त्री ज्योतिषीही होते, पण एकोणिसाव्या शतकात खगोलशास्त्र व
फलज्योतिष वेगळे झाले, ते का? ३) खगोलशास्त्र ही विज्ञानाची व वैज्ञानिक
अभ्यासाची महत्त्वाची शाखा झाली. त्याचा अभ्यास जगभराच्या सगळय़ा
विद्यापीठांमधून होता; परंतु फलज्योतिष मात्र चोथा समजून विज्ञानाने फेकून
दिले. असे का? ४) जगभराच्या 186 वैज्ञानिकांनी, ज्यात १९ नोबेल पारितोषिक
विजेते शास्त्रज्ञ आहेत, 'फलज्योतिष हे शास्त्र नाही. तो केवळ काही लोकांचा
पोट भरण्याचा धंदा आहे. त्यावर जनतेने विश्वास ठेवू नये,' असे पत्रक
काढले व ते जगभर प्रसिद्ध केले. त्याबद्दल 'ज्योतिष अधिवेशना'चे काय मत
आहे? ५) आजचे फलज्योतिषी ९ (किंवा १२) ग्रह मानतात. त्यात राहू, केतू
नावाचे ग्रहही मानतात. प्रत्यक्षात राहू-केतू अस्तित्वातच नाहीत. ते ग्रहही
नाहीत. तरी ज्योतिषी मात्र आजही जनतेच्या कुंडल्यांमध्ये (होरोस्कोप)
राहू-केतू फिरवतच असतात. ते का? कसे? अस्तित्वात नसलेल्या राहू-केतूंना
स्थान देणा?र्या कुंडल्या किती विश्वसनीय असू शकतात? व त्या आधारावर
उभ्या असणा?र्या फलज्योतिषात कितपत अर्थ असू शकतो? ६) चंद्र-सूर्याला ग्रह
म्हणून आजही स्थान दिले जाते. चंद्र हा उपग्रह आहे, हे खगोलशास्त्राच्या
ज्ञानामुळे पाचव्या वर्गातल्या मुलालाही ज्ञात असते. तरी सुशिक्षित विद्वान
ज्योतिषीही चंद्राला ग्रह म्हणूनच कुंडलीत स्थान देतात. अशा अवस्थेत
विद्वान ज्योतिष्यांपेक्षा पाचव्या वर्गातल्या मुलांनाही अधिक ज्ञान असते,
असे का मानू नये? ७) सूर्य हाही ग्रह म्हणूनच कुंडलीत मांडला जातो व आजही
ज्योतिषी पृथ्वीभोवतीच (कुंडलीत) सूर्याला फिरवत असतात. सूर्य हा तारा आहे.
तो ग्रह नाही व पृथ्वी इतर ग्रहांसोबत सूर्याभोवती फिरते हे शाळकरी
मुलांना जसे शिकवले जाते तसेच ज्योतिष्यांना शिकवावे, प्रसंगी
त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा काढाव्यात, अशी विनंती आम्ही <br /><br />सरकारला
करावी काय? ८) पृथ्वी हा ग्रह आहे. त्याचा पत्रिकेत ग्रह म्हणून का समावेश
नाही? ९) ग्रहाचा मानवी जीवन प्रवाहावर परिणाम होतो असे फलज्योतिषी सांगतात
व त्यावरच त्यांचे शास्त्र अवलंबून आहे. याला वैज्ञानिक आधार काय? एकाच
स्थळी व एकाच ठिकाणी राहणा?र्या माणसांवर एकाच ग्रहाचे, ते केवळ वेगवेगळय़ा
वेळी जन्मले म्हणून वेगवेगळे परिणाम कसे होतील? १0) सगळे ग्रह व सूर्य
यांची भ्रमणकक्षा व काळ निश्चित आहे. पुढील पाच हजार वा पाच लाख
वर्षांनंतर तो निश्चित ठरावीकच असणार आहे. याचाच अर्थ
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याचे भविष्य तो जन्मत:च ठरलेले असते.
असे असतानाही अनेक ज्योतिषी ग्रहदशा बदलण्याचे व ग्रहांचे अरिष्ट
टाळण्यासाठी अनेक पूजा, ताईत, खडे वगैरे उपाय सांगतात व ठरलेले आयुष्य
बदलवता येते असेही सांगतात. ते कसे? ग्रहांची दिशा, स्थान व भ्रमण निश्चित
असूनही या उपायांनी माणसांचे भविष्य बदलतेच कसे? हे सगळे उपाय म्हणजे
सामान्य लोकांना लुबाडण्याची ज्योतिष्यांची एक क्लृप्ती नव्हे काय? मुळात
माणसांचं आयुष्य ठरलेलं असतं हे सांगणंच लबाडी नव्हे काय? ११) माणसाचा जन्म
आणि मृत्यू ठरलेला असतो का? ठरलेला नसेल तर फलज्योतिषाला काही आधार उरेल
काय? पण जर जन्म ठरलाच असेल तर मनुष्य स्वत: निर्णय घेऊन आजच्या काळात
भारतीय कायद्याच्या परवानगीने कृत्रिम गभर्पात करतो व जन्माला येणा?र्या
नव्या मनुष्याचे अख्खे आयुष्यच थांबवतो, हे कसे? ठरलेला जन्म कृत्रिम
उपायांनी थांबवणारा मनुष्य ग्रहांपेक्षा वा नियंत्यापेक्षा मोठा मानायचा
का? १२) मृत्यू ठरलेला असतो का? अ) तो जर ठरलेला असेल तर, १९३0 साली भारतीय
माणसाचे सरासरी आयुष्य केवळ १८ वर्षे होते. आता ते ६८ वर्षांपेक्षा अधिक
झाले आहे. हे अधिकचे सरासरी आयुष्य भारतीयांच्या वाट्याला कुठून आले? याचे
उत्तर फलज्योतिष्यांना पत्रिकांमध्ये दाखवता येईल का? आ) मृत्यू ठरलेला
असतो असे मानणारे ज्योतिषी आपल्या घरच्यांना व स्वत:लाही औषधोपचार का
करतात? ते डॉक्टरांची मदत का घेतात? जर मृत्यू ठरलेल्या क्षणीच होणार असेल
तर डॉक्टरांची मदत घेऊन स्वत:चा व स्वत:च्या नातेवाईकांचा जीव वाचविण्याचा
प्रय▪करून पैसा फुकट घालविणे मूर्खपणाचे नव्हे का? इ) एकाच अपघातात
ज्यावेळी शेकडो लोक मरतात त्या वेळी त्या सगळय़ांचा मृत्युयोग असतो काय?
नागासाकी-हिरोशिमा अणुस्फोट व सगळय़ाच मोठय़ा अपघातांबद्दल काय? तसा पुरावा
पत्रिका तपासून देता येईल काय? १३) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती
गेल्या पंचवीस वर्षांपासून ज्योतिष्यांना सारखी आव्हाने देत आहे, तरी
ज्योतिषी ती आव्हाने स्वीकारून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तोंड एकदाचे
बंद का करीत नाही? १४) दोनदा २0-२0 पत्रिकांच्या आधारे, माणूस मेलेला आहे
की जिवंत आहे व स्त्री की पुरुष आहे हे सांगा. दोन्ही वेळेस उत्तरे ९0
टक्क्यांपेक्षा अधिक ९५ टक्के अचूक निघायला हवीत, तर १५ लाख रुपयांचे
पारितोषिक मिळेल किंवा मानवी जीवनातील, तपासून शहानिशा करता येतील अशा
कोणत्याही पाच घटना (लग्न, मूल, नोकरी, शिक्षण, अपघात, बढती वगैरे) वीस
पत्रिकांच्या आधारे सांगाव्यात. त्या ९0 टक्के ख?र्या ठराव्यात. दोनदा
वीस-वीस पत्रिकांची भाकिते ९0 टक्के अचूक निघावीत. १५ लाख मिळतील; पण ७0
टक्के जरी खरी निघाली (दोनदा २0-२0) तरी ते शास्त्र असू शकते असे आम्ही
मानू, अशी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन नागपूर समितीने पुणे, धुळे,
अमरावती या चारही अ. भा. ज्योतिष अधिवेशनात जाहीर आव्हाने दिली होती. ती
आव्हाने स्वीकारून आपली बाजू सत्य असल्याचे ज्योतिष महामंडळ का सिद्ध करू
शकले नाही? याचा अर्थ, फलज्योतिषशास्त्र नाही असाच घ्यायचा का?<br /><br />(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)<br /><br />भ्रमणध्वनी - ९३७१0१४८३२<br /><br />२ँ८ेंल्लं५.ु'ॅ२स्र३.्रल्ल</span></td></tr>
<tr><td><table align="left"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/23022013/23022013-md-ng-4-3346-3..jpg" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" /></td></tr>
</tbody></table>
</td></tr>
</tbody></table>
<hr />
<br /><span class="hand" style="font-family: arial; font-size: xx-small;"> << Back to Headlines</span> </div>
</td></tr>
</tbody></table>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-68710049463049155382013-02-26T05:19:00.000-08:002013-02-26T05:19:05.563-08:00 माणूस प्रेमात पडतो म्हणजे नेमकं काय होतं?<table style="width: 100%px;"><tbody>
<tr><td><br /></td></tr>
<tr><td><table align="left"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/16022013/16022013-md-ng-4-3570-1-small.jpg" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" /></td></tr>
</tbody></table>
<span class="bodyd" style="color: #2c2c2c; font-family: arial;">मागचा प्रेमावरचा लेख
प्रसिद्ध झाला आणि फोन सारखा खणखणू लागला. 'फार सुंदर', 'महत्त्वाच्या
विषयाला चालना दिली अभिनंदन'! 'प्रेमाला प्रतिष्ठा दिली त्याबद्दल
धन्यवाद'! असे खूप फोन होते. पण 'तुम्ही लिहिलं त्यात शेवटपर्यंत प्रेम
म्हणजे काय ते कळलयच नाही'. 'विषयवासना, सेक्स म्हणजे प्रेम असं तुम्हांला
म्हणायचं आहे का?' 'तुमच्यासारख्या विचारी माणसानं 'अशा' विषयावर का
लिहावं? अशाही प्रतिक्रिया होत्या, तर काही फोन फारच विचित्र होते. माझ्या
एका ओळखीच्या मुलीचं प्रेम जुळलं. त्या दोघांचं प्रेम मला तोडायचं आहे. ती
त्याच्यासोबत कधीच सुखी होणार नाही. कसं तोडू हे प्रेम? कसं वाचवू तिला? तर
प्रेम कसं करायचं? समोरच्या व्यक्तीला प्रेमात कसं पाडायचं? असे प्रश्न
विचारणारेही काही फोन होते.<br /><br />'प्रेम' हा माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा,
फार महत्त्वाचा, आदराचा, अभ्यास करण्याचा, समजून घेण्याचा विषय आहे. भाऊ,
प्रेम म्हणजे नेमकं काय? हे सांगणं फार कठीण आहे. मी आधीच सांगितलं
व्यक्तिपरत्वे प्रेमाची व्याख्या बदलते. बदलू शकते. व्यक्तीनुसार प्रेमाची
तीव्रता, प्रेमभावनेची पातळी बदलते. तरी सर्व माणसांनी सर्वाच्या हृदयाला
जाणवणारी, स्पर्शधारी ही भावना आहे. सर्वाना जाणवते, स्पर्शते, उसासो
सोडायला लावते हाच या भावनेतला 'समान दुआ', 'समान धागा' आहे.<br /><br />आयुष्यात
कधीच प्रेमात पडली नसेल अशी व्यक्ती अपवादच असली पाहिजे. माणूस प्रेमात
कां पडतो? प्रेमात कसा पडतो? सामान्यत: एखादी विरुद्ध लिंगीय व्यक्ती
आवडते. खूप खूप आवडते. फारच आवडते. तिच्याविषयी जबरदस्त ओढ वाटते. आकर्षण
वाटतं. तिच्या सहवासात राहावसं वाटतं. तिला पाहत राहावसं वाटतं. तिच्यासोबत
बोलत राहावसं वाटतं. समोर नसताना सारखी ती व्यक्ती आठवत राहते.<br /><br />तिच्या
आठवणीत रमताना खूप छान वाटतं. ती अचानक समोर दिसली तर छातीत धडधड होते. पण
ही 'धडधड' खूप छान, हवीहवीशी वाटते. ती हसली की, सारं आसमंत फुलल्यासारखं
वाटतं. ती 'रडवेली' झाली, दु:खी झाली की, आसमंतात मळभ दाटून आल्यासारखं
वाटतं. सारं विचारांचं, भावनांचं केंद्र ती व्यक्ती बनून बसते. असं काहीसं
घडू लागलं की, माणूस प्रेमात पडला असं फार तर म्हणता येईल.<br /><br />दोन
माणसं कोणत्या तरी निमित्तानं वा रस्त्यानं जाताना अचानक समोर येतात. सहज
नजरानजर होते आणि एक घडलेला किस्सा. कॉलेज लायब्ररीतून 'तो' बाहेर पडला.
वर्गात जाण्यासाठी तेवढय़ात जोरदार पावसाची सर आली. लायब्ररीसमोरून
क्लासमध्ये जाणारी 'ती' पावसापासून वाचण्यासाठी लायब्ररीच्या व्हरांडय़ाच्या
आडोशाला आली. काहीशी भिजलेली. केसांवर पाण्याचे थेंब मोत्यांसारखे चमकू
लागलेले. सलवार कमीजचं कमीज अंगाला चिपकू लागलेलं. आपल्या वक्षस्थळाचं
संरक्षण करण्यासाठी वह्या-पुस्तकांचा गठ्ठा तिनं छातीसमोर ढालीसारखा
धरलेला. पण.. पावसाचा जोर वाढला. शिंतोडे अंगावर येऊ लागले. आत सरकण्यास
जागा नाही. सारा व्हरांडा गर्दीनं ओसंडून वाहतोय. मुलांमध्ये शिरण्याची
तिची हिंमत नाही. आतील पोलला लागून असलेल्या सुरक्षित जागी उभ्या असलेल्या
त्याचं तिच्याकडे लक्ष जातं. डोळ्यानंच तो तिला जवळ येण्याची खूण करतो. पण
ती कळूनही हिंमत करू शकत नाही. 'एका मुलाजवळ उभं राहायचं?' पुन्हा तो
खुणावतो. आता पावसाचे शिंतोडे तिला अधिकच भिजवू लागलेले. नाइलाजानं ती तिथे
येऊ लागते. तो अदबीनं सरकतो. तिला सुरक्षित जागेत घुसू देतो आणि तत्काळ
तिथून हलून तिच्या भिजवणीच्या जागेवर जाऊन उभा राहतो. तिला खूप हायसं
वाटतं. तो जवळ चिकटून उभं राहण्याचा चान्स त्यानं घेतला नाही म्हणून. पण
त्याला थँक्स म्हणायला हवं. पण म्हणायचं कसं? त्याचं लक्षच नाही. शेवटी
त्याचं लक्ष जातं. ती डोळ्यांनीच थँक्स म्हणून जाते. अन् त्यानं पहिल्यांदा
तिचे ते टप्पोरे, शिलेदार, समुद्राच्या अथांग पाण्यासारखे पाणीदार डोळे
पाहिले. इतके सुंदर डोळे? अन् तो त्या डोळ्यांतच अडकून जातो. एकसारखा एकटक
पाहत राहतो. तिच्या डोळ्यांत डुबू लागतो. अथांग महासागरात खोल खोल उतरू
लागतो. एकटक, एकाग्रतेनं पाहत राहतो. भान हरपून मनसोक्त खोल खोल जात राहतो.<br /><br />काही
क्षण तीही भान हरपून, एकटक, एकाग्रतेनं पाहते. साध्याच दिसणार्या या
तरुणाच्या भावपूर्ण, जितकं स्वच्छ डोळ्यांमध्ये आपण केव्हा अडकून पडलो हे
तिच्या लक्षातच येत नाही. थोडय़ाच वेळात भानावर येते. नजर खाली घेते. पुन्हा
पाहते तर तो भान हरपून पाहतोच आहे. त्याची ब्रह्मनंदी टाळी लागली आहे.
पापणीही न हलवता तो सारखा पाहतोच आहे. तिला काय करावं ते कळतंच नाही. असा
अनुभव तिनं कधी घेतलाच नाही. त्याच्या नजरेत अडकून जायला होतं. नजर काढता
काढता येत नाही. काय आहे असं त्या डोळ्यांत? आतवर, खोलवर काहीतरी शिरतं
सारं. हृदय आतून असं घुसळू लागतं. कसं कसं, पण छान छान वाटतं. बराच वेळ
दोघांचे डोळे सारखे एकदुसर्यात गुंतत होते. ती सारखी नजर खाली घ्यायची, पण
पुन्हा पाहण्याची अनिवार इच्छा व्हायची. पुन्हा पाहायची. डोळ्यांत
अडकायची. तो मात्र एकटक पाहतच होता. अडकूनच पडला होता. किती वेळ उलटला
माहीत नाही. पाऊस ओसरला. थांबला. व्हरांडा रिकामा होऊ लागला. नाइलाजानं
तीही निघाली. पण त्याची नजर मात्र सारखी तिच्या डोळ्यांचाच वेध घेत होती.
झालं तो तिच्या प्रेमात पडला. आकंठ बुडाला. तिच्यावर प्रेमकविता करू लागला.
त्याचं सारं विश्व तिच्या अस्तित्वानं, तिच्या डोळ्यांनी व्यापलं.
1970च्या दशकातलं हे प्रेम. याला म्हणायचं 'लव्ह अँट फर्स्ट
साईट'.'दिसताक्षणीच प्रेमात पडणं'.<br /><br />हा एक प्रेमाचा प्रकार, प्रेमाचा
आविष्कार. माणूस दिसताक्षणीच कसा काय प्रेमात पडू शकतो? समोरची व्यक्ती
कोण? कुठली? काय करते? काय योग्यतेची आहे? काहीच माहीत नसताना माणूस असा
प्रेमात पडतो हे मात्र खरं आहे. अनेक माणसं प्रत्यक्ष जीवनात या प्रकारे
प्रेमात पडली आहेत हेही तेवढंच खरं आहे. अशा प्रेमाची परिणती काय होते?
प्रेमाची यशस्विता म्हणजे लगAात रूपांतर होणं असं मानलं तर कदाचित अशा
प्रकारच्या प्रेमाचा सक्सेस रेट कमीच असणार आहे. कारण प्रेमात पडताना
कुठलीच व्यावहारिक बाजू पाहिलेली नसल्यामुळं दोन पात्रांत जर फारच
व्यावहारिक अंत असेल. उदा. जात, धर्म, खानदान, आर्थिक स्थिती, दोन्ही
कुटुंबांतील संस्कृती, कर्मठपणा, आधुनिकपणा तर लगAात रूपांतर होणं
अशक्यप्रायच होऊन बसतं. म्हणून काय ते प्रेम कमी दर्जाचं असतं? कम अस्सल
असतं?<br /><br />पण तो तिच्या प्रेमात कां पडला? फक्त निळ्या डोळ्यांच्या
प्रेमात पडला? मग कोणत्याही निळे डोळे असलेल्या मुलीच्या प्रेमात तो पडेल
का? त्याने आधी निळे डोळे कधीच पाहिले नव्हते का? ती खूप सुंदर आहे म्हणून
तो प्रेमात पडला कां? त्यापेक्षा अधिक सुंदर मुलगी त्यानं आधी पाहिली
नव्हती कां? निळे डोळे असणारी मुलगी काही ही पहिलीच नाही आणि
तिच्यापेक्षाही सुंदर मुली त्याच्या आसपास वावरतच होत्या. मग तो तिच्यात
प्रेमात कां पडला? आणि नकळत प्रेमात पडला. खूप खूप सिर्मस प्रेमात पडला?
का? या प्रश्नाचं उत्तर मी वर्षानुवर्षे शोधतोय. खूप लोकांचं 'लव्ह अँट
फर्स्ट साईट' समजून घेतलं. मानसशास्त्रीय अंगानं अभ्यास केला. जे उत्तर
गवसतं आहे ते देण्याचा प्रयत्न करतो आहे. माणूस जन्माला आल्यानंतर अगदी
बालवयापासून तो माणसांना पारखू लागतो. ओळखू लागतो. काही माणसं त्याला खूप
भावतात. काही माणसं खूप आवडतात. त्यांच्याजवळ ही मुलं चटकन जातात. रमतात,
आनंदी होतात. कदाचित ही माणसं त्यांच्याशी खूप चांगली वागतात. त्यांना
आवडेल अशा पद्धतीनं प्रेम करतात. त्यांना मुळीच वाईट अनुभव न देता फक्त
चांगलेच अनुभव देतात, तर काही माणसांजवळ ही लहान मुलं मुळीच जात नाही. जाऊ
इच्छित नाही.<br /><br />साधारणत: मुलं 4-5 वर्षाची व्हायला लागली की, त्यांना
स्त्री, पुरुष वेगळे आहेत याची तीव्र जाणीव व्हायला लागते. विरुद्ध लिंगीय
व्यक्तीविषयीच्या कुतूहलाचं, उत्सुकतेचं रूपांतर आकर्षणात होण्याच्या
सुरुवातीचा हा कालावधी असतो. वय वर्ष 5 ते 10-11 वर्षापर्यंत अशी आवडणारी,
भावणारी व्यक्ती जर वारंवार सहवासात आली, प्रेम करू लागली, गालगुच्चे घेऊ
लागली, गालांचे चुंबन घेऊ लागली, छातीशी आवळू लागली, आलिंगन देऊ लागली, तर
हे मूल त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतं. कदाचित हे मूल 5-6 वर्षाचं असेल. ती
विरुद्ध लिंगीय व्यक्ती 10 वर्षे ते 30-35 वर्षाचीही असेल तरी असं घडू
शकतं, घडतं. अर्थात त्या मुलाला वा मुलीला आपण प्रेमात पडलो हे फार
तीव्रतेनं कळतंच असं नाही. फक्त ती व्यक्ती खूप आवडते. तिचा सहवास खूप
आवडतो एवढंच त्यावेळी कळत असतं. जर या दोघांमधले हे प्रेमसंबंध (अत्यंत
निकोप, निर्वाज्य. यात कुठेही रूढार्थानं सेक्स नसतो, रोमांस नसतो.) काही
काळ चालले तर त्या मुलांच्या मनात खोलवर ते घर करून जातात. प्रेमात
पडलेल्या मोठय़ा वयाच्या व्यक्तीची प्रतिमा या मुलांच्या हृदयात बंदिस्त
होते.<br /><br />अनेकदा ही प्रेम व्यक्ती जीवनातून निघून जाते, दूर जाते अथवा
तिचं लगA होऊन ती वेगळ्या अर्थानं दुरावते. पण वाढत्या वयासोबत या
मुलांच्या मनातील ती प्रेम-प्रतिमा तशीच हृदयात बंदिस्त राहते. वयात
आल्यावर मनात खोलवर रुजलेल्या प्रेम-प्रतिमेसारखीच वा त्याच्या आसपासची
एखादी व्यक्ती दिसताच आपल्या मनातील खोलवर रुजलेली प्रतिमा हीच आहे असं
त्याच्या मनाला नकळत वाटतं आणि माणूस 'लव्ह अँट फर्स्ट साईट' पडू शकतो. खरं
म्हणजे तो स्वत:च्या मनात रुजलेल्या प्रेमातच पुन्हा पडत असतो.<br /><br />(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)<br /><br />भ्रमणध्वनी - 9371014832<br /></span></td></tr>
</tbody></table>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-84395079413935184152013-02-11T03:23:00.002-08:002013-02-11T03:23:31.080-08:00प्रेम म्हणजे नक्की काय? खरं प्रेम कशाला म्हणायचं?<table style="width: 100%px;"><tbody>
<tr><td><div class="haedlinesstory">
</div>
</td></tr>
<tr><td><table align="left"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/09022013/09022013-md-ng-4-3229-1-small.jpg" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" /></td></tr>
</tbody></table>
<span class="bodyd" style="color: #2c2c2c; font-family: arial;">प्रेम, ढाई अक्षर प्रेम
का. एक अद्भुत अनुभव. एक अवर्णनीय अनुभूती. सार्या जगाला वेड लावणारी
गोष्ट. सामान्य माणसाकडून अतक्र्य गोष्ट घडवून आणण्याचं कारण. माणसाला
जगण्याचा प्रेरणास्नेत ठरणारी तीव्रतर भावना. माणसाला जीवन संपवून टाकण्यास
प्रवृत्त करणारी, निराशेचं टोक गाठायला लावणारी असहनीय भावना आणि
दुसर्याचं जीवनचं संपवून टाकण्यास मजबूर करणारी, अमानुष कृत्याची जन्मदाती
विखारी भावना. या सार्यांना प्रेमचं म्हणायचं?<br /><br />प्रियकरानं
प्रेयसीच्या बहिणीच्या घरासमोर स्वत:वर सपासप चाकूनं वार करून घेतलेत.
खिशात चिठ्ठी सापडली, 'मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही म्हणून आत्महत्या
करतोय.' काल-परवाची एक बातमी. एकतर्फी प्रेमातून प्रियकरानं प्रेयसीचा खून
केला. प्रियकरानं प्रेयसीच्या तोंडावर अँसिड फेकले. कॉलेज परिसरात
प्रियकरानं प्रेयसीच्या छाताडात सर्वासमक्ष बंदुकीच्या गोळ्य़ा घातल्या. या
पद्धतीच्या कितीतरी बातम्या आपण सातत्यानं वाचत, ऐकत आलो आहोत.<br /><br />निसर्गानंच
नर-मादीमध्ये जबरदस्त आकर्षण निर्माण केलं आहे. जेणेकरून स्त्री-पुरुषांनी
एक-दुसर्याकडे प्रचंड ओढीनं आकर्षित व्हावं. एक-दुसर्यांसोबत प्रणयाराधन
करावं. त्यातून अपत्य प्राप्ती व्हावी. माणसाचं मूल खूप परावलंबी असतं. ते
स्वत:च्या भरवशावर जगण्यायोग्य बनेपर्यंत मातेनं त्याला सांभाळंलच पाहिजे.
नाहीतर ते मरेल. म्हणून निसर्गानंच गर्भवती स्त्रीच्या मनात होणार्या
बाळाविषयी प्रचंड ओढ निर्माण व्हावी, वाट्टेल त्या परिस्थितीत, प्रसंगी
स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्या बाळाचं संरक्षण, संगोपन करावं असं
वात्सल्ययुक्त प्रेम निर्माण केलं आहे. निसर्गाच्या या दोन्ही गरजा आहेत.
त्यातून दोन प्रकारचं प्रेम. एक वैषयिक प्रेम आणि दुसरं वात्सल्ययुक्त
प्रेम निर्माण झालं आहे. <br /><br />गुहांमध्ये राहणार्या रानटी नर-मादीचं
पुढे जाऊन शेती करणार्या कुटुंबवत्सल माणसांमध्ये रूपांतर झालं. माणसानं
लग्न संस्था निर्माण केली. एक नवरा, एक बायको असं नातं गेल्या शेकडो वर्षात
रुजू लागलं. माणूस संस्कारित होत गेला आणि त्याची 'प्रेमाची गोष्ट' बदलत
गेली. नर-मादीनं परस्परांजवळ यावं यासाठी निर्माण झालेलं प्रेम
वात्सल्ययुक्त प्रेमाच्या सहवासात उन्नयीत होऊ लागलं. केवळ रतिक्रीडेपर्यंत
मर्यादित असणारं नर-मादीमधील प्रेम, बदलून दीर्घकाळ टिकणारं,
वात्सल्ययुक्त आणि वैषयिक या दोहोचं मिश्रण असणारं एक नवंच प्रेम उदयास
आलं. या नव्या प्रेमाला समाजात, मानवी मनात प्रतिष्ठा प्राप्त झाली. हे
अधिक सुसंस्कारित प्रेम मानलं जाऊ लागलं.<br /><br />आणि आजच्या समाजात जन्माला
आल्यापासून कथा, कादंबर्या, सिनेमा, टी.व्ही. सार्या माध्यमातून 'प्रेम
एके प्रेम, प्रेम दुने प्रेम' सारखं मनावर आदळत असतं. नैसर्गिक ओढ असतेच.
त्यात संस्कारातून सारखं प्रेमाचं प्रोग्रामिंग मनात रुजत असतं. त्यामुळं
वयात येताना, आल्यावर जवळपास प्रत्येक तरुण-तरुणी प्रेमात पडते. काही जण
अलगदरीत्या नकळत प्रेम जाळ्य़ात अडकतात. आपण प्रेमात केव्हा पडलो हे त्यांना
कळतही नाही. काही जणं समजून-सवरून-पाहून समोरचं पात्र आपल्या लायकीचं
आहे, नाही याचा विचार करून प्रेमात पडतात आणि काही जण प्रेमात पडल्याचं
दाखवतात. मोठय़ा शहरात कॉलेजियन्समध्ये बॉयफ्रेड, गर्लफ्रेड असणं हा स्टेटस्
सिम्बॉल झाला आहे. त्यापेक्षा बॉयफ्रेंड नसणं हा फार मोठा 'पराभव' मानला
जातो. त्यामुळं किमान दाखविण्यासाठी तरी बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड असली पाहिजे
या अपरिहार्यतेतून प्रेमात असणं गरजेचं झालं आहे. <br /><br />प्रेमात पडणं
जेवढं स्वाभाविक आहे तेवढंच प्रेमात आपटणंसुद्धा स्वाभाविक आहे. प्रेमभंग
आजही होतात. एकीकडे आजही देवदास निर्माण होतात तर दुसरीकडे कॉलेजच्या 3-4
वर्षाच्या काळात 3-4 प्रेमप्रकरणं होणं, सिरियस अफेअर्स होणं, स्वाभाविक
समजलं जाण्याइतपत कॉमन झालंय काही तरुणांच्या जीवनात.<br /><br />'प्रेम' हा एक
शब्द असला तरी त्याची अनुभूती, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या
व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असू शकते. मोठय़ा शहरांनुसार, छोटय़ा गावांनुसारही ती
बदलते. वयाच्या 19व्या वर्षापासून मी सामाजिक चळवळीत आहे. 14-15 वर्षे
विविध वृत्तपत्रे, साप्ताहिकांमधून 'युथ कॉलम चालविले आहेत. युवकांकरता
लिखाण केलं आणि गेली 23 वर्षे मुंबईतून व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा
चालविण्याच्या माध्यमात तरुण-तरुणींशी संवाद साधतो आहे. कौन्सिलिंगच्या
निमित्तानं त्यांच्या प्रेम समस्या समजून घेतो आहे. पुण्या-मुंबईपासून ते
कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या शहरी भागातील
युवकांसोबतच छोटय़ा गावातील युवकांनाही समजून घेण्याची संधी माझ्या
कार्यशाळांमुळं मला सातत्यानं मिळते. त्यांचं भावविश्व, प्रेमविश्व मी
दीर्घकाळापासून समजून घेतो आहे आणि म्हणूनच याही क्षेत्रात आपलं प्रशिक्षण
होणं गरजेचं आहे असं तीव्रतेनं वाटतं. म्हणूनच या लेखाचा हा प्रपंच. कदाचित
कळत-नकळत आणि जाणीवपूर्वकसुद्धा माझ्या आयुष्यात मला सगळ्य़ात जास्त प्रेम,
प्रेम समस्या हाताळाव्या लागल्या. प्रेमात पडलेल्या, त्यापेक्षा जास्त
प्रेमभंग झालेल्या तरुण-तरुणींना समजावावं लागलं, त्यांचं समुपदेशन करावं
लागलं. एक चळवळीचा नेता, वृत्तपत्र-स्तंभलेखक आणि समुपदेशक या तिन्ही
नात्यांनी 'प्रेम' या विषयाचा खूप अभ्यास करावा लागला. विचार करावा लागला.
शिवाय एक व्यक्ती म्हणूनही या विषयाचा, प्रेमाचा व्यक्तिगत जीवनावर,
जडणघडणीवर गहिरा परिणाम झाला आहे.<br /><br />गेल्या चाळीस वर्षात तीन पिढय़ांना
मी 'प्रेम' करताना, जगताना पाहतो आहे. पण प्रेम म्हणजे नक्की काय? कशाला
खरं प्रेम म्हणावं? कोणतं प्रेम उच्च दर्जाचं? कोणतं प्रेम कनिष्ठ दर्जाचं?
कुणाचं प्रेम किती जास्त? कुणाचं किती कमी? खरं प्रेम आहे की फक्त
इनफॅच्युएशन, 'आकर्षण' आहे. प्लॅटोनिक प्रेम श्रेष्ठ आणि वासनेनं भरलेलं
प्रेम खालच्या पातळीचं समजायचं काय? माणूस आयुष्यात एकदाच प्रेम करतो का?
जो एकदाच प्रेम करतो ते खरं प्रेम? जो एकापेक्षा अधिकदा प्रेम करतो ते खरं
नाही का? का? एकतर्फी प्रेम अर्थहीन का? <br /><br />अशा अनेक प्रश्नांची
उत्तरं शोधतोय माणसांची मनं. मला छान कळतात असं खूप लोकांना वाटतं. मलाही
कधीकधी तसं वाटतं. माझा मानसशास्त्राचा अभ्यासही चांगला आहे. या सगळ्य़ा
प्रश्नांची उत्तरं निश्चित, ठळकपणे देता येणं शक्य नसलं तरी या विषयावर छान
'विचारमंथन' मांडलं जाऊ शकतं. यावर आपण विस्तारानं नंतर चर्चा करूच. पण आज
मात्र काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सगळ्य़ाच माणसांना,
स्त्री-पुरुषांना, तरुण-तरुणींना, मुला-मुलींना सांगायच्या आहेत. मानव
जातीच्या धारणेसाठी, मानवतेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत. कोणत्याही
परिस्थितीत ते आपण पायदळी तुडवता कामा नये, हे आपण समजून घेतलं पाहिजे.<br /><br />एक
- मानवी जीवनात प्रेम ही एक नितांत सुंदर भावना आहे. खूप हवीहवीशी
वाटणारी, सार्या जीवनाचं सार्थक झाल्याचं वाटणारी भावना आहे. सारं जीवन
व्यापून टाकणारी अद्वितीय भावना आहे. पण स्वत:चं आणि दुसर्याचं 'मानवी
जीवन' त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. जगण्यापेक्षा प्रेम अधिक
महत्त्वाचं असूच शकत नाही. 'सो नो टू डेथ.' मृत्यूला नकार द्या. स्वत:च्या,
दुसर्याच्या आणि दोघांच्याही. आत्महत्या, खून दोन्हीही नाही. <br /><br />कितीही
प्रेमात पडला, आकंठ बुडाला आणि पुढे, प्रेमभंग झाला तरी.. या प्रेमभंगातून
बाहेर पडता येतं. पुन्हा सरसरून जगता येतं. प्रेमाबाहेरही जीवनात खूप काही
करण्यासारखं असतं. जीवनातील अनेक क्षेत्रे आपल्या 'डिव्होशनची' वाट पाहत
असतात. प्रेमाची ही ऊर्जा त्या कामात टाका. ते काम <br /><br />फुलून येईल. सरसरून, तरारून उठेल. त्याचा वटवृक्ष निर्माण होईल.<br /><br />देवदास
हा मानवी जीवनातील आदर्श असूच शकत नाही. तो स्वत:ही कधी आनंदानं जगला
नाही. त्यानं त्याच्या आई-वडिलांनाही आनंद दिला नाही आणि त्याच्यावर प्रेम
करणार्या पारो, चंद्रमुखींनाही कधी आनंदानं जगू दिलं नाही. देवदास हा केवळ
पराभूतांचा, षंढांचा, कर्तृत्वहीनांचाच आदर्श असू शकतो. त्याचं दाढी
वाढवणं, त्याचं दारू ढोसणं, हाय चंद्रमुखी, हाय पारो म्हणत म्हणत, टाचा
घासत घासत उसासे सोडणं सारंच त्याज्य आहे, नाकारणीय आहे.<br /><br />दोन - एकदा
प्रेमात पडल्यावर, दोघांनीही प्रेमात पडल्याची कबुली दिल्यावर ते आयुष्यभर
निभावलंच पाहिजे असा एक अलिखित नियमच प्रेम विश्वास निर्माण झाला आहे. हा
नियम उत्तम असू शकतो, उत्तम आहे. पण.. नाहीतर धोका, बेवफाई हे लेबलही योग्य
नाही. सुरुवातीस दोन पात्र एक-दुसर्यांना भेटतात तेव्हा सारंच नवं असतं.
वरवरचं असतं. कदाचित एक-दुसर्यांची खरी ओळख पटण्याआधीच दोन वरवरचे मुखवटे
एक-दुसर्याच्या प्रेमात पडतात. जसजसे जवळ येतात, काळ पुढे सरकतो, तसतसे
मुखवटे गळून पडतात. आतला खरा माणूस बाहेर येतो. भारतीय समाजात या
मुखवटय़ांचं प्रमाण खूपच जास्त आहे. कदाचित मुखवटय़ाआड दडलेला 'खरा माणूस
एकदम वेगळाच आहे' असं नंतर लक्षात आल्यावर ते प्रेम सुरू राहणं शक्यच नसतं.
अशावेळी एखाद्यानं माघार घ्यायचं ठरवलं तर तसं करण्याचा त्याला तिला
अधिकार आहे हे आपण समजून घ्यायला हवं. असं समजून घेणं सोपं नाही. 'दिल
टूटता है, टुकडे टुकडे होते है, हृदय छिन्न-भिन्न होतं.' हे सगळं मला कळतं.
तरी ज्याच्यावर आपण एवढं प्रेम करतो त्याच्या माघारी फिरण्याच्या
निर्णयाचा आपण मनापासून सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे. त्याचा मार्ग
मोकळा केला पाहिजे. कोणत्याही प्रकारे इमोशनली ब्लॅकमेल न करता त्या
व्यक्तीला जाऊ द्यायला हवं. व्यभिचारी, बेवफा म्हणणं, तोंडावर अँसिड फेकणं,
तिची येनकेन प्रकारे बदनामी करणं, तिचं जीवन असह्य होईल असं आपण वागणं हा
आपण करत असलेल्या प्रेमाचाच अपमान आहे हे समजून घेतलं पाहिजे.<br /><br />त्यानंतरही
सामान्य मैत्री ठेवायची की नाही हा मात्र तुमचा अधिकार आहे. एकदा तुमच्या
प्रेम पात्रानं नाही म्हटल्यावर सामान्य मैत्रीसुद्धा न ठेवता, कायमचे त्या
व्यक्तीच्या आयुष्यातून निघून जाण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे.
थोडक्यात, तुम्हाला स्वत:ला वाचविण्याचा, मनाला कमीत कमी जखमा होतील
याप्रमाणं वागण्याचा पुरेपूर अधिकार आहे. एकतर्फी प्रेमही तेवढंच खरं असतं.
पण.. पुढे पाहू.<br /><br />(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.)<br /><br />भ्रमणध्वनी- 9371014832<br /></span></td></tr>
</tbody></table>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-24046511334728010612013-02-11T03:21:00.003-08:002013-02-11T03:21:28.622-08:00परीक्षेच्या काळात माईंड रिलॅक्स ठेवा, टेन्शन अजिबात घेऊ नका<table style="width: 100%px;"><tbody>
<tr><td><div class="haedlinesstory">
</div>
</td></tr>
<tr><td><table align="left"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/02022013/02022013-md-ng-4-3509-1-small.jpg" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" /></td></tr>
</tbody></table>
<span class="bodyd" style="color: #2c2c2c; font-family: arial;">फेब्रुवारी उजाडला.
अनेकांच्या परीक्षा जवळ आल्यात. अभ्यास जोमात, जोशात सुरू झाला असेल.
'परीक्षेत उत्तम यश मिळायला हवं. आजच्या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर
उत्तम मार्क्स मिळालेच पाहिजेत. प्रयत्न तर सुरूच आहेत, पण उत्तम मार्क्स
मिळाले नाही तर कसं होईल? आई-वडिलांना काय वाटेल? मित्र-मैत्रिणी काय
म्हणतील? नातेवाईकांमध्ये हशा होईल! कुणाला तोंड दाखविण्याचीसुद्धा लाज
वाटेल? खरंच असं झालं तर? नको नको, असं व्हायला नको, असे विचार मनात
घोंगावत असतील.पण कितीही नको नको म्हटलं तरी मनात असा विचार
वारंवार येतो. मनाचं टेन्शन वाढत जातं. जसंजसं टेन्शन वाढत जातं तसंतसं मन
अस्वस्थ होतं. छातीत धडधड होते. ब्लडप्रेशर वाढू लागतं. आणखी असे नकारात्मक
विचार येतात. मन अधिकाधिक अस्वस्थ होऊ लागतं. मनाची एकाग्रता ढळते.
अभ्यासात लक्ष लागत नाही. परीक्षेची भीती वाटू लागते. खूप टेन्शन येतं. झोप
उडू लागते.अनेकांबाबत या काळात असं घडतं. किमान परीक्षेचं टेन्शन
आल्यामुळं अस्वस्थ व्हायला होतं. अभ्यासात मन एकाग्र करणं कठीण जातं.
टेन्शन हा स्मरणशक्तीचा शत्रू आहे. त्यामुळं कितीही वेळा अभ्यास केला तरी
तो नीट लक्षात राहत नाही. मग आणखीच टेन्शन वाढत जातं. काय करावं तेच कळत
नाही.<br /><br />अनेक विद्यार्थी अशा नकारात्मक विचारांच्या दुष्टचक्रात
अडकतात. पण हे स्वाभाविकपणे घडत असलं तरी अपरिहार्य नाही. आपण मनात जसा
विचार करत जातो तसं आपल्याबाबत घडत जातं. आपण स्वत:च स्वत:शी सतत बोलत
असतो. जसं आपण सतत स्वत:शी बोलू, सतत स्वत:ला सांगू तसंच आपल्याबाबत घडत
जाणार आहे. त्यामुळं आपण स्वत:ला काय सांगतो ते फार महत्त्वाचं आहे.अशा
वेळी स्वत:च स्वत:शी सेल्फ टॉक करावा. जाणीवपूर्वक स्वत:ला विधायक
पद्धतीनं पटवावं. स्वत:चं नाव घेऊन म्हणावं, 'श्यामराव जमेल, अभ्यास जमेल.
असा कंटाळा येऊन कसं चालेल? मन भरकटवून कसं चालेल? अभ्यासावर मन एकाग्र
करा. बरोबर मन एकाग्र होईल. माझं मन एकाग्र होत आहे. जसा जसा मी अभ्यास
करतो आहे तसंतसं ते अधिकाधिक एकाग्र होत आहे. अभ्यासातील गोडी वाढते आहे.
अभ्यास करताना मला मनापासून आनंद होतो आहे. अधिकाधिक मन एकाग्र होत आहे.
मला छान अभ्यास जमतो आहे.' असं वारंवार स्वत:ला नीट समजावून सांगावं.
बरोबर अभ्यास अधिक चांगला जमू लागेल. संमोहनासारखी प्रक्रिया वापरून जर या
पद्धतीच्या सूचना दिल्यात तर त्याचा खूप चांगला व प्रभावी परिणाम मिळतो.
लवकर या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याची संधी मिळते. पण संमोहन नीट शिकून
घ्यावं. वैज्ञानिक पद्धतीनं शिकविणार्यांकडूनच शिकावं. आज बाजारात भरमसाट
दावे करणारे अनेक संमोहनतज्ज्ञ आहेत. खोटे-नाटे दावे करून भलत्याच गोष्टी
ते आपल्या माथी मारत असतात. त्यांच्यापासून आपण सावध राहावं. असल्या
भोंदूंना ओळखण्याच्या काही खुणा आहेत. त्यापैकी एक 'माझ्या मित्राचं वा
पाल्याचं अभ्यासात मन लागत नाही. परीक्षेची भीती वाटते. मला त्याच्यासाठी
संमोहन शिकायचं आहे. मी शिकून त्याचा फायदा देता येईल का?' जो संमोहनतज्ज्ञ
हो म्हणेल तो 100 टक्के भोंदू आहे हे तुमच्या लक्षात येईल. संमोहन,
मेडिटेशन या सार्या प्रक्रिया स्वत:च स्वत:करता वापरता येतात. आपण वापरून
इतरांना त्याचा काहीही फायदा देता येत नाही. परीक्षेचं फारच टेन्शन
आलं तर स्वत:ला नीट समजावून सांगावं, 'जे होईल ते पाहिलं जाईल. मी आता
माझं सारं लक्ष अभ्यासावर केंद्रित करतो आहे. नीट मन लावून, एकाग्रतेनं
अभ्यास करणार आहे. मला जमेल तेवढय़ा उत्तमपणे मी पेपर सोडवेन. पुढचं पुढं
पाहिलं जाईल. मी माझं कर्तव्य नीट पार पाडेन. अगदी रिलॅक्स राहून अभ्यास
करेन. परीक्षा देईन. यश-अपयशाची आत्ताच चिंता न करता सारं लक्ष अभ्यासावरच
केंद्रित करेन. उत्तम अभ्यास करेन' असं जर आपण वारंवार स्वत:ला सांगू लागलो
तर अगदी तसाच परिणाम आपल्याला मिळू लागतो. कारण ज्यावेळी आपण टेन्शनमध्ये
असतो, भीतीच्या आहारी असतो त्या वेळी आपण 'हायली सजेस्टिबल' असतो. या
अवस्थेत जर आपण अशा विधायक सूचना दिल्यात तर त्या प्रभावीपणे अमलात येऊ
शकतात, नव्हे येतात.<br /><br />फक्त या सूचना देताना काही क्षण डोळे मिटा.
पूर्ण एकाग्रतेनं स्वत:ला अशा विधायक सूचना द्या. डोळे उघडा आणि पुन्हा
अभ्यासाला सुरुवात करा. पुन्हापुन्हा असा प्रयत्न करत गेलात तर बरोबर
तुम्हाला रिझल्ट मिळताहेत अशी प्रचिती येईल. स्वत:च स्वत:च्या अभ्यासाचा
टाईमटेबल तयार करा. तो काटेकोरपणे पाळा. 'पण सर, मी अशा अवस्थेत परीक्षा
दिली, मला कमी मार्क्स मिळाले, तर माझं अख्खं करिअर बरबाद होईल ना?
त्यामुळं ड्रॉप घेणं उत्तम नाही का?' असा प्रश्न अनेकजण विचारतात. खरं
म्हणजे परीक्षेचं, अभ्यासाचं टेन्शन टाळण्यासाठी, परीक्षेपासून पळ
काढण्यासाठी 'ही ड्रॉपची आयडिया' आपल्याच मनानं काढलेली असते. त्याला आपण
कधीही बळी पडता कामा नये. नाही तर आयुष्यभर आपल्याला पळावं लागेल. एखाद्या
समस्येला सरळ न भिडता पळून जाण्याची सवय लागेल. आपल्या भविष्यासाठी,
आयुष्यासाठी हे फार घातक आहे. त्यामुळे मनापासून ठरवून टाकायचं, 'मी पळून
जाणार नाही. कितीही टेन्शन आलं, भीती वाटली तरी मी पळणार नाही. अभ्यास
करेनच. परीक्षा देईनच. वाट्टेल ते झालं तरी मी हे करेनच' असं वारंवार
स्वत:ला सांगायचं. पण परीक्षेत कमी मार्क्स मिळून करिअर बरबाद झालं तर? या
प्रश्नाचंही सोपं उत्तर आपल्या मनाला देता येतं. ठीक आहे. तरी मी अभ्यास
करेन. सार्या पेपर्सचा मन लावून अभ्यास करेन. सारे पेपर्स देईन. फक्त
शेवटच्या पेपरच्या दिवशी मी ठरवेन, तो पेपर द्यायचा की नाही ते. मला
मार्क्स कमी मिळून करिअर बरबाद होईल असं निश्चित वाटलं तर मी शेवटचा पेपर
देणार नाही. त्यामुळं मला सारी परीक्षा पुन्हा दुसर्यांदा देण्याची संधीही
मिळेल आणि आता अभ्यास, परीक्षा यापासून पळून जाण्याच्या मानसिकतेपासूनही
मला स्वत:ला वाचवता येईल.' असं स्वत:ला नीट समजावून सांगून त्याप्रमाणं
प्रत्यक्षात आपल्याला वागता येतं. टेन्शनही कमी होतं. <br /><br />टेन्शन कमी
करण्याचे काही सुंदर उपाय आहेत. आजच्या आधुनिक काळाची ती देण आहे. माझ्या
'स्वसंमोहन व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळांमध्ये मी दोन प्रकारचं
प्रोग्रामिंग विद्यार्थ्यांना शिकवतो. संमोहनात जाऊन अभ्यासाची
गोडी-एकाग्रता वाढविण्याचं प्रोग्रामिंग शिकवतो. त्याप्रमाणे नियमित सराव
करायला लागलात तर अभ्यासाची एकाग्रता-गोडी वाढू लागते आणि एकाग्रतेनं
अभ्यास करू लागल्यामुळं अभ्यासाचा 'इनपूट' वाढतो.<br /><br />दुसरं परीक्षेची
भीती आणि परीक्षेचं टेन्शन येऊ न देता रिलॅक्स अवस्थेत परीक्षा देण्याचं
प्रोग्रामिंग शिकवतो. त्याचा नियमित सराव करायला लागलं की, रिलॅक्स अवस्थेत
परीक्षा देणं जमू लागतं. परीक्षेच्या काळात आपलं माईंड जेवढं रिलॅक्स असेल
तेवढी आपली स्मरणशक्ती उत्तम पद्धतीनं काम करते. आपला परीक्षेचा 'आऊटपूट'
वाढतो. केवळ या दोन प्रोग्रामिंगमुळंसुद्धा आपणंच करत असलेल्या अभ्यासाच्या
भरवशावर आपला परीक्षेतील परफार्मन्स सुधारतो. परीक्षेतील परसेन्टेज वाढतं.
आजवर हजारो विद्यार्थ्यांनी याचा फायदा करून घेतला आहे.जरी आपण
कार्यशाळा केली नाही तरी घरी बसल्या तुम्ही करू शकाल अशी एक सोपी
रिलॅक्सेशन पद्धती सांगतो. अर्थात त्याला संमोहनाची सर नाही. तरी काही अंशी
निश्चितपणे आपणास परिणाम मिळू शकतील.रिलॅक्स करणं म्हणजे आपल्या मसल्स ढिल्या सोडणं, ताणरहित अवस्थेत आणणं. आरामात खुर्चीवर बसा अथवा बेडवर झोपा. (उशी पातळ हवी.) सारं शरीर ढिलं सोडा. डोळे बंद करा. टप्प्याटप्प्यानं सारं शरीर रिलॅक्स करा. मनातल्या मनात म्हणा आणि तसं करा. पायांची
बोटं रिलॅक्स, तळवे रिलॅक्स, पाय रिलॅक्स, गुडघे रिलॅक्स, मांडय़ा रिलॅक्स,
कंबर रिलॅक्स, पोट रिलॅक्स, छाती रिलॅक्स, श्वासोच्छ्वास नॉर्मल, संथ,
लयबद्ध होतोय. पाठ-पाठीचे रिलॅक्स, खांदे-दोन्ही हात-बोटं रिलॅक्स, मान
रिलॅक्स, जबडा रिलॅक्स, गाल-कान रिलॅक्स, ओठ-नाक रिलॅक्स, डोळे-पापण्या
रिलॅक्स, कपाळ रिलॅक्स, आठय़ा निघून जाताहेत. डोकं रिलॅक्स, डोक्यातला
प्रत्येक मज्जातंतू रिलॅक्स होतोय. डावं डोकं रिलॅक्स, उजवं डोकं
रिलॅक्स, डोकं खूप रिलॅक्स, रिलॅक्स हलकं हलकं झालंय. खूप शांत, आनंदित,
टवटवीत वाटतंय असं 2 वेळा म्हणा. 2-4 सेकंद थांबा व पुढील सूचना द्या.<br /><br />मी
घेत असलेल्या प्रत्येक श्वासासोबत मनाची एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो
आहे. दिवसेंदिवस माझी अभ्यासातील गोडी, एकाग्रता वाढते आहे.मी सोडत
असलेल्या प्रत्येक श्वासासोबत माझ्या मनातील टेन्शन, नकारात्मक विचार,
परीक्षेची भीती निघून जाते आहे आणि मी घेत असलेल्या प्रत्येक श्वासासोबत
मनाची निर्भयता, रिलॅक्सेशन व विधायक विचार करण्याची क्षमता वाढते आहे.(हे सजेशन 2 ते 3 वेळा रिपीट करा.) मला
खूप आनंदित, टवटवीत, रिलॅक्स, उत्साहित वाटतंय असं तीनदा म्हणत म्हणत
हळूहळू डोळे उघडा आणि जागे व्हा. 5 ते 6 मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण होते.
बस्स एवढंच. दरवेळी अभ्यासाला बसताना असा सराव करा. दिवसांतून किमान 3 ते 5
वेळा असा सराव करा आणि पाहा काय परिणाम मिळतात ते.<br /><br />(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा <br /><br />निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)<br /><br />भ्रमणध्वनी - 9371014832<br /></span></td></tr>
</tbody></table>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-70264471936655752412013-01-23T05:21:00.003-08:002013-01-23T05:21:30.382-08:00'लैंगिक तृप्ती'तूनच मिळतो मानवी जीवनाचा सर्वोच्च आनंद<table style="width: 100%px;"><tbody>
<tr><td><div class="haedlinesstory">
</div>
</td></tr>
<tr><td><table align="left"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/19012013/19012013-md-ng-4-3655-1-small.jpg" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" /></td></tr>
</tbody></table>
<span class="bodyd" style="color: #2c2c2c; font-family: arial;">मध्य प्रदेशातील खजुराहो
येथील मंदिरे मी बारकाईनं न्याहाळत होतो. स्त्रीपुरुष संबंधांविषयीची
शिल्पकला अद्भुत होती, सुंदर होती, शृंगारिक होती, प्रणयदृश्य अत्यंत
विलोभनीय होती, रतिक्रीडा जिवंत होऊन अवतरल्या होत्या. सौंदर्य, कला व
ज्ञान याचा अत्यंत सुरेख संगम पाहायला मिळत होता. मी भान हरपून या सार्या
शिल्पकलेचे फोटो काढत होतो. माझ्याजवळ निकॉन डी-80 हा प्रोफेशनल कॅमेरा
होता. माझ्यासारखाच अत्यंत चोखंदळपणे निरीक्षण करीत गंभीरपणे फोटो काढणारा
एक परदेशी अमेरिकन माणूस स्मित करत बोलू लागला. मी बहुधा प्रोफेशनल
फोटोग्राफर आहे अशी त्याची समजूत झाली असावी. त्याच्याजवळही माझ्यासारखाच
कॅमेरा आणि 70 टू 300 चा टेलिलेन्स होता. त्यामुळं आम्ही मंदिराच्या
घुमटावरची बारीकसारीक शिल्पे टिपू शकत होतो. बोलता बोलता तो म्हणाला,
''तुम्ही भारतीय किती सुदैवी आहात, हजारो वर्षापासून तुम्हा भारतीयांना
सेक्सविषयी, रतिक्रीडेविषयी किती उत्तम ज्ञान होतं. तुमचा वात्सायन आणि
खजुराहो यांसारख्या मंदिरांनी जगाला सेक्सकडे विज्ञान म्हणून, ज्ञान म्हणून
पाहायला शिकवलं. माणसांच्या या मूलभूत गरजेकडे उदारपणे, माणुसकीपूर्ण
दृष्टिकोनातून पाहायला आणि विचार करायला शिकवलं.'' खरं म्हणजे एक भारतीय
म्हणून या अमेरिकन माणसानं केलेलं कौतुक मी आनंदानं स्वीकारायला हवं होतं. अभिमानानं
माझा ऊर भरून यायला हवा होता, पण झालं उलटंच. मला प्रचंड चीड आली. त्या
अमेरिकनची नाही तर स्वत:चीच, स्वत: भारतीय असण्याची. का?<br /><br />कारण
महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात पुरोगामी प्रांत. जादूटोणाविरोधी बिलाच्या
निमित्तानं मी मंत्रालयात, विधिमंडळात सारखे खेटे घालत होतो. आमचे मित्र
त्या वेळचे शिक्षणमंत्री ना. वसंतराव पुरके यांनी सेक्स एज्युकेशनसंबंधी
एक प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. सेक्स एज्युकेशन शब्द असला तरी ती
टीनएजर्सला, पौगंडावस्थेतील मुलांना शरीराची साधी ओळख करून देण्याची तयारी
होती. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी एक पुस्तिका निर्माण
करण्यात आली होती. ती पुस्तिका फडकवत, त्यातील स्त्रीपुरुष देहाची चित्रे
दाखवत दाखवत अनेक जनप्रतिनिधी कडाडून तुटून पडले होते. भारतीय संस्कृतीचा
हा अपमान आहे. नव्या पिढीला हे बिघडवायला निघाले आहेत. शाळाशाळांमध्ये
कंडोम पुरविणार का? वगैरे वगैरे आक्षेप घेतले गेले. शेवटी या आरोपांच्या
धुराळ्यात तो प्रस्ताव बाजूला पडला. वसंतराव पुरके यांनी दूरदृष्टी ठेवून
नव्या पिढीच्या हितासाठी एक अत्यंत आवश्यक पाऊल उचलण्याची हिंमत केली होती,
त्याबद्दल केव्हाही त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. पण पुरोगामी
महाराष्ट्रातल्या विरोध करणार्या जनप्रतिनिधीचं काय?<br /><br />एका माझ्या
ओळखीच्या जनप्रतिनिधीला मी म्हटलं, तुम्ही खरं म्हणजे महाराष्ट्रातून एक
मोठा मोर्चा मध्य प्रदेश आणि ओरिसात न्यायला हवा. कारण पुस्तकातील
चित्रांवर तुम्ही एवढे खवळलात, तर खजुराहो व कोणार्क येथे तर रतिक्रीडेची
कोरीव शिल्पे आहेत, संभोग दृश्य आहेत. हजारो शाळकरी मुलं ते पाहत असतात.
त्यामुळं आपली भारतीय संस्कृती रसातळात जाते आहे आणि जगन्नाथ पुरीच्या
मंदिराचं काय? भारतातील सर्वात मोठं, अत्यंत पुरातन, भारतीय संस्कृतीचं
प्रतीक असलेलं हे मंदिर आहे. रोज किमान लाखभर लोक या मंदिरात दर्शनाला
जातात. या मंदिराच्या घुमटावर संभोग दृश्य कोरलेली आहेत. भारतीय संस्कृती
वाचविण्यासाठी खजुराहो, कोणार्क, पुरीचं जगन्नाथ मंदिर तिन्हीही जमीनदोस्त
करायला नको का? आता तुमच्या लक्षात आलं असेल मला चीड का आली होती ते.
भारतीय संस्कृतीच्या नावाखाली सेक्स एज्युकेशनला विरोध करणार्यांना भारत,
भारतीय संस्कृती काहीही माहीत नसतं. इंग्रजांनी शंभर-दीडशे वर्षापूर्वी
लॉर्ड मेकॉलेप्रणीत शिक्षण पद्धतीद्वारा पेरलेल्या सेक्सविषयीच्या विकृत
कल्पना घेऊनच आजही या विषयाकडे आपण पाहतो आहोत.<br /><br />त्या काळात इंग्लंड
सेक्स या विषयाकडे फार प्रतिगामी दृष्टिकोनातून पाहत असे. ºिश्चनातील
कॅथॉलिक पंथीय सेक्सला फार वाईट समजत असत, अजूनही तो पगडा कायम आहे.
पती-पत्नींनीसुद्धा रतिक्रीडेपासून दूर राहिलं पाहिजे. अपवाद फक्त
अपत्यप्राप्ती उद्देशाचा. तेवढय़ापुरतंच पतिपत्नींनी एकत्र यावं. बाकी
सेक्स म्हणजे पापाची खाण. त्या काळातील इंग्लंडवर या विचारधारेचा पगडा
होता. सुशिक्षितांच्या माध्यमातून तो भारतीय संस्कृतीचा विचार ठरू पाहतोय.
मधल्या काळात इंग्लंड खूप बदललं, पण भारतीय सुशिक्षितांची मानसिकता मात्र
तशीच प्रतिगामीच राहिली.भारतीयांनी रतिक्रीडेला, कामाला पुरुषार्थ
मानला आहे. हा अभ्यासाचा, जीवनात आनंद घेण्याचा विषय मानला आहे. म्हणूनच
जगातलं पहिलं सेक्स एज्युकेशनवरचं पुस्तक लिहिणारा 'कामसूत्र' जनक वात्सायन
ऋषी हा प्रतिष्ठित ऋषी होता. त्याचं नाव नेहमीच आदरानं घेतलं जातं.
शशीकपूरनं यावर शेखर सुमन आणि रेखाला घेऊन एक सुंदर चित्रपट निर्माण केला
होता. याद्वारे या विषयाची एक अल्पशी, पण सर्वागसुंदर ओळख भारतीयांना करून
दिली.<br /><br />शाक्तपंथीय साधनेत, तंत्र साधनेत या विषयाकडे केवळ उदार
दृष्टिकोनातूनच नव्हे, तर मोक्षप्राप्तीचा एक मार्ग म्हणूनसुद्धा पाहिलं
जातं. महादेवाची पिंड गावागावांत असते. गावोगाव भक्तिभावानं व आदरानं
त्याची पूजा केली जाते. पिंड हे स्त्री-पुरुष लिंगाचं प्रतीक आहे, हे
प्रत्येक भारतीयाला माहीत असायलाच हवं. निसर्गानंच मानवी प्राण्यात
सेक्स हा एक अपरिहार्य भाग म्हणून निर्माण केला आहे. निर्मिती, नवी
निर्मिती ही निसर्गाची, प्राणिमात्राची गरज आहे. नर आणि मादी यांनी वारंवार
एकत्र यावं. त्यातून गर्भधारणा राहावी, नव्या अपत्यांचा जन्म व्हावा
म्हणूनच नर आणि मादीमध्ये जबरदस्त आकर्षण निर्माण होईल याची काळजी
निसर्गानं घेतली आहे. आकर्षणामुळं एकत्र आलेल्या स्त्री-पुरुषांना
रतिक्रीडा करावीशी वाटावी, त्यात त्यांना प्रचंड आनंद मिळावा. या आनंदासाठी
त्यांनी वारंवार एकत्र यावं अशी रचनाच निसर्गानं निर्माण केली आहे.
म्हणूनच आजही मानवी जीवनातील सर्वोच्च व परमोच्च आनंद स्त्री-पुरुष
संबंधातील 'ऑरगॅझम'मधून रतिक्रीडेतील 'लैंगिक तृप्तीतून' मिळतो. केवळ आनंदच
मिळत नाही तर संपूर्ण शरीर आणि मन 'ऑरगॅझम' नंतर पूर्णत: रिलॅक्स होतं.
एवढं सुंदर रिलॅक्सेशन दुसर्या मार्गानं प्राप्त होत नाही. त्यामुळं
सार्या टेंशन्स आणि ताणतणावांचा निचरा होतो. माणूस अंतर्बाह्य शांत, शांत
होतो. त्यामुळं अधिक निरोगी बनण्याच्या दिशेनं वाटचाल करतो. स्वभावही अधिक
संतुलित होऊ लागतो आणि यासाठी स्त्री आणि पुरुषांची मनापासून एकदुसर्याला
साथ असावी लागते. तरच हे साध्य होतं. बलात्कारात हे शक्य असतं का?
रतिक्रीडेतला आनंद ज्याला कळतो तो बलात्कार करणंच शक्य नाही. हे एज्युकेशन
आम्हाला केव्हा व कसं मिळणार?<br /><br />(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा <br /><br />निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.)<br /><br />भ्रमणध्वनी- 9371014832<br /></span></td></tr>
</tbody></table>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-84922960494413491652013-01-14T01:55:00.003-08:002013-01-14T01:55:54.052-08:00आजच्या पिढीला 'सेक्स एज्युकेशन' आवश्यक!<table style="width: 100%px;"><tbody>
<tr><td><div class="haedlinesstory">
</div>
</td></tr>
<tr><td><table align="left"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/12012013/12012013-md-ng-4-3187-1-small.jpg" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" /></td></tr>
</tbody></table>
<span class="bodyd" style="color: #2c2c2c; font-family: arial;">बलात्कार हा मानवी जीवनातील सर्वात भयानक, माणुसकीला
काळिमा फासणारा, हत्येपेक्षाही जास्त गंभीर असा गुन्हा आहे. त्याचं
कोणत्याही अवस्थेत समर्थन होऊच शकत नाही. स्वत:ला संत म्हणवणारे, पण खर्या
अर्थानं सामान्य, सहृदय माणसाचीही पात्रता नसणारे आसाराम बापूंसारखे ढोंगी
साधू यानिमित्तानं आपल्या अकलेचे तारे पाजळताहेत. 'दिल्लीच्या बलात्कारित
मुलीनं 'भाऊ' म्हणून बलात्कार्यांना आवाहन केलं असतं तर त्यांनी तिला
सोडून दिलं असतं. बलात्कार्यांइतकीच मुलगा मित्र असणारी ती मुलगी जबाबदार
आहे. सरस्वतीला आवाहन केलं असतं तर देवानं तिचं रक्षण केलं असतं.'आता
हे आसाराम बापू कोण? ज्यांच्या आश्रमात आपल्याच भक्त स्त्रियांना राधा
बनवून त्यांच्यासोबत रासलीला रचल्या जातात. केवळ तेच नाही, तर त्यांचा
मुलगाही हेच धंदे करतो. मुंबईच्या दोन सुशिक्षित भक्त मुलींवर आसारामच्या
मुलानं बलात्काराचा प्रयत्न केल्याचे आरोप प्रसिद्घिमाध्यमांमध्ये आधीच
प्रसिद्घ झाले आहेत. आपल्या 'दिव्य' ग्रंथामधून स्त्रियांविषयी अतिशय हिणकस
विचार लिहिणार्या गुरूनं सांगितलेली प्रत्येक आज्ञा शिष्यांनी पाळलीच
पाहिजे, असं सांगणार्या, विटाळशी बाई बागेत फिरायला गेली तर फुललेली फुलं
कोमेजतात. निखालस खोटं, अवैज्ञानिक, निलाजरं विधान करणार्या महाविद्वान
आसारामांविषयी काय बोलावं?<br /><br />वाईट याचंच वाटतं की, संत ज्ञानेश्वर,
संत नामदेव, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज अशा
समाजाचं प्रबोधन करणार्या, समाजाला चार पावलं पुढं नेणार्या संतांकरिता
जी संत उपाधी वापरली जाते तीच उपाधी असल्या बेशरम माणसाकरिता
महाराष्ट्रातील त्यांचे तथाकथित भक्त वापरतात.विनोबा भावेंनी 'संत'
या शब्दाचा फार सुंदर अर्थ सांगितला आहे. 'सत्याचा आग्रह धरत जो समाजाला
पुढे नेतो तो खरा संत' यानिमित्तानं अनेकांचं विकृत हृदय आणि विकृत विचार
प्रगट झाले. 'स्त्रिया तोकडे कपडे घालतात म्हणून बलात्कार होतात.
पाश्चत्त्य संस्कृतीचा पगडा असणार्या शहरी वातावरणात 'इंडियात' बलात्कार
होतात. ग्रामीण भागात, 'भारतात' बलात्कार होत नाहीत.अर्थात,
ज्यांना खरा भारत माहीत नाही, भारताशी ज्यांचा परिचय नाही, पुरुषी
अहंगंडानं आणि काल्पनिक विश्वात रमण्याच्या ध्यासानं ज्यांची दृष्टी अधू
बनली आहे अशांनी उधळलेली ही मुक्ताफळं आहेत. त्याला फारसं महत्त्व देण्याचं
कारण नाही. बलात्कारी माणसाची मानसिकता नेमकी काय असते? या समाजात,
पुरुषप्रधान समाजरचनेत, स्त्री ही उपभोगण्याची वस्तू आहे असाच संस्कार
होतो. बोलण्यातून, म्हणीतून, वागण्यातूच हाच संस्कार सतत ध्वनित होत असतो.
या संस्काराचा स्त्रीसुद्घा बळी आहे.<br /><br />दीर्घकाळ युवा चळवळींमध्ये
असल्यामुळं, व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळांमुळं आणि तब्बल 15 वर्षे
वृत्तपत्रांचे युवास्तंभ हाताळल्यामुळं भारतीय युवकांची मानसिकता फार जवळून
अनुभवता आली. माझ्या जीवनात सगळ्यात जास्त प्रेमप्रकरणं मला हाताळावी
लागली. 30-35 वर्षापूर्वी दोन मनांचं प्रेम आणि त्यात काही टक्क्यांमध्ये
शारीरिक संबंध असायचे. पण अलीकडच्या काळात 'बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड'च्या
जमान्यात बहुतांश प्रेमसंबंध शारीरिकसुद्घा असतात. बरं, प्रेम सुरू करताना
आयुष्यभराची साथ, लग्न असं काहीही कमिटमेंट नसतं. खरं म्हणजे आजच्या
जमान्यात हे प्रेम शरीरसंबंध टूवे (दुतर्फा) असतात, असावेत. बरोबरीच्या
नात्यानं हे रिलेशन असतं.पण जेव्हा काही कारणानं ही रिलेशनशिप
तुटते तेव्हा चांगल्या सुशिक्षित, आधुनिक मुलीसुद्घा 'त्या मेल्यानं माझा
भोग घेतला, मजा मारली आणि आता कंटाळा आला तर उडून चालला' या अर्थानं आरोप
करतात. तेव्हा त्या आधुनिक कपडय़ाआड दडलेली, पण मुळात बुरसटलेली स्त्री
बाहेर येते. या मुलींना सांगावं लागतं, तू असं बोलून स्वत:चा, तुझ्यातल्या
स्त्रित्वाचा अपमानं करते आहेस. तुमच्यातले संबंध राजीखुशीचे होते. उपभोग
घेतलाच असेल तर तुम्ही एक-दुसर्याचा घेतला आहे. खरं म्हणजे प्रेमाला
'उपभोग' हा शब्द वापरून प्रेमाचा आणि सेक्सचा दोहाेंचा तुम्ही अपमान
करताहात.<span style="color: #2c2c2c;"> </span>बलात्कारी मनोवृत्तीचा संबंध सरळ सरळ स्त्री-पुरुष
संबंधांविषयी असलेल्या दृष्टिकोनाशी आहे. पुरुषप्रधान भारतीय संस्कृती असो
अथवा पाश्चात्त्य संस्कृती, दोन्ही विचारधारा एकच आहेत. स्त्रीदेह हा
भोगाचा विषय आहे. पुरुषानं स्त्रीचा भोग घ्यायचा असतो. स्त्री त्यासाठीच
जन्माला आली असते. म्हणून तिला स्वातंर्त्य नाही. इति मनुस्मृती. लहानपणी
पित्यानं, तरुणपणी पतीनं आणि म्हातारपणी मुलानं संरक्षण करण्याची ती वस्तू
आहे.पित्यानं लग्न होईपर्यंत ती अनाध्रात राहील म्हणजे तिचा
कौमार्यभंग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. लग्नानंतर पतीच्या हाती
तिला एकदाचं सोपवलं की, मग पित्याची सुटका होते. ही मानसिकता, ही विचारधारा
आणि 'स्त्री ही भोग्य वस्तू आहे' ही विचारधारा एकाच नाण्याच्या दोन बाजू
आहेत.<span style="color: #2c2c2c;"> </span>स्त्रीचं शील, चार्त्यि यांनी शुचितेशी जोडलेली विचारधारा
अजूनही कायम आहे. शील आगपेटीच्या काडीसारखं असतं. एकदा ती उगाळली की,
पुन्हा काडीपेटी उगाळता येत नाही. हा आदर्श, मानसिक संस्कार अजूनही तसाच
आहे. फक्त प्रत्यक्षात तो अमलात येण्याची अपेक्षा ठेवण्याची कुणी हिंमत
ठेवत नाही एवढंच. टीव्ही, इंटरनेटच्या जमान्यातील, आधुनिक कपडे घालणारी,
इंग्रजी बोलण्यात भूषण मानणारी ही आधुनिक पिढी आगपेटीच्या काडीपासून
लायटरपर्यंत (जो वारंवार पेटवला जाऊ शकतो, हवा तेव्हा पेटतो) प्रवासकर्ती
झाली आहे आणि इंग्रजी बोलू न शकणारी, थोडंसं मॉडर्न बनण्याचा प्रयत्न
करणारी, अजूनही ग्रामीण भाषेचा लेहजा असणारी सुशिक्षित पिढीही त्याच दिशेनं
वाटचाल करते आहे.या सर्वाना इंटरनेटवर, मोबाईलवर स्त्री-पुरुष
देहाची उघडीनागडी चित्र, ब्ल्यू फिल्म्स सतत आणि सहज पाहायला मिळतात.
त्यातून पुन्हा मनात असलेला 'स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे' जुनाच संस्कार
पक्का होतो. विकृत पद्घतीनं चालवला जातो. बहुतांश ब्ल्यू फिल्म्स
बलात्कारसदृशच असतात. शृंगार, रोमान्स या गोष्टींना फारसं स्थान नसतं.
स्त्री-पुरुष प्रेमसंबंध म्हणजे फक्त 'इंटरकोर्स', 'भोगणं' हाच संस्कार
अधिकाधिक पक्का होतो. दृक्-श्रव्य माध्यमामुळं तो अधिक तीव्र स्वरूपाची
विकृती निर्माण करतो. चित्रपट, इंटरनेट, सेक्सी जाहिराती यातून असं
चाळवलं गेलेलं मन, मुळात पुरुषी अहंगंडानं, पुरुषी मनोवृत्तीनं पछाडलं
गेलेलं हे मन मग रस्त्यारस्त्यांवर छेडखानी करणं, अश्लील कॉमेंट्स करणं
सुरू करतं. समाजात याविषयी 100 परसेन्ट टॉलरन्स असल्यामुळे ते चेकाळलेलं मन
अधिकच सोकावतं, स्थिरावतं. अश्लील हातवारे करणं, विकृत हावभाव करणं,
घाणेरडं टॉन्टिंग करणं हा आपला जन्मसिद्घ पुरुषी अधिकार आहे असं मानू लागतं
आणि मग यातील काही महाभाग बलात्कारापर्यंत जाऊन पोहोचतात.बलात्काराचा
इतिहास पाहिला, तपासला तर त्यातील पंचाण्णव टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी
आधी छेडखानीचे, टॉन्टिंगचे प्रकार केले आहेत असं लक्षात येतं. मग यावर उपाय
काय? सर्वप्रथम स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे का? संस्कार बदलणं. मुलं आणि
मुली दोन्हींबाबत. स्त्री ही बरोबरीचा माणूस आहे. तिचा, तिच्या देहाचा,
तिच्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान राखणं हे माझं कर्तव्य आहे असं प्रत्येक
पुरुषाला, मुलाला शिकवलं पाहिजे. लहानपणापासून तशा संस्कार शाळा, कॉलेज,
प्रसिद्घिमाध्यमं आणि घरातूनसुद्घा बिंबवायला पाहिजे. त्याचप्रमाणं
देहाच्या पलीकडे स्त्रीला अस्तित्व आहे. स्त्रीचं व्यक्तिमत्त्व,
बुद्घिमत्ता, कर्तृत्व हे तिच्या सौंदर्याइतकच, किंबहुना जास्त महत्त्वाचं
आहे असा संस्कार तिच्यावर केला पाहिजे. समजा, तिच्या इच्छेविरुद्घ तिच्यावर
बलात्कार झालाच, तर एक अपघात, एक शारीरिक जखम एवढय़ाच अर्थानं त्याकडे
पाहायला स्त्रीनं शिकलं पाहिजे, स्त्रीला शिकवलं पाहिजे अन्यथा एवढय़ा
महत्प्रयासानं <span style="color: #2c2c2c;"></span>मिळालेलं स्वातंर्त्य स्त्रीला गमवावं लागेल आणि
तेही काही विकृत पुरुषांच्या भीतीपोटी, तिचा काहीएक दोष नसताना स्वातंर्त्य
तिला गमवावं लागेल.<span style="color: #2c2c2c;"> </span>ज्युडो-कराटे शिकून स्त्रियांचा आत्मविश्वास
वाढत असेल तर शिकायला, शिकवायला हरकत नाही. पण बलात्कार झाला तरी त्याला
एका जखमेपेक्षा जास्त महत्त्व देणार नाही, हा संस्कार मात्र त्यासोबत
तेवढाच प्रभावीपणे बिंबवला पाहिजे. तरच स्त्रिया मोकळेपणानं वावरू शकतील.
नवी नवी क्षेत्रे पादाक्रांत करू शकतील.<span style="color: #2c2c2c;"> </span>देशभर बलात्कारविरोधी
वातावरण निर्माण झालं आहे. त्याचा फायदा उचलून सरकार-पोलिसांनी काही कडक
पावलं उचलली पाहिजे. छेडखानी, अश्लील कॉमेंट्स याबाबत झिरो टॉलरन्स निर्माण
झाला पाहिजे आणि या गुन्ह्याखाली अटक झालेल्या मुलांची व त्यांच्या
आई-बापांची व शाळा-कॉलेजेसची नावं वृत्तपत्रात प्रसिद्घ केली पाहिजे. आपला
दिवटा तरुण चिरंजीव मुलींना छेडत असेल तर आई-वडिलांनाही तेवढंच जबाबदार
धरलं पाहिजे. कारण घरातला दुटप्पी संस्कार याला जबाबदार असतो. आपल्या
मुलींना छेडलं तर जे आई-वडील गंभीर बनतात तेच आई-वडील मात्र आपल्या
मुलाच्या अशा कृत्याकडे कानाडोळा करतात. हा अक्षम्य अपराध आहे. मी
ज्या काळात विद्यापीठ परिसरात एम. ए. इंग्रजी करत होतो त्या काळात अशा
छेडखानी करणार्या मुलांविरोधात मोहीम उघडली होती. हातात दै. 'तरुण भारत'चा
'महाविद्यालयाचा परिसर' कॉलम होता.<span style="color: #2c2c2c;"> </span>आपलं नाव पेपरात छापून येईल या
धाकानंच अनेकांचं 'पौरुष' थिजलं होतं. छेडखानी आटली होती. हा एक प्रभावी
मार्ग बनू शकतो. शाळा-कॉलेजातूनही छेडखानीविरोधात मोहिमा राबवायला हव्यात.
प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक यांनी पुढाकार घेऊन मुला-मुलींचं नीट
प्रबोधन करायला हवं. सहजीवन, एक-दुसर्याचा सन्मान करायला, शिकवायला हवं.
तशा चर्चा घडवून आणायला हव्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या
पिढीचं सेक्स एज्युकेशन करायला हवं. बलात्कार करून, ओरबाडून कोणताच आनंद
मिळत नाही, तर दोघांच्या सहमतीनं, रोमान्ससह असलेल्या प्रेमसंबंधातूनच खरा
आनंद मिळतो, हे ज्ञान सर्वापर्यंत पोहचवणं नितांत गरजेचं आहे.<br /><br />(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)<br /><br />भ्रमणध्वनी - 9371014832<br /></span></td></tr>
</tbody></table>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-11417783088567939572013-01-14T01:53:00.002-08:002013-01-14T01:53:15.126-08:00बलात्कारास प्रोत्साहन देणारी मानसिकता विकृत<table style="width: 100%px;"><tbody>
<tr><td><div class="haedlinesstory">
</div>
</td></tr>
<tr><td><table align="left"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/05012013/05012013-md-ng-4-3531-1-small.jpg" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" /></td></tr>
</tbody></table>
<span class="bodyd" style="color: #2c2c2c; font-family: arial;">भारताची राजधानी दिल्ली
येथे झालेल्या अमानुष बलात्कार प्रकरणाने सारा देश ढवळून निघाला आहे.
सर्वसामान्यांच्या विशेषत: तरुण-तरुणींच्या तीव्र सक्रिय प्रतिक्रिया एक
नवा इतिहास निर्माण करताहेत. कोणत्याही सहृदय, संवेदनशील माणसाचं मन
पिळवटून टाकणारी ही घटना आहे. आपल्यातला 'माणूस' अस्वस्थ करणार्या या
घटनेनं अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. <br /><br />यावर केल्या जाऊ शकणार्या
उपायांचा, सूचनांचा पाऊस पडतो आहे. बलात्कार्याला फाशी द्या, त्याला
नपुंसक करा, कायदा कडक करा इत्यादी सूचना, उपाय सुचविले जाताहेत. कायदा कडक
झाला पाहिजे. बलात्कारी पुरुषाला आयुष्यभराची अद्दल घडली पाहिजे. एवढी कडक
शिक्षा झाली पाहिजे की जेणेकरून पुन्हा दुसरा कुणी बलात्कार करण्यास
धजावणार नाही. असं घडावं याविषयी दुमत असण्याचं कारण नाही. <br /><br />बलात्काराचं,
कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही कारणानं, कोणत्याही काळी समर्थन होऊच शकत
नाही. कुणीही सहृदय माणूस बलात्काराचं समर्थन करण्यास, धजावणारचं नाही हे
खरं असलं तरी बलात्कार होतात का होतात? यामागच्या मनोवृत्तीचा, मानसिक
कारणांचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करू या. एबीपी माझा या वृत्तवाहिनींनं
आयोजिलेल्या बलात्कार या विषयावरील एका चर्चात्मक कार्यक्रमात गेल्या
पंधरवडय़ात मी सहभागी झालो होतो. त्या वेळी काही गोष्टी प्रकर्षानं लक्षात
आल्या. यानिमित्तानं काही महत्त्वाच्या बाबींकडे, इतिहासाकडे लक्ष वेधून
घेण्याची गरज वाटते. <br /><br />1975 साली 25 जूनला 'आणीबाणी' घोषित झाली आणि
27 जूनला आम्ही काही सहकारी वर्धा जेलमध्ये कोंबले गेलो. मी, चंद्रकांत
वानखेडे, सुभाष इथापे हे तीन विद्यार्थी वगळता बाकी 900 कैदी हे गुन्हेगार
होते. अनेक अट्टल गुन्हेगार होते. त्यात एक गोरा गोमटा, उंचपुरा, स्मार्ट
कैदी होता. पुलगाव सैनिक कॅम्पमधील एक माजी सैनिक पण अख्ख्या जेलमधील एकही
कैदी त्याच्याशी बोलत नसे, संपर्क ठेवत नसे. सारे त्याच्याशी अत्यंत
तुच्छतेनं वागत असत. पुढे कारण कळलं. त्यानं त्याच्याच ऑफिसरच्या बायकोवर
बलात्कार केला आहे. म्हणून सार्या कैद्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला
होता. <br /><br />पुढे अनेक कैदी मित्र झाले. त्यांच्या अंतरंगात शिरण्याची
संधी मिळाली. तेव्हा कळले की गुन्हेगारांचीसुद्धा एक मूल्यव्यवस्था असते.
चोर, दरोडेखोर, खुनी माणसंसुद्धा बलात्कारी गुन्हेगाराला 'गया गुजरा',
'एकदम हिणकस,' हमारे साथ बैठने लायक नही' समजतात. हे कळल्यावर एका बाजूनं
आश्चर्य वाटलं; पण दुसर्या बाजूनं फार बरं वाटलं. असाच प्रसंग आता घडला.
दिल्लीतील तरुणीवर बलात्कार करणार्या संशयित गुन्हेगाराला तिहाड जेलमधील
कैद्यांनीच बदडून काढलं. बलात्कार हा गुन्हा, हे कृत्य अट्टल
गुन्हेगारांनासुद्धा तिरस्करणीय वाटतं ही आनंदाची गोष्ट आहे. <br /><br />पण
1992-93 च्या मुंबई दंगलीमध्ये आणि गुजरातच्या दंगलींमध्ये अनेक
स्त्रियांवर बलात्कार झाले. पण हे बलात्कार करणारे कुणी अट्टल गुन्हेगार
नव्हते, अथवा चवचाल, विकृत समजले जाणारे तरुण नव्हते. तर उलट धर्माभिमानी
म्हणविणार्यांनी, काही तथाकथिक सुसंस्कृत लोकांनी, हे बलात्कार केले होते
आणि तेही धर्माच्या, धर्मरक्षणाच्या नावावर बलात्कार केले होते. त्यातील
काही केसेस तर काळजाचा थरकाप उडविणार्या आहेत. दंगली आधी ज्या घरांसोबत
घरोबा होता. एका घरात शिजलेली भाजी दुसर्या घरात जात असे. एवढे
जिव्हाळ्य़ाचे संबंध आहेत. अशा दुसर्या धर्माच्या घरातील स्त्रीवर ओळखीच्या
पुरुषांनी बलात्कार केलेत आणि हे बलात्कार करविण्यात पुढाकार घेणार्या
स्त्रिया आहेत. आपल्याच तरुण मुलांना रोजारणीवर बलात्कार करण्यास
प्रोत्साहन देताहेत, अशा किमान दोन केसेस मला माहीत आहेत. पोलीस तपास
अधिकार्यांच्या तोंडूनच त्या ऐकल्या आहेत. <br /><br />अर्थात, याच मुंबई
दंगलीत इतर धर्मातील स्त्रियांना प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून
वाचविल्याची, बलात्कार वाचविल्याची व शेजारधर्म प्रखरपणे पाळल्याची अनेक
उदाहरणंही मला माहीत आहेत. म्हणूनच माणुसकीवरचा विश्वास अजून कायम आहे. पण
याच दंगलीच्या काळात इतर धर्मीयांवर बलात्कार करण्यास प्रोत्साहन देणार्या
नेत्याचा अत्यंत बीभत्स चेहरा सप्रमाण उघड झाला होता, हेही अत्यंत विदारक
सत्य आहे. <br /><br />1971-72 सालच्या बांगलादेश युद्धाच्या आधी आम्ही काही
'तरुण शांती सैनिक' बंगालमधील 'बनगाव' या बॉर्डरच्या गावी काही सेवा कार्य
करीत होतो. पाकिस्तान बॉर्डर केवळ तीन-चार किलोमीटर अंतरावर होती. हजारो
बंगाली पाकिस्तानी शरणार्थी भारताच्या सीमेत प्रवेश करीत होते. त्यांची
व्यवस्था 'बनगाव' कॅम्पमध्ये केली जात असे. त्यामध्ये अनेक बलात्कारित
स्त्रिया असत. अनेक तरुणींचे स्तन कापले असत. योनीमध्ये संगिनी खुपसल्या
असत. बांगला स्त्रियांचा अपमान करणं, सूड उगवणं हे परमराष्ट्रीय
धर्मकर्तव्य आहे असं समजून पाकिस्तानी मिल्ट्री हे करीत असे. पाकिस्तानी
बंगाली स्त्रियांना भारतीय बॉर्डरमध्ये शिरण्याआधी सर्वासमक्ष पकडून
पाकिस्तानी सैनिक बलात्कार करीत आणि बंदुका, रायफली ताणून उभ्या असलेल्या
भारतीय सैनिकांना खिजविण्यासाठी, तुम्ही आमचं काही बिघडवू शकत नाही असं
दाखविण्यासाठी तर अधिकच चेकाळून ही कृत्य केली जात. <br /><br />त्या वेळी
बॉर्डरवरच्या या सैनिकांची चाललेली मानसिक उलाघाल आम्ही प्रत्यक्ष अनुभवली
आहे. आपल्या समक्ष बलात्कार केले जाताहेत, स्तन कापले जाताहेत, संगिनी
योनीत खुपसल्या जाताहेत, नग्न केलं जात आहे. केवळ काही फर्लाग अंतरावर हे
संगळं घडताना दुर्बिणीशिवाय प्रत्यक्ष डोळ्य़ांनी दिसत आहे. हातात शस्त्र
आहे, लढण्याची खुमखुमी आहे. पण ऑर्डर नाही म्हणून हात चोळत बसण्याशिवाय
काहीही करता येत नाही. अशा अत्यंत उद्विग्न मनोवस्थेत असलेल्या सैनिकांना
आम्ही पाहिलं आहे. सैनिकांचं नियंत्रण सुटून आदेशाशिवाय युद्धाची ठिणगी पडू
नये म्हणून आपल्या सैनिकांची एका बाजूनं समजूत काढत असतानाच आतून मात्र
संतापानं प्रचंड पेटलेले सैनिक अधिकारीही त्या वेळी जवळून पाहिले आहेत. <br /><br />या
सर्व परिस्थितीमुळेच त्या वेळी पंतप्रधान इंदिरा गांधींना पूर्व
पाकिस्तानवर चढाई करण्याचा निर्णय घेण्यास भाग पडलं असावं. पण पुढचं
आम्हाला काही पाहता आलं नाही. युद्ध सुरू झालं. पेटलेल्या सैनिकांनी अवघ्या
काही दिवसांत अख्खा पूर्व पाकिस्तान ताब्यात घेतला आणि 1 लाख पाकिस्तानी
सैनिकांनी शरणागती पत्करून स्वत:ला भारतीय सैन्याच्या हवाली केलं. जगाच्या
इतिहासात यापूर्वी एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर एकाचवेळी एवढय़ा मोठय़ा संख्येनं
शस्त्रसज्ज सैनिकांनी शरणागती पत्करली नव्हती. भारतीय सैन्यानं इतिहास
घडविला. <br /><br />पाकिस्तानी सैनिक बॉर्डरवर बलात्कार करताना, छळताना विचार
करीत नसत की, ही स्त्री कोणत्या धर्माची आहे. दोन्ही धर्माच्या स्त्रियांवर
बलात्कार करीत असत. सैनिक आणि बलात्कार हा युद्धाच्या इतिहासाचा अविभाज्य
भाग राहिला आहे. पहिल्या आणि दुसर्या अशा दोन्ही महायुद्धात मोठय़ा
प्रमाणात स्त्रियांवर बलात्कार झाले आहेत. हिटलरच्या नाझी सैन्यानं जसे
असंख्य अमानुष बलात्कार केलेत तसंच प्रमाण कमी असलं तरी दोस्त
राष्ट्रांच्या सैनिकांनीही बलात्कार केले आहेत. <br /><br />सैनिकांच्या
बलात्कारांनी तर सारा भारताचा इतिहास भरलेला आहे. शिवाजी राजांच्या
उदयाच्या आधी युद्धात प्रदेश जिंकला की जिंक णारे सैनिक, सरदार सारेच त्या
परिसरातील तरुण, सुंदर स्त्रियांना पकडून बलात्कार करीत असत. तेवढय़ानं मन
भरलं नाही तर त्यातील विशेष सुंदर स्त्रियांना सोबत घेऊन जात आणि आपल्या
नाटक शाळेत व जनानखान्यात भरती करीत असत. युद्धात जिंकण्यासोबतच पराजित
परिसरातील स्त्रियांना भोगण्याचा, पळविण्याचा, बलात्कार करण्याचा अधिकारच
प्राप्त होतो. असा समज आणि शिरस्ता त्या काळी होता. <br /><br />आपल्या
सैनिकांना असे बलात्कार करण्यास बंदी घालणारा, ही आज्ञा मोडल्यास कुणाचाही
मुलाहिजा न ठेवता त्याला कडक शिक्षा करणारा पहिला राजा इतिहासानं पाहिला तो
शिवाजी राजा. स्त्रियांचा सन्मान राखणारा, तो सन्मान राखलाच जाईल याची
काळजी घेणारा जाणता राजा म्हणूनच अद्वितीय आहे, महान आहे. <br /><br />पण
शिवाजी राजा नंतर काय? काश्मीर, पंजाब, नागालंॅड वगैरे परिसरात काय घडलं?
भारतीय सैनिकांवर बलात्काराचे अनेक आरोप झालेत. भारतीय कायद्यानुसार काही
सैनिकांना शिक्षाही झाली. <br /><br />पुरुष स्त्रीवर बलात्कार का करतो?
बलात्कार करणारा पुरुष विकृत असतो का? की बलात्कार करण्यास प्रोत्साहन
देणारी मानसिकता घडविणारी परिस्थिती विकृत असते? या परिस्थितीला
पुरुषप्रधान संस्कृती म्हणतात का? या संस्कारात घडलेल्या प्रत्येक
पुरुषाच्या मनाच्या एका कोपर्यात बलात्कारी दडला आहे का? पुढे शोधू या
प्रश्नांची उत्तरं. <br /><br />(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा <br /><br />निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत )<br /><br />भ्रमणध्वनी : 9371014832<br /><br />एारळश्र- ीहूरारपर्रीùीशवळषषारळश्र.लेा</span></td></tr>
</tbody></table>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-68930467900046960922012-12-29T04:28:00.004-08:002012-12-29T04:28:55.215-08:00मनातील भावनांचा मोकळेपणाने निचरा करा<table style="width: 100%px;"><tbody>
<tr><td><table align="left"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/29122012/29122012-md-ng-4-3274-1-small.jpg" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" /></td></tr>
</tbody></table>
<span class="bodyd" style="color: #2c2c2c; font-family: arial;">'ताणतणावाचं नियोजन
तुमच्याच हाती' हा गेल्या शनिवारचा लेख प्रसिद्ध झाला. सारखा फोन खणखणू
लागला. ''आपल्या जीवनात खूप टेंशन आहे. ते हाताळणं जमत नाही. त्यामुळं
त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात,'' असे सांगणारे असंख्य फोन आले. तर
तुम्ही फार सुंदर मार्ग सांगितलात, टेंशन हाताळण्यासाठी खूप लोकांनी
अभिनंदनही केलं. 'ताणतणाव नियोजन' हा आपणा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय.
आजचं युगच हे टेंशनचं युग मानलं जातं. प्रचंड धावपळीचं जीवन, जीवघेणी
स्पर्धा, पैसे मिळविण्याचं वाढलेलं प्रेशर, यशस्वी होण्यासाठी धडपड
करण्याची अपरिहार्यता या सगळ्यांचा परिणाम म्हणजे टेंशन, टेंशन, टेंशन. हे
हाताळण्यासाठी, वेळोवेळी टेंशन कमी करण्यासाठी, त्याचा निचरा करण्यासाठी
रिलॅक्सेशन तंत्र वापरणं अपरिहार्य आहे आणि संमोहन प्रक्रिया ही प्रभावी
रिलॅक्सेशन निर्माण करणारी प्रक्रिया आहे.<br /><br />मी नियमितपणे स्वसंमोहन
व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा चालवितो. त्यामध्ये 'ताणतणाव नियोजन' हा
विषय प्रभावीपणे तर शिकविला जातोच, पण सोबत संमोहन प्रक्रियाही शिकवली
जाते. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात विदर्भात पाच-सहा ठिकाणी या कार्यशाळा
होणार आहेत.<br /><br />सुरुवातीला मनात निर्माण झालेलं टेंशन तसंच साचत गेलं,
तर पुढे त्याचं रूपांतर अँनक्झायटीमध्ये- चिंता, काळजी, अस्वस्थता होतं.
त्याचे शरीरावर, मनावर खूप दुष्परिणाम होतात.<br /><br />शरीरावर होणारे
दुष्परिणाम-विकार- कशरीं वशीशरीश, रक्तदाब - इश्रेव झीशर्ीीीश, मधुमेह-
ऊळरलशींशी, सांधेदुखी, डोकेदुखी, अनेक प्रकारचे चर्मरोग, दमा-अस्थमा,
निद्रानाश, इतर मनोविकार आजार.<br /><br />मनावर होणारे दुष्परिणाम<br /><br />बुद्धिकौशल्यावर
प्रतिकूल परिणाम, निर्णयक्षमतेवर प्रतिकूल परिणाम, आत्मविश्वास ढासळतो,
स्वत:वरचे नियंत्रण सुटते, स्मरणशक्ती खालावते.<br /><br />मागच्या लेखात आपण
ताणतणावावर नियंत्रण मिळविण्यासाठी वा ताणतणाव सहजासहजी आपल्या जीवनात
निर्माणच होणार नाही यासाठी काय करायचे ते पाहिलं होतं. एकूण 11 उपाय आपण
करू शकतो, वापरू शकतो याचा विस्तारानं आढावा घेतला होता. आता पुढील उपाय
पाहू या.<br /><br />वेळच्या वेळी आपल्याला आपल्या भावनेचा निचरा करता आला
पाहिजे : काय होतं की, दरवेळी आपल्या सगळ्याच भावना आपल्या जीवनामध्ये
व्यक्त करता येत नाहीत, कारण काही सामाजिक दडपणं आणि नीतिनियम असतात.<br /><br />एवढंच
नव्हे, तर सभ्यपणाच्या कल्पना असतात. त्यामुळे अनेकदा वेगवेगळ्या
प्रकारच्या भावना आपल्याला दाबून टाकाव्या लागतात आणि मग या जर तशाच साचत
गेल्या तर अत्यंत वाईट असे दुष्परिणाम आपल्याला पुढच्या जीवनामध्ये भोगावे
लागतात. त्यामुळे भावनेचा निचरा करणारे तंत्र आपल्या जीवनामध्ये असणं
नितांत गरजेचं आहे. याला 'कॅथारसिस' असा शब्द इंग्रजीमध्ये वापरला जातो.
'परझीन'-'शुद्ध होणं.' एखादा स्पंज आहे. हा स्पंज ज्यावेळेस घाण गोळा करतो
आणि या स्पंजला दाबून आपण ती घाण काढून टाकतो, त्या पद्धतीने आपल्या मनाचं
शुद्धीकरण झालं पाहिजे, ही कल्पना या कॅथारसिसमागे आहे.<br /><br />नाटक-सिनेमामधूनसुद्धा
आपल्या भावनेचा सुंदर निचरा होतो. याकरिता मला एक उदाहरण तुम्हाला
सांगावसं वाटतं. माझ्याकडं एक विदर्भातील बाई काम करायला होती. विजय
कोंडकेचा 'माहेरची साडी' नावाचा सिनेमा लागला होता. ती मला म्हणायला लागली,
''साहेब, मी काही दोन-तीन दिवस कामाला येणार नाही. मी ममईला (मुंबईला)
सिनेमा पाहायला चालले.'' मी म्हटलं, ''दोन-तीन दिवस कशाला पाहिजे?'' खरं
म्हणजे, मी नालासोपार्याला राहायचो. मुंबई म्हणजे काही दूर नव्हती. ''तू
एका दिवसात जाऊन पाहून ये आणि मग दुसर्या दिवशी कामाला ये.'' ''नाय जी,
म्हणे दोन-तीन दिवस तर लागलंच मले. सिनेमा पाहून तर यायचंच आहे.'' आता ही
बाई गेली आणि तब्बल चार-पाच दिवसांनी आली. <br /><br />''काय गं, तू सिनेमा पाहायला गेली होती एक दिवसाकरिता आणि तीन-चार दिवसांनी परत येते म्हणजे काय?''<br /><br />ती
म्हणाली, ''अजी तुम्हाला काय सांगू, अरे इतका मस्त सिनेमा आहे ना? अवं, मी
गेले सिनेमाले अन् आतमध्ये गेल्या गेल्या जी धो-धो रडायला लागली. सिनेमाभर
रडत होती. लई बरं वाटलं. म्या म्हटलं काय, लई चांगला सिनेमा आहे. पुन्हा
पाहिल्याशिवाय काय परत जायचंच नाही. लागली म्हणे लाईनीत. अहो कायची! लवकर
सिनेमाची एक तिकीट मिळते का? एवढी मोठी रांग! चौथ्या दिवशीचं तिकीट भेटलं,
मी राहिली तिकडं. चौथ्या दिवशीचा सिनेमा पाहूनच परत आली.'' आता 'माहेरची
साडी' हा सिनेमा आहे, जो आतमध्ये शिरल्यापासून शेवटपर्यंत स्त्रियांना धो
धो रडवतो. त्या सिनेमाने आजपर्यंतचे मराठीतले उत्पन्नाचे सगळे रेकॉर्ड्स
मोडले, एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर हा सिनेमा चालला आणि या सिनेमाचा
प्रेक्षकवर्ग नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक स्त्रिया होत्या, याचं कारण काय
आहे? <br /><br />मनामध्ये साचून असलेल्या सगळय़ा भावनांचा निचरा करण्याची संधी
मिळते. धो धो रडूनसुद्धा आपलं मन निर्मळ झाल्यामुळे, परझीन झाल्यामुळे,
कॅथारसिस झाल्यामुळे आपल्याला खूप बरं वाटतं. हीही मानवी जीवनातली एक
नितांत आवश्यक गरज असू शकते. नाटक-सिनेमामधून कॅथारसिस घडतं याला अत्यंत
महत्त्व आहे. त्याकरिता केवळ नाटक- सिनेमाच पुरेसे आहेत असं नव्हे.
तुमच्या-<br /><br />माझ्या जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळे मित्र-मैत्रिणी जोडता
आले पाहिजेत. त्यांच्यासोबत छानपैकी आपल्याला आपल्या मनातलं बोलता आलं
पाहिजे. <br /><br />मनामध्ये जे काही आहे ते उत्तम पद्धतीनं व्यक्त करता आलं
पाहिजे. याबाबत मी जेव्हा नेहमी सगळय़ांसोबत बोलतो. प्रामुख्याने ज्या वेळेस
हिपनोथेरपिस्ट कोर्समध्ये संमोहन उपचारांचा भाग शिकवत असताना
स्त्रियांच्या कौन्सिलिंगबद्दल काही गोष्टी मला सांगाव्या लागतात, तेव्हा
एक गोष्ट मी आवर्जून सांगत असतो. भारतीय स्त्रीबाबत एक अडचण आहे. तिला
आपल्या मनातलं इतरांजवळ बोलता येत नाही.<br /><br />मी असं म्हटल्यानंतर,
तुम्ही कदाचित मला हसाल. कारण स्त्रिया खूप बोलतात अशी आपली समजूत आहे. हे
खरं आहे की, स्त्रिया खूप बोलतात. चार स्त्रिया एकत्र आल्या की प्रचंड बोलत
बसतात; पण आपल्या मनातलं सोडून बाकी सगळं बोलतात. कारण लहानपणापासून
त्यांना अनुभव आलेला असतो की, आपल्या मनातील एखादं गुपित कोणाला सांगितलं
किंवा अगदी आतली गोष्ट कुणाजवळ सांगितली की, ती गोष्ट बाहेर फुटते आणि
त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे हळूहळू स्त्री हे
शिकते की, सगळं बोलायचं, पण आपल्या मनातलं गुपित मात्र कोणाजवळ सांगायचं
नाही. आपल्या मनात दबून असलेल्या भावना कुणाला सांगायच्या नाहीत. त्यामुळे
वर्षानुवर्षे या भावना मनामध्ये साचत जातात, साचत जातात, साचत जातात आणि
त्याचे दुष्परिणाम मनोरुग्ण बनून मग त्यांना भोगावे लागतात किंवा वेगवेगळय़ा
पद्धतीचे मानसिक आजार पुढे जाऊन भोगावे लागतात. <br /><br />त्यामुळे मी नेहमी
म्हणत असतो की, प्रत्येक स्त्रीला आपल्या मनातलं मोकळेपणाने बोलता येईल
असं स्थान असण्याची गरज आहे; आणि जे थेरपिस्ट आहेत, कौन्सिलर्स आहेत
त्यांचं हे महत्त्वाचं काम आहे की, त्यांनी विश्वासाचा एक असा खांदा
स्त्रीला उपलब्ध करून दिला पाहिजे की, ज्या खांद्यावर डोकं ठेवून,
विश्वासाने त्यांना जे सांगावसं वाटतं ते सांगता आलं पाहिजे आणि मोकळेपणानं
रडता आलं पाहिजे. पण हे प्रत्येकालाच काही शक्य नाही किंवा दरवेळी
आपल्याला कौन्सिलरची किंवा या पद्धतीच्या समंजस थेरपिस्टची मदत मिळेलच असं
नाही. याकरिता दुसरा पर्याय आहे. स्त्रियांनीसुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा
काही समंजस स्त्रियांसोबत मैत्री निर्माण केली पाहिजे की, ज्या समजून घेऊ
शकतात, आपल्या मनातलं ऐकू शकतात आणि हे गुपित दुसर्याजवळ न सांगण्याइतपत
समंजसपणा त्यांच्यामध्ये आहे, असा विश्वास तुम्हाला वाटतो. या पद्धतीचे
काही चांगले मित्र-मैत्रिणी जोडणं हेसुद्धा आवश्यक आहे. त्यातून उत्तम
पद्धतीने भावनेचा निचरा होऊ शकतो.<br /><br />थोडक्यात, जी माणसं मनातल्या मनात
साठवून ठेवतात, सहजासहजी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करत नाहीत, ती
माणसं या पद्धतीच्या आजारांना म्हणजे एंग्झायटी प्रोन आजारांना मोठय़ा
प्रमाणावर बळी पडत असतात. त्यामुळे या माणसांनी आपल्या भावना मोकळेपणाने
इतरांजवळ व्यक्त केल्या पाहिजेत.<br /><br />समजा, तुम्हाला एखाद्या
व्यक्तीपुढे या भावना मोकळेपणाने व्यक्त करणं अडचणीचं वाटत असेल, तर आजच्या
आधुनिक काळामध्ये काही दुसरेही पर्याय आहेत. उदाहरणार्थ,आपण एखाद्या
मैत्रिणीशी किंवा मित्राशी बोलत आहात असं समजून बोलत जावं आणि टेपरेकॉर्डर
ऑन ठेवावा. टेपरेकॉर्डरमध्ये आपण जे काही बोलतो ते नंतर एक-दोनदा ऐकावं.
त्यातून बोलण्याचं समाधान मिळतं. पुन्हा ते ऐकल्यामुळे आपल्याला त्याची
खात्री वाटते की, हे सगळं आपण बोललेलो आहोत. त्यातूनसुद्धा भावनेचा निचरा
होऊ शकतो. दुसरा पर्याय 'लिखाण' हासुद्धा असू शकतो. आपण कागद-पेन घेऊन
बसावं आणि आपल्याला जे वाटतं ते सगळंच्या सगळं कागदावर उतरवावं.
त्यातूनसुद्धा आपल्या भावनेचा निचरा होऊ शकतो.<br /><br />क्रिएटिव्हिटी :
आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये निर्मितीचा आनंद देणारं काम असणं किंवा
असला काही छंद असणं नितांत गरजेचं आहे. खरं म्हणजे आपण जे काम करतो,
त्यातूनच जर आपल्याला निर्मितीचा आनंद मिळत असेल, तर डेफिनेटली आपल्या
जीवनाचं सार्थक बनून जातं, कारण त्यातून आपल्याला इतका सुंदर आनंद मिळत
राहतो की, एकूणच सगळय़ा रपुळशीूं आणि ींशपीळेप चा निचरा होत जातो आणि एक
निरोगी, आनंदमय जीवन जगण्याची आपल्याला संधी मिळते. पण मॅक्झिमम लोकांना
आपल्याला आवडेल किंवा निर्मितीचा आनंद देईल असं काम करण्याची संधी मिळत
नाही. त्यावेळेस असे काही छंद आपल्याला जोपासता आले पाहिजेत. कितीतरी
प्रकारचे, निर्मितीचा आनंद देणारे छंद असू शकतात. त्याला आपण
चित्रकला-पेंटिंग म्हणतो किंवा मूर्तिकला म्हणतो, त्याशिवाय
फोटोग्राफीसारखं तंत्र की, ज्यातून आपल्याला निर्मितीचा आनंद मिळू शकेल.
संगीत आहे. लेखन आहे. साधं बागकाम आहे. एवढंच नव्हे, तर वेगवेगळ्या
पद्धतीच्या कला आहेत. या कलांमधून हा आनंद आपल्याला मिळू शकतो. सगळं जाऊ
द्या, साधा उत्तम स्वयंपाक करण्यातसुद्धा आनंद आहे. अशा कितीतरी क्रिएटिव्ह
गोष्टी आपल्या जीवनात असू शकतात. ज्या आपल्याला आवडतात. ज्यातून आपल्याला
आनंद मिळतो आणि त्या उपयुक्तसुद्धा आहेत. याचं जर कॉम्बिनेशन करता आलं तर
पुन्हा रपुळशीूं आणि ींशपीळेप चा निचरा होण्यास प्रचंड मदत मिळते. कारण या
सगळ्या क्रिएटिव्ह कामांमध्ये आपण पूर्ण एकाग्र होतो, समरस होतो आणि
समरसतेने आणि एकाग्रतेने आपणास जो आनंद मिळायचा तो मिळतो.<br /><br />आता
आपल्याला या तेरा मुद्यांचा मी जो उल्लेख केला; हे सगळेच्या सगळे तेरा
मुद्दे आपल्या जीवनात अंतर्भूत करता येतीलच असं नाही; पण किमान पहिले पाच
मुद्दे कम्पलसरी आपल्याला जीवनात आणावे लागतात. एखादं रिलॅक्सेशन तंत्र,
आपल्या विचारप्रक्रियेमध्ये विधायक विचार करण्याचा बदल, आयुष्याबद्दलचा एक
विधायक दृष्टिकोन स्वीकारणं, स्वभावामध्ये अनुकूल बदल करणं आणि शांत, खोल,
समाधानकारक झोप मिळणं हे पाच मुद्दे आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात
आपल्याला अंतर्भूत करताच आले पाहिजेत. त्यानंतर पुढचे जे काही आठ मुद्दे
आहेत, त्यापैकी किमान चार ते पाच मुद्दे आपल्या जीवनामध्ये अंतर्भूत करता
आले म्हणजे, एकूण नऊ ते दहा मुद्दे जर आपल्या जीवनामध्ये असू शकले तर मग
आपल्याला रपुळशीूं आणि ींशपीळेप पासून कायमचं दूर राहून अतिशय
शांत-रिलॅक्स-आनंदी जीवन जगण्याची संधी घेता येते. मला वाटतं, जे काही मी
तुमच्यापुढे मांडलं आहे त्याचा नीट विचार करा. आयुष्यामध्ये अशी मनोवृत्ती
निर्माण करा की, कोणत्याच प्रकारचे रपुळशीूं आणि ींशपीळेप आपल्या मनामध्ये
निर्माण होणार नाहीत. आपलं जीवन पाहिलं तर ते अतिशय सुंदर आहे, सोपं आहे,
सहज आहे, आनंदाने जगण्यासारखं आहे. आनंदाने जगणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार
आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेन की, या मुद्यांचा नीट विचार करून आजपासूनच
आपलं जीवन अतिशय शांत, रिलॅक्स, आनंदी अवस्थेत जगायचं, असं ठरवू या.<br /><br /> (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.)<br /><br />भ्रमणध्वनी-9371014832<br /></span></td></tr>
</tbody></table>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-38946483296195229692012-12-25T07:07:00.001-08:002012-12-25T07:07:31.752-08:00ताणतणावाचं नियोजन तुमच्याच हाती<span class="bodyd" style="color: #2c2c2c; font-family: arial;">तुम्हाला जर ताणतणावरहित
जगायचं असेल तर आयुष्यामध्ये रिलॅक्सेशन तंत्राची जोड देणं अपरिहार्य आहे.
तुम्ही त्याकरिता साधे रिलॅक्सेशन वापरा, संमोहन उपचार वापरा, योगा किंवा
मेडिटेशन वापरा किंवा इतर कोणतेही रिलॅक्सेशनचे तंत्र वापरा; पण त्याची जोड
देणे नितांत गरजेचे आहे. कारण आपल्या शरीरामध्ये ज्या प्रकारची रपुळशीूं
आणि ींशपीळेप निर्माण होतात, अँंड्रीनॅलीन आणि स्टीरॉईड्सचं प्रमाण साचत
जातं त्याचा निचरा करण्यासाठी रिलॅक्सेशन अपरिहार्य आणि आवश्यक आहे.
त्याशिवाय एवढय़ा उत्तम पद्धतीने निचराच होऊ शकत नाही हे कृपया आपण समजून
घ्या. संमोहन उपचाराचा उपयोग तुम्ही व्यक्तिमत्त्व विकासाकरिता करता. इतरही
अनेक गोष्टींचा उपयोग व्यक्तिमत्त्व विकासासारखा तुम्ही करू शकाल; पण
रिलॅक्सेशन, संमोहनाचा उपयोग स्वत:चं शरीर उत्तम पद्धतीने रिलॅक्स
करण्याकरिता जो करू शकतो त्याला मात्र दुसरा पर्याय नाही हे कृपया समजून
घ्या.<br /><br />आपल्या विचारप्रक्रियेमध्ये बदल केला पाहिजे - आपल्याला जर
नकारात्मक विचार करण्याची सवय असेल तर सातत्याने आपण आपल्या मनामध्ये
ताणतणावच निर्माण करत जाणार आहोत. त्यामुळं आपल्याला विधायक विचार करण्याची
सवय निर्माण करणं नितांत गरजेचं आहे. त्याकरिता एक तर संमोहन उपचार
आपल्याला वापरता येतात आणि त्यातून ही सवय निर्माण करता येते, तर दुसर्या
बाजूने सातत्याने आपल्या कॉन्शस माईंडमध्ये स्वत:च स्वत:ला सांगून, 'अरे,
मला नकारात्मक विचार नाही करायचा बरं का! आता मी सतत पॉझिटिव्ह विचार करणार
आहे,' असं दरवेळी स्वत:ला दक्ष राहून सांगत जाण्यातूनसुद्धा आपल्यामध्ये
बदल घडवून आणता येतो. जीवनाकडे पाहण्याचा एक व्यापक, विधायक माणुसकीपूर्ण
दृष्टिकोन स्वीकारणे आपल्याला नितांत गरजेचं आहे. त्यामुळे आपण स्ट्रेस आणि
इतर सगळं टेन्शन्स आपल्या जीवनातून घालवू शकतो.<br /><br />आपल्या
स्वभावामध्ये बदल करणं - जोपर्यंत आपण आपल्या स्वभावामध्ये विधायक बदल करू
शकणार नाही, तोपर्यंत या स्ट्रेसपासून आणि टेन्शनपासून आपण कधीही स्वत:ला
वाचवू शकणार नाही. अर्थात याकरिता पुन्हा संमोहन उपचार आपल्याला ताकदीने
मदत करतात. स्वभावामध्ये बदल करण्यासाठी त्या पद्धतीचे बदल आपल्याला घडवून
आणता येतात.<br /><br />शांत, खोल आणि समाधानकारक झोप मिळाली पाहिजे - झोप हे
टेन्शन-ताणतणाव याचा निचरा करणारं अतिशय उत्तम औषध आहे. जर आपल्याला रोज
शांत, खोल आणि गाढ झोप लागत राहिली तर फारसे ताणतणाव शिल्लकच राहत नाहीत;
पण यात एक अडचण आहे. ज्यावेळेस आपल्या मनावरच्या ताणाचे प्रमाण वाढते,
टेन्शनचे प्रमाण वाढते, रपुळशीूं खूप वाढते त्यावेळेस आपल्याला झोपच येत
नाही. रपुळशीूं आणि ींशपीळेप हे खर्या अर्थाने झोपेचे शत्रू आहेत. म्हणजे
ज्यांच्यामुळे त्याचा निचरा होतो आणि आपण नॉर्मल होतो, पूर्ववत होतो, ती
झोपच जर आपल्याला मिळाली नाही तर आपल्याला खर्या अर्थानं अतिशय कठीण
समस्येला तोंड द्यावं लागतं. याकरिता पुन्हा आपल्याला संमोहन उपचारांची मदत
होते. समजा एखाद दिवशी ताणाचे प्रमाण वाढलेले असल्यामुळे झोप येत नसेल, तर
संमोहन उपचार करा. कॅसेट ऐका.. तुमच्या मनावरचे ताण कमी होतील. तरीही झोप
आली नाही तर पुन्हा दुसर्यांदा ऐका, तिसर्यांदा ऐका! मनावरचे ताण बरेचसे
कमी झाले की तुम्हाला छानपैकी झोप लागेल. त्यामुळे शांत, खोल व समाधानकारक
झोप हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्थात कुणी किती तास झोपायचं हे
व्यक्तिपरत्वे अवलंबून असतं. याबाबत कोणताही असा नियम सांगत नाही की सहा
तास, सात तास झोप पुरेशी होते. काही माणसांना साडेसात-आठ तासांची झोप
आवश्यक वाटते. काही माणसांना पाच तासातसुद्धा झोप पूर्ण होते याचे समाधान
मिळते. त्यामुळे माणसानुसार, त्याच्या व्यक्तिमत्त्वानुसार, त्याच्या
आवश्यकतेनुसार त्याच्या झोपेचे प्रमाण कमी-अधिक असू शकते; पण शांत, खोल आणि
समाधानकारक झोप मिळणं हे मात्र नितांत गरजेचं आहे.<br /><br />व्यायाम -
नियमित आणि आवश्यक तेवढा व्यायाम जर आपण करत गेलो, तर जे अँंड्रीनॅलीन आणि
स्टीरोईड्स अतिरिक्त प्रमाणात आपल्या शरीरात साचतात त्यांचा निचरा
होण्यासाठी मदत मिळते. कारण व्यायाम करताना जी अँक्शन घडते त्यातून घाम
येऊन पुढील क्रियेसाठी स्नायू तयार होतात आणि त्यामुळे शरीरात अतिरिक्त
प्रमाणात साचलेली अँड्रीनॅलीन आणि स्टीरॉईड्स कमी होतात. त्यामुळे त्याचे
दुष्परिणाम आपल्याला कमी प्रमाणात भोगावे लागतात.<br /><br />आहार - आहारसुद्धा आवश्यक आहे. योग्य आणि आवश्यक तेवढा संपूर्ण आहार नितांत गरजेचा आहे.<br /><br />आपल्याला
व्यसनांपासून दूर राहता आलं पाहिजे - दारू, तंबाखू, सिगारेट यासारख्या
व्यसनांपासून आपण दूर राहिलो पाहिजे. मला पुन्हा एकदा प्रकर्षाने तुम्हाला
जाणीव करून द्यावीशी वाटते की दारू, सिगारेट, तंबाखू अशी व्यसनं रपुळशीूं
ीिेपश व्यसनं आहेत. आपल्यापैकी अनेक सिगारेट ओढणार्यांना असं वाटतं की
सिगारेट ओढल्यानंतर रपुळशीूं निघून जाते व आपण रिलॅक्स होतो; पण ही
वस्तुस्थिती नाही. सिगारेटची सवय आपल्या शरीराला लागलेली असते. त्यामुळे
मुद्दाम शरीर कृत्रिम रपुळशीूं निर्माण करतं. जेणेकरून आपण सिगारेट ओढावी
आणि मग सिगारेट ओढल्यानंतर आपलं शरीर थोडंसं रिलॅक्स होतं. पुन्हा रपुळशीूं
लीशरींश होते. पुन्हा ताणतणाव निर्माण होतात. यातून सातत्याने ताणतणाव
निर्माण करून घेण्याची सवय दारू पिणार्या माणसाला, सिगारेट ओढणार्या
माणसाला, तंबाखू खाणार्या माणसाला लागते. तथापि या व्यसनांमुळे आपल्याला
रिलॅक्सेशन मिळते हा केवळ गैरसमज आहे हे कृपया आपण समजून घ्या.<br /><br />जीवनामध्ये
काही अर्थपूर्ण नाती असली पाहिजेत, प्रेम असले पाहिजे - जोपर्यंत आपल्या
जीवनामध्ये प्रेम नाही, प्रेमाला वाव देणारी माणसं नाहीत तोपर्यंत आपल्या
जीवनात जगण्यात अर्थ वाटत नाही आणि मग ही परिस्थिती रपुळशीूं आणि टेन्शन
निर्माण करणारी परिस्थिती ठरते. म्हणून आयुष्यामध्ये चांगले मित्र असणं,
चांगल्या मैत्रिणी असणं, मुलं असणं, जोडीदार असणं, इतर कौटुंबिक नाती असणं
हे नितांत गरजेचं आहे.<br /><br />समाधान देणारा सेक्स - खरं म्हणजे
पती-पत्नीच्या संबंधांमध्ये दोघांनाही पुरेशी तृप्ती मिळाली पाहिजे.
दोघांनाही समाधान देणारा सेक्स असला पाहिजे. मानवी जीवनामध्ये सेक्समधून
जेवढा रपुळशीूं आणि ींशपीळेप चा निचरा होतो तेवढा सुंदर निचरा होण्याचे
दुसरे उदाहरण नाही. माणूस अंतर्बाह्य सुंदर पद्धतीने रिलॅक्स होतो. भारतीय
माणूस सेक्सला फार महत्त्व देत नाही. खरं म्हणजे अनेकदा पती-पत्नीसुद्धा
सेक्स या विषयावर परस्परांसोबत बोलत नाहीत. त्यातल्या त्यात साधारणत: असं
मानलं जातं की, पुरुषाची तृप्ती झाली की संपलं. त्यातून स्त्रियांमधलं
असमाधान मात्र वाढत जातं. हा आपल्या देशामधला सगळय़ात मोठा समस्या असणारा
संदर्भ अनेकांना माहीतसुद्धा नसतो. त्यामुळे दोघांचीही लैंगिक तृप्ती हा
मुद्दा आहे. पती-पत्नीने हा मुद्दा समजून घेतला पाहिजे आणि नियमितपणे
दोघांनाही समाधान देणारा सेक्स उपलब्ध होईल याची काळजी घेतली पाहिजे.
त्यामध्ये जर काही अडचणी येणार असतील तर त्यावर मात केली पाहिजे. संमोहन
उपचार पद्धती अतिशय उत्तम पद्धतीने त्यावर मात करण्यासाठी आपल्याला मदत करू
शकतात.<br /><br />सेक्सच्या आड येणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रपुळशीूं आणि
ींशपीळेप. अपुळशीूं आणि ींशपीळेप हे सेक्सचा शत्रू आहेत. समजा काही
कारणामुळे पतीला किंवा पत्नीला, कोणालाही प्रचंड प्रमाणावर मनावर जर ताण
निर्माण झालेला असेल, कोणत्याही एखाद्या गोष्टीमुळे ती किंवा तो अस्वस्थ
असेल तर दोघांना सेक्समध्ये सहभागी होता येत नाही आणि पतीबाबत ही बाब असेल
तर त्याला परफॉर्मन्स करता येत नाही. त्यामुळे दोघांमध्ये उत्तम सेक्स तर
सोडाच, पण साधं सेक्श्युल लाईफसुद्धा उरू शकत नाही. त्यामुळे स्वाभाविकच
यावर मात करण्यासाठी रिलॅक्सेशनचं तंत्र उपयोगी पडतं. आधी जर आपण संमोहन
किंवा कोणतंही रिलॅक्सेशनचं तंत्र वापरलं तर स्वाभाविकच रपुळशीूं आणि
ींशपीळेप चं प्रमाण कमी होतं आणि ते पुरेसे कमी झाल्यानंतर सेक्सचा
झशीषेीारपलश उत्तमपणे साधता येतो. त्यामुळे संमोहन उपचार पद्धती
सेक्सवरच्या प्रत्येक समस्येला घालवण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी
आपल्याला सुंदररीत्या मदत करू शकते.<br /><br />मनोरंजन - मनाला पुरेसा
विरंगुळा देणारं मनोरंजन आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. आपण नाटक पाहतो.
नाटकामध्ये खर्या अर्थाने शिरतो, समरस होतो, त्याचा आनंद आपण घेतो.
त्यातून आपल्याला मनोरंजन मिळतं. सिनेमामध्ये आपण याच पद्धतीने शिरतो,
खर्या अर्थाने त्याच्याशी तादात्म्य होतो. त्यातून आपल्याला आनंद मिळतो.
डान्स आहे, गाणी आहेत, दूरदर्शन आहे. या सगळय़ाच प्रकारच्या मनोरंजनाला एक
खास महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे. जर आपण यामध्ये मनापासून सहभागी झालो,
तर संपूर्ण मन त्यामध्ये गुंतल्यामुळे स्वाभाविकच सगळय़ा प्रकारच्या
ींशपीळेपी आणि रपुळशींळशी चा निचरा व्हायला मदत मिळते आणि पुन्हा ताजेतवाने
होऊन आपण जीवनाला सुरुवात करू शकतो. यातलं सगळय़ात उत्तम जर कोणतं मनोरंजन
असेल तर ते डान्स आहे. कारण डान्समध्ये तीन गोष्टी एकत्र येतात. यामध्ये
रिदम-ताल, शारीरिक व्यायाम आणि गाणी या तीन गोष्टी एकत्र येतात. <br /><br />महाराष्ट्रीयन
माणसं याबाबतीत मात्र बरीचशी नतद्रष्ट आहेत. महाराष्ट्रीयन माणसं काय
म्हणतात, तू नाच आम्ही पाहतो. ते तमासगिरांना नाचायला लावतात. थोडक्यात
'तुम्ही निरोगी रहा, आम्ही तुम्हाला पाहत पाहत रोगी बनत जातो', या
पद्धतीच्या मनोवृत्तीने जगणारी आपण महाराष्ट्रीयन माणसं आहोत.
नाचणार्यांबाबत आपण बोलतानासुद्धा 'नाच्या', 'तमासगीर' असे शब्द वापरतो.
भारतामधल्याच इतर काही कल्चर आहेत, ज्यांच्या जीवनाचा 'नाच' हा अविभाज्य
भाग आहे. आदिवासी, पंजाबी, गुजराती अशा बहुतांश कल्चरमध्ये 'नाच' हा
त्यांच्या जीवनाचा 'अपरिहार्य आणि अविभाज्य' भाग आहे. एवढेच नव्हे तर साऊथ
इंडियन्समध्येसुद्धा 'नाच' हा त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा,
प्रतिष्ठेचा, सन्मानाचा भाग आहे. महाराष्ट्रीयन माणसं मात्र याबाबत
नतद्रष्ट आहेत.<br /><br />(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन <br /><br />समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)<br /><br />भ्रमणध्वनी-9371014832</span>Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-51758981036037333452012-12-25T07:05:00.002-08:002012-12-25T07:05:20.359-08:00जादूटोणाविरोधी विधेयकातून नवे क्रांतिपर्व सुरू होईल<div class="haedlinesstory">
</div>
<table align="left"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/15122012/15122012-md-ng-4-3726-1-small.jpg" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" /></td></tr>
</tbody></table>
<span class="bodyd" style="color: #2c2c2c; font-family: arial;">नागपूरच्या हिवाळी
अधिवेशनात जादूटोणाविरोधी विधेयक चर्चेला येणार अशा बातम्या
वृत्तपत्रांमधून झळकताहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री
अजितदादा पवार या दोघांचेही या अर्थाची वक्तव्ये प्रसिद्ध झाली आहेत.
सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे जाहीररीत्या आणि खाजगीतही या अधिवेशनात
हे विधेयक चर्चेला घेऊन संमत करणार असं बोलताहेत.<br /><br />पहिल्या आठवडय़ात
विधानमंडळाचे कामकाज सुरळीत चालू शकले नाही. या आठवडय़ात ते सुरळीत चालू
शकले तर कदाचित हे जादूटोणाविरोधी बिल चर्चेला येऊ शकेल. पण नेहमीप्रमाणेच,
''आमच्या धर्मावर गदा येणार, वारीला जाणं, सत्यनारायण करणं, घरीसुद्धा
पूजा करणं गुन्हा ठरणार, हे विधेयक केवळ हिंदूंच्या विरुद्ध आहे,'' असा
आरडाओरडा हितसंबंधी मंडळींनी आणि विशेषत: सनातन संस्थेवाल्या सनातन्यांनी
सुरू केला आहे. जादूटोणाविरोधी विधेयक संमत झालं तर सनातन संस्था, हिंदू
जनजागरण समिती व या सनातनी विचारांचे इतर लोक अडचणीत येतील. त्यांना विखारी
अंधश्रद्धाळू अमानुष सनातनी प्रचार थांबवावा लागेल अथवा जेलची हवा खावी
लागेल हे खरं आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची शिफारस महाराष्ट्र
सरकारने केंद्राकडे केली आहे. त्यामुळे त्यांनी जीव तोडून या बिलाला विरोध
करणं स्वाभाविक आहे. पण इतरांनी का विरोध करावा? काय आहे या बिलात?
त्यावेळचे सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे, मुख्यमंत्री विलासराव
देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने सध्याचे
जादूटोणाविरोधी विधेयकाचे प्रारूप तयार झाले आहे. 16 डिसेंबर 2005 साली ते
विधानसभेत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पारित झाले होते. पुढे ते
विधानपरिषदेत अडकले. विधानसभेत पारित झालेले विधेयक संयुक्त चिकित्सा
समितीकडे पाठविल्यामुळे ते शून्यावर आहे. आता सामाजिक न्यायमंत्री
शिवाजीराव मोघे यांनी पुन्हा ते विधानसभेत मांडले आहे. फक्त विधेयकाच्या
नावात बदल केला. बाकी जसेच्या तसे आहे. सध्याच्या विधेयकातील शब्दन्शब्द
विचारपूर्वक ठरविण्याची संधी माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे
यांच्यासोबत मला मिळाली. ना. हंडोरे त्यांचे खासगी सचिव मिलिंद शंभरकर आणि
मी अशा तिघांनी या विधेयकाचे अंतिम प्रारूप ठरविण्यात प्रचंड मेहनत घेतली.
त्यामुळे या विधेयकात आलेल्या प्रत्येक शब्दामागचा, बदलामागचा इतिहास मला
ठाऊक आहे. तो वाचकांसोबत शेअर करण्याची संधी मी घेतो आहे. अनेकांना वाटते
हे विधेयक फार कमजोर आहे. असं वाटणं चांगली गोष्ट आहे. पण गेल्या 30 वर्षात
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ लढाऊपणे तळागाळातून चालविणार्या माझ्यासारख्या
कार्यकर्त्याला माहीत आहे की, हा कायदा अतिशय ताकदवान आहे. सरकारच्या
कर्तव्याच्या आणि भारतीय राज्यघटनेच्या सध्याच्या मर्यादेत राहून यापेक्षा
प्रभावी विधेयक तयार करणे शक्य नाही. पण हा कायदा महाराष्ट्र सरकारचा आहे.
आम्हा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळवाल्यांचा नाही. तसा तो असता तर
फलज्योतिषापासून पर परासानशास्त्रीय दावे करणार्यांपर्यंत सारे या
विधेयकात ओढले गेले असते, पण ते शक्य नव्हते. कारण अंधश्रद्धा निर्मूलन
करणं हे प्रबोधनाचं काम आहे. हे प्रबोधन आमच्यासारख्या कार्यकत्र्यांनी
प्रसिद्धिमाध्यमांनी व सरकारनेही केलं पाहिजे. पण राज्यसरकारनं जिथे
माणसाची उघड फसवणूक होते, लुबाडणूक होते, जीव धोक्यात येतो तिथेच
कायद्याद्वारा हस्तक्षेप केला पाहिजे याचे नीट भान ठेवून सध्याचे प्रारूप
तयार झाले आहे. सध्याच्या विधेयकाचा मथळा आहे 'महाराष्ट्र नरबळी व अन्य
अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ
उच्चाटन अधिनियम 2011' अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा, नरबळी
याचा अर्थ काय? 2 ख. नुसार याची व्याख्या सोपी करून टाकली. परिशिष्टात
जोडलेली 12 कलमं म्हणजेच अमानवीय, अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा, नरबळी या
बाहेरची एकही गोष्ट या विधेयकात अंतर्भूत नाही, अशी अपवादात्मक व सोपी
सुटसुटीत व्याख्या सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत
यांच्यामुळं करण्यात आली. त्यांनी खूप मेहनतीनं हे विधेयक सोपं, सुटसुटीत
करण्यात मोलाचं मार्गदर्शन केलं. सर्वसाधारण विधेयकात शब्दांची व्याख्या
करावी लागते. त्यात खूप गोष्टी येऊ शकतात आणि म्हणून काही लोक अमानवीय,
अघोरी, अनिष्ट प्रथा यात अनेक प्रथांवर बंदी येईल, अशी भीती व्यक्त करतात,
पण केवळ व्याख्येद्वारा 12 कलमांच्या मर्यादेतच हे विधेयक बंदिस्त केले
आहे. त्यात इतर प्रथा येत नाहीत. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा.<br /><br />परिशिष्टातील
12 कलमासंबंधी कृती घडली की, संबंधितांसाठी शिक्षा मात्र कठोर आहे. सहा
महिने ते सात वर्षे कारावास आणि पाच हजार ते पन्नास हजार रुपये दंड. शिवाय
या अपराधाचा प्रसार-प्रचार करणार्यासही एवढीच कठोर शिक्षा आहे. शिवाय हा
अपराध दखलपात्र व अजामीनपात्र आहे. त्यामुळं पोलिसांना गुन्हा नोंदवावाच
लागेल व जामीन न्यायालयातून घ्यावा लागेल. पण अपराध काय? <br /><br />परिशिष्टातील ही 12 कलमं वाचा<br /><br />1.
भूत उतरविण्याच्या बहाण्याने बांधून ठेवून वा अन्यरीत्या मारहाण करणे,
मिरचीची धुरी देणे, पादत्राणे भिजवलेले पाणी पाजणे, छताला टांगणे,
तापलेल्या वस्तूंचे चटके देणे, जबरदस्तीने मूत्र, विष्ठा पाजणे, केस उपटणे
इत्यादी प्रकारे छळ करणे.<br /><br />(भूत उतरविण्यासाठी मंत्र-प्रार्थना, पूजा करणे गुन्हा नाही)<br /><br />2.
एखाद्या व्यक्तीने (जिवंत) तथाकथित चमत्कार करून आर्थिक प्राप्ती करणे,
फसवणूक, ठकविणे, दहशत बसविणे. 3. जीवाला धोका निर्माण होतो किंवा शरीराला
जीवघेण्या जखमा होतात अशा अनिष्ट व अघोरी प्रथांचा अवलंब करणे, उत्तेजन
देणे, सक्ती करणे, 4. कोणतेही अमानुष कृत्य करणे, नरबळी देणे, सल्ला देणे,
प्रोत्साहन देणे, प्रवृत्त करणे. 5. अतिंद्रिय शक्ती संचारली असे भासवून
भीती निर्माण करणे, न ऐकल्यास वाईट परिणाम होतील, अशी धमकी देणे.<br /><br />(केवळ देव-देवी अंगात येणे गुन्हा नाही)<br /><br />6.
एखादी व्यक्ती करणी करते. काळी विष्ठा करते, भूत लावले, जनावराचे दूध
आटविते, अपशकुनी आहे, रोगराई पसरविणे, सैतान आहे असे जाहीर करणे व त्या
व्यक्तीचे जगणे त्रासदायक करणे. 7. करणी, चेटूक केलं या सबबीखाली मारहाण
करणे, धिंड काढणे, वाळीत टाकणे. 8. भुताची भीती घालणे, शारीरिक इजा
भुतामुळं झाली सांगणे, वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून मंत्रतंत्र अघोरी
उपाय करणे, मृत्यूची भीती घालणे. 9. कुत्रा, साप, विंचू चावल्यास वैद्यकीय
उपचार घेण्यापासून रोखून त्याऐवजी मंत्रतंत्र यांसारखे उपचार करणे.<br /><br />(कुर्त्यावर
अँन्टीरेबीज, अँन्टीव्हेनम (स्नेक) इंजेक्शन्स वेळीच घेतल्यास माणसं वाचू
शकतात. कोकणातल्या विंचूदंशानं माणूस मरू शकतो, पण वैद्यकीय उपचारांनी वाचू
शकतो.). 10. बोटाने शस्त्रक्रिया करतो वा गर्भवती स्त्रीचे गर्भलिंग
बदलवितो असा दावा करणे. 11. अवतार असल्याचे सांगून व पूर्वजन्मी प्रियकर,
प्रेयसी, पती, पत्नी असल्याचे सांगून लैंगिक संबंध ठेवणे. 12.
मंदबुद्धीच्या व्यक्तीमध्ये शक्ती आहे असे भासवून त्या व्यक्तीचा धंदा व
व्यवसाय करणे. आता या 12 कलमांत विरोध करण्यासारखे काय आहे? कुणीतरी
सुबुद्ध माणूस याला विरोध करणे शक्य आहे का? ही 12 कलमं म्हणजेच कायदा आहे.
मग हे सत्यनारायण, वारी, पूजेला कायदा विरोध करतो हे कुठून आलं? त्याला
आधार काय? <br /><br />भारतीय जनता पक्षाचा या बिलाला संपूर्ण पाठिंबा होता.
आजही असलाच पाहिजे. त्यांना विरोध करण्याचा नैतिक अधिकारच नाही. त्या वेळचे
भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष नितीन गडकरी माझे जुने मित्र.
विद्यार्थिदशेपासूनचे स्नेही. मी दै. 'तरुण भारत' (नागपूर) चा युवास्तंभ
चालवीत असे. त्या वेळी ते विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते. तेव्हापासूनची
मैत्री. त्यांनी माझं काम एकदम सोपं करू टाकलं. जादूटोणाविरोधी बिलासंबंधी
सारे निर्णय घेण्यासाठी <br /><br />भाजपतर्फे अशोक मोडक या आमदाराला प्रतिनिधी
नेमून टाकलं. विधिमंडळाच्या भाजप कार्यालयात गोपीनाथ मुंडे, विरोधी
पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांच्यासमोर नितीन गडकरींनी माझ्यासमक्ष विषय
काढला आणि चारही प्रमुख नेत्यांनी अशोक मोडक म्हणतील तर भाजपचं अंतिम मत
असेल असं एक मतानं सांगितलं.<br /><br />अशोक मोडक अतिशय आग्रही; पण खूप
प्रगल्भ विचारांचे असल्यामुळे आमचं काम फारच सोपं झालं. एका महत्त्वाच्या
बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर.
पाटील, सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत अशोक मोडक
यांनी या बिलावर अंतिम शिक्कामोर्तब केलं. त्यांनी सुचवलेले सारे बदल मान्य
केले. मोडकांच्या आग्रहाखातर बिलात सार्वजनिक चळवळी म्हटल्याचं स्थान
देणारी एक तरतूद होती. तीही आम्ही काढून टाकली. त्यामुळे या बिलाला विरोध
करण्याचा कोणताही नैतिक अधिकार भाजपला नाही. माझे स्नेही नितीन गडकरी नेहमी
म्हणतात,''मी दिलेला शब्द कधीही मोडत नाही.'' आता तर ते राष्ट्रीय अध्यक्ष
आहेत. त्यामुळं त्यांचा शब्द त्यांच्या पक्षाचा अधिकृत शब्द खरा
करण्यासाठी जबाबदारी ते पार पाडतील याची मला खात्री आहे. 2003 सालच्या
हिवाळी अधिवेशनाआधी झालेल्या याच महत्त्वाच्या बैठकीच्या वेळी भाजपचे आ.
मंगलप्रसाद लोढा यांच्या नेतृत्वाखाली जैन धर्मीयांचे एक शिष्टमंडळ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटायला आलं. खरं म्हणजे ते हे बिल मंजूर
करू नका, असं सांगण्यासाठी आले होते. मुख्यमंर्त्यांनी त्यांच्याशी मला
चर्चा करायला सांगितले. सारं बिल शिष्टमंडळानं समजावून घेतल्यावर आ.
मंगलप्रसाद लोढा म्हणाले,''मानव, हे तर फारच चांगलं बिलं झालं आहे. यात
विरोध करण्यासारखं काहीच नाही. उगाच गैरसमज पसरविला जातो आहे. आम्हा
धार्मिक माणसांचा गैरसमज दूर करण्यासाठी या बिलात काही तसे टाका.''
चांगल्या धार्मिक रूढी, परंपरांना हे बिल लागू पडत नाही असं काहीतरी मी
त्यांना मुख्यमंर्त्यांना सांगायला सांगितलं. ''आपल्याला असं काही टाकता
आलं तर टाका,'' असं मुख्यमंत्री म्हणाले, म्हणून आम्ही (मी, तत्कालीन
सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे, पी. एस. मिलिंद शंभरकर) त्या
पद्धतीनं एक वाक्य तयार केलं. कायदा खात्याच्या माणसांना ते दिलं. या बिलात
व्यक्तीचं शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान न करणार्या कोणत्याही चांगल्या
रूढी, परंपरेचा समावेश नाही अशी तळटीप टाकायचं आम्ही ठरवलं होतं. कायदा
खात्यानं त्याचं तेरावं कलम करून टाकलं. त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्याचं
शब्दांकन तयार केलं. ते समजायला कठीण आहे हे माझ्या लक्षात आलं होतं; पण
वेळ नव्हता. नागपूर अधिवेशनात बिल मांडायचं असल्यामुळं आणि बिलाचं अंतिम
रूप तयार करण्याची जबाबदारी व अधिकार कायदा खात्याचाच असल्यामुळे आम्ही
गप्प बसलो.<br /><br />काय आहे ते कलम?<br /><br />शंका दूर करण्यासाठी याद्वारे
असे घोषित करण्यात येते की, ज्यामुळे व्यक्तीला मानसिक, शारीरिक वा आर्थिक
बाधा पोहोचत नाही असे कोणतेही धार्मिक विधी व धार्मिक कृत्ये अंतर्भूत
असलेल्या कृतींनी या अधिनियमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही. याचा खरा
अर्थ असा होतो की, परिशिष्टातील 12 कलमांत एखादी रूढी, विधी, कृत्य येत
असेल, कारण या 12 व्या <br /><br />कलमाव्यतिरिक्त इतर कशालाच हे बिल लागू होत
नाही, असं व्याख्येत 1 (ख), स्पष्टच केलं आहे) आणि त्याद्वारे व्यक्तीला
मानसिक, शारीरिक, आर्थिक बाधा पोहोचत नसेल तर त्यालाही हे बिल लागू होणार
नाही. ती गोष्ट शिक्षापात्र ठरणारं नाही. चांगल्या रूढी, परंपरांना हे बिल
लागू होत नाही हे सांगण्यासाठी हे तेरावं कलम समाविष्ट केलं अहे. त्याचा
अर्थ हाच होता. फार गदारोळ व्हायला लागल्यानंतर मी पुन्हा सुप्रीम कोर्टात
माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्याकडे गेले. कायदा खात्याच्या
शब्दरचनेनुसार टाकलेलं हे तेरावं कलम त्यांनी बारकाईनं पाहिलं आणि निर्वाळा
दिला. भाषा उगीच क्लिष्ट केली आहे. न्यायमूर्तीनी अगदी सुरुवातीलाच मला
समजावून सांगितलं होतं. बिलाची भाषा सोपी हवी. कुणालाही कळली पाहिजे. बिल
मराठीतच तयार करायचं. मग त्याचं इंग्रजीत भाषांतर करायचं. नाहीतर इंग्रजीत
बिल बनवितात. अशा क्लिष्ट मराठीत त्याचं भाषांतर करतात हे योग्य नाही.
त्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानला तयार केलेले कायदे वाचा.
एवढय़ावर ते त्या वेळी थांबले नाहीत. तर अनेक तास माझ्यासोबत असून त्यांनी
या बिलातील महत्त्वाची कलमं सोप्या मराठी भाषेत तयार करून दिली होती.
त्यामुळं या वेळी क्लिष्ट भाषेविषयी (13 व्या कलमाच्या) त्यांनी नापसंती
व्यक्त केली.<br /><br />पण पुढे म्हणाले, पण अर्थ बरोबर आहे. व्यक्तीचं
मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान न करणार्या रूढी, परंपरांना (विधी,
कृत्ये) यातून सूट दिली आहे. त्या शिक्षापात्र ठरणार नाही, असाच याचा अर्थ
निघतो. व्यक्तीचं मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान करणार्या धार्मिक विधी,
कृत्यांना हे बिल लागू होतं असा अर्थ निघूच शकत नाही. कुणालाही तो काढता
येणार नाही. कायद्याचा उलटा अर्थ काढता येत नसतो. सुप्रीम कोर्टाचे
न्यायमूर्ती पी. बी. सावंतांनी हा निर्वाळा दिल्यावर मी रिलॅक्स झालो. ना.
चंद्रकांत हंडोरेही रिलॅक्स झाले. तरी पण मग उद्या आम्ही आमच्या घरी
सत्यनारायणाची पूजा केली तर तुम्ही म्हणाल व्यक्तीचं आर्थिक नुकसान झालं.
आम्हाला 6 महिने जेलमध्ये पाठवलं. पंढरपूरच्या वारीला पायी गेलो तर म्हणाल.
शारीरिक नुकसान झालं. आम्हाला 6 महिने जेलमध्ये पाठवलं. आम्ही घरी देवाची 2
तास पूजा करीत असलो तर म्हणाल, तुमचं मानसिक नुकसान झालं. 6 महिने
जेलमध्ये पाठवाल, असे आ. दिवाकर रावते विधानपरिषदेत बोलले. वृत्तपत्रांत
मोठमोठे मथळे, बातम्या, छापून आल्यात आणि महाराष्ट्रभर गैरसमज पसरला. असं
बिलात कुठेही नसताना आ. दिवाकर रावते मुद्दाम बोलले. पुढे त्यावर चर्चाच न
झाल्यामुळं हे मत कुणीही विधानपरिषदेच्या फ्लोअरवर खोडून काढलं नाही.
सनातन्यांच्या हाती कोलीत मिळालं. ते ह्या बातम्या, मथळे दाखवून दाखवून
मुद्दाम गैरसमज पसरवताहेत.<br /><br />खरं म्हणजे शिवसेनेचे कार्याध्यक्ष
उद्धवजी ठाकरेंना बिलासंदर्भात मातोश्रीवर भेटलो होतो, 'अंधविश्वास शब्द
काढून टाका, अघोरी प्रथा म्हणा,' अशी त्यांनी केलेली सूचना मान्य झाली.
त्या वेळच्या मुख्यमंर्त्यांनी बिलाचा मथळाच बदलून टाकला. बिल छपाईला
जाण्याआधी आ. सुभाष देसाईंनी अनेक शाब्दिक बदल सुचविले. ते बिलात केले
गेले. शिवसेनेचा 100 टक्के सहभाग मिळण्याआधीच हे बिल विधानसभेत मांडून संमत
झाले होते. हे खरे असले तरी सगळ्याच पक्षांशी चर्चा करून जास्तीतजास्त
सहमतीनं प्रारूप ठरविण्याचा विचार अमलात आणला होता हेही खरं आहे. सामाजिक
न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्याशी मंत्रालयात झालेल्या चर्चेत त्यांनी
या नव्या बिलातील काही बदल करण्याचे मान्य केले. त्यामुळं मुद्दाम विरोध
करणार्यांना निष्प्रभ करता येईल हे त्यांनाही पटले. एकतर हे तेरावं कलम
मुळातूनच विधेयकातून वगळावं. त्यामुळे विधेयक, कुठेही कमकुवत होत नाही.
दुसरं पाचवं कलम ट्रस्ट कंपनीसंबंधी आहे. तेही काढून टाकावं. हिंदूंचे
ट्रस्ट ताब्यात घेण्याचे षड्यंत्र अशी ओरड करणार्या सनातन्यांची हवाच
निघून जाईल. तिसरं पुन्हा अंधविश्वास हा शब्द नव्या बिलात टाकला आहे. मागील
सरकारनं कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरेंची सूचना सन्मानपूर्वक मानली होती.
त्याचा आदर राखावा. बिल चर्चेला येतानाचे हे बदल करण्याची तयारी सरकारनं
दाखवली तर विरोध करण्यासारखं काहीही उरणार नाही. उत्तम वातावरणात चर्चा होऊ
शकेल. हे जादूटोणाविरोधी बिल संमत झालं तर संपूर्ण देशाला हे कळत नकळत
लागू होईल. किमान प्रसिद्धिमाध्यमांसाठी तरी ते देशभर लागू होईल. कारण
परिशिष्टातील 12 कलमांचा प्रचार-प्रसार करणं हाही कायद्यानं गुन्हा ठरणार
आहे. मुंबईत प्रसारित झाल्याशिवाय भारतातील कोणताच टीव्ही चालू शकत नाही.
पर्यायानं देशभरातील सार्याच टीव्ही व इतर प्रसिद्धिमाध्यमांना या बिलाचा
अभ्यास करूनच आपल्या कार्यक्रमांना, जाहिरातींना, बातम्यांना प्रसारित
करावं लागेल. शिवाय महाराष्ट्रातील हजारो, लाखो माणसांचे जीव वाचतील. लाखो
लोकांची लुबाडणूक थांबेल. एक नवे क्रांतिपर्व सुरू होईल.<br /><br />(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन <br /><br />समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)<br /><br />भ्रमणध्वनी-9371014832</span>Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-51823012483938613042012-12-14T05:45:00.003-08:002012-12-14T05:45:51.062-08:00ज्योतिषी ठगांना आव्हान देण्याची वेळ आली आहे<br /><table style="background-color: white; font-family: arial; width: 100%px;"><tbody>
<tr><td><table align="left"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/09122012/09122012-md-ng-4-3227-2-small.jpg" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" style="cursor: pointer; font-size: 11px;" /></td></tr>
</tbody></table>
<span class="bodyd" style="color: #2c2c2c; font-family: arial; font-size: 14px; line-height: 24px;">हिंदुत्ववादी समजल्या जाणार्या स्वामी विवेकानंदांची एक कथा सांगून लेखाचा शेवट करतो. दुसर्या धर्मीयांचा द्वेष न करता त्यांच्याबद्दल पुरेपूर बंधुभाव बाळगून टिळा, जानवं, पूजाअर्चा, कर्मकांड, वर्णश्रेष्ठत्व, अंधश्रद्धा नाकारूनही माणूस हिंदू असू शकतो. नव्हे तोच खरा हिंदू असतो. असं प्रभावीपणे मांडणार्या स्वामी विवेकानंदांच्या शब्दाइतका प्रभावी, समर्पक शेवट दुसरा असू शकतो का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्वाचा कैफ लादून ज्योतिष पसरवणार्या षडयंत्राला दुसरं प्रभावी उत्तर असू शकतं का? नियती, नशीब या संकल्पनांवर विश्वास ठेवल्यामुळे या देशातील जनता दुर्बळ होते. त्यामुळेच हा देश रसातळास पोहोचला आहे. हे नेमकेपणानं ओळखून माणसाचं कर्तृत्व जागवण्यासाठी स्वामी विवेकानंद एका ज्योतिष्याची कथा आवर्जून सांगत असत. एक चक्रवर्ती राजा होता. त्याच्या पदरी एक फार मोठा विद्वान ज्योतिषी होता. नव्यानचं रुजू झाला होता. कुंडली मांडून अतिशय अचूक असं भूतभविष्य-वर्तमान सांगतो अशी त्या ज्योतिष्याची ख्याती होती. त्यानं वर्तवलेलं भविष्य म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असते असं समजलं जायचं. राजाच्या पदरी असणारा प्रधान परदेश प्रवासाला गेला होता. एक दिवस राजाला स्वत:चं भविष्य विचारण्याची हुक्की आली. त्यानं ज्योतिष्याला स्वत:चं भविष्य विचारलं.<br /><br />राजे महोदय, सहा महिन्यांत मृत्युयोग<br /><br />ज्योतिष्यानं राजाच्या कुंडलीचा नीट अभ्यास केला. त्याचा चेहरा पडला. तो बोलेनाच. राजानं फारच आग्रह केल्यावर तो भविष्य सांगायला तयार झाला. तो म्हणाला, ''राजे महोदय, मला सांगायला फार वाईट वाटतं, दु:खही होतं; पण सत्य सांगणं माझं कर्तव्य आहे म्हणून सांगतो. आपल्याजवळ फार कमी वेळ आहे. केवळ सहा महिन्यांचा अवधी आहे. आतापासून सहाव्या महिन्याच्या शेवटी, सातवा महिना सुरू होण्याच्या आधी आपल्याला हे जग सोडून जावं लागेल. मृत्युयोग आहे. कोणत्याही परिस्थितीत न टळणारा मृत्युयोग.'' राजाला प्रचंड हादरा बसला. आपण मरणार या कल्पनेनंच राजा झुरू लागला. हळूहळू त्याचं राज्यकारभारावरून लक्ष उडालं. तो आपल्या शयनगृहातच राहू लागला. दरबारात येईनासा झाला. ही बातमी बाहेर फुटली. राजा दुबळा होतोय हे लक्षात येताच मांडलिक राजांनी गुप्त तयारी सुरू केली. सैन्याची जमवाजमव सुरू केली. हेरखात्याकडून ही बातमी परदेशात असलेल्या प्रधानाला समजली. 'राज्य' धोक्यात आहे हे लक्षात येताच प्रधान आपली यात्रा अर्धवट टाकून राज्यात परत आला. तोवर दोन महिन्यांचा कालावधी उलटला होता. ज्योतिष्याच्या भविष्यकथनामुळं राजाचं मन राज्यकारभारातून उडालं, हे प्रधानाला हेरखात्याकडून कळलं होतंच. तातडीनं प्रधानानं राजाची भेट घेतली. भविष्यकथनात काही अर्थ नसतो. कदाचित एखाद्या शत्रूचं हे षडयंत्र असावं, असंही प्रधानानं सांगून पाहिलं. पण काही उपयोग झाला नाही. राजाचा या नव्या ज्योतिष्याच्या भविष्यकथनावर अढळ विश्वास बसला आहे, आपण कितीही समजावून सांगितलं तरी राजा ऐकणार नाही, हे प्रधानाच्या लक्षात आलं. प्रधानानं खूप विचार केला, निर्णय घेतला आणि निश्चयानं कामाला लागला.<br /><br />राजदरबार भरला<br /><br />दुसर्या दिवशी दुपारी 12 वाजता राजदरबार भरणार असा तातडीचा आदेश प्रधानानं काढला. सगळ्यांना सूचना गेल्या. महत्त्वाच्या मंर्त्यांना संदेश गेले. सैन्याला आणि हेरखात्याला जय्यत तयार राहण्याचे आदेश सुटले. 'राजाही दरबारात हजर राहणार आहे' असे निरोप गेले. खूप दिवसांनंतर राजदरबार भरला. राजदरबारात सगळे मंत्री, सेनापती, मानकरी तर हजर होतेच; पण राज्यातील<br /><br />महत्त्वाचे व मान्यवर नागरिकही मोठय़ा संख्येनं प्रधानानं हजर ठेवले होते. बरोबर 12 वाजता खचाखच भरलेल्या दरबारात राजेमहोदयांना प्रधान जातीनं घेऊन आले. सारे आपापल्या स्थानावर विराजमान झाले. प्रधानानं बोलायला सुरुवात केली. ज्योतिष्याला त्याच्या भविष्य कथनाच्या सामर्थ्याविषयी प्रश्न केला. ''ज्योतिष हे गणित आहे. माझं गणित अचूक असतं, माझं भविष्यकथन काळ्या दगडावरची रेघ असते.'' वगैरे ज्योतिष्यानं सांगितलं. ''आपण राजाचं भविष्य सांगितलं. मी पुन्हा तुम्हाला एक संधी देतो. पुन्हा राजाच्या कुंडलीचा अभ्यास करा. पुन्हा राजाचे भविष्य सांगा.'' प्रधानानं आज्ञा सोडली. ''माझं भविष्य-गणित कधीच चुकत नाही. खरं म्हणजे मी कधीच पुन्हा दुसर्यांदा गणित करत नाही. तरी तुमचा आग्रह आहे म्हणून अभ्यास करतो. राजाचं भविष्यकथन असल्यामुळंच मी माझा नियम मोडायला तयार आहे.'' असं म्हणून ज्योतिष्यानं पुन्हा राजाच्या कुंडलीचा अभ्यास सुरू केला. बराच वेळ आकडेमोड केली आणि शेवटी निर्धारपूर्वक सांगितलं. ''माझं भविष्यकथन अगदी अचूक होतं. राजाचा मृत्युयोग निश्चित आहे. आता केवळ चारच महिने उरलेत. त्यात कालत्रयीही बदल होणं शक्य नाही.'' हे भविष्यकथन ऐकताच संपूर्ण दरबार शहारला. आतापर्यंत केवळ कुजबुज ऐकू येत होती. पण आता खरंच राजा 4 महिन्यांत मरणार म्हटल्यावर सार्या दरबारावर शोककळा पसरली. राण्या रडायला लागल्या. पण प्रधानानं मुळीच विचलीत न होता ज्योतिष्याला विचारलं - ''ज्योतिषी महोदय, तुमची कुंडली तुम्हाला माहीत आहे का?''<br /><br />मी अजून 55 वर्षे जगणार आहे<br /><br />ज्योतिषी हसून म्हणाला, ''अहो, हे काय प्रधान महोदय, माझी कुंडली मला ठाऊक नसेल? अगदी मुखोद्गत आहे मला ती.'' ''तुमचं आयुष्य किती आहे?'' प्रधान. ज्योतिषी, ''अहो, आता तर मी कुठे पस्तीस वर्षांचा आहे. अगदी वयाच्या नव्वद वर्षांपर्यंत माझं आयुष्य आहे. अजून पंचावन्न वर्षे मी जगणार आहे.'' प्रधान , ''उत्तम गोष्ट आहे. तुम्ही पंचावन्न वर्षे अजून जगणार; दीर्घायू आहात. तरी माझ्याखातर पुन्हा तुम्ही तुमच्या कुंडलीचा अभ्यास करा; तुमचं आयुष्य किती ते मला सांगा.'' ज्योतिषी हसून आकडेमोड करायला लागला.. म्हणाला, ''प्रधानजी, तुमच्या सांगण्यावरून मी माझ्या कुंडलीचा पुन्हा एकदा अभ्यास केला. आकडेमोड केली. माझं भविष्य बरोबर आहे. मी दीर्घकाळ जगणार. वयाच्या नव्वदीपर्यंत जगणार..''<br /><br />हे ऐकताच.. डोळ्यांचं पातं लवतं न लवतं तोच प्रधानजी ज्योतिष्याजवळ झेपावले. क्षणात आपली तलवार म्यानातून काढली. कचकन ज्योतिष्याचं मुंडकं उडवलं. धडापासून वेगळं झालेलं रक्ताळलेलं ज्योतिष्याचं मुंडकं राजाच्या पायाजवळ पडलं.<br /><br />संपूर्ण दरबार शहारून गेला. स्मशानशांतता पसरली. प्रधान धीरगंभीर आवाजात सांगू लागला, ''राजे महोदय, मला माफ करा! आयुष्यात पहिल्यांदा तुमच्या परवानगीशिवाय मी एक निर्णय घेतला! पण माझा उद्देश तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही मला माफ कराल. एवढच नव्हे, तर तुम्ही, हा सारा देश, सारे प्रजाजन माझा निर्णय योग्य होता असंच म्हणतील याची मला खात्री आहे. राजे महोदय, या ज्योतिष्यानं आपण सहा महिन्यांत मरणार असं भविष्य कथन केलं. ते आपण खरंच धरून चाललात. कारण आपला ज्योतिषावर, भविष्यकथनावर प्रचंड विश्वास आहे. नाइलाजानं मी कठोर निर्णय घेतला. असल्या दैववादी बनवणार्या, नियतीवादी बनवणार्या ज्योतिषावर लोकांचा विश्वास वाढवणार्या ज्योतिष्याचं पितळ उघडं पाडण्याचा मी निश्चय केला. पण राजे महोदय, काल रात्री घेतलेला निर्णय, त्याचा मृत्यू त्याला कळू शकला नाही. त्याचे बदललेले ग्रह त्याला दिसले नाहीत. काही मिनिटांत येणारा मृत्यू ज्या ज्योतिष्याला दिसू शकला नाही, स्वत:चा मृत्युयोग ज्याला कळू शकला नाही, तो ज्योतिषी तुमचा मृत्युयोग कसा काय सांगू शकतो, महाराज? मला सांगा, कसा काय सांगू शकतो?'' प्रधान या ठिकाणी थांबला.. दरबारात स्मशानशांतता पसरली. थोडय़ा वेळानं हळूच राजानं दोन्ही हात उचलले. टाळी वाजवायला सुरुवात केली. सार्या दरबारानं टाळ्या वाजवून-वाजवून, टाळ्यांच्या गजरानं सभागृह दणाणून सोडलं. स्वामी विवेकानंद ही गोष्ट आवर्जून का सांगायचे, ते आपण समजून घेऊ, नीट मनात ठसवू. यानंतर कोणत्याच प्रकारचं भविष्य पुढील आयुष्यात पाहणार नाही, भविष्यावर विश्वास ठेवणार नाही असं ठरवू आणि नियतीवादी बनवणारं, पराक्रमशून्य बनवणारं हे ज्योतिषी षडयंत्र उलथवून टाकू !<br /><br />आजवर कोणीही ''ज्योतिष हे शास्त्र आहे'' हे सिद्ध करू शकला नाही!<br /><br />1985 सालापासून ज्योतिष्यांना आम्ही सतत आव्हान देत आलो आहे. आम्ही वीस पत्रिका देतो, ज्योतिष्यांनीच तयार केलेल्या पत्रिका देतो, त्यातील कोण जिवंत आहे व कोण मेलं आहे एवढंच 95 टक्के अचूक सांगा आणि 15 लाखांचं (2009 सालात ते 15 लाखांचं झालेलं आहे.) पारितोषिक घेऊन जा. काही ज्योतिषी पुढे म्हणू लागले. आमच्या शास्त्रानुसार मृत्यू सांगायचा नसतो. पुन्हा ही एक पळवाट, बनवेगिरी. ठीक आहे. त्याचाही फायदा आम्ही त्यांना घेऊ दिला. तुम्हाला ज्या विषयाचं भविष्य सांगता येतं असे किमान 5 मुद्दे ठरवा. आम्ही दिलेल्या वीस कुंडल्यांच्या आधारावर या 5 मुद्यांबाबतचं (कदाचित शिक्षण, नोकरी/ व्यवसाय, लग्न, मुलं, अपघात) भविष्य किमान 90 टक्के जरी अचूक सांगितलं तरी हे पारितोषिक मिळेल; पण हे पारितोषिक मात्र आजवर कुणीही जिंकू शकलेलं नाही किंवा त्याच्या जवळपाससुद्धा कुणी येऊ शकलेलं नाही.<br /><br />काहींनी आव्हान स्वीकारण्याचा दावा केला. तसं वृत्तपत्रांमधून जाहीरही केलं; पण प्रत्यक्षात मात्र, वेळ आल्यावर नेहमीच आव्हानातून पळ काढला.<br /><br />फक्त अशोक तोमर नावाच्या मुंबईत अँस्ट्रॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट चालवणार्या ज्योतिष्यानं नाशिकात हे आव्हान पार पाडलं. 1985 साली सार्या पत्रकारांसमोर पार पडलेल्या या आव्हानात 10 कुंडल्यांच्या आधारे भाकितं केली. केवळ 32 टक्के अचूक ठरलीत, त्याचा दारुण पराभव झाला.<br /><br />दिल्ली स्टार न्यूजच्या चंद्रगहणाच्या एका लाईव्ह कार्यक्रमात मीरा महाजन नावाच्या एका टीव्ही स्टार ज्योतिषीने जाहीर आव्हान स्वीकारण्याचे लाईव्ह मान्य केले. पण पुढे तिने चक्क पळ काढला. पुढे चार दिवस मी दिल्लीत थांबलो, पण ती चॅनेलवाल्यांनाही सापडली नाही.<br /><br />फलज्योतिषावर आक्षेप : 186 वैज्ञानिकांचे पत्रक<br /><br />फलज्योतिष हे विज्ञान नव्हे, असे जगभरातील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. फलज्योतिषाला विरोध करणारे परिपत्रकच शास्त्रज्ञांनी तयार केले आहे आणि त्यावर विविध देशांतील महत्त्वाच्या 186 शास्त्रज्ञांनी सह्या केल्या आहेत. सह्या करणार्यांमध्ये 19 नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत. त्यात भारतातील सी.चंद्रशेखर या एकुलत्या एक शास्त्रज्ञाची सही आहे.<br /><br />या परिपत्रकाचा मूळ मसुदा असा आहे :<br /><br />जगभरातील विविध क्षेत्रांत फलज्योतिष अधिकाधिक स्वीकारले जात आहे. हे पाहून विविध क्षेत्रांतील आम्हा वैज्ञानिकांना काळजी वाटते. आम्ही खाली स्वाक्षरी करणारे-खगोलशास्त्रज्ञ, अँस्ट्रोफिजिसिस्ट आणि इतर क्षेत्रातील वैज्ञानिक (ज्योतिष्यांकडून वैयक्तिक आणि सार्वजनिकरीत्या सांगितली जाणारी भाकिते व सल्ले, जे चिकित्साही न करता स्वीकारले जातात त्या विरोधात) लोकांना सावध करू इच्छितो. ज्यांना ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवावासा वाटतो त्यांनी जाणून असावं, की ज्योतिषशास्त्रातील गृहीतांना कोणताही पाया नाही, आधार नाही.<br /><br />लोक फलज्योतिषावर विश्वास का ठेवतात? आजच्या अनिश्चिततेच्या काळात योग्य निर्णय घेण्याचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी, समाधानकारक सल्ला मिळवण्यासाठी ते आसुसलेले असतात. त्यामुळे त्यांच्या आवाक्यापलीकडे असणारे आकाशस्थ ग्रहगोल त्यांचे नशीब (नियती) आधीच ठरवतात, यावर विश्वास ठेवणं त्यांना आवडत असेल. तरीपण आपण सगळ्यांनी वस्तुस्थितीला सामोरं गेलं पाहिजे आणि भविष्य हे आपल्यावर अवलंबून असतं, ग्रह-तार्यांवर नव्हे, हे समजून घेतलं पाहिजे.<br /><br />आजच्या आधुनिक काळात, आधुनिक शिक्षणाच्या आणि आधुनिक दृष्टीच्या प्रकाशात आपण हे समजून घेतलं पाहिजे की, अंधश्रद्धा आणि जादुई चमत्कारांवर विश्वास ठेवणं, विसंबून राहणं म्हणजे स्वत:चीच फसवणूक करून घेणं होईल. तरीही आजच्या आधुनिक समाजामध्ये फलज्योतिषावरील विश्वास वाढतो आहे. आज केल्या जाणार्या भविष्यकथनांवर, त्यांची कसलीही तपासणी न करता प्रसिद्धिमाध्यमं (अगदी प्रतिष्ठित दैनिकं, मासिकं, पुस्तक प्रकाशकसुद्धा) प्रसिद्धी देतात. यामुळं आम्ही वैज्ञानिक अस्वस्थ झालो आहोत.<br /><br />या परिस्थितीची परिणती अतार्किकता आणि भोंगळवाद वाढवण्यातच होईल. आम्हाला असं वाटतं, की या ज्योतिषी ठगांच्या दिखाऊ दाव्यांना सरळ आणि पूर्ण शक्तिनिशी आव्हान देण्याची वेळ आता आली आहे.<br /><br />(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)<br /><br />भ्रमणध्वनी-9371014832</span></td></tr>
</tbody></table>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-26560651382868383962012-12-14T05:38:00.001-08:002012-12-14T05:38:08.571-08:00दैनिक पुण्यनगरी - दिवाळी अंक २०१२- विशेष लेख - 'इंडिया आणि 'भारत' यातील अंतर कमी करण्याची गरज<br />
<div style="margin-left: 0pt; margin-right: 0pt; text-indent: 0pt;">
<br /></div>
<div style="margin-left: 0pt; margin-right: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">समाजाच्या सर्वच क्षेत्रांत भारत देश प्रगती करतो आहे. भारत महासत्ता बनण्याच्या दिशेनं वाटचाल करतो आहे असं मानणारा एक मोठा इंडियन वर्ग या देशात आहे. इंडिया शायनिंग अशी आरोळी या देशात ठोकली गेली. खरंच इंडिया शायनिंग होताना दिसतो आहे?</span></div>
<div style="margin-left: 0pt; margin-right: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">तर समाजाच्या सर्वच क्षेत्रांत मूल्य </span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">हास होताना दिसतो आहे. सर्वच क्षेत्रांतला दर्जा खालावताना दिसतो आहे. समाज मूल्यात्मकरीत्या नीचांकी पातळी गाठतो आहे. सगळ्याच क्षेत्रांत भ्रष्टाचार माजतो आहे असे मानणारा, त्यामुळे कासावीस होणारा एक संवेदनशील वर्गही या देशात आहे.</span></div>
<div style="margin-left: 0pt; margin-right: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">खरं काय आहे?</span></div>
<div style="margin-left: 0pt; margin-right: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">भारतासारख्या देशात या सत्याचा शोध घेणं वाटतं तितकं सोपं नाही. आपण कोणत्या दृष्टिकोनातून भारताकडे पाहतो त्यावर त्याचं उत्तर अवलंबून आहे.</span></div>
<div style="margin-left: 0pt; margin-right: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">सुरुवात आजच्या सद्य:स्थितीपासून आपण करू या! आज शहरी भागात चकचकीत मॉल संस्कृती दिसते आहे. भरपूर पैसे असणारा, पैसे उधळणारा, चकचकीत दिखाऊ राहमीमान जगणारा, पण 'आंग्लाळलेला' एक मोठा वर्ग 'शायनिंग इंडिया'चं आभासी सत्य प्रदर्शित करतो आहे. उच्च राहणीमान आणि आंग्लाळलेपण हे सिनॉनिमस-स्थितिदर्शक शब्द बनले आहेत. ग्लोबलायजेशनचा, जागतिकीकरणाचा सगळ्यात मोठा फायदा मिळवणारा हा इंडिया आहे.</span></div>
<div style="margin-left: 0pt; margin-right: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">याच चंगळवादी वर्गाचं, इंडियाचं चित्रण टीव्ही आणि इतर प्रसिद्धिमाध्यमांमधून सारखं ग्रामीण भागातील सामान्य आणि शहरी भागातील निम्न मध्यमवर्गीय व झोपडपट्टीतील गरीब माणसांपर्यंत, भारतापर्यंत पोहोचतं आहे. हा ६०-६५ टक्के असणारा भारत रोज शहरात भटकताना गावात टीव्हीवरून शाय</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">q</span><span style="font-size: 10pt;">नग इंडिया पाहतो आहे. काही प्रश्नांची उत्तरं देऊन माणसांना करोडपती बनताना पाहतो आहे. वेगवेगळ्या रिअॅलिटी शोमधून पाहता पाहता काही माणसांना, मुलांना स्टार बनताना पाहतो आहे. कोट्यवधी रुपये कमावणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">यांच्या यशोगाथा ऐकतो, पाहतो आहे आणि कोट्यवधी रुपये अनैतिक मार्गाने इकडचे तिकडे होताना पाहतो आहे. रोज नवीनवी रंगीत स्वप्ने पाहतो आहे. येनकेन प्रकारे धनप्राप्ती करणे म्हणजेच यश प्राप्त करणं होय हे सप्रमाण शिकतो आहे. त्यामुळं चकचकीत रंगीन टीव्हीवरील स्वप्नरंजनामुळं त्याला स्वत:च्या समस्यांकडे दुर्लक्ष करणं जमतं आहे. पण महागाईमुळं जगणं असह्य झालंय. दोन वेळच्या जेवणाची सोय करता करता नाकीनऊ येतंय. मुलांचं शिक्षण करणं अशक्यप्राय बनतं आहे. आजूबाजूला राहणीमान उंचावणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या साधनांनी बाजारपेठ ओसंडून वाहते आहे; पण ती साधनं विकत घेण्याची क्षमता नाही. मुलांना चकचकीत स्वप्नांपासून दूर करता येत नाही आणि त्यांचे हट्ट, आकांक्षाही पुरवता येत नाहीत. अशा जीवघेण्या कात्रीत जगणारा, पण आज नाही उद्या आपणही या शायनिंग इंडियाचा भाग बनू या स्वप्नरंजनात, आशेत जगणारा फार मोठा निम्न मध्यमवर्गीय भारत आहे.</span></div>
<div style="margin-left: 0pt; margin-right: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">पण अशाच मन:स्थितीत-स्थितीत जगणारा, स्वप्न-आशा पूर्ण होण्याविषयी साशंक असणारा, शेतीआधारित जीवन जगणारा, शेतकरी, शेतमजुरांचा एक भारत आहे. हा ग्रामीण कृषीआधारित बहुसंख्य भारत मात्र निराशेच्या काळोख्या आवर्तनात अडकला आहे. त्याला स्वत:ला कोणताही आशेचा किरण दिसत नाही. पण त्याला एक अंधूक आशा वाटते. आपली मुलं उद्या इंग्रजी शिकतील. इंडियामध्ये प्रवेश मिळवतील. कदाचित आपली आजची स्थिती निराशा- गरिबी-हताशा बदलेल.</span></div>
<div style="margin-left: 0pt; margin-right: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">आज टीव्ही, मोबाईलमुळं सारा देश जवळ आल्यासारखा वाटतो आहे. पण या देशामधील इंडिया आणि भारत यामधील अंतर मात्र खूप वाढलं आहे. आपल्या देशात दोन देश आहेत. एक इंडिया आणि दुसरा भारत. स्वातंत्र्यानंतर या दोहोंमधलं अंतर कमी करण्याचा वादा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सरकारनं, महात्मा गांधींच्या वारसदारांनी केला होता. नव्हे, इंडिया, भारत हे दोन्ही देश एक होतील असा आशावाद स्वातंत्र्य आंदोलनाच्या घुसळणीतून नवनीतासारखा (लोण्यासारखा) निर्माण झाला होता. नेहरू सरकारनं तसा प्रयत्नही केला. म्हणूनच पूर्ण भांडवलशाही (अमेरिका, इंग्लंडसारखी) वा कम्युनिस्ट, शास्त्रीय समाजवादी अर्थरचना न स्वीकारता लोकशाही समाजवादी ही मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. त्यांच्या (नेहरूंच्या) हयातभर प्रामाणिकपणे राबण्याचा प्रयत्न केला. अर्थात, हे गांधींचं स्वप्न नव्हतं. गांधींना ग्रामस्वराज्य हवं होतं. स्वयंपूर्ण खेडी असणारी विकेंद्रित अर्थव्यवस्था. ज्या अर्थव्यवस्थेत सगळ्यांना काम मिळेल, सगळ्यांचं पोट नीट भरेल, सगळ्यांच्या किमान गरजा पूर्ण होतील अशी अर्थव्यवस्था. पण गांधींचं स्वप्न, इच्छा कधीच पूर्ण झाली नाही.</span></div>
<div style="margin-left: 0pt; margin-right: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">३० जानेवारी, १९४८ साली नथुराम गोडसेनं त्यांना संपवलं नसतं, आणखी दहा वर्षे गांधी जिवंत राहिले असते तर या देशात वेगळी अर्थव्यवस्था निर्माण झाली असती. कदाचित त्यासाठी गांधी-नेहरू संघर्ष निर्माण झाला असता. कदाचित दोघं एकदुस</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">यांविरुद्ध उभे ठाकल्याचं दृश्य जगाला पाहायला मिळालं असतं. पण त्यातून भारताची अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था जन्माला आली असती.</span></div>
<div style="margin-left: 0pt; margin-right: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">पंडित जवाहरलाल नेहरूंच्या प्रामाणिकपणाबद्दल, देशप्रेमाबद्दल, देशभक्तीबद्दल त्यांचा शत्रूही शंका घेऊ शकणार नाही. तरीपण ते खूप आंग्लाळलेले होते. कळत-नकळत ते इंडियाचं प्रतिनिधित्व करत होते. महात्मा गांधींच्या सहवासात स्वातंत्र्य आंदोलनात ते खूप भारताळले. पण महात्मा गांधींसारखे निखळ भारतीय कधीच बनू शकले नाहीत.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">भारत आणि इंडिया ही टर्मिनॉलॉजी, संकल्पना शेतकरी आंदोलनाचे प्रणेते शरद जोशी यांनी लोकप्रिय केली. त्यामुळं ती अलीकडच्या काळात म्हणजे १९७८-८२च्या काळात निर्माण झाल्याचं आपल्याला वरपांगी दिसतं. पण त्याची मुळं या भूमीत हजारो वर्षांपासून रुजली आहेत.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">इंडिया म्हणजे 'आहे रे' वर्ग. जो सधन आहे. ज्यांच्या हातात सारी सूत्रं आहेत, सा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय नाड्या आहेत आणि जो इतरांच्या शोषणावर जगतो आहे, पुष्ट-बलिष्ट झाला आहे.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">भारत म्हणजे 'नाही रे' वर्ग. जो रात्रंदिवस राबराब राबतो, कष्ट करतो, संपत्ती निर्माण करतो; पण धड जगण्यासाठी आवश्यक त्या गरजा पूर्ण करता करताच ज्याच्या नाकीनऊ येतं. पण इतरांना 'आहे रे' वर्गाला मात्र संपन्न करतो. इतरांकडून स्वत:चं शोषण करवून घेतो आणि ही सारी परिस्थिती दैवाचा भोग म्हणून निमूटपणे स्वीकारतो.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">भारतात दीर्घकाळापासून हे दोन वर्ग होतेच. तसे ते जगभरच होते; पण भारतात मात्र ते जातिआधारित होते. वर्णव्यवस्थेच्या नावाखाली होते.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">उच्च तीन वर्ण. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हा 'आहे रे' वर्ग. म्हणजे आजच्या आधुनिक भाषेत बोलायचं झालं तर इंडिया. सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक नाड्या या तीन वर्णांच्या हातात हजारो वर्षे होत्या, आजही आहेत.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">'नाही रे' वर्ग हा शूद्रांचा, शेतक</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">यांचा व बारा बलुतेदारांचा. राबराब राबणारा, संपत्ती निर्माण करणारा; पण त्याचा उपभोग घेण्याची संधी वरील तीन वर्णांना देणारा हा भारत. बहुसंख्यांचा खरा भारत.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">एके काळी म्हणे, भारतात सोन्याचा धूर निघत असे. पण किमान जेव्हापासून या देशात शंकराचार्यांच्या चार पीठांनी 'मनुस्मृती' राबवायला सुरुवात केली असेल त्या १५०० ते २५०० वर्षांपासून तरी या देशातल्या बहुसंख्य शूद्र, अतिशूद्रांना शोषित जीवनच जगावं लागलं आहे.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">खरा भारत समजून घ्यायचा असेल, तर प्रत्येक देशप्रेमी, समाजप्रेमी, धर्मप्रेमी माणसानं 'मनुस्मृती' किमान एकदा तरी वाचली पाहिजे. त्याशिवाय त्याला खरा भारत कळणार नाही, खरा धर्म कळणार नाही; भारतातील ख</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या समस्या कळणार नाहीत.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">भारतातील वर्णव्यवस्थेचे काही फायदेही झालेत; पण तोटे मात्र अगणित झालेत. अनेक धर्मप्रेमी असं मानतात, की आधी या देशात आदर्श वर्णव्यवस्था होती. गुणांनुसार, माणसाच्या कर्तृत्वानुसार त्याला कोणत्याही वर्णात प्रवेश करता येत असे. नंतर काही हितसंबंधीयांनी या वर्णव्यवस्थेचं जातिव्यवस्थेत रूपांतर केलं. ती बंदिस्त केली.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">एके काळी मलाही असं वाटत असे. याचे पुरावे मिळविण्यासाठी खूप अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. वर्णव्यवस्था ही चांगली व्यवस्था आहे असं मानणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">यांशी खूप चर्चा केली; पण पुरावे मिळू शकले नाहीत. तरी त्या सनातन वादात न पडताही समाजशास्त्राचा, मानववंशशास्त्राचा अभ्यास आपल्याला या प्रश्नाचं नि:संदिग्ध उत्तर देऊ शकतो. अॅबसोल्युट पॉवर करप्ट्स अॅबसोल्युटली, निरंकुश सत्ता, निरंकुश भ्रष्टाचारी बनवते.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">वर्णव्यवस्थेत ब्राह्मणवर्णाला निरंकुश सत्ता मिळाली. परिणामत: ब्राह्मणवर्ण निरंकुश भ्रष्टाचारी बनला. त्याचा 'मनुस्मृती' हा जिताजागता पुरावा आहे.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">याचा परिणाम अपरिहार्य होता. गुलामगिरी हा देश तब्बल तेराशे वर्षे परकीयांच्या आक्रमणाखाली होता. ८००-९०० वर्षे तर सरळ सरळ दुस</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">याच्या शासनाखाली गुलामगिरीत जगत होता.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">जो समाज स्वत:तील बहुसंख्य कष्टकरी श्रमानं संपत्ती निर्माण करणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या हातांचं बळ वापरणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या माणसांना गुलाम बनवतो, त्यांना अस्मिताहीन बनवतो तो समाज गुलाम बनणारच ना? या देशातही तसंच झालं.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">पुरातन काळात लढताना संख्या फार महत्त्वाची असे. कारण एकासोबत एक लढाई होत असे. अशा काळात बाहूत खरी शक्ती असणारा मोठा वर्ग होता तो शूद्रातिशूद्रांचा. पण त्याला लढण्याचा अधिकार नाही. शस्त्र परजण्यासाठी आवश्यक ती धार्मिक मान्यता नाही, अस्मिता नाही. ब्राह्मणांनी लढायचं नसतं. मूठभर वैश्यांचं ते काम नाही. लढाईत सतत मरणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या क्षत्रियांची संख्या मर्यादित. ५-१० टक्के लोक कसं ९० टक्के लोकांचं संरक्षण करणार?</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">चातुर्वण्र्य संकल्पनेतच गुलामगिरीची मुळं दडली आहेत. म्हणूनच भारत एवढा दीर्घकाळ गुलाम राहिला.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या पुस्तकात याचे अनेक पुरावे मांडले आहेत. त्यातलं एक उदाहरण - काशी, बनारस मुस्लिम राजाच्या ताब्यात होती. अटकेपार झेंडे रोवणारे मराठे सरदार काशीभोवताली तळ ठोकून बसले. काशीला घेराव, वेढा घातला. सारी रसद तोडली. हिंदूंचं सगळ्यात पवित्र तीर्थक्षेत्र धार्मिक अस्मितेचं केंद्र</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">q</span><span style="font-size: 10pt;">बदू असणारी काशी ताब्यात घेण्याचा त्यांचा निश्चय होता. मुस्लिम राजा हुशार. त्यानं पेशव्यांना निरोप धाडला. तुमच्या सरदारांनी काशीवर स्वारी केली तर काशीमधील सा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या गाई आणि सारे ब्राह्मण मी मारून टाकीन. त्यांचा शिरच्छेद करेन. त्यांना वाचवायचं असेल तर मराठे सरदारांना परत बोलवा. पेशव्यांचा दूत तातडीनं दौडला. मराठ्यांना वेढा उठवून माघारी फिरण्याचा आदेश तत्काळ पोहोचला.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">मूठभर ब्राह्मणांना व गायींना वाचविण्यासाठी काशी मुस्लिम राजाच्याच ताब्यात राहिली. लढाईत हजारो मरतच होते. अशा लढाईत स्थानिक ग्रामीण, शेतकरी, कष्टकरी उद्ध्वस्त होत मारले जात, बलात्कार होत. पण मूठभर ब्राह्मण मरता कामा नयेत हा राजदंडक, धर्मदंडक, वर्णव्यवस्था प्रबंधन.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">समोर गायींचा तांडा दौडवून कितीदा तरी हिंदूंचा त्या काळात मुस्लिमांनी पराभव केला आहे. त्याची अनेक उदाहरणं स्वातंत्र्यवीर सावरकर आणि प्रबोधनकार ठाकरेंनी मांडली आहेत. पण एवढ्या सगळ्या आक्रमणानंतरही, वारंवार बेचिराख झाल्यावरही निसर्गाच्या भूकंप, दुष्काळ, पूर इत्यादी आपत्तीनंतरही पुन्हापुन्हा भारतीय खेडी उभी राहत असत. जिवंत राहत असत. खेडी दीर्घकाळ टिकली यामागचं रहस्य येथे स्वयंपूर्ण ग्रामरचना होती यात आहे. शेतकरी आणि बारा बलुतेदार मिळून बनलेली एक स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">सा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या गावाच्या गरजा पूर्ण करणारी व्यवस्था गावातच होती. सारं कौशल्य, कारागीर गावातच तयार होत. सारी तरबेज माणसं मारली गेली तरी त्यांच्या नातेवाइकांना दुस</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या गावातून सहज आयात केलं जाऊ शकत असे. पुन्हा गाव सरसरून उभं राहत असे. हे भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचं बलस्थान म. गांधींच्या आधी जाणता राजा शिवाजीराजेंनी बरोबर ओळखलं. जातिव्यवस्था व वर्णव्यवस्थेमुळं होणारं नुकसानही जाणत्या राजानं नेमकेपणानं ओळखलं. म्हणून त्यांनी अठरापगड जातींच्या माणसांना, बारा बलुतेदारांना, शेतक</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">यांना शिपाई बनवलं. त्यांना शस्त्र चालवणं शिकवलं, सन्मान दिला. ज्या काळात शिपाईगिरी हा पूर्णवेळ व्यवसाय होता त्या काळात, शेतीच्या काळात शेतीची कामं करा. नंतर ती आटोपली, की सैनिक बना. असं अर्धवेळ सैन्य निर्माण केलं.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">'आहे रे' आणि 'नाही रे' यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला. मूल्याधारित अभ्रष्ट राज्यव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भारताला अस्मिता देण्याचा प्रयत्न केला.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">गेल्या दोन हजार वर्षांतील हा पहिला प्रयोग होता. राजाच्या लहरीनुसार, मर्जीनुसार नव्हे, तर कायद्यानुसार राज्य चालावे अशी व्यवस्था केली. सामान्य माणसाचा, स्त्रीचा सन्मान राखला जाईल अशी नैतिक मूल्यव्यवस्था, मानवी मूल्यव्यवस्था रुजविण्याचा प्रयत्न केला. सैन्यानं लुटावे अशी प्रथा असण्याच्या काळात सैन्यानं काहीही प्रजेकडून फुकटात घेऊ नये असे आदेश दिले. नव्हे, ते कडकपणे अमलात येतील यासाठी दक्ष राहिले. ब्राह्मणी वर्ण, शोषण व्यवस्थेला शह दिला. तटस्थ न्यायव्यवस्था उभी केली. म्हणून मी नेहमी म्हणतो, 'भारतीयांची अस्मिता सर्वांगीणरीत्या उंचावणारा पहिला खरा 'भारतीय' हा शिवाजी राजा होता.' किमान जो इतिहास आज आपल्याजवळ उपलब्ध आहे त्यानुसार तरी दुसरे उदाहरण नाही अन्यथा या देशात सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रांत अराजकच होते. स्वतंत्र ग्रामीण अर्थव्यवस्थेमुळे हा देश विपरीत परिस्थितीतही जिवंत होता. पण जातिव्यवस्थेमुळे ही ग्रामीण अर्थव्यवस्था शोषणाचं प्रकट हत्यारही बनली होती म्हणूनच डॉ. आंबेडकरांनी या व्यवस्थेला विरोध केला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या वर्णत्रयीचंचं सारं राज्य होतं. (शिवाजी राजे क्षत्रिय नव्हते.) राज्य कुणाचंही असो, राजा कोणत्याही धर्माचा असो, या वर्णत्रयीचं सारं सुखनैव चालत असे. अधूनमधून एखादा झक्की मुस्लिम राजा जिझिया कर (इतर धर्मीयांना कर) लावत असे. त्याचा जेवढा त्रास होत असे तेवढाच. एखाद्या क्षत्रिय राजाचं राज्य जात असे एवढंच. पण तो एखाद्या बादशहाचा मांडलिक वा सरदार बनून सारे स्वत:चे फायदे राखत असे.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">या अशा गुलामगिरीच्या वातावरणात काही धार्मिक, कर्मठ आचार वगळता फारशा नीतिमूल्यांची बूज राखली जात नसे. नैतिक मूल्यांना तशी फारशी प्रतिष्ठा नसे. काही विशिष्ट जाती, काही लोक 'प्राण जाये पर वचन ना जाये' हा सिद्घान्त पाळायचे. दिलेल्या शब्दाखातर जीव द्यायलाही सज्ज असायचे. पण 'वचन पाळणे' म्हणजे नीतिमूल्ये पाळणे नव्हे.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">दानदक्षिणा प्रकरण तर इतकं बोकाळलं होतं, की जगातल्या सगळ््या प्रकारची पापं धुण्याच्या यंत्रणा ब्राह्मणांनी निर्माण केल्या होत्या. मुळात 'पापक्षालन' ही फार चांगली प्रक्रिया आहे. एखादी चूक झाली. पश्चात्ताप करा. पुन्हा ही चूक करणार नाही असं ठरवून टाका आणि पश्चात्तापाच्या अग्नीत शुद्घ होऊन, अधिक उत्तम माणूस बनून पुढची पाऊलवाट पूर्ण करा. अशी ही एक उत्तम मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. ख्रिश्चन धर्मात ही प्रक्रिया 'कन्फेशन' नावानं ओळखली जाते. पण निरंकुश सत्तेनं, ब्राह्मण वर्णानं, दानदक्षिणेच्या लोभानं या 'पापक्षालना'चा पार व्यापार करून टाकला. ते पाप दूर करण्याचे कंत्राट घेऊ लागले. त्याचा परिणाम असा झाला, की वाट्टेल तेवढं पाप करा, पापक्षालन करा, दानदक्षिणा द्या. पुन्हापुन्हा पाप करा. नो प्रॉब्लेम. फक्त दानदक्षिणा द्या. त्यामुळं या पुरोहित पापक्षालन प्रक्रियेनं अपराधीपणाची टोचणीच काढून टाकली. माणसांनी पापी बनण्यास प्रोत्साहित करणारी ही यंत्रणा बनली. आजही हे दृश्य सर्व धर्मस्थळी आढळतं. हजारो कोटी रुपये दानधर्मात येतात. हे सरळ, प्रामाणिक मार्गानं आलेले पैसे असतात का? बहुतांशी वाममार्गाची कमाई असते.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">ज्या धर्मानं उच्च माणुसकीपूर्ण, नैतिक मूल्ये रुजवावी अशी अपेक्षा असते तोच धर्म या देशात भ्रष्ट, निरंकुशांच्या हातचं बाहुलं बनल्यामुळं नैतिक मापदंड निर्माण करण्यात अपुरा पडू लागला. जातिव्यवस्थेमुळं, अस्पृश्यतेमुळं साधा मानवी सन्मानही न मिळणारा मोठा शूद्र वर्ग मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करू लागला. वरपांगी बरोबरीच्या नात्यानं वागवणारा, सर्वांना किमान जेवणात समानता देणारा, जेत्यांचा मुस्लिम धर्म या देशात वाढू लागला. पुढे इंग्रजांच्या प्रवेशानंतर ईसाई धर्मप्रसार पावू लागला. पण या वर्णत्रयीला ना त्याची खंत ना दु:ख होतं. अशा काळात अख्ख्या जगावर साम्राज्य निर्माण करणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या इंग्रजांचं बस्तान या देशात बसू लागलं. एकोणिसाव्या शतकात ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती रुजू लागली होती.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">मशीनच्या साहाय्यानं हजारो मानवी हातांइतकं काम वेगानं करता येणं शक्य होऊ लागलं. हा माल जगभर विकता येणं गरजेचं होतं. शिवाय चिमुकल्या ब्रिटनजवळ कच्चा माल अपुरा होता. पण भारत, आफ्रिका इंग्रजांच्या ताब्यात होते. दोन्ही देशांत कच्चा माल मुबलक उपलब्ध होता. मानवी मजूरही मुबलक उपलब्ध होते. पण भारताची स्वतंत्र आर्थिक खेडीरचना या इंग्रजांच्या विकासाच्या, औद्योगिक प्रगतीच्या आड येत होती.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">इंग्रजांनी पहिलं काम केलं ही स्वतंत्र आर्थिक रचना मोडीत काढण्याचा निश्चय केला. भारतातला कच्चा माल इंग्लंडला पाठवणं व तेथून निर्माण झालेला पक्का माल भारतीय बाजारात विकणं ही यंत्रणा सुरू केली. तो खेड्यात निर्माण होणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या मालापेक्षा स्वस्तात निर्माण व्हावा व स्वस्तात गावोगाव पोहोचावा म्हणून टड्ढाम, रेल्वे, बस इत्यादी दळणवळणाची साधनं निर्माण केली. यासाठी लागणारी यंत्रणा सुरळीत चालावी म्हणून या देशात नव्या 'इंडिया'ची निर्मिती सुरू केली. त्यासाठी लॉर्ड मेकॉलेनं गुलामी मनोवृत्ती निर्माण करणारी शिक्षणव्यवस्था निर्माण केली. सरकारी नोकरदारवर्ग निर्माण केला. अर्थातच, या 'इंडिया' यंत्रणेत सर्वांत पहिले उत्साहानं या देशातील आधीचे 'आहे रे' असणारा वर्ग, 'वर्णत्रयी' सामील झाला. काही क्षत्रिय मांडलिक होतेच. ब्राह्मण शिक्षणव्यवस्थेत सरकारी कारभारात सामील झाले. व्यापारउदिमात असणारे वैश्य कारखानदारीचा भाग बनले. म्हणजे या देशातील 'आहे रे' 'इंडियन' बनले.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">गुलामी मनोवृत्ती शिक्षणानं त्यांच्यात रुजवली. 'आंग्लाळलेपण' सुरू झालं. पण याच इंग्रजी भाषेनं स्वातंत्र्य, समता, बंधुता या युरोपात प्रतिष्ठित झालेल्या. मानवी सर्वश्रेष्ठ मूल्यांचा परिचय करून दिला. युरोपमध्ये वाहणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या स्वातंत्र्याचा परिचय झाला. बहुसंख्याकांनी या 'ज्ञानाचा' उपयोग अधिक उत्तम गुलाम बनण्यासाठी, अधिक उत्तम पोटार्थी बनण्यासाठी केला. पण काही संवेदनशील 'इंडियन्स'साठी ही इंग्रजी भाषा वाघिणीचं दूध ठरली. कायद्याचा अभ्यास करणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या काही वकिलांनी काही जुजबी हक्क मिळविण्यासाठी एकत्र येऊन काँग्रेस काढली. जुजबी हक्कांविषयी बोलणारी काँग्रेस हळूहळू या देशाच्या मर्यादित स्वातंत्र्याविषयी बोलू लागली. 'स्वराज्य' वगैरे शब्द उच्चारू लागली. तिकडे आफ्रिकेत एका इंडियन वकिलाला तो काळा आहे म्हणून रेल्वेच्या फस्र्ट क्लासच्या डब्यातून, फस्र्ट क्लासचं तिकीट असूनही खाली प्लॅटफॉर्मवर</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">फेकलं. या इंडियन वकिलाचा प्रचंड अपमान झाला. पण यानं तो व्यक्तिगत अपमान न मानता मानवी अस्मितेचा अपमान मानला आणि सर्वतोपरी बलिष्ठ असणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या, सारं जग पादाक्रांत करणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या इंग्रजांविरुद्घ लढाई सुरू केली.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">बंदूक, तोफांनी लढणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">याला कसं हरवायचं ते इंग्रजांना चांगलंच माहीत होतं. पण अहिंसेनं, सविनय कायदेभंगाचं हत्यार वापरणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">याशी कसं लढायचं ते उच्च सैन्याधिकारी असणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या, अनेक लढाया जिंकलेल्या द. आफ्रिका प्रमुखाला कळेना. तो या नव्या हत्यारापुढे बिचकू लागला. दबकू लागला. मोहनदास करमचंदची सरशी होऊ लागली. त्यातून महात्मा मोहनदास करमचंद गांधींचा उदय होऊ लागला. या प्रक्रियेत 'इंडियन' गांधी खूप धार्मिक व आध्यात्मिक असल्यामुळं वेगळा विचार करू लागला. 'इंडियन'पण सोडून माणुसकीचा विचार करू लागला.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">१९१४ साली भारतात आला. भारतात एका छोट्या गावात जन्मलेला हा इंडियन भारत समजण्यासाठी 'भारत यात्रा' करू लागला. त्याला 'खरा भारत' इथला शूद्रातिशूद्र समाज कळू लागला. या सा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या प्रक्रियेत तो 'भारतीय' बनत गेला. १९२० सालापासून कळत-नकळत त्यानं न मागता देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाचं नेतृत्व त्याच्या हातात आलं. अत्यंत धार्मिक व आध्यात्मिक असणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या, भारतीय बनलेल्या गांधीनं आपल्या सगळ््या कृतीला, कार्याला, स्वातंत्र्य आंदोलनाला एक नैतिक अधिष्ठान दिलं. प्रामाणिकपणाचे, सत्याचे, साधनशुचितेचे मापदंड रुजवले. उत्तम साध्य साधण्यासाठी ते प्राप्त करण्याचा मार्गही उत्तम नैतिक असला पाहिजे असा आग्रह धरला.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">ही सारी नीतिमूल्ये खरं म्हणजे समाजात, धर्मस्थळांत कुठेच दिसत नव्हती. धर्मस्थळं तर भ्रष्टाचाराची, अनाचाराची केंद्रस्थानं झाली होती. अगदी इंग्रजांचं राज्य रुजेपर्यंत तीर्थयात्रेला आलेल्या श्रीमंत भाविकांचे, पूजेच्या दरम्यान मुडदे पाडून त्यांची सारी संपत्ती लुटण्याची परंपरा निर्माण झाली होती. दिलीपकुमार, संजीवकुमार, वैजयंतीमाला यांनी काम केलेल्या 'संघर्ष' चित्रपटात याचं अत्यंत विदारक व प्रभावी चित्रण केलं आहे. काशीचं हे चित्रण आहे. पण हिंदू धर्मात ही सारी नीतिमूल्ये आहेत असं मानणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या, श्रद्घा असणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या गांधींनी समाजकारणात, अर्थकारणात, राजकारणात, जीवनातल्या सगळ््याच अंगांत उच्च मानवी नीतिमूल्ये जोपासण्याचा, रुजविण्याचा आग्रह धरला.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">गांधींचं स्वातंत्र्य आंदोलन हे केवळ स्वातंत्र्य आंदोलन राहिलं नाही. ते सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक अंगांनी</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">फुलत गेलं. बहरत गेलं. पत्रकार असणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या गांधींनी आणि अनेक स्वातंत्र्य आंदोलनांतील इतर नेत्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातही नीतिमूल्यांचे मापदंड निर्माण केले. सार्वजनिक क्षेत्रात नीतिमूल्यांचा आग्रह व मापदंड निर्माण करण्याचा प्रयत्न करणं व त्याबाबत यशस्वी होणं ही देशातील 'खरी पहिली क्रांती' होती आणि तिचा पिता होता महात्मा गांधी.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">हिंदू धर्मात जन्मलेला हा माणूस सगळ््याच धर्मांचा अभ्यासक व चाहता असल्यामुळं सर्वच धर्मांतील उच्च नीतिमूल्ये अंगीकारणारा व रुजविणारा ठरला. त्यांनी आपल्या प्रार्थनेत सर्वच धर्मांच्या चांगल्या गोष्टींचा अंतर्भाव केला. सर्वधर्मसमभाव पहिल्यांदा राष्टड्ढीय धर्म बनविला. परिणामत: स्वातंत्र्य आंदोलनात घुसळून निघालेल्या पिढीत मानवी मूल्यांचा व सगळ््याच क्षेत्रांत नीतिमूल्यांचा आग्रह रुजला. त्याचा परिणाम भारतातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता या सगळ््याच क्षेत्रांवर झालेला दिसतो. स्वातंत्र्य आंदोलनापासून सक्रिय असणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या मध्यमवर्गाची ही कळत-नकळत नीतिमूल्ये बनली. केवळ स्वत:चा, स्वत:च्या हिताचा विचार करण्यापेक्षा इतरांच्या हिताचाही विचार करून जगणं, त्यासाठी प्रयत्न करणं हे उत्तम जगणं आहे नव्हे, माणूस म्हणून खरं जगणं हेच आहे अशी मान्यता निर्माण झाली. याप्रमाणं जगणारी, दुस</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">यांसाठी झटणारी अशी अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची माणसं झाली. अगदी ७०-८० सालापर्यंत अशी माणसं मोठ्या प्रमाणावर दिसत होती.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">खरं म्हणजे मी स्वातंत्र्यानंतर जन्मलो १९५१ साली. माझे वडील विनोबांचे शिष्य. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन, कॉलेज शिक्षण सोडून ते भूदान चळवळीत सामील झाले. पूर्णवेळ काम करू लागले. त्याचे खूप आर्थिक चटके आम्हांला लहानपणी भोगावे लागले. म्हणून मी ठरवलं होतं, 'मी कधीही सार्वजनिक काम, समाजसेवा करणार नाही. पूर्णवेळ कार्यकर्ता तर कधीच बनणार नाही.' खरं म्हणजे तसा मनोमन निश्चय केला होता. पण वर्धा शहरात राहणं आणि विनोबा, जयप्रकाश नारायण, आचार्य दादा धर्माधिकारी या गांधी शिष्यांचा सहवास-प्रभावच असा होता, की स्वत:साठी छान नोकरी करण्याचा निश्चय केव्हा मागे पडला आणि सार्वजनिक जीवनात केव्हा ओढला गेलो ते कळलंच नाही.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">पुढे तब्बल ४२ वर्षे सार्वजनिक जीवनात काम करतो आहे. त्यातील तब्बल १०-११ वर्षे कोणत्याही प्रकारचं मानधन न घेता पूर्णवेळ काम केलं आहे. बरं, आपण फार विशेष करतो आहे असंही वाटे ना! कारण कितीतरी दिग्गज माणसांना तसं करताना पाहत होतो. नारायणभाई देसाई, बाबा आमटे, रावसाहेब पटवर्धन, यदुनाथ थत्ते, चंद्रकांत शहा, ठाकूरदास बंग, (माझ्या वडिलांचे प्राध्यापक होते. प्राध्यापकी सोडून कार्यकर्ते झाले.) गोविंदराव शिंदे, रामभाऊ म्हसकर असे अनेक इतर वडिलांचे सहकारी, सर्वोदयी कार्यकर्ते.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">१९७० साली जयप्रकाश नारायणांच्या तरुण शांती सेनेत सामील झालो. दादा धर्माधिकारींच्या वैचारिक परिपोषणावर पुष्ट झालो. बिहार आंदोलनासारखं आंदोलन वाट्याला आलं. त्या काळात विविध आंदोलनातले तरुण सहकारी नेते मित्र झाले. डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. अरुण लिमये, प्रमोद महाजन, अशोक बंग, डॉ अभय बंग, डॉ. उल्हास जाजू, चंद्रकांत वानखडे, सुधाकर जाधव, किशोर देशपांडे, शुभमूर्ती, कलानंद मणी, बाळ सरोदे, एकनाथ उगवार हे तरुण शांती सेनेचे सहकारी. आधी डॉ. रूपा कुळकर्णींसोबत 'हुंडाविरोधी आघाडी'त काम केलं. १९८२ साली अखिल भारतीय अंधश्रद्घा निर्मूलनाची चळवळ सुरू केली. त्या वेळी अनेक क्षेत्रांत विविध चळवळी सुरू होत्या. बाबा आमटेंचं आनंदवन हा एक चांगला प्लॅटफॉर्म होता. सगळ््या संघटनांचं पहिलं शिबीर डॉ. विकास आमटेंच्या सक्रिय सहकार्यानं आनंदवनलाच आयोजिलं होतं. तिथून अंधश्रद्घा निर्मूलनाचं काम सुरू झालं. डॉ. प्रकाश आमटेंचं हेमलकसाचं काम आम्हा सगळ्यांसाठीच आत्मीयतेचा व प्रेरणेचा विषय होता. त्याच काळात डॉ. रूपा कुळकर्णी, डॉ. सीमा साखरे यांचे नागपुरातून तर पुण्यातून विद्या बाळ, छाया दातार, शारदा साठे यांचे मुंबईतून स्त्रियांसंबंधीचे आंदोलन सुरू होते. डॉ. बाबा आढावांचे विषमता निर्मूलन कार्य सुरू होते. युनोतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून शरद जोशी यांनी शेतकरी आंदोलनाचा धडाका लावला होता.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">मी पत्रकारितेत दाखल झालो १९७८ साली. नागपूरच्या दै. 'तरुण भारता'तून सुरुवात केली. 'तरुण भारत' आरएसएसचं मुखपत्र श्री. मा. गो. वैद्य व श्री. दि. भा. घुमरे या संपादकांच्या हाताखाली काम केलं. माझे विचार वेगळे. ३ वर्षे 'तरुण भारता'त स्तंभलेखन करत होतो. पुढे सहा महिने १९८२ साली 'तरुण भारता'त नोकरीही केली. पण मला मान्य नसलेले विचार मी कधी लिहिले नाहीत व माझ्या संपादकांनीही कधी मी त्यांच्या धोरणाप्रमाणं लिहावं असा आग्रह धरला नाही.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">१९८२ पर्यंत माझ्या विचारात फारच परिवर्तन झालं. 'तरुण भारता'च्या धोरणाला ते पेलवेना. तेव्हा डायरेक्टर बोर्डानं फार आग्रह धरला तरी मा. गो. वैद्यांनी मला नोकरीवरून काढून टाकण्यास मान्यता दिली नाही. शेवटी ज्या सा. 'तरुण भारता'त माझी नेमणूक होती ते साप्ताहिकच बंद करण्याचा निर्णय डायरेक्टर बोर्डानं घेतला. तेव्हा आपसूकच माझी नोकरी संपली.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">मी १९ वर्षे पत्रकारिता केली; पण कधीच मनाला न पटणारं लिहिलं नाही. खोटं लिहिलं नाही. कधी भ्रष्टाचाराला साथ वा वाव दिला नाही. पण त्याचं फारसं नवल नव्हतं. कारण गोविंद तळवलकर, यदुनाथ थत्ते, 'माणूस'चे माजगावकर, 'सोबत'चे ग. रा. बेहरे, मुकुंदराव किर्लोस्कर, मा. गो. वैद्य, म.प. दळवी, विद्याधर गोखले, माधव गडकरी, कुमार केतकर, विद्या बाळ यांच्यासारखे अनेक तत्त्वनिष्ठ व विचारस्वातंत्र्याचा आग्रह धरणारे संपादक त्या काळात होते. पत्रकारिता हे मिशन आहे असं उघडपणे ही संपादक मंडळी बोलत असे, लिहीत असे; तसं वागत असे. त्याचा परिणाम माझ्यासारखा संवेदनशील व नवख्या पत्रकारांवर होत असे.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">शैक्षणिक क्षेत्रातही असे उच्च मापदंड होते. प्राचार्य राम शेवाळकर, प्राचार्य नरहर कुरुंदकर, भा. ल. भोळे यांच्यासारखे कितीतरी उत्तम शिक्षक व समाजशिक्षक एकाच शरीरात नांदत होते. प्राध्यापकांनी शिकवण्याचं काम उत्तमपणे करता करताच सामाजिक कार्यात उत्तम योगदान दिलं पाहिजे अशी मान्यता होती. प्रा. राम बापट, प्रा. ग.प्र. प्रधान यांसारखे कितीतरी प्राध्यापक अनेक प्राध्यापक-विद्याथ्र्यांचे प्रेरणास्थान होते. कारण अजूनही म. गांधींनी रुजवलेल्या मानवतावादी व मूल्याधिष्ठित जगण्याला, साध्या राहणीमानाला प्रतिष्ठा होती. आर्थिक संपन्न जीवनापेक्षा मानसिक संपन्न जीवन उच्च दर्जाचं असतं असा प्रबळ सामाजिक संस्कार अजून जिवंत होता. तसे प्रत्यक्ष जिवंत आदर्श 'याचि देही याचि डोळा' पाहायला मिळत असत. पण याच काळात दुस</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या बाजूनं प्रचंड प्रमाणावर मूल्य </span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">हासाला सुरुवातही झाली होती. भ्रष्टाचार हा या देशाचा अविभाज्य भाग आहे. ज्या देशात, जी माणसं देवासारख्या पवित्र क्षेत्रात सौद्यापासून सुरुवात करतात तिथे दुसरंकाय होणार? 'देवा अमुक झालं तर तुला तमुक वाहीन, एवढ्याची पूजा घालेन' असा सौदा भक्त करतात आणि पुजा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">याला वा डायरेक्ट देवाला जेवढे अधिक पैसे देऊ तेवढी तो अधिक कृपा करेल असं मानतात त्या देशात भ्रष्टाचाराची गंगोत्री निर्माण होणारच! ती आधी धार्मिक क्षेत्रात होती. ती आता जीवनाच्या सगळ््या अंगांत पसरू लागली आहे.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">प. जवाहरलाल नेहरूंच्या काळात थोडाबहुत भ्रष्टाचार असेल; पण त्यांनी कधीही अंधश्रद्घांना, भ्रष्टाचाराला, धर्मवादाला प्रतिष्ठित केलं नाही. या देशाची एक सेक्युलर प्रतिमा राखण्याचा प्रयत्न केला. प्रामाणिकता रुजविण्याचा प्रयत्न केला; पण त्यांची मुलगी इंदिरा गांधी, रणरागिणी, दुर्गा होती. प्रबळ, प्रभावी शासक होती; पण असुरक्षित होती. त्यातून या देशाचा पंतप्रधान पहिल्यांदा उघड अंधश्रद्घांना प्रतिष्ठा देऊ लागला. मंदिराचे आशीर्वाद घेत हिंडू लागलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी राजकारणात धर्म आणला आणि निवडणूक राजकारणासाठी भ्रष्टाचार, आर्थिक भ्रष्टाचारही प्रतिष्ठित केला. जिथे पंंतप्रधानच प्रवाहपतित होतो तिथे दुसरं काय होणार?</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">जयप्रकाश यांचं आंदोलन, भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, म. गांधींची मूल्यव्यवस्था पुन्हा रुजवणारं उत्तम साधन बनावं असा प्रयत्न होता. जयप्रकाश यांचा हा प्रामाणिक प्रयत्न होता. त्यामुळं पहिल्यांदा या देशातील सरकार बदललं. काँग्रेसऐवजी दुसरं सरकार आलं. पण ज्याच्या नैतिक बळावर हा बदल झाला तोच जयप्रकाश या जगातून निघून गेला. या देशात दुस</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">यांदा इतिहासाला तसंच नकारात्मक वळण लागलं.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">म. गांधींनी काही भरीव करण्याची गरज होती त्या वेळी गोडसेंनी त्यांना संपवलं आणि आता सत्तेबाहेर राहून पुन्हा देशातील सर्वच क्षेत्रांत काही उच्च नैतिक मापदंड निर्माण करण्याची क्षमता असणारे जयप्रकाश नारायणही नाहीसे झालेत.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">या देशाचा सर्वांगाने </span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">हास सुरूच राहिला. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातले आमचे काही सहकारी राजकारणात जाऊन भ्रष्टाचार-सहकारी ठरले.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">पंतप्रधान राजीव गांधींना म्हणावं लागलं, की १ रुपयापैकी केवळ १० पैसेच गरिबांपर्यंत पोहोचतात. ९० पैसे मधली पैसे पोहोचवणारी यंत्रणा नाहीसे करू लागली.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंगांच्या काळात शूद्रांमधल्या काही जातींना आरक्षणाच्या निमित्तानं बळ मिळालं. त्यांची अस्मिता जागी झाली. ते राजकारणात प्रभावी बनू लागले. काहीअंशी सत्तेची सूत्रं त्यांच्या हाती येऊ लागली. पण त्यांचं भारतीयकरण होण्याची प्रक्रिया सुरू नसल्यामुळं ते 'इंडिया'त दाखल होऊ लागले. खरा इंडियनाईज बदल झाला तो पंतप्रधान नरसिंह रावांच्या काळात. राजीव गांधींनी आधुनिकीकरण स्वीकारलं होतं; पण मिश्र अर्थव्यवस्था कायम होती. राजीव गांधींना कदाचित भारत कळत नव्हता; पण तो एक प्रामाणिक माणूस होता. आपल्या आईपेक्षा निश्चित अधिक प्रामाणिक होता. पण अत्यंत अंधश्रद्घा आणि भ्रष्टाचाराचं, अनैतिक मार्गांचं मुळीच सोयरसुतक नसलेले, तथाकथित विद्वान नरसिंह रावांनी व डॉ. मनमोहन सिंगांनी ग्लोबलायजेशन, जागतिकीकरण स्वीकारलं. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था टाकून देऊन, कल्याणकारी राज्याची कल्पना सोडून देऊन खुली भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारली. त्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात झाली आणि देशाचं 'इंडियनायजेशन' उघडपणे सुरू झालं. 'भारता'चा कुणीच वाली उरला नाही. उलट 'भारत' हा अर्थव्यवस्थेवरचा भार आहे अशी धारणा सर्वच क्षेत्रांत रुजू लागली.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">पैसा आणि पैशालाच प्रचंड प्रतिष्ठा प्राप्त झाली. सारे यशाचे मापदंड बदलले. पैसा म्हणजेच यश, पैसा हेच साध्य, पैसा हेच ध्येय हा खुल्या भांडवलशाहीचा संस्कार सर्वच क्षेत्रांत रुजू लागला. परिणामत: पैसा ध्येय प्राप्त करण्याकरता पैसा साधनाचा वापर होऊ लागला. भ्रष्टाचार जो आधीच या देशाचा संस्कार होता तो आता जीवनाचा भाग बनला, शिष्टाचार झाला; प्रतिष्ठित झाला. मानवी जीवनमूल्ये, उच्च नैतिक मूल्ये रुजवणारी प्रक्रियाच अवरुद्घ झाली. पैशाची आणि दानधर्माची बटिक बनलेली भ्रष्ट, धार्मिक व्यवस्था अधिकच भ्रष्ट झाली. ती दिवसेंदिवस श्रीमंत आणि भ्रष्ट होते आहे. मानवी मूल्ये रुजविण्याचं कार्य या देशात धर्म करू शकत नाही. कारण तो पुरोहितशाहीचं शोषणाचं हत्यार बनला आहे.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">म. गांधींनी मानवी, नैतिक मूल्ये रुजविण्याची प्रक्रिया सुरू केली. त्याची खूप चांगली फळे ४०-५० वर्षे दिसली. आता ती प्रक्रिया अवरुद्घ झाली आहे. मधे एक आशेचा किरण उद्भवला होता. अण्णा हजारेंचं भ्रष्टाचारविरोधी आंदोलन. म्हणूनच सा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या देशातील सारे 'इंडियन' तरुणही त्यांच्यामागे उभे राहिले. त्यांच्यात म. गांधींना पाहू लागले. पण वरपांगी म. गांधी दिसणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या अण्णा हजारेंना इंडिया आणि भारत यातलं नेमकं अंतर कळतं काय? ते भारतात जन्मले, भारतीय कपडे घालतात, भारतात ग्रामीण भागात राहतात. पण त्यांना खरा भारत कळताना दिसत नाही. तेवढा आवाका, तेवढा अभ्यास, तेवढं आकलन त्यांना आहे हे जाणवत नाही. त्यामुळं त्यांच्यावर एका मर्यादेपेक्षा जास्त अपेक्षा लादणं हा त्यांच्यावरचाच अन्याय ठरेल.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">आज आहे त्या परिस्थितीचा विचार केला तर दिवसेंदिवस 'इंडिया' प्रगत, बलिष्ठ, श्रीमंत होत जाणार आहे. त्यातील अनेकांची विक एण्ड घरं अमेरिका, युरोप, ऑस्टड्ढेलियात निर्माण होतील आणि 'भारत' दिवसेंदिवस गरीब होणार, कुपोषित होणार; आत्महत्येस प्रवृत्त होणार. पण हे डिटोरिएशन एका मर्यादेपलीकडे 'इंडिया'ला परवडणारं नाही. कारण पैसे पोट जाळू शकत नाही. त्यासाठी अन्नधान्यच लागतं आणि ते 'भारत'च पिकवू शकतो. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरविण्याची क्षमता जगात इतर कुणामध्येच नाही. त्यामुळे 'इंडिया'ला जगण्यासाठी 'भारता'ला जिवंत ठेवावंच लागणार आहे. 'भारता'च्या अस्तित्वावरच इंडियाची मिजास, प्रगती अवलंबून आहे. त्यामुळं जेव्हा परिस्थिती फारच रसातळाला जायला सुरुवात होईल तेव्हा याच भारतातून इंडियात जाऊ इच्छिणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या आणि इंडियात असणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या काही संवेदनशील माणसांना 'भारत' समजून घेण्याची इच्छा होईल. त्यातून त्यांना भारत कळताना उच्च मानवी मूल्ये व उच्च नैतिक मूल्यांचं महत्त्व पटेल. ते रुजविण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतील आणि त्यातून पुन्हा जीवनातल्या सर्वच अंगांत उच्च मानवी मूल्याधारित मापदंड प्रस्थापित होतील. ते मापदंड स्वत:च्या जगण्यात स्थापित करणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या अनेक व्यक्ती पुन्हा या समाजात बहुसंख्येत दिसू लागतील. ती प्रक्रिया सुरू झाली आहे. राजा, कलमाडी यांचं तुरुंगात जाणं, अण्णा हजारे, केजरीवाल यांचं आंदोलन ही सारीच त्या दिशेनं 'भारत' चालत जाण्याची शक्यता दर्शविणारी सुचिन्हे आहेत. मावनी जीवनाचं एक जैविक वैशिष्ट्य आहे. त्याच्या सा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या जगण्याची धडपडच सुख, आनंद मिळविण्यासाठी असते. 'पैशातून हवं ते सुख मिळवता येतं' हा संस्कार जागतिकीकरणामुळं मोकाट सुटलेली भांडवलशाही रुजविण्यात यशस्वी झाली आहे. पण माणसाचा शोध असतो तो 'दीर्घकाळ टिकणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या सुखाचा.' आणि पैसा, वस्तू, चैनीची साधनं, तात्पुरता सेक्स कधीच दीर्घकाळ टिकणारं सुख देऊ शकत नाही. त्यातून मिळणारं सुख खूप क्षणिक असतं. काही संवेदनशील माणसांना हे तीव्रतेनं लक्षात येतं. एखाद्या प्रसंगामुळं, घटनेमुळं ते भानावर येतात आणि मग त्यांचा दीर्घकाळ मिळणा</span><span style="font-family: Arial; font-size: 10pt;">è</span><span style="font-size: 10pt;">या सुखाचा शोध सुरू होतो. काही वाट चुकलेले हिमालयात जातात सुख शोधायला आणि देव देव करत बसतात.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">काही वाट गवसलेले 'माणसांना जोडून घेण्यात' सुख शोधतात आणि मग अशांच्या सुख शोधण्याच्या प्रक्रियेतून नैतिक मूल्ये रुजवणारी क्रांती घडून येते. माणसाला माणूसपण देणारी प्रक्रिया घडून येते. अशांमुळेच मानवजात टिकून आहे. जिवंत आहे. प्रगतिपथावर आहे... असणार आहे.</span></div>
<div style="margin: 0pt; text-indent: 0pt;">
<span style="font-size: 10pt;">भ्रमणध्वनी - ९३७१०१४८३२</span></div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-77714651786937854312012-12-07T23:54:00.003-08:002012-12-07T23:54:32.585-08:00ज्योतिष्यांनो, हिंमत असेल तर या प्रश्नांचे उत्तर द्या<table style="background-color: white; font-family: arial; width: 100%px;"><tbody>
<tr><td><div class="haedlinesstory" style="font-family: Mangal, Arial; font-size: 17px; font-weight: bold; margin-left: 10px; padding: 0px;">
<br /></div>
</td></tr>
<tr><td><table align="left"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/08122012/08122012-md-ak-4-3363-1-small.jpg" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" style="cursor: pointer; font-size: 11px;" /></td></tr>
</tbody></table>
<span class="bodyd" style="color: #2c2c2c; font-family: arial; font-size: 14px; line-height: 24px;">शेगावला अखिल भारतीय ज्योतिष परिषद दि. 7 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. 8,9 डिसेंबरपर्यंत चालेल. त्यानिमित्तानं देशभरातील ज्योतिषी शेगावला दाखल झाले असणार!<br /><br />अर्थात, कुणालाही परिषद भरविण्याचा अधिकार आपल्या भारतीय घटनेनेच दिला आहे. त्या स्वातंर्त्याचा, अधिकाराचा आम्ही अखिल भारतीय अंधश्रद्धा<br /><br />निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आदर राखून काही जाहीर प्रश्न उपस्थित करू इच्छितो.<br /><br />अर्थात, आजवर आम्ही कधीही कायदा हातात घेतला नाही. गेल्या 30 वर्षात कधीही अलोकतांत्रिक कृती केली नाही. त्यामुळे ज्योतिष परिषदेला डिस्टर्ब करण्याचा वा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही मुळीच करणार नाही. ज्योतिष्यांनी नि:शंक मनाने आपली परिषद एन्जॉय करावी. पण जर अजूनही थोडीशी सद्सद्विवेकबुद्धी शाबूत असेल, तर आपण लोकांची लुबाडणूक करणारे; त्यांच्यावर झालेल्या लहानपणापासूनच्या संस्काराचा गैरफायदा घेऊन त्यांना फसवून स्वत:च्या पोटाची खळगी भरणारे; गंडांतर, अरिष्ट, ग्रहशांती, राहू वक्री सांगून त्यांना घाबरवून त्यांच्या खिशावर डल्ला मारणारे तर नाही ना? याचा अत्यंत गंभीरतेने विचार करावा.<br /><br />एकेकाळी माझी श्रद्धा होती, फलज्योतिष खरंच शास्त्र आहे असा विश्वास होता. त्या काळी काही काळ मीही भविष्यकथन केलं आहे. पण जेव्हा मला त्यातला फोलपणा लक्षात आला तेव्हा मी ते सोडलं. माझ्या संपर्कात आलेल्या अनेक ज्योतिष्यांनी, ज्योतिष्याचा खोटेपणा लक्षात आणून दिल्यावर आपला ज्योतिषी व्यवसाय बंद केला.<br /><br />गेल्या 30 वर्षाच्या कामातून एक गोष्ट तीव्रतेनं लक्षात आली. किमान पाच-दहा वर्षे व्यावसायिक पद्धतीनं फलज्योतिष सांगणार्या सार्यांच्याच लक्षात येतं की, शास्त्रानुसार आपली अनेक भाकितं चुकतात, निम्म्याहून अधिक चुकतात. थोडासा मानसशास्त्राचा, लोकांच्या बॉडीलॅंग्वेजचा आधार घेऊन अंदाजे ठोकताळे आपण करीत असतो. आपल्या ज्योतिष्यांना (नक्की काहीही) माहीत नसतं. पण सामान्य जनता मात्र श्रद्धेमुळं ज्योतिष्याच्या भाकितांवर विश्वास ठेवून जीवनातील खूप महत्त्वाचे निर्णय घेते. अशा वेळी ज्योतिषी व्यवसाय करणार्या माणसाचं मन ही 'फसवणूक' कशी सुरू ठेवू देते?<br /><br />दहा एक वर्षे व्यवसाय केल्यावर तरी या शास्त्रातील फोलपणा कळतोच कळतो. तरी जे त्यानंतरही ज्योतिष व्यवसाय सुरू ठेवतात त्यांना काय म्हणावं?<br /><br />इतरांना फसविण्याची मानसिक तयारी असल्याशिवाय ज्योतिषी आपला व्यवसाय व परिषदा रेटून नेऊ शकतील का?<br /><br />गर्भवती बाईला मुलगा होईल की मुलगी याचा अंदाज वर्तविणार्या कुणाही अडाणी माणसाची भाकितं 50 टक्के खरी ठरू शकतात. 100 स्त्रियांविषयीच्या भाकितात हाच आकडा 30 टक्के ते 70 टक्क्यांपर्यंत खरा ठरू शकतो. याला 'लॉ ऑफ प्रॉबॅबिलिटी', शक्याशक्यतेचा नियम म्हणतात. केवळ याचाच फायदा ज्योतिषी उचलत असतात. त्यांची भाकितं कधीही अंदाज नियमापेक्षा अधिक अचूक ठरत नाही. म्हणूनच अँस्ट्रॉलॉजी, फलज्योतिष्याला कधीच वैज्ञानिक मान्यता व दर्जा मिळू शकला नाही.<br /><br />जर ज्योतिष्यांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत असेल तर, 'जोवर फलज्योतिष हे शास्त्राच्या कसोटय़ांवर सिद्ध होत नाही तोवर आम्ही लोकांना त्यांचं भविष्य सांगून त्यांची दिशाभूल करणार नाही, त्यांना फसवणार नाही,' असा निर्णय अखिल भारतीय ज्योतिष परिषद का घेत नाही? या आधीही अखिल भारतीय ज्योतिष परिषदांना आम्ही आव्हानं दिलीत.<br /><br />2, 3 डिसेंबर 1985 साली पुण्यात झालेल्या अखिल भारतीय ज्योतिष परिषदेला पत्रकं वाटून जाहीर आव्हानं दिली. त्यानंतर धुळय़ाच्या 86 सालच्या अखिल भारतीय ज्योतिष परिषदेला जाहीर आव्हान टाकण्यासाठी संपूर्ण धुळे परिसरात प्रबोधनाची राळ उडवून दिली.<br /><br />पोलिसांना आणि डीआयजी अरविंद इनामदारांना आम्ही आधीच सांगितलं होतं. ज्योतिष्यांच्या परिषदस्थळी आम्ही काहीही करणार नाही. कारण आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना परिषद भरविण्याचा अधिकार आहे, असला पाहिजे. चोरांनासुद्धा संमेलन भरविण्याचा, परिषद भरविण्याचा अधिकार असला पाहिजे.(यावर डीआयजी खळखळून हसले होते.) त्यामुळं आदल्या दिवसापर्यंत आम्ही प्रबोधन करू; पण ज्योतिष परिषदेत मात्र आम्ही गोंधळ घालणार नाही, धुमाकूळ घालणार नाही. त्यामुळं आपण निश्चिंत असावं. आदल्या रात्रीपर्यंत प्रचारसभा घेऊन मी व माझ्या प्रमुख कार्यकत्र्यांनी धुळे शहर सोडलं.<br /><br />आमचे काही पत्रकार कार्यकर्ते परिषदेत हजर होते. संपूर्ण परिषदेवर आंदोलनाची छाया होती. आम्ही आतमध्ये घुसून काहीतरी गोंधळ घालू या भीतीने ते डोळय़ात तेल घालून पहारा देत होते. प्रत्येक परिसंवादात, उद्घाटनाच्या भाषणात आमच्या आव्हानाचं प्रतिबिंब पडत होतं. ज्योतिष्यांची नुसती तारेवरची कसरत सुरू होती.<br /><br />त्यानंतर अमरावतीला अखिल भारतीय ज्योतिष परिषद झाली. त्यालाही आमच्या कार्यकत्र्यांनी आव्हान टाकलंच; पण आम्ही जनजागरण सभा घेण्याच्या भानगडीत पडलो नाही. अर्थात, याही वेळी ज्योतिष्यांनी आव्हान स्वीकारलंच नाही.<br /><br />उपाध्येंच्या मुलींचा गोंधळ..<br /><br />पुढे 1991 साली मुंबईला अखिल भारतीय परिषद भरली. मी तिथेच असल्यामुळं परिषदेच्या दोन दिवस आधी 'फलज्योतिष : एक थोतांड' या विषयावर एक व्याख्यान दादरच्या छबिलदास शाळेच्या हॉलमध्ये आयोजिलं. या व्याख्यानात आव्हान न स्वीकारता, तशी तयारीही न दाखवता, ज्योतिषी शरद उपाध्येंच्या ज्योतिष वर्गातील विद्यार्थ्यांनी व खास करून विद्यार्थिनींनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तरुण सुशिक्षित मुलींनी आमच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याची ही पहिलीच वेळ होती. सभ्य दिसणार्या मुली असं वागू शकतात यावर विश्वास ठेवणं फार कठीण जात होतं. पण त्या वेळी त्यांना फारसं काही करता आलं नाही. तरी त्यामुळे ज्योतिष परिषदेला आम्हाला पुन्हा आव्हान टाकावं लागलं. काही जाहीर प्रश्न विचारावे लागले. तशी वृत्तपत्रांतून प्रसिद्धी द्यावी लागली.<br /><br />पुढे नागपूरला ज्योतिष परिषद भरली आणि ज्योतिषविरोधी प्रबोधनानं नागपूर दणाणून सोडलं. नियोजित उद्घाटक मुख्यमंत्री मनोहर जोशी व स्वागताध्यक्ष बांधकाममंत्री नितीन गडकरी परिषदेला उपस्थितच राहिले नाही. नागपूर श्रमिक पत्रकार संघानं प्राचार्य राम शेवाळकरांच्या अध्यक्षतेखाली मी व ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर असा परिसंवाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला. ऐनवेळी (आधी शेवाळकरांना व पत्रकारांना संमती देऊनही) कालनिर्णयकार साळगावकरांनी ज्योतिष परिषद परवानगी देत नाही या सबबीखाली माघार घेतली.<br /><br />म्हणून पुन्हा अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनास अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जाहीर सवाल..<br /><br />1) फलज्योतिष हे शास्त्र आहे का? 2) पूर्वी फलज्योतिष आणि खगोलशास्त्र एकत्र होते. ग्रीकांपासून, आर्यभट्टापासून ते गॅलिलिओ- कोपर्निकसपर्यंत अनेक सुप्रसिद्ध खगोलशास्त्री ज्योतिषीही होते, पण एकोणिसाव्या शतकात खगोलशास्त्र व फलज्योतिष वेगळे झाले, ते का? 3) खगोलशास्त्र ही विज्ञानाची व वैज्ञानिक अभ्यासाची महत्त्वाची शाखा झाली. त्याचा अभ्यास जगभराच्या सगळय़ा विद्यापीठांमधून होता; परंतु फलज्योतिष मात्र चोथा समजून विज्ञानाने फेकून दिले. असे का? 4) जगभराच्या 186 वैज्ञानिकांनी, ज्यात 19 नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत, 'फलज्योतिष हे शास्त्र नाही. तो केवळ काही लोकांचा पोट भरण्याचा धंदा आहे. त्यावर जनतेने विश्वास ठेवू नये,' असे पत्रक काढले व ते जगभर प्रसिद्ध केले. त्याबद्दल 'ज्योतिष अधिवेशनाचे' काय मत आहे? 5) आजचे फलज्योतिषी 9 (किंवा 12) ग्रह मानतात. त्यात राहू, केतू नावाचे ग्रहही मानतात. प्रत्यक्षात राहू-केतू अस्तित्वातच नाहीत. ते ग्रहही नाहीत. तरी ज्योतिषी मात्र आजही जनतेच्या कुंडल्यांमध्ये (होरोस्कोप) राहू-केतू फिरवतच असतात. ते का? कसे? अस्तित्वात नसलेल्या राहू-केतूंना स्थान देणार्या कुंडल्या किती विश्वसनीय असू शकतात? व त्या आधारावर उभ्या असणार्या फलज्योतिषात कितपत अर्थ असू शकतो?<br /><br />6) चंद्र-सूर्याला ग्रह म्हणून आजही स्थान दिले जाते. चंद्र हा उपग्रह आहे, हे खगोलशास्त्राच्या ज्ञानामुळे पाचव्या वर्गातल्या मुलालाही ज्ञात असते. तरी सुशिक्षित विद्वान ज्योतिषीही चंद्राला ग्रह म्हणूनच कुंडलीत स्थान देतात. अशा अवस्थेत विद्वान ज्योतिष्यांपेक्षा पाचव्या वर्गातल्या मुलांनाही अधिक ज्ञान असते, असे का मानू नये? 7) सूर्य हाही ग्रह म्हणूनच कुंडलीत मांडला जातो व आजही ज्योतिषी पृथ्वीभोवतीच (कुंडलीत) सूर्याला फिरवत असतात. सूर्य हा तारा आहे. तो ग्रह नाही व पृथ्वी इतर ग्रहांसोबत सूर्याभोवती फिरते हे शाळकरी मुलांना जसे शिकवले जाते तसेच ज्योतिष्यांना शिकवावे, प्रसंगी त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा काढाव्यात, अशी विनंती आम्ही सरकारला करावी काय? 8) पृथ्वी हा ग्रह आहे. त्याचा पत्रिकेत ग्रह म्हणून का समावेश नाही? 9) ग्रहाचा मानवी जीवन प्रवाहावर परिणाम होतो असे फलज्योतिषी सांगतात व त्यावरच त्यांचे शास्त्र अवलंबून आहे. याला वैज्ञानिक आधार काय? एकाच स्थळी व एकाच ठिकाणी राहणार्या माणसांवर एकाच ग्रहाचे, ते केवळ वेगवेगळ्या वेळी जन्मले म्हणून वेगवेगळे परिणाम कसे होतील? 10) सगळे ग्रह व सूर्य यांची भ्रमणकक्षा व काळ निश्चित आहे. पुढील पाच हजार वा पाच लाख वर्षानंतर तो निश्चित ठरावीकच असणार आहे. याचाच अर्थ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याचे भविष्य तो जन्मत:च ठरलेले असते. असे असतानाही अनेक ज्योतिषी ग्रहदशा बदलण्याचे व ग्रहांचे अरिष्ट टाळण्यासाठी अनेक पूजा, ताईत, खडे वगैरे उपाय सांगतात व ठरलेले आयुष्य बदलवता येते असेही सांगतात. ते कसे? ग्रहांची दिशा, स्थान व भ्रमण निश्चित असूनही या उपायांनी माणसांचे भविष्य बदलतेच कसे? हे सगळे उपाय म्हणजे सामान्य लोकांना लुबाडण्याची ज्योतिष्यांची एक क्लृप्ती नव्हे काय? मुळात माणसांचं आयुष्य ठरलेलं असतं हे सांगणंच लबाडी नव्हे काय? 11) माणसाचा जन्म आणि मृत्यू ठरलेला असतो का? ठरलेला नसेल तर फलज्योतिषाला काही आधार उरेल काय? पण जर जन्म ठरलाच असेल तर मनुष्य स्वत: निर्णय घेऊन आजच्या काळात भारतीय कायद्याच्या परवानगीने कृत्रिम गर्भपात करतो व जन्माला येणार्या नव्या मनुष्याचे अख्खे आयुष्यच थांबवतो, हे कसे? ठरलेला जन्म कृत्रिम उपायांनी थांबवणारा मनुष्य. ग्रहांपेक्षा वा नियंत्यापेक्षा मोठा मानायचा का? 12) मृत्यू ठरलेला असतो का? अ) तो जर ठरलेला असेल तर, 1930 साली भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य केवळ 18 वर्षे होते. आता ते 68 वर्षापेक्षा अधिक झाले आहे. हे अधिकचे सरासरी आयुष्य भारतीयांच्या वाटय़ाला कुठून आले? याचे उत्तर फलज्योतिष्यांना पत्रिकांमध्ये दाखवता येईल का? आ) मृत्यू ठरलेला असतो असे मानणारे ज्योतिषी आपल्या घरच्यांना व स्वत:लाही औषधोपचार का करतात? ते डॉक्टरांची मदत का घेतात? जर मृत्यू ठरलेल्या क्षणीच होणार असेल तर डॉक्टरांची मदत घेऊन स्वत:चा व स्वत:च्या नातेवाईकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करून पैसा फुकट घालविणे मूर्खपणाचे नव्हे का? इ) एकाच अपघातात ज्यावेळी शेकडो लोक मरतात त्या वेळी त्या सगळ्यांचा मृत्युयोग असतो काय? नागासाकी-हिरोशिमा अणुस्फोट व सगळ्याच मोठय़ा अपघातांबद्दल काय? तसा पुरावा पत्रिका तपासून देता येईल काय? 13) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या पंचवीस वर्षापासून ज्योतिष्यांना सारखी आव्हाने देत आहे, तरी ज्योतिषी ती आव्हाने स्वीकारून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तोंड एकदाचे बंद का करीत नाही? 14) दोनदा 20-20 पत्रिकांच्या आधारे, माणूस मेलेला आहे की जिवंत आहे व स्त्री की पुरुष आहे हे सांगा. दोन्ही वेळेस उत्तरे 90 टक्क्यांपेक्षा अधिक 95 टक्के अचूक निघायला हवीत. तर 15 लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल किंवा मानवी जीवनातील, तपासून शहानिशा करता येतील अशा कोणत्याही पाच घटना (लग्न, मूल, नोकरी, शिक्षण, अपघात, बढती वगैरे) वीस पत्रिकांच्या आधारे सांगाव्यात. त्या 90 टक्के खर्या ठराव्यात. दोनदा वीस-वीस पत्रिकांची भाकिते 90 टक्के अचूक निघावीत. 15 लाख मिळतील; पण 70 टक्के जरी खरी निघाली (दोनदा 20-20) तरी ते शास्त्र असू शकते असे आम्ही मानू, अशी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन नागपूर समितीने पुणे, धुळे, अमरावती या चारही अ. भा. ज्योतिष अधिवेशनात जाहीर आव्हाने दिली होती. ती आव्हाने स्वीकारून आपली बाजू सत्य असल्याचे ज्योतिष महामंडळ का सिद्ध करू शकले नाही? याचा अर्थ, फलज्योतिषशास्त्र नाही असाच घ्यायचा का? 15) कोणताही महत्त्वाचा ज्योतिषी वा ज्योतिष महामंडळ, या आव्हानानंतर पुढे आले नाही; पण श्री. एम. कटककर नावाचे ज्योतिषी मात्र आव्हान स्वीकारण्याची एक बालिश भाषा घेऊन पुढे आले होते. ते म्हणाले होते, मी माणसांची स्वभाववैशिष्टय़े सांगतो. त्या वेळी अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे आव्हान एका अटीवर स्वीकारण्याचे मान्य केले. कटककरांसोबत पाचव्या वर्गातील, फलज्योतिषाचे कुठलेही ज्ञान नसलेली कुठलीही 10 मुले बसवू. त्या दहा मुलांना पत्रिका न पाहताच अंदाजे स्वभाववैशिष्टय़े सांगावीत व श्री. कटककर महाशयांनी पत्रिका पाहून स्वभाववैशिष्टय़े सांगावीत. एका जरी शाळकरी मुलाने कटककरांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले, तर मात्र कटककरांनी त्या मुलाची व जनतेची जाहीर माफी मागावी व धंदा बंद करावा. त्या वेळी या प्रतिआव्हानातून एम. कटककरांनी चक्क पळ काढला. तरी असा पळपुटा ज्योतिषी, ज्योतिष महामंडळाच्याच नव्हे, तर अधिवेशनाच्या स्टेजवरही दिमाखाने मिरवतो आहे, हे ज्योतिष्यांना व अधिवेशनाला कितपत भूषणावह आहे? या प्रश्नांची उत्तरं ज्योतिष्यांनी जाहीररीत्या द्यावीत. पण ज्योतिषी या प्रश्नांची उत्तरं न देता ज्योतिष्यावरची टीका म्हणजे हिंदू धर्मावरचा हल्ला अशी ओरड करतात. मग स्वातंर्त्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद हिंदू नव्हते का?<br /><br />पेशव्यांची पेशवाई पाण्यात गणपतीसारखीच बुडाली<br /><br />स्वातंर्त्यवीर सावरकर फलज्योतिषाद्वारे मुहूर्त पाहण्यावर कडाडून हल्ला करताना फार सुंदर युक्तिवाद वापरतात.<br /><br />''मुहूर्तावर मुळीच विश्वास न ठेवणार्या मूठभर इंग्रजांनी पृथ्वीवर सूर्य मावळणार नाही एवढय़ा विस्तीर्ण प्रदेशावर-भूमीवर साम्राज्य निर्माण केलं आणि मुहूर्तावर, शुभ-अशुभावर विश्वास ठेवणारे पेशवे, डावा पाय पुढे ठेवायचा की उजवा पाय पुढे ठेवायचा हे ज्योतिष्याला विचारून ठरविणारे पेशवे, संकट आलं की विघ्नहर्त्या गणपतीस पाण्यात बुडवून ठेवत असत. अशा पेशव्यांची पेशवाई इंग्रजांमुळं गणपतीसारखीच पाण्यामध्ये बुडाली.''<br /><br />स्वातंर्त्यवीर सावरकर एवढय़ावरच थांबत नाहीत, तर वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणी मनोवृत्तीवर टीका करणारे, जन्मानं चित्पावन ब्राह्मण असलेले सावरकर म्हणतात,''आम्ही ब्राह्मण शेंडय़ा का ठेवतो? कारण अखिल ब्रह्मंडात असलेल्या सगळ्या ज्ञानलहरी (सगळं ज्ञान) केवळ आमच्याच डोक्यात शिराव्यात म्हणून आम्ही रेडिओच्या एरिअलसारख्या शेंडय़ा ठेवतो.''<br /><br />भविष्यावर विश्वास म्हणजे कर्तृत्वाला सोडचिठ्ठी<br /><br />भविष्यावर विश्वास म्हणजेच नशिबावर विश्वास; आपलं भविष्य आधीपासूनच ठरलं आहे असं मानलं तरच ज्योतिषी ते ओळखून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करताहेत असं मानता येईल ना? नशिबावर विश्वास ही गोष्ट कोणत्याही राष्ट्राच्या उत्थानाकरिता, नागरिकांच्या स्वकर्तृत्वाकरिता घातकच आहे.<br /><br />स्वामी विवेकानंदांसारख्या, हिंदू धर्माची पताका समुद्रापार पोहोचविणार्या द्रष्टय़ालासुद्धा आग्रहानं सांगावं लागलं की,''जोवर या देशातले तरुण नशिबावर आणि दैवावर विसंबून राहताहेत तोवर या देशाला भवितव्य नाही.'' ज्योतिषाचं समर्थन म्हणजेच दैववादाचं समर्थन, नशिबाचं समर्थन, माणूस नियतीच्या हातचं बाहुलं असल्याचं समर्थन नव्हे का? (क्रमश:)<br /><br />(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा<br /><br />निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)<br /><br />भ्रमणध्वनी-9371014832</span></td></tr>
</tbody></table>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-81465365761943758812012-12-05T00:30:00.002-08:002012-12-05T00:30:32.505-08:00आनंदानं जगायचं असेल, तर अतिशय निर्भय बना<table style="background-color: white; font-family: arial; width: 100%px;"><tbody>
<tr><td><div class="haedlinesstory" style="font-family: Mangal, Arial; font-size: 17px; font-weight: bold; margin-left: 10px; padding: 0px;">
<br /></div>
</td></tr>
<tr><td><table align="left"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/01122012/01122012-md-ng-6-3506-1-small.jpg" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" style="cursor: pointer; font-size: 11px;" /></td></tr>
</tbody></table>
<span class="bodyd" style="color: #2c2c2c; font-family: arial; font-size: 14px; line-height: 24px;">समस्या, प्रत्येकाच्या जीवनात समस्याच समस्या असतात. काही माणसं समस्यांखाली पार पिचून जातात, गलितगात्र होतात. काही माणसं माझ्या जीवनात समस्याच समस्या आहेत अशी सारखी ओरड करीत असतात. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये एमिले कोया नावाचा एक मानसोपचार करणारा व्यक्ती होऊन गेला. त्याच्याकडे हजारोंच्या संख्येने लोक येत असत, उपचार घेत असत आणि रोगदुरुस्त होऊन जात असत. खरं म्हणजे ºिश्चन धर्मात 'फेथ हिलिंग' नावाची प्रक्रिया आहे. येशू ºिस्ताच्या नावावर ही प्रक्रिया चालते. रोगदुरुस्तीकरिता मोठय़ा प्रमाणावर वापरली जाते. भारतात त्याला 'चंगाई सभा' असंही म्हटलं जातं. या फॉर्मासिस्ट असणार्या एमिले कोयाने 'फेथ हिलिंग'चं नाव घेतलं असतं तर जगभरात मानसन्मान, पैसा, कीर्ती त्याला प्राप्त झाली असती; पण तो एवढा वैज्ञानिक मनोवृत्तीचा व प्रामाणिक गृहस्थ होता की, आलेल्या प्रत्येक रोग्याला म्हणायचा, ''तुम्ही दुरुस्त झाला आहात हे तुमच्या मनाचं सामर्थ्य आहे. मी फक्त तुम्हाला ते वापरायला शिकवलं आहे, प्रवृत्त केलं आहे.''<br /><br />असंच एकदा त्याच्याकडे आलेल्या पेशंट बाईने तिच्या समस्या सांगायला सुरुवात केली. त्याने तिचं म्हणणं समजून घेतलं आणि तिला म्हणाला,''बाई, तुम्ही काय करता की तुमच्या जीवनात निर्माण झालेली एखादी छोटीशी जरी समस्या असेल तरी तुम्ही सारखा तिचाच विचार करता. विचार करून करून मुळात उंदराएवढी असलेली समस्या डोंगराएवढी करून ठेवता आणि मग त्या डोंगराएवढय़ा समस्येच्या ओझ्याखाली पार पिचून जाता. समस्या केवळ विचार करून करून कधीच सुटत नसतात. या जगात समस्या सोडविण्याचे दोनच मार्ग आहेत. एक जी समस्या तुमच्या जीवनात निर्माण झाली असेल तिचा एकदाच विचार करा. ती सोडविण्यासंबंधीच्या मार्गाचा विचार करा. निर्णय घ्या! आणि तडकाफडकी समस्या सोडवून मोकळे व्हा! योग्य, अचूक मार्गाचा वापर करा आणि त्या समस्येपासून मुक्त व्हा!<br /><br />समजा ती समस्या तुम्हाला सोडवणं शक्यच नसेल. तुमच्या अधिकारक्षेत्राच्या, क्षमतेच्या, ताकदीच्या बाहेरची असेल तर ती समस्या आपल्या जीवनात नाहीच आहे, असं गृहीत धरून जगायला शिका. समस्या सोडविण्याचा हा दुसरा मार्ग आहे.''<br /><br />एमिले कोयाने समस्या सोडविण्याचे हे दोन मार्ग सांगितले आहेत. तेवढेच हे दोन मार्ग या जगात आहेत. आपण सर्वसामान्य माणूस काय करतो की, समस्या सोडविण्याविषयीचा निर्णय घ्यायला घाबरतो. अनिर्णीत अवस्थेत राहिल्यामुळे प्रचंड नुकसान होतं. अनेकदा असं आपल्याला वाटतं,''मी निर्णय घेतला आणि तो चुकला तर?'' कदाचित काही काळ वाट पाहिल्यानंतर समस्या आपोआप सुटेल अथवा अधिक अचूक निर्णय घेण्याची संधी मिळेल; पण असं दरवेळी घडणं शक्य नसतं. आपला हॅम्लेट झाला असेल, द्विधा मन:स्थिती झाली असेल, तर कागदपेनाचा वापर करावा, या समस्येबाबत 'अ' निर्णय घेतला तर काय फायदे होतील, काय तोटे होतील हे लिहून काढावे. हा विचार करीत असताना मी 'अ'च निर्णय घेणार आहे, असं गृहीत धरून सखोल, सांगोपांग विचार करावा व फायदे-तोटे तपशीलवार लिहून काढावेत. थोडय़ा वेळानंतर 'ब' निर्णय घेतला तर काय फायदे-तोटे होतील हेही तपशीलवार लिहून काढावे. कदाचित या समस्येत तिसराही निर्णय घेणे शक्य असेल तर तिसरा 'क' निर्णय घेतल्यावर काय फायदे-तोटे होतील तेही विस्तारानं कागदावर नोंदवावं. ही कसरत करताना आपल्याच विचारांना दिशा मिळते. मनाचा गुंता, विचारांचा गुंता सोडवायला मदत होते. वाटल्यास तेव्हाच वा एखाद्या दिवसानंतर पुन्हा 'अ', 'ब' व 'क' नीट वाचावं आणि सर्वात जास्त योग्य वाटेल (त्या वेळी) तो निर्णय घेऊन मोकळं व्हावं. हा निर्णय घेण्याचा उत्तम व जास्तीतजास्त अचूक ठरू शकणारा मार्ग आहे. केवळ समस्येकरिताच नव्हे, तर कोणताही निर्णय घेण्याबाबत साशंक असाल त्या वेळी हा मार्ग वापरता येईल.<br /><br />काही समस्या आपल्याला सोडविता येत नसतात. ही जीवनातील वस्तुस्थिती आहे. अशा वेळी हे सत्य स्वीकारून ही समस्या अशीच राहणार आहे असं गृहीत धरून जगावं लागतं. जगायला शिकावं लागतं. आपल्या आजूबाजूला कसंही वातावरण असलं तरी त्याचा मनावर परिणाम न होऊ देण्याचं सामर्थ्य आपल्या मनात आहे. हे आपण आधीच्या लेखांमध्ये पाहिलेलं आहे. यालाच ती समस्या अस्तित्वातच नाही, असं गृहीत धरून जगायला शिकणं म्हणतात.<br /><br />आपल्या जीवनात आनंदानं जगायचं असेल आणि दुसर्यालाही आनंदानं जगू द्यायचं असेल तर काही दृष्टिकोन स्वीकारावे लागतात.<br /><br />एक विधायक विचार करा! आणि विधायकच वागा! आपण नाटक पाहतो, सिनेमा पाहतो, कादंबर्या वाचतो. या सगळय़ांमधून 'टिट फॉर टॅट'. 'कोणी आरे म्हटलं तर त्याला कारे म्हणायचं,' असं शिकवलं जातं. त्यामुळे बदला, प्रतिशोध, दुश्मनी निभावणं यात सर्वसामान्य माणून अडकून पडतो. आपल्या आजूबाजूची माणसं आपल्याविषयी वाईटसाईट बोलतात, टीका करतात, चिखल फेकण्याचा प्रयत्न करतात. हे ऐकलं की आपण पिसाळतो, आपण त्यांच्याबद्दल वाईटसाईट बोलतो. उत्तरं देण्याच्या प्रयत्नात चिखलफेक करतो. आपली सगळी निर्मितीक्षमता, ऊर्जा असल्या निर्थक गोष्टींत खर्च करतो. परिणामत: आपल्या आजूबाजूच्या खुज्या माणसांप्रमाणे आपणही खुजे बनत जातो आणि मग 'अवघे खुजे धरू सुपंथ' या पद्धतीने जगत जातो. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. आपली एनर्जी असल्या क्षुल्लक गोष्टीत खर्च न करता सगळी निर्मितीक्षमता आणि ऊर्जा चांगल्या कामात खर्च करावी. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची उंची वाढविण्यात खर्च करावी. स्वत: एवढं वाढत जावं की, बोलणार्याची टीका आपल्या कानापर्यंत पोहोचूच नये. कुणी थुंकण्याचा प्रयत्न केला तर त्याची थुंकी आपल्यापर्यंत पोहोचूच नये. हा खरा विधायक मार्ग आहे. मानवी जीवनात खूप विधायक पद्धतीने वागता येतं. त्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो.<br /><br />एक ऋषी महोदय सकाळच्या वेळी सूर्याला अघ्र्य देण्यासाठी नदीच्या पात्रात उभे होते. ते ओंजळीत पाणी घेऊ लागले. त्यांच्या हातात पाण्यासोबत एक विंचू आला, चावला. विंचवाला सोडायचं म्हणून त्यांनी ओंजळीतील पाण्यासोबत विंचवाला सोडून दिलं. पुन्हा ओंजळीत पाणी घेऊ लागले. पुन्हा विंचू ओंजळीत आला. फरक जाणवला. हे वारंवार घडायला लागलं. त्यांच्या बाजूला उभा असलेला त्यांचा शिष्य म्हणाला,''गुरू महोदय, हे तुम्ही काय करता आहात? (एकदा तुम्ही त्या विंचवाला जीवदान दिलं हे मी समजू शकतो; पण तो वारंवार तुमच्या ओंजळीत येतो. वारंवार चावतो तेव्हा एकदाचं ह्या विंचवाला ठेचून मारा आणि सूर्याला अघ्र्य अर्पण करण्याचं पवित्र कार्य निर्विघ्नपणे पार पाडा.'' यावर गुरू महोदय मिस्कीलपणे उद्गारले, ''मित्रा, त्याचं असं आहे की, चावणं हा कदाचित त्या विंचवाचा धर्म असेल. (संस्कृत भाषेत 'धर्म' या शब्दाचा दुसरा अर्थ 'स्वभाव'सुद्धा होतो.) प्राणिमात्रांवर दया करणं हा माझा धर्म आहे. तो त्याचा धर्म पाळतो आहे, मी माझा धर्म पाळतो आहे.'' एवढय़ा एक्सटेंटपर्यंत, या मर्यादेपर्यंत तरी माणसाला विधायक वागता येतं आणि आपण तसं वागायला हवं. किमान जोपर्यंत कुणी आपल्या जीवावरच हल्ला करीत नाही, अस्तित्वच खुंटवून टाकत नाही तोपर्यंत तरी आपल्याला विधायक विचार करता येतो आणि विधायक वागता येतं.<br /><br />खूप माणसं आयुष्यात जगताना भीतभीत जगत असतात. कोण काय म्हणेल? लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल? अशा प्रश्नांच्या दडपणापोटी मनापासून जे करायचं असतं तेही करीत नाही. अनेक प्रकारांची भीती बाळगतात. उद्या काय होईल? भविष्यात काय घडेल? या काल्पनिक ओझ्याखाली दडपून जातात. भूतकाळामधल्या नकारात्मक गोष्टी आठवून आठवून स्वत:चं नुकसान करून घेतात. भूतकाळातील सावली सतत त्यांचा पिच्छा पुरवीत असते.<br /><br />जीवनात खरंच जगायचं असेल, आनंदानं जगायचं असेल तर सगळय़ा प्रकारची भीती मनातून काढून टाका. अतिशय निर्भय बना, जीवनामध्ये जगत असताना प्रत्येक क्षण आणि क्षण समरसून जगा. समरसतेनं, एकाग्रतेनं जगलेला प्रत्येक क्षण आपल्याला आनंद देऊन जातो. खेळण्याच्या मैदानावर आपण दोन तास समरसून खेळतो. प्रचंड थकतो. अक्षरश: घामानं निथळतो. तरी त्या क्षणी आपल्या मनाला खूप आनंद होतो. कारण ते खेळण्याचे दोन तास आपण एकाग्रतेनं समरसून घालविलेले असतात. कितीही कष्टाचं काम असेल, मेहनतीचं, वेदनादायक काम असेल आणि ते आपण मनापासून एकाग्रतेनं करणार असू, तर त्या कामातून आपल्याला आनंदच प्राप्त होतो.<br /><br />जर आपण आपल्या जीवनात प्रत्येक काम मनापासून करू लागलो, समरसून करू लागलो तर आपलं सारं जीवनच आनंदमय बनून जाईल. त्यामुळे जीवनात जे काही करायचं आहे ते मनापासून, समरसून, एकाग्रतेनं करा! वर्तमानकाळातला प्रत्येक क्षण जगताना त्यावर भूतकाळाची सावली पडू देऊ नका आणि भविष्यकाळातील काल्पनिक ओझंही पडू देऊ नका.<br /><br />जीवनात जेव्हा एखाद्या गोष्टीला मनापासून 'हो' म्हणावसं वाटत असेल, तर आतून झालेल्या सद्सद्विवेकबुद्धीनुसारसुद्धा 'हो'च म्हणावसं वाटत असेल तर 'हो'च म्हणा! कारण एकदा आलेली संधी पुन्हा येतेच असं नाही.<br /><br />ज्यावेळी मनापासून, आतून सद्सद्विवेकबुद्धीनुसारसुद्धा 'नाही'च म्हणावसं वाटत असेल तेव्हाही ठामपणे 'नाही'च म्हणा! फक्त समोरच्या व्यक्तीला नीट समजावून सांगून, नम्रपणे 'नाही' म्हणा! सर्वसामान्य माणूस दडपणाखाली वा प्रेमाच्या शोषणाला बळी पडून (आई म्हणते म्हणून, नवरा म्हणतो म्हणून, मुलं म्हणतात म्हणून दबावाला बळी पडतो.)'हो' म्हणतो. परिणामत: आपण सद्सद्विवेकबुद्धीनुसार वागत नाही. आपल्या मनाचं ऐकत नाही. त्यामुळं आपल्या व्यक्तिमत्त्वाचा र्हास होतो आणि ज्या व्यक्तीला दडपणाखाली 'हो' म्हटलेलं असतं त्या व्यक्तीच्या कामालाही योग्य न्याय देऊ शकत नाही. दुहेरी नुकसान होतं. आपल्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार निर्णय घ्यावेत. ''माझी सद्सद्विवेकबुद्धी चुकली तर? या भीतीला हद्दपार करा! आपली सद्सद्विवेकबुद्धी केव्हा मॅच्युअर होणार? त्याला वयाची लिमिट काय असू शकते? याचं काहीही गणित असू शकत नाही. आपल्या सद्सद्विवेकबुद्धीवर विश्वास ठेवा! तिच्यावर विसंबून राहा! आयुष्यात जेव्हा 'हो' म्हणायचं असेल तेव्हा 'हो' म्हणा! 'नाही' म्हणायचं असेल तेव्हा 'नाही'च म्हणा! चूक होईल याची भीती बाळगू नका! मानवी जीवनात कितीही प्रयत्न केला तरी चुका होतातच. झालेली चूक स्वीकारा. चूक दुरुस्त करण्याची यंत्रणा स्वत:त निर्माण करा. चुकांपासून शिकत जा! आणि सातत्यानं यशाच्या दिशेनं वाटचाल करीत जा. आनंदानं जगत जगत कितीही कष्ट पडले तरी हसतमुखानं वाटचाल करीत जात हे मानवी जीवनाच्या सुखाचं, यशाचं रहस्य आहे, मर्म आहे.<br /><br />(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन<br /><br />समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)<br /><br />भ्रमणध्वनी-9371014832</span></td></tr>
</tbody></table>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-22253982469874719232012-11-27T05:57:00.002-08:002012-11-27T05:57:44.079-08:00सुख-दु:ख, यश-अपयशाची निर्मिती मेंदूत होते!<br /><table style="background-color: white; font-family: arial; width: 100%px;"><tbody>
<tr><td><table align="left"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/24112012/24112012-md-ng-4-3524-1-small.jpg" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" style="cursor: pointer; font-size: 11px;" /></td></tr>
</tbody></table>
<span class="bodyd" style="color: #2c2c2c; font-family: arial; font-size: 14px; line-height: 24px;">आनंदी राहा आणि इतरांना आनंदी करा, 'बी हॅपी! अँण्ड मेक अदर्स हॅपी' हा निसर्गमंत्र जीवनात अमलात आणणं एवढं कठीण आहे? अशक्य आहे?<br /><br />आजूबाजूला केवढी दु:खं आहेत? जीवनात केवढय़ा समस्या आहेत? सारं जीवनच वेगवेगळ्या दु:खांनी भरलेलं आहे. 'एक धागा सुखाचा.., तर शंभर धागे दु:खाचे' अशी जीवघेणी वस्तुस्थिती आहे. म्हणूनच दु:ख असह्य झाल्यावर अनेक लोक आत्महत्या करतात. प्रेमाचं, विरहाचं, प्रेमभंगाचं दु:ख असह्य झाल्यानं प्रेमी हे जग सोडून जातात. कर्जाच्या ओझ्याखाली पिचलेला शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. पत्नीनं बदफैलीपणा केला म्हणून पती इहलोक सोडून जातो. पतीनं दुसरा घरठाव केला म्हणून पत्नी संसार अध्र्यावर सोडून निघून जाते. काही माणसं जगतात, पण मरणप्राय यातना, दु:ख भोगत जगत असतात. असल्या जगण्यापेक्षा मृत्यू बरा असं त्यांना वाटत असतं. हे जग असं आहे. यातील खरं काय आहे?<br /><br />दु:खाचा संबंध आपल्या मनाशी आहे. मनावर होणार्या परिणामांबद्दल दोन विचारधारा आहेत. एक आध्यात्मिक, पारलौकिक विचारधारा. मन प्रचंड सामर्थ्यशाली असतं. त्याची शक्ती एवढी वाढवता येते की त्याचा परिणाम आजूबाजूच्या वस्तूंवर, परिस्थितीवर, माणसांवर निसर्गावरसुद्धा होऊ शकतो. त्याची क्षमता एवढी वाढवू शकतो की मन:सामर्थ्यानं वस्तूसुद्धा हलू शकते, वाकू शकते. परिस्थिती हवी तशी बदलू शकते. प्रकाशापेक्षाही अधिक वेगाने मन प्रवास करू शकतं. 'अँस्ट्रल ट्रॅव्हल' करू शकतं.<br /><br />पण या विचारधारेनुसार मानलेलं मन:सामर्थ्य आजवर सिद्ध होऊ शकलं नाही. किमान वैज्ञानिक कसोटय़ांवर ते कुणालाही सिद्ध करता आलं नाही. जगभर संशोधनं झालीत; पण असं काही आजवर सिद्ध झालं नाही. उद्याही सिद्ध होण्याची शक्यता नाही.<br /><br />दुसरी विचारधारा मार्क्सवादी, जडवादी, भौतिक विचारधारा. मन हे आजूबाजूच्या परिस्थितीनुसार घडतं. माईंड इज ए रिझल्टंट ऑफ मॅटर (अँटमॉस्पिअर). थोडक्यात ते आजूबाजूच्या परिस्थितीचं गुलाम असतं. स्वतंत्र नसतं. परिस्थितीला वातावरणाचा परिणाम ते टाळू शकत नाही. दु:खी परिस्थितीनं ते दु:खीच होणार?<br /><br />वरपांगी पाहताना आपल्याला हे मत, ही विचारधारा खरी वाटू शकते, वाटते. कारण आपल्यापैकी बहुतेकांवर भोवतालच्या परिस्थितीचा, वातावरणाचा असा गडद प्रभाव पडतो. त्यानुसार आपलं मन दु:खी बनतं वा आनंदी बनतं.<br /><br />पण सत्य मात्र वेगळचं आहे. हिप्पोक्रेटस, औषधशास्त्राचा जनक साडेबावीसशे वर्षापूर्वी म्हणून गेला, 'माणसाचं सुख आणि दु:ख', 'यश आणि अपयश' त्याच्या मेंदूतून निर्माण होतं आणि मगच जीवनात ते प्रत्यक्ष अमलात येतं.<br /><br />स्पिनोझा नावाचा एक महान तत्त्वज्ञ म्हणून गेला, 'हॅप्पिनेस इज द अल्टिमेट व्हच्र्यू' (आनंदी असणं हा मानवी जीवनातील सर्वात मोठा सद्गुण आहे.) अथवा विसाव्या शतकातील एक महान वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञ बट्रॉंड रसेल यानं 'सुखी माणसाचा सदरा' (पुस्तक लिहून) मानवजातीला घातला आहे. सुखी कसं राहता येतं ते शिकवलं आहे.<br /><br />हे खरं आहे की, माणसाला जिवंत राहण्यासाठी आवश्यक असणार्या प्राथमिक गरजांची पूर्तता झाल्याशिवाय त्याला आनंदानं जगता येणार नाही. अन्न, वस्त्र व निवारा मिळालाच पाहिजे. त्याच्या नैसर्गिक गरजा पूर्ण झाल्याच पाहिजे. अर्थात, या गरजा पूर्ण करण्यासाठी गरीब माणसांना प्रचंड धडपड करावी लागते, काबाडकष्ट करावे लागतात, खूप मेहनत घ्यावी लागते.<br /><br />समजा रडत, भेकत, कुथत, दु:खीकष्टी होत एखादी 'अ' व्यक्ती कष्ट करते. आठ-दहा तास काबाडकष्ट केल्यावर त्याच्या हातावर त्या दिवसाची मजुरी पडते. या पैशातून तो रात्रीसाठीचा शिधा घेतो. पुन्हा रडत, कुथत, नशिबाला दोष देत, ''माझ्याच वाटय़ाला कां हे भोग? इतर कसे आनंदात जगताहेत?'' असा विचार करत शिधा रांधतो. जेवतो, पोटभर जेवतो., तृप्त होतो. जेवल्यावर हा माणूस आनंदी होईल कां? नाही. कदाचित त्याचं शरीर अन्न ग्रहण केल्यावर तृप्त होईल; पण मन मात्र आनंदी होणार नाही. उलट ''आजतर कसंबसं जेवलो, पण उद्या काम मिळेल कां? जेवायला मिळेल की उपाशी राहावे लागेल?'' याच विवंचनेत, तळमळून तो रात्र काढेल. कदाचित त्याला धड झोपही लागणार नाही. तो सारखा अस्वस्थ, चिंताग्रस्त असेल.<br /><br />समजा दुसरा 'ब' माणूस,''चला छान काम करू या, आनंदानं काबाडकष्ट करू या'' अशा मनोवृत्तीनं कामावर भिडला. पहिल्या 'अ' इतकीच त्यानं मेहनत घेतली. मिळालेल्या मजुरीतून शिधा घेतली. आनंदानं स्वयंपाक केला, जेवला. तर शरीरही तृप्त होईल आणि मनंही आनंदानं तृप्त होईल. ''आजचं तर छान झालं. उद्याचं उद्या पाहू. काहीतरी काम मिळेलच. नाही मिळालं तर ठीक आहे. काहीतरी मार्ग शोधूच.''<br /><br />हा आशावादी, आनंदी माणूस शांतपणे झोपी जाईल. तुमच्यापुढे ठेवलेली दोन्ही उदाहरणं काल्पनिक नाहीत. आपल्या देशात शेकडय़ानं अशी (दोन्ही) उदाहरणं पाहायला मिळतात. कष्ट करताना शरीराला तोषीस पडू शकते, कॅलरीज जळू शकतात; पण त्यानं दु:खच होतं असं नाही. तर कितीही कष्टाचं काम करताना ते आनंदानं करता येण्याचं सामर्थ्य आपल्या मनात आहे. प्रचंड काबाडकष्ट उपसताना, अर्धपोटी राहतानासुद्धा आनंदानं, हसतमुखानं जगणारी कितीतरी माणसं मी याच देशात खेडय़ापाडय़ात पाहिली आहेत.<br /><br />ज्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होण्यामध्येही अनंत अडचणी येतात, अशीही माणसं जर आनंदानं जगू शकतात, तर ज्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतात, त्यांना दु:खी असण्याचं कारण काय? किमान मध्यमवर्गीय माणसांनी तरी आनंदी राहायला नको कां? कारण दृष्टिकोन! 'अँटिटय़ूड'! आपला आपल्याकडे, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर सारं अवलंबून असतं. तुम्ही जर 'एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे'वाले असाल तरतुम्ही नेहमी दु:खीच राहणार! एकुलता एक सुखाचा धागासुद्धा तुम्हाला सुख देऊ शकत नाही. ''काय उपयोग? हे सुख थोडचं टिकणार आहे? आपल्या वाटय़ाला तर नेहमी दु:खच दु:ख! आपलं नशीबच असं..'' समोर असलेल्या सुखावर, आनंदावरसुद्धा तुम्ही पार बोळा फिरविणार. सुखाच्या आताच्या वर्तमान क्षणांवर भविष्यातील काल्पनिक दु:खांचे डोंगर चढवून सुखी क्षणही तुम्ही चिरडून टाकणार! हेही आपल्या मनाचं सामर्थ्य आहे. मनानं, मन:सामर्थ्यानं तुम्ही कदाचित समोरची, भोवतालची परिस्थिती बदलवू शकत नाही; पण समोरच्या कोणत्याही, कशाही परिस्थितीचा मनावर किती आणि कसा परिणाम होऊ द्यायचा हे ठरविण्याचं सामर्थ्य मात्र निश्चितपणे आपल्या मनात आहे आणि हे मनाचं सामर्थ्य समर्थपणे वापरणं हेच खरं अध्यात्म आहे. आजच्या परिभाषेत याला आपण मानसशास्त्र म्हणतो. मनाचं शास्त्र म्हणतो.<br /><br />आज आपण जागतिकीकरणाच्या खुल्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या अजस्र विळख्यात जगत आहोत. त्यालाच आधुनिकीकरण, प्रगती समजतो आहोत. या भांडवलशाही अर्थरचनेनं काही आभासी मूल्य तुमच्या-माझ्यावर लादली आहेत. मूठभर कार्पोरेटस् आणि मोजक्या भांडवलदारांचा धनसंचय अमाप वाढायचा असेल तर अशी 'आभासी मूल्य' समाजात रुजणं नितांत गरजेचं आहे. सगळ्या माध्यमांमधून ही मूल्य खोलवर रुजवली जातात. आपल्या नकळत मनात खोलवर ती रुजतात.<br /><br />त्यातील आजचं एक मूल्य आहे. 'सक्सेस, सक्सेस, सक्सेस' 'नथिंग सक्सिडस् लाईक सक्सेस', यशासारखी यशस्वी गोष्ट दुसरी कोणतीही नाही. यशस्वी व्हा!<br /><br />यशस्वी होणं म्हणजे काय? हेही आपल्याला सांगितलं जातं, आपल्या मनात खोलवर कोरलं जातं. ''भरपूर पैसे कमवा, उच्चपदावर विराजमान व्हा, आणखी पैसे कमवा, कार, साधी नाही बी.एमड.ब्ल्यू. कार, मोठा फ्लॅट, बंगला बाळगा, सुटाबुटात वावरा, मस्त पाटर्य़ा करा, छान दारू एन्जॉय करा, पुन्हा कष्ट करा, सारखे धडपडा, आणखी आणखी उच्चपदावर जा, अधिकाधिक पैसे कमवा. अधिक पाटर्य़ा-दारू एन्जॉय करा, अधिकाधिक सक्सेस व्हा.''<br /><br />खरं म्हणजे गेली 21-22 वर्षे मी मानवी विकासाच्या, व्यक्तिमत्त्व विकासाच्या क्षेत्रात व्यावसायिक पद्धतीनं कार्यशाळा चालवतो आहे. लोकांना यशस्वी, आनंदी, सुखी कसं व्हावं ते शिकवतो आहे. मानसशास्त्राचा, भारतीय अध्यात्माचा गाढा अभ्यास केल्यानंतर आधीची 20-22 वर्षे सार्वजनिक क्षेत्रात काम केल्यानंतर मी या मानवी विकास (ह्युमन डेव्हलपमेंट) क्षेत्रात काम करतो आहे. त्यामुळं माणसांना रेसमध्ये धावणारी घोडी न बनता माणूस बनता बनता यशस्वी व्हा, अशी संतुलित शिकवणूक देणं मला शक्य होतं.<br /><br />पण मी जेव्हा या क्षेत्रातले इतर ट्रेनर पाहतो तेव्हा 'मी जिंकणारच, मीच जिंकणारच, मी जिंकणारच', 'मी यशस्वी होणारच, यशस्वी होणारच, यशस्वी होणारच' असे जोरजोरानं खिंकाळणारे घोडेच जिकडेतिकडे दिसतात आणि ते आपल्या कार्यशाळांना आलेल्या माणसांनासुद्धा असंच जोरजोरानं खिंकाळायला लावून रेसचे घोडे बनविण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात आणि यालाच ते 'व्यक्तिमत्त्व विकास' असं म्हणतात. त्या बिच्चार्यांना माहीतच नसतं की खुल्या भांडवलशाहीच्या हातात असणार्या लगामाच्या तालावर नाचणारे घोडे आपण आहोत म्हणून.<br /><br />रात्रंदिवस धावा, आमच्यासाठी राबराब राबा, पाहिजे तेवढे ताजेताजे हरभरे खाऊ घालतो, धष्टपुष्ट बनवतो, आरामदायक एसी तबेल्यांमध्ये ठेवतो. उत्तम धावला. फायदा करून दिला, तर चकचकीत सुंदर, आकर्षक नवं खोगीर घालतो. म्हणजे वरचा हुद्दा देतो. नाही, तर पेकाटात लाथ घालून तबेल्याच्या बाहेर घालवतो. हा एसी तबेल्याची, ताज्या हरभर्याची सवय झालेला धष्टपुष्ट घोडा अपयशाच्या भीतीनं ऊर फुटेस्तोवर धाव धाव धावतो अन् एक दिवस धावता धावताच ब्लडप्रेशर हाय झाल्यानं हार्टफेल होऊन मरतो. नाही तर 'ब्रेन हॅमरेज' होऊन हॉस्पिटलात भरती होतो अथवा वेगानं धावता आलं नाही म्हणून तबेल्याबाहेर घालवलं गेल्यामुळं, अयशस्वितेचा शिक्का बसल्यामुळं, गलितगात्र बनून निराशेच्या गर्तेत स्वत:ला बुडवून घेतो. अशा माणसांना कार्पोरेट, मॅनेजर्स, उद्योजक, आयटी इंजिनिअर्स वगैरे वगैरे म्हटलं जातं.<br /><br />हे खरं आहे की, यश माणसाच्या मेंदूतूनच निर्माण होतं. वारंवार त्याच्या मेंदूत यश प्रोग्राम केलं तर माणसाचा मेंदू त्या दिशेनं वेगानं वाटचाल करेल; पण आपल्या मेंदूत यश म्हणजे नेमकं काय प्रोग्राम करायचं ते आपण ठरवायला नको कां?<br /><br />मद्यसम्राट हौसेनं नागडी कॅलेंडर्स निर्माण करणारा विजय माल्या हाही आजच्या आधुनिक जगातला यशस्वी माणूस आहे. राखी सावंतही यशस्वी आहे. सनी लिओनी ही महेश भटची नटी. पोर्नोग्राफिक स्टारही यशस्वी आहे. असं आजचं यशाला पुजणारं जग मानतं.<br /><br />खरंतर या तिघांच्याही यशाची जातकुळी एकच आहे. महात्मा गांधीजीही एक यशस्वी माणूस होते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरही यशस्वी माणूस होते. गांधी आणि आंबेडकर यशस्वी झाले नसते तर लाखो, कदाचित कोटय़वधी माणसांच्या जीवनात प्रकाश निर्माण झाला नसता; पण आजच्या आधुनिक समाजाच्या यशाच्या व्याख्येनुसार गांधी- आंबेडकर यशस्वी होते कां? पण माल्या, राखी, सनी मात्र यशस्वी आहेत. भरपूर पैसे, समृद्धी, प्रसिद्धी सारं त्यांच्याकडे आहे. त्यामुळं आपण आपली यशाची व्याख्या ठरवणं गरजेचं आहे. रेसमध्ये धावणारे, धष्टपुष्ट, उंची खोगीर घातलेले, एसी तबेल्यात राहणारे घोडे बनायचं आणि यशस्वी व्हायचं की स्वत: आनंदानं जगणारी, दुसर्याच्या जीवनात आनंदाचा, सुगंधाचा दरवळ पसरविणारी माणुसकीपूर्ण माणसं बनायचं आणि यशस्वी व्हायचं.<br /><br />एकदा तुम्ही तुमची यशस्वी व्हायची व्याख्या ठरवली की, त्या दिशेनं स्वत:ला वारंवार सांगून प्रोग्राम करता येतं. त्यासाठी म्हणजे यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते; पण ही मेहनत घेतानाच, आनंदानं मेहनत घ्यायचं ठरवलं, प्रचंड कष्ट हसत खेळत, एन्जॉय करत घ्यायचे ठरविले तर यशापर्यंत पोहोचण्याचा मार्गच खूप आनंद देतो. सारी कष्टप्रद वाटचालच आनंदमय होऊन जाते आणि या वाटचालीत इतर वाटसरूंचा आनंद वाढविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला तर सारी वाटच आनंदानं भरून ओसंडून वाहते. मग यशाच्या शिखरावर पोहोचलं तर अधिकच आनंद! आणि अपयश वाटय़ाला आलं तर? नो चिंता, नवी वाट चोखाळण्याचा नवा आनंद पुन्हा घेऊ या! आनंदी माणसाचा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. अपयशसुद्धा.<br /><br />(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा<br /><br />निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)<br /><br />भ्रमणध्वनी-9371014832</span></td></tr>
</tbody></table>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-66602170210468349842012-11-19T05:14:00.002-08:002012-11-19T05:14:10.738-08:00आनंदी राहा, सोबतच्या माणसांनाही आनंदी करा!<table align="left" style="background-color: white; font-family: arial;"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/17112012/17112012-md-ng-4-3775-1-small.jpg" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" style="cursor: pointer; font-size: 11px;" /></td></tr>
</tbody></table>
<span class="bodyd" style="background-color: white; color: #2c2c2c; font-family: arial; font-size: 14px; line-height: 24px;">'हॅपी दिवाली', दिवाळी आनंदाची जावो, अशा शुभेच्छांचा आपण वर्षाव करतो. उत्तम गोष्ट आहे. पण केवळ दिवाळीच का? प्रत्येकच दिवस का नाही? माणूस दीर्घकाळ सुखाचा शोध घेत आला आहे. आनंदी राहण्याचं रहस्य शोधतो आहे. कदाचित धर्मानी सगळ्यात जास्त सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अजूनही हा शोध सुरू आहे.<br /><br />भूक शमवण्यातलं सुख, प्रणयातलं सुख, बाकी सारी सुखं क्षणभंगुर आहेत. काही काळातच ती ओसरतात. म्हणून चिरकाल, अनंतकाळ टिकणारं सुख शोधण्याचा प्रयत्न धर्मानी केला. भारतीय धर्माना त्यातून मोक्ष ही कल्पना सुचली. मोक्ष म्हणजे सगळ्या सुख-दु:खांपासून सुटका. जन्म-मरणाच्या फेर्यामधून सुटका. चिरंतन आनंदाची अवस्था. आता ही केवळ कल्पना आहे की वस्तुस्थिती आहे, हे आपल्याला कधीच कळू शकत नाही. कारण मोक्ष मरणानंतर प्राप्त होतो आणि मेल्यानंतर माणूस आपली अनुभूती, अनुभव जिवंत माणसांपर्यंत पोहोचवू शकत नाही. त्यामुळं त्या वादात, त्या क्षेत्रात आपण न शिरलेलेच बरं. शिवाय मोक्षाचा एवढा आग्रह असणार्या भारतातील धार्मिक वातावरणात शूद्र-अतिशूद्रांना ढोरापेक्षाही निकृष्टपणे जगण्यास, तब्बल दोन-अडीच हजार वर्षे तरी, प्रवृत्त करणारी चातुर्वण्र्याची कल्पना अमानुषपणे राबवली जाऊ शकतेच कशी? याचाच अर्थ चिरंतन आनंद अवस्था गाठण्यास आसुसलेल्या आध्यात्मिक माणसांचं या जीवनातील दु:खाशी व आनंदाशी काही देणंघेणं नव्हतं. माणुसकीशीही काही देणंघेणं नव्हतं, असं मानायचं काय? असे अनेक अमानुष प्रश्न निर्माण होतात. म्हणून आपण या पृथ्वीवरच्या, इहलोकातील सुखाच्या शोधाविषयी बोलू, विचार करू, समजून घेऊ.<br /><br />गेल्या 10 लाख वर्षापासून आपण दोन पायांचा प्राणी, पृथ्वीवर वावरतो आहे. आजच्या सारखा 'माणूस' म्हणवला जाणारा प्राणी किमान दोन लाख वर्षापासून पृथ्वीवर जगतो आहे. प्रत्येकच प्राण्याकडून निसर्गाच्या किमान दोन अपेक्षा आहेत.<br /><br />एक तीव्रतेनं जगण्याची, वाट्टेल त्या परिस्थितीत, प्रसंगी आटोकाट प्रयत्न करून, संघर्ष करून मारकाट करून जिवंत राहण्याची धडपड करण्याची प्रवृत्ती. जन्म घेण्याच्या प्रक्रियेसोबतच, एक नॅचरल इन्स्टिंक्टचा, जैविक प्रक्रियेचा अविभाज्य भाग म्हणून जगण्याची दुर्दम्य इच्छा प्रत्येक माणसाला, प्राणिमात्राला प्राप्त होत असते. म्हणूनच अगदी टाटा-बिर्ला अंबानी असो की तुमच्या माझ्यासारखा प्राथमिक गरजा पूर्ण करू शकणारा मध्यमवर्गीय माणूस असो की, आज रात्री खायला मिळेल की नाही याचीही शाश्वती नसणारा एखादा भिकारी असो, प्रत्येक जणचं धडपडत जगण्याचा प्रयत्न करीत असतो. जगण्याची, जिवंत राहण्याची दुर्दम्य इच्छा ही प्राणिमात्राला निसर्गानं दिलेली देणगी आहे, निसर्गाची ती अपरिहार्य गरज आहे.<br /><br />दुसरं, प्राणिमात्रानं आपली जात जिवंत ठेवण्यासाठी स्वत:सारखेच प्राणी जन्माला घातले पाहिजे, त्यासाठीसुद्धा वाट्टेल तेवढा प्रयत्न केला पाहिजे, प्रसंगी संघर्ष केला पाहिजे, पण नवी पिढी जन्माला घातली पाहिजे. ही निसर्गाची दुसरी आवश्यकता.<br /><br />माणूस हा उत्क्रांत प्राणी असला तरी सस्तन प्राण्याचे सारे नियम त्याला लागू होतात. मूल जन्माला यायचं असेल तर नर-मादीनं जवळ आलं पाहिजे, त्यांनी मैथुन केलं पाहिजे. तरच नवी पिढी जन्माला येणार. म्हणून नर-मादीमध्ये परस्परांविषयी जबरदस्त ओढ वाटेल, आकर्षण वाटेल अशी यंत्रणा निसर्गानं निर्माण केली. एवढंच नव्हे, तर हे एकत्र येणं कष्टप्रद, त्रासदायक न होता आनंददायक बनेल अशी योजना केली. अगदी नर-मादी एकत्र येताना प्रणयातही आनंद मिळेल, तो वाढत जाईल. एवढा आनंद वाढत जाईल की तो मधेच थांबवता येणं शक्य होणार नाही, त्याचं रूपांतर मैथुनात होईल आणि मैथुनात हा आनंद उत्तरोत्तर वाटत जाईल व त्याची परिणती 'परमोच्च आनंदात' होईल, लैंगिक तृप्तीत होईल. मगच ही प्रक्रिया थांबेल. अशीही योजना निसर्गानं आखली. कारण नर तृप्तीच्या वेळी शुक्राणू सोडले जातात, अपत्य राहण्याची शक्यता वाढते.<br /><br />निसर्गानं हा सारा खेळच आनंदमय करून टाकला. बक्षीस म्हणून परमोच्च आनंद बहाल केला. कारण प्राणी आनंदासाठी धडपडायला, कष्ट घ्यायला तयार आहे म्हणून.<br /><br />प्रणयाराधनातून मनुष्यप्राण्याला जो परमोच्च आनंद मिळतो तेवढा आनंद दुसर्या कोणत्याही माध्यमातून त्याला मिळत नाही, ही वस्तुस्थिती निसर्गानं निर्माण करून ठेवली. कारण नवी पिढी निर्मिती ही निसर्गाची गरज होती.<br /><br />पण हा आनंद क्षणिक असतो, काही सेकंद-मिनिटांचा असतो, त्याऐवजी चिरंतन आनंद प्राप्त करण्यासाठी माणसानं धर्म-अध्यात्म या माध्यमातून प्रयत्न केले. दीर्घकाळ, किमान अडीच-तीन हजार वर्षे हे प्रयत्न सुरू आहेत. त्यात यश मिळालं की नाही या प्रश्नाचं उत्तर मिळणं कठीण आहे.<br /><br />मधल्या काळात, प्रामुख्यानं धर्माच्या या प्रणयाराधनामधल्या निसर्गनिर्मित आनंदावर मर्यादा आणण्याचे खूप प्रयत्न झाले. प्रणय-मैथुन (आधुनिक भाषेत सेक्स) ही प्रक्रिया वाईट ठरली गेली, पाप ठरवली गेली. प्रणय-मैथुन हे आध्यात्मिक प्रगतीच्या, मोक्षाच्या मार्गातले अडथळे आहेत असं मानलं गेलं. ब्रह्मचर्याला प्रचंड महत्त्व दिलं गेलं, प्रतिष्ठित केलं गेलं. जवळपास, मुस्लिम वगळता, सगळ्याच धर्मानी हे ब्रह्मचर्याचे प्रयोग दीर्घकाळ राबवले. शक्य होईल तिथे प्रणय-मैथुनाला थांबवण्याचा, शक्य असेल तिथे बंदी घालण्याचा प्रयत्न केला. पण खरं म्हणजे ही लढाई निसर्गाच्या प्राथमिक नियमांच्या विरुद्धची लढाई होती. निसर्गाचं प्रॉडक्ट, निर्मिती असणार्या माणसानं ती आपल्या निर्मात्याविरुद्ध उभारलेली लढाई होती. ती जिंकणं शक्य होतं का? शक्यच नव्हतं. त्यामुळं हे सारे ब्रह्मचर्य प्रयोग दारुणरीत्या असफल झाले. ब्रह्मचर्याची वस्तीस्थानं विकृतीचे अड्डे बनले. ºिश्चन धर्मामधील कॅथॉलिक पंथीय विचारसरणीत 'प्रणय-मैथुन'ला स्थानच द्यायची तयारी नव्हती. अगदी नवरा-बायकोनंसुद्धा यापासून दूर राहिलं पाहिजे अशी अपेक्षा होती. अपवाद फक्त मूल जन्माला घालण्यापुरता. तेवढय़ाचसाठी आपद्धर्म म्हणून पती-पत्नीनं एकत्र यावं अशी अपेक्षा होती. कॅथॉलिक पंथीय धर्मोपदेशकांनी ब्रह्मचारीच राहिलं पाहिजे असा आग्रह होता. पण विसावं शतक संपता संपता धर्मोपदेशकांनासुद्धा लग्न करण्याची परवानगी देणारा फतवा व्हॅटिकन सिटीला काढावा लागला. ही चांगली गोष्ट आहे. हा निर्णय कौतुकास्पद, माणुसकीपूर्ण आहे.<br /><br />निसर्गाचं अपत्य असणारा माणूस कधीच निसर्गाच्या विरुद्धची लढाई जिंकू शकत नाही. जास्तीतजास्त तो निसर्गनियमांचाच वापर करून काही निसर्गनियमांमधून थोडीशी सवलत प्राप्त करू शकतो, काही नियमांना थोडीशी मुरड घालू शकतो. निसर्गनियम समजून घेऊन काही नियमांपासून, थोडसं कंपल्शन बाजूला सारून, काहीसं स्वातंर्त्य पदरात पाडून घेऊ शकतो. ही आपली, माणसाची मर्यादा आपण समजून घेतली पाहिजे. कारण शेवटी आपण या निसर्गाचे घटक आहोत, मालक नाहीत.<br /><br />निसर्गानं प्राणिमात्राला आणखी एक तिसरी इन्स्टिंक्ट, जैविक प्रेरणा बहाल केली. सुखानं जगण्याची, सुखासाठी आनंदासाठी धडपडण्याची. आपल्या मेंदूत उत्क्रांतीच्या दुसर्या टप्प्यात लिंबिक सिस्टिम प्राप्त झाली आहे. यात एक रिवॉर्ड फंक्शन असतं तर दुसरं पनिशमेंट फंक्शन असतं. ज्या ज्या वेळी आपण एखादी कृती करतो, अनुभव घेतो, वर्तणूक करतो त्या त्या वेळी रिवॉर्ड वा पनिशमेंट फंक्शन जागृत होतं. जर रिवॉर्ड फंक्शन जागृत झालं तर आपल्याला आनंद मिळतो, सुख मिळतं. मग ती कृती पुन्हापुन्हा करावीशी वाटते; तो अनुभव, ती वर्तणूक पुन्हा पुन्हा रिपिट करावीशी वाटते. कारण सातत्यानं सुख मिळावं, आनंद मिळावा यासाठी धडपडत जगावं हाही नैसर्गिक प्रेरणेचा एक भाग आहे.<br /><br />जर आपलं पनिशमेंट फंक्शन जागृत झालं तर आपल्याला वेदना होते, दु:ख होतं. मग ती कृती, वर्तणूक, तो अनुभव पुन्हा रिपिट करावासा वाटत नाही. कारण आपल्याला वेदना, दु:ख नको असतं.<br /><br />निसर्गाचा पहिला नियम, जो जो जन्माला आला त्यानं वाट्टेल त्या परिस्थितीत धडपडत जगावं. पण कसं जगावं? सातत्यानं रिवॉर्ड फंक्शन जागृत होत जाईल, आनंद मिळेल, सुख मिळेल. (आणि पनिशमेंट फंक्शन जागृत होणार नाही, दु:ख आणि वेदनांपासून दूर राहता येईल.) या पद्धतीनं माणसानं जगावं, असा प्रयत्न आपण आयुष्यभर करत असतो. निसर्गाचीच तशी योजना आहे.<br /><br />त्यामुळं तुमच्या-माझ्या जीवनाचा खराखुरा उद्देशच आनंद मिळवणं, सुख मिळवणं हा आहे.<br /><br />जर प्रत्येक माणूस सुख मिळवण्याचा, आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत गेला तर माणूस स्वार्थी बनणार नाही का? अमानुष बनणार नाही का? स्वत:च्या सुखासाठी स्वार्थासाठी तो दुसर्यांचे मुडदे पाडणार नाही का? या प्रश्नांचं उत्तर दीर्घकाळापासून माणूस शोधत आला आहे आणि कदाचित या भीतीपोटीच इहलोकातील, प्रत्यक्ष जीवनातील सुखाला किंमत देऊ नये, त्यापेक्षा परलोकातील, स्वर्गातील सुखाला, मोक्षाला किंमत दिल्यामुळं माणूस अधिक परोपकारानं वागेल, अधिक माणुसकीपूर्ण वागेल अशी अपेक्षा केली असावी. त्या दिशेनं आपण गेली दोन-अडीच हजार वर्षे प्रवास करून पाहिला. पण त्यातून असं काही साध्य होताना दिसत नाही.<br /><br />तसं असतं तर किमान आपली सारी धार्मिक स्थळं माणुसकीची, प्रामाणिकपणाची, परोपकाराची स्थळं ठरली असती. देवळांमध्ये भरमसाट काळा पैसा दानपेटय़ांमध्ये जमा झाला नसता आणि कोटय़वधी रुपये दानपेटय़ांत जमा होणार्या देवळांच्या बाहेर भिकार्यांच्या रांगा लागल्या नसत्या. देवळांनीच भिकार्यांचं भिकारीपण संपवलं असतं.<br /><br />माणसं देवधर्म मानतात म्हणून प्रामाणिकपणे वागतात, अशी एकेकाळी माझीही, इतर धार्मिक माणसांप्रमाणेच समजूत होती.<br /><br />27 जून 1975 साली (25 जूनला रात्री 12 वा. आणीबाणी घोषित झाली) आणीबाणीला विरोध केला म्हणून आम्हाला अटक झाली. पुढे 10 महिने वध्र्याच्या जेलमध्ये राहावं लागलं. त्या वेळी मी खरं म्हणजे देव मानणारा होतो. पण पूजाअर्चा सुटली होती. मी, माझे सहकारी चंद्रकांत वानखडे, सुभाष इथापे तिघं जण या कारणांसाठी (आणीबाणीला विरोध) जेलमध्ये आलो होतो. आम्ही तिघेही देवपूजा करत नव्हतो. बाकी सारे वेगवेगळ्या गुन्ह्याखाली अटक झालेले आणि जिल्ह्यातील सारे हिस्ट्रीशिटर गुन्हेगार, सुमारे 900 लोक, जेलमध्ये होते. ते सारेच्या सारे नियमितपणे देवाची पूजा करत असत. एवढंच नव्हे, तर दरोडा घालतानाही देवाला साकडं घालत असत आणि देव त्यांना याही कामात मदत करतो, अशी त्यांची श्रद्धा होती.<br /><br />तेव्हा कळलं देव मानणारी माणसं प्रामाणिक नसतात. जी प्रामाणिक माणसं देव मानतात तीच देव मानणारी माणसं प्रामाणिक असतात.<br /><br />पण माणसाला एकटय़ाला जगता येत नाही. मानवी जीवनातील सगळ्यात मोठी शिक्षा ही एकांतवासाची शिक्षा आहे. दीर्घकाळ माणूस एकटा राहिला तर पागल होतो, नाहीतर आत्महत्या करून आयुष्य संपवतो.<br /><br />आपल्याला जर आनंदानं जगायचं असेल तर इतर माणसांसोबत जगलंच पाहिजे. बरं इतरांना आपण दु:खी करत गेलो तर आपण आनंदी होतो का? नाही. उलट आपल्याला रुखरुख वाटते. अपराधीपणाची टोचणी लागते. त्यामुळं आनंदानं जगायचं असेल तर आपल्यासोबतच्या माणसांच्या जीवनातील आनंद वाढवण्याचा प्रयत्न करत गेलो तरच आपल्याला आनंदानं जगता येतं.<br /><br />त्यामुळं या जीवनात जगत असताना 'आनंदी राहा आणि सोबतच्या माणसांना आनंदी करा' हा तुमच्या-माझ्या जीवनातील सगळ्यात मोठा मंत्र ठरला पाहिजे, प्रार्थना ठरली पाहिजे. ही निसर्गाची गरज आहे, निसर्गाची शिकवण आहे. हेच खरं अध्यात्म आहे ना? धर्म आहे ना? माणुसकीपूर्ण माणूस बनणं आहे ना? मी आनंदी होण्यासाठी इतरांना आनंदी करत जाणं हाच खरा परोपकार आहे ना?<br /><br />(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.)<br /><br />भ्रमणध्वनी- 9371014832</span>Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-75147842412158223332012-11-10T03:06:00.001-08:002012-11-10T03:06:23.756-08:00विज्ञान धर्मच सत्यशोधनाचा उद्देश पूर्ण करतो<table style="background-color: white; font-family: arial; width: 100%px;"><tbody>
<tr><td><div class="haedlinesstory" style="font-family: Mangal, Arial; font-size: 17px; font-weight: bold; margin-left: 10px; padding: 0px;">
<br /></div>
</td></tr>
<tr><td><table align="left"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/10112012/10112012-md-ng-4-3364-1-small.jpg" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" style="cursor: pointer; font-size: 11px;" /></td></tr>
</tbody></table>
<span class="bodyd" style="color: #2c2c2c; font-family: arial; font-size: 14px; line-height: 24px;">गेल्या शनिवारचा लेख प्रसिद्ध झाला आणि नेहमीप्रमाणं फोन खणखणू लागला. बरेच फोन अभिनंदन करणारे होते, धन्यवाद देणारे होते. पण काही फोन मात्र खूप चवताळून केले होते. बहुधा त्यांच्या धर्मश्रद्धा दुखावल्या गेल्या होत्या. मी काही धर्माबद्दल लिहिलं नव्हतं. फक्त आपल्या माणसांच्या कहाणीबद्दल लिहिलं होतं. डार्विनच्या उत्क्रांतिवादी सिद्धांताबद्दल त्रोटक माहिती लिहिली होती. तरी काही लोक एवढे का खवळले असावे?<br /><br />जे शिक्षणानं अपुरे आहेत त्यांचं चिडणं, खवळणं, रागावणं मी समजून घेऊ शकतो. समजून घेतो. अतिशय समजावण्याच्या सुरातच उत्तरं देतो. पण जे उच्चशिक्षित आहेत त्यांचं काय करायचं? असाच एक फोन नांदेडवरून आला. परिचय देताना 'मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे' असं त्यांनी सांगितलं आणि डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत खोटा आहे. माकडापासून माणूस बनत नाही. आजची माकडं माणसं का बनत नाही? वगैरे बोलायला लागले. वरून डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मी अभ्यासला आहे, मला सारं माहीत आहे, असं म्हणून भांडायलाही लागले.<br /><br />मी त्यांना शेवटी म्हणाले,''ठीक आहे. डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताला कोर्टात ओढा. देशभर तो शिकविण्यावर कोर्टाची बंदी आणा.'' एका मेकॅनिकल इंजिनिअरची एखाद्या वैज्ञानिक संशोधनाबद्दलची ही बालिश प्रतिक्रिया ऐकून मला कीव आली, त्या विद्यापीठाची, त्या कॉलेजची जिथून या माणसाला मेकॅनिकल इंजिनिअरची डिग्री मिळाली. एखाद्या विज्ञानशाखेच्या विद्यार्थ्याला विज्ञानाबद्दल असं बोलण्याचा अधिकार आहे कां? असू शकतो कां? पोटासाठी विज्ञान शिकायचं? पोट भरण्यासाठी विज्ञान वापरायचं आणि वरून स्वत:च्या अंधश्रद्धा उरी कवटाळण्यासाठी त्याच विज्ञानाला लाथाडायचं? हे कसं चालेल?<br /><br />सगळय़ात पहिले, जे विज्ञान मुळात खोटं आहे, अशा खोटय़ा विज्ञानाची डिग्री परत करायला पाहिजे. त्या डिग्रीचा पोट भरण्यासाठी उपयोग करणार नाही असं ठरवलं पाहिजे. तेव्हाच अशांना विज्ञानाचा खोटं म्हणण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होऊ शकेल ना? नाहीतर, एखाद्या खर्या विज्ञान विद्यार्थ्याप्रमाणं डार्विनचा सिद्धांत खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी पुढं सरसावलं पाहिजे. त्यासाठी सबळ वैज्ञानिक पुरावे, वैज्ञानिक जगतापुढे सादर करून तो सिद्धांत खोटा आहे हे सिद्ध केलं पाहिजे. पुराणातले उतारे हे पुरावा ठरू शकत नाहीत. शेवटी विज्ञान, विज्ञान म्हणजे तरी काय आहे हो? जे या निसर्गात आहे त्याचा शोध घेणं, त्यामागच्या नियमांचं आकलन करून घेणं आणि हे निसर्गाचे नियमच वापरून शॉर्टकट पद्धतीनं काही गोष्टी निर्माण करणं म्हणजे विज्ञान. विज्ञान हे या निसर्गाच्या, सृष्टीच्या पलीकडे नसतं. विज्ञान स्वत: काहीही निर्माण करत नाही वा काहीही नष्ट करत नाही. फक्त निसर्गनियमांचा वापर करून एकाचं दुसर्यात रूपांतर करू शकतं. तेही निसर्गनियमांनुसारच. त्यामुळं विज्ञान आपल्या निसर्गापेक्षा वेगळं नाही, बाहेरचं नाही, परकं नाही, अगम्य नाही. निसर्गातील सत्य म्हणजे विज्ञान. हे आपण आजच्या काळात समजून घेतलं पाहिजे आणि सहजतेनं स्वीकारलंसुद्धा पाहिजे. खर्या धार्मिक माणसाला विज्ञान स्वीकारणं अतिशय सोपं जातं. कारण सगळय़ाच धर्मानी, त्याला एकही धर्म अपवाद नाही. धर्माचा खरा उद्देश सत्यशोधन करणं आहे. सत्याचा शोध घेणं आहे, असं मानलं आहे आणि विज्ञान तर या विश्वातील, निसर्गातील, प्राण्यांतील, माणसातील सत्याचा शोध घेतं. धर्माचा उद्देशच विज्ञान पूर्ण करत आहे. तरी ही खळखळ का?<br /><br />ज्यांनी आपला धर्म पुरोहितशाहीकडे गहाण टाकला आहे. त्यातील 'सत्य शोधणे' या मूळ उद्देशाला गुडबाय केला आहे. काही हजार वर्षापूर्वी जे कुणी लिहून ठेवलं वा सांगून ठेवलं ते म्हणजेच अंतिम सत्य आहे असं जे मानतात, तेच अशा पद्धतीनं खळखळ करतात. खरं म्हणजे ही माणसं मुळात धर्मभ्रष्ट झालेली माणसं असतात आणि अशांमुळचे आपल्या समाजाचं प्रचंड नुकसान होतं.<br /><br />या देशात तब्बल (किमान) दोन हजार वर्षे स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. सावित्रीबाई फुले रोज शाळेत जाताना, पुण्याच्या धर्ममार्तडांकडून शेणाचा मार, कचरा अंगावर घेत, कुलटा स्त्री, वेश्या असे घाणेरडे शब्द ऐकत, तरी जिद्दीनं शाळेत जात, मुलींना शिकवत आणि पाहता पाहता समाज बदलला. आज आपली आई शिकली, बायको शिकली, मुली शिकताहेत. या देशात पराकोटीची अस्पृश्यता होती. केवळ दीडशे-दोनशे वर्षापूर्वी पेशवाईत अतिशूद्रांना चप्पल न घालता चालावं लागायचं. रस्त्यावर त्यांची अपवित्र पाऊलं उमटू नयेत म्हणून त्यांच्या कमरेला काटक्या लावून चालावं लागत असे. त्यांनी रस्त्यांवर थुंकून रस्ता विटाळू नये म्हणून केवळ थुंकण्यावर बंदी नव्हती तर थुंका अथवा न थुंका; पण गळ्यामध्ये थुंकण्यासाठी 'गाडगं'ं बांधल्याशिवाय त्यांना रस्त्यावरून चालण्याची परवानगी नव्हती. या देशातल्या बहुसंख्येने असलेल्या शूद्रातिशूद्रांना ढोरांपेक्षाही निकृष्ट दर्जाचं जीवन जगावं लागत होतं. पण यात आपण परिवर्तन केलं. एका अस्पृश्य जातीत जन्मलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपण जगातील सगळ्यात मोठय़ा लोकशाहीची, भारताची घटना निर्माण करणार्या समितीचं अध्यक्ष बनवलं. अस्पृश्यता पाळणं कायद्यानं गुन्हा ठरवलं. स्त्रियांना समान कायदेशीर अधिकार दिले. आज अस्पृश्य समजल्या जाणार्या जातीतील हजारो लाखो माणसं अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, प्राध्यापक आहेत, आयएएस, आयपीएस, आयएफएस ऑफिसर आहेत आणि याच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं नांदेडच्या एका इंजिनिअरला माझ्याशी भांडभांड भांडण्याचा, स्वत:चं अत्यंत अवैज्ञानिक मत मांडण्याचा, 'लोकशाही विचार स्वातंर्त्याचा' अधिकार दिला आहे, हे विसरून कसं चालेल? देवानं मुद्दाम, मेहनतीनं माणसाला निर्माण केलं, ही आपली आवडती कल्पना. त्यामुळं माणूस म्हणून आपल्याला खूप महत्त्व मिळतं, आपणच आपल्याला देतो. इतकी वर्षे ही आवडती जागा आपण पटकावून बसलो होतो आणि डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांतामुळं या आवडत्या जागेवरून आपली हकालपट्टी होते असे म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं, तरी सत्य स्वीकारणं आपण शिकलं पाहिजे.<br /><br />आजच्या माकडाचा माणूस का बरं होत नाही? हा प्रश्नच हास्यास्पद आहे. ज्याला डार्विनचा उत्क्रांतिवाद कळला नाही तोच असा प्रश्न विचारू शकतो. एकतर आपण वानरापासून निर्माण झालो नाही. आपले आणि वानराचे पूर्वज सारखेच होते, एवढंच काय ते सत्य आहे आणि ही प्रक्रिया लाखो-कोटय़वधी वर्षामध्ये घडून आली आहे. माणसाचं अख्खं आयुष्यच केवळ दहा लाख वर्षाचं आहे. त्यातही आपलं ज्ञान, आयुष्य केवळ काही हजार वर्षाचं आहे. प्राणिजगताच्या उत्क्रांतीत हा कालावधी नगण्य आहे. दुसरं, नवी जात, निसर्गातील अपघातामुळं, म्युटेशनमुळं निर्माण होते. उदा. आपण ऐकतो एका बाळाला दोन डोकी होती. दुसर्या एका बाळाला चार डोळे होते. चार हात होते. या पद्धतीने काही अपघात घडत असतात. जे निसर्गासाठी प्रतिकूल ठरतात ते प्राणी मरतात. जे निसर्गात जगण्यासाठी अनुकूल अपघात ठरतात ते प्राणी जगतात. त्यातून नव्या प्राणी जाती निर्माण होतात. शिवाय पिढय़ान्पिढय़ा निसर्गाप्रमाणं स्वत:त अनुकूल बदल करण्यासाठी धडपडणार्या प्राणी-जातीत आनुवंशिक बदल घडून येतात. त्यातून उपजाती निर्माण होतात. उदाहरणार्थ माळरानावर वावरणारं अस्वल, वाघ हिमालयातील बर्फात दीर्घकाळ जगण्याचा प्रयत्न करू लागले की त्यातून केसाळ पांढरे 'पोलार्ड बिअ' आणि हिमवाघ तयार होतात. पण हेही बदल हजारो-लाखो वर्षामध्ये होतात. डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत स्वीकारण्यास खळखळ करणारे केवळ भारतातच आहेत असं नाही. अमेरिकेसारख्या अत्यंत प्रगत देशातसुद्धा आहे. दोन शतकांपूर्वी युरोप अमेरिकेसारख्या देशांमध्ये शाळा-कॉलेजेस मोठय़ा प्रमाणावर चर्चेसद्वारा चालवली जात. पंधराव्या-सोळाव्या शतकात ब्रुनोनं मत मांडलं, ''पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते.'' झालं. चर्चचा फतवा निघाला. युरोपमध्ये ब्रुनोला जिवंत जाळण्यात आलं. पुढे कोपर्निकसने हेच मत मांडलं. त्याचा छळ झाला, त्यातच त्याचा मृत्यू झाला. कारण बायबलच्या ओल्ड टेस्टामेंटच्या, जेनेसिसच्या, उत्पत्ती मांडणीला छेद देणारं हे मत होतं. बायबलला खोटं ठरविणारं कोणतंही मत तेथील पुरोहितशाही स्वीकारणंच शक्य नव्हतं. पुढे गॅलिलिओनं दुर्बीण शोधली. खूप मोठा गणितज्ञ म्हणून युरोपमधल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये त्यानं प्रचंड नावलौकिक मिळविला. सर्वदूर त्यांच्या विद्वत्तेचा दबदबा निर्माण झाला. त्यानं ग्रंथ लिहिला, त्यातही पृथ्वीविषयी हेच मत मांडलं. पण एवढय़ा विद्वान, प्रतिष्ठित वैज्ञानिकाला हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याची हिंमत झाली नाही. ब्रुनो कोपर्निकसचं उदाहरण समोर होतं.<br /><br />अनेक वर्षानी त्याचा शाळकरी मित्र व्हॅटिकन सिटीचा पोप बनला. धर्मपीठाच्या उच्चासनावर आपलाच मित्र बसला आहे, या भाबडय़ा समजुतीतून त्यानं आपला ग्रंथ प्रसिद्ध केला. पण पुरोहित कुणाचाच मित्र नसतो. जुना शाळकरी मित्र आता पोप होता. गॅलिलिओवर पोपनं चौकशी समिती बसवली. जीव वाचविण्यासाठी गॅलिलिओला लिहून द्यावं लागलं, ''पृथ्वी सपाट आहे, ती सूर्याभोवती फिरत नाही, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो.''<br /><br />तरी गॅलिलिओला नजरकैदेत ठेवलं. एवढय़ा विद्वान माणसाला हा अपमानास्पद आघात सहन झाला नाही. तो पोपच्या नजरकैदेतच हे जग सोडून गेला. सोळाव्या शतकातील ही गोष्ट आहे.<br /><br />पण अठराव्या-एकोणिसाव्या शतकातील डार्विनच्या वाटय़ाला मात्र हा छळ आला नाही. त्याचं संशोधन तर फारच क्रांतिकारक होतं? तरी का? कारण मधल्या 200-250 वर्षात विज्ञानानं सगळ्याच क्षेत्रात प्रचंड क्रांती केली होती. रोजच्या जगण्यात बदल निर्माण झाले होते. घोडागाडय़ांच्या ऐवजी बस, कार, ट्रेन, ट्राम रस्त्यावर धाऊ लागल्या होत्या. वेगवेगळ्या वस्तूंचं कारखान्यात उत्पादन होऊ लागलं होतं. वीज घराघरांत पोहोचू लागली होती आणि प्रत्येकच विज्ञानातील संशोधन बायबलप्रणीत समजुतींना हादरा देत होतं. पण सर्वसामान्य माणसांचं जीवन समृद्ध करणारं विज्ञान नाकारणं शक्य नव्हतं. मग धर्मसंस्थेनं, चर्चनं आपले हात आवरते घेतले. विज्ञान क्षेत्रात हस्तक्षेप करणं बंद केलं. त्यानंतर डार्विन आला. म्हणून तो वाचला. आणखी दोनशे वर्षे (सोळाव्या शतकात) आधी तो सिद्धांत मांडला असता तर त्याला सुळीच दिलं असतं.<br /><br />सिद्धांताचा मात्र छळ झालाच. अमेरिकेतील एका चर्चच्या शाळेत मुलांना डार्विनचा सिद्धांत शिकवत नसत. उलट तो खोटा आहे असं सांगितलं जाई. एका मुलाचे पालक कोर्टात गेले. कोर्टात चर्चविरुद्ध पालक लढाई सुरू झाली. प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. कोर्टानं निर्णय दिला, ''चर्चच्या आधिपत्याखाली शाळा असली, तरी त्या शाळेला डार्विनचा सिद्धांत, वैज्ञानिक सिद्धांत म्हणून शिकवलाच पाहिजे. वाटल्यास बायबलचं धर्मशिक्षण देणार्या तासाला बायबलमधली जेनेसिसची कल्पना त्यांना सांगावी.'' ही विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकांमध्ये घडलेली गोष्ट आहे. तरी आपण डार्विनचा सिद्धांत नाकारणार? कशाच्या आधारावर?<br /><br />(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)<br /><br />भ्रमणध्वनी- 9371014832</span></td></tr>
</tbody></table>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-61165736252645490562012-11-09T04:35:00.000-08:002012-11-09T04:35:02.008-08:00सृष्टीनिर्मितीबाबत डार्विनचा सिद्धांत जगन्मान्य<br />
<div class="post-header" style="background-color: #c0a154; color: #997755; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 13px; line-height: 1.6; margin: 0px 0px 1em;">
<div class="post-header-line-1">
</div>
</div>
<div class="post-body entry-content" id="post-body-2121307374708333663" itemprop="description articleBody" style="background-color: #c0a154; color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14px; line-height: 1.5; position: relative; width: 568px;">
<table style="background-color: white; font-family: arial;"><tbody>
<tr><td><div class="haedlinesstory" style="font-family: Mangal, Arial; font-size: 17px; font-weight: bold; margin-left: 10px; padding: 0px;">
<br /></div>
</td></tr>
<tr><td><table align="left"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/03112012/03112012-md-ng-4-3501-1-small.jpg" style="-webkit-box-shadow: rgba(0, 0, 0, 0.498039) 1px 1px 5px; box-shadow: rgba(0, 0, 0, 0.498039) 1px 1px 5px; padding: 8px;" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" style="-webkit-box-shadow: rgba(0, 0, 0, 0.498039) 1px 1px 5px; box-shadow: rgba(0, 0, 0, 0.498039) 1px 1px 5px; cursor: pointer; font-size: 11px; padding: 8px;" /></td></tr>
</tbody></table>
<span class="bodyd" style="color: #2c2c2c; font-size: 14px; line-height: 24px;">आपण का बरं जन्माला आलो? ईश्वरानं का बरं आपल्याला जन्माला घातलं असावं? आपल्या जगण्याचा खरा उद्देश काय आहे? का बरं आपण जगतो? ही सृष्टी कुणी निर्माण केली असेल? ही सृष्टी निर्माण करण्यामागे काय उद्देश असावा? असे अनेक प्रश्न, प्रत्येक विचारी माणसाच्या मनात निर्माण होतात. अगदी माणूस विचार करायला लागला, तेव्हापासून या प्रकारचे प्रश्न माणसाला पडत आले आहेत. त्यांचा शोध घेण्याचा तो प्रयत्न करत आला आणि या शोध-प्रयत्नातूनच त्याला काही प्रश्नांची उत्तरं सापडली आहेत. शोध-प्रयत्नाची धडपडच कदाचित मानवाच्या प्रगतीची कहाणी बनली आहे. थोडक्यात ही कहाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू या. ही आपली कहाणी आहे. या सृष्टीची निर्मिती कशी झाली असावी? कुणी निर्माण केली असावी? मानवी जगण्याच्या 10 लाख वर्षाच्या इतिहासात अगदी अलीकडच्या काळात धर्माची निर्मिती झाली. सगळ्याच धर्मानी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. नव्हे, या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय कदाचित धर्माना एवढा व्यापक पाठिंबा, एवढय़ा संख्येनं अनुयायी लाभलेच नसते. एवढा महत्त्वाचा हा प्रश्न होता.<br /><br />ºिश्चन धर्माच्या 'ओल्ड टेस्टामेंट'मध्ये ही 'जेनेसिस'ची म्हणजे सृष्टी उत्पत्तीची कल्पना मांडली आहे. एकूण सात दिवसात ईश्वरानं सृष्टी निर्माण केली. पहिल्या दिवशी ईश्वर म्हणाला, 'लेट देअर बी लाईट', 'तिथे प्रकाश असू दे' आणि पहिल्या दिवशी प्रकाश निर्माण झाला. दुसर्या दिवशी ईश्वर म्हणाला, 'लेट देअर बी वॉटर', 'तिथे पाणी असू दे' आणि दुसर्या दिवशी पाणी निर्माण झालं. पाचव्या दिवशी म्हणाला, 'आदम असू दे' आणि पहिला माणूस निर्माण झाला. तो एकटाच पृथ्वीवर, सृष्टीमध्ये वावरू लागला. ईश्वराला आदमची दया आली. बिचारा एकटाच हिंडतोय म्हणून सहाव्या दिवशी ईश्वरानं आदमच्या हाडापासून 'ईव्ह'ची निर्मिती केली. ही पहिली मानवी स्त्री. सौंदर्यवती स्त्री. पण ईश्वरानं तिला धोक्याचा इशारा दिला. ''बाई, या ईडन गार्डनमध्ये पाहिजे तेवढं भटक. मौज कर. खा, पी पण ज्ञानाचं फळ मात्र चाखू नकोस.'' या सगळ्या सृष्टी निर्माणप्रक्रियेत ईश्वर खूप थकला. म्हणून सातव्या दिवशी म्हणजे संडेला, रविवारी त्यानं विश्रंती घेतली म्हणून रविवार हा अजूनही सुट्टीचा दिवस मानतो आपण. पण एक अघटित घडलं. सौंदर्यवान ईव्ह अतिशय पवित्र होती. निर्मळ होती. आदम आणि ईव्ह दोघंही गुण्यागोविंदानं जगत होते. भाऊबहिणीप्रमाणं नांदत होते. पण ईव्हच्या डोक्यात एक विचार सारखा यायचा. का बरं ईश्वरानं, हे सुंदर दिसणारं, ज्ञानाचं फळ चाखण्यास मनाई केली? काय असावं त्यात? कसं असेल ते चवीला? एक दिवस तिला राहावलं नाही. खूप हिंमत करून तिनं ते 'ज्ञानाचं फळ' चाखलंच. ते चाखताच तिला ज्ञान झालं. आपण स्त्री आहोत. तिच्या मनात कामवासना निर्माण झाली. तिनं बरोबर आदमला फशी पाडलं. त्यामुळं ती गर्भवती राहिली. मूल जन्माला आलं. अशा प्रकारे मानवजात निर्माण झाली. जर ईव्हने चुकून ते ज्ञानाचं फळ चाखलं नसतं तर तिच्या मनात पाप, कामवासना निर्माण झाली नसती आणि तुमचा-माझा जन्म झाला नसता आणि हे जीवन जगण्याची तुम्हाला-मला गरज पडली नसती. ज्यातून माणसाचं जीवन निर्माण होतं, त्या प्रक्रियेला पाप ठरवलं. कामवासना म्हणजे पाप. ज्ञानाचं फळ चाखणं म्हणजे पापाला निमंत्रण देणं. 'ओल्ड टेस्टामेंट' हा धर्मग्रंथ केवळ ºिश्चनांनाच प्रिय, श्रद्धेय नाही. तर यहुदी (ज्यु) व मुस्लिम धर्मीयांनाही तेवढाच श्रद्धेय आहे. या तिन्ही धर्माचे धर्म संस्थापक ईश्वर मानले जात नाहीत. ते देवदूत, प्रेषित होते असं मानलं जातं. त्यामुळं येशू ºिस्त आणि महम्मद पैगंबर हे दोघेही ईश्वराचे प्रेषित आहेत आणि या तिन्ही धर्माचा मूळ ग्रंथ 'ओल्ड टेस्टामेंट' आहे हे तिन्ही धर्म सृष्टीनिर्मितीची समान कल्पना मानतात. आदम आणि ईव्हची, आदम आणि हौवा होते एवढाच काय तो फरक.<br /><br />भारतीय धर्मामध्ये जेनेसिस, सृष्टीनिर्मितीची कल्पना खूप वेगवेगळ्या प्रकारे सांगितली आहे. बायबल, कुराण यांसारखा 'एखादाच' प्रमाण ग्रंथ नाही. त्यामुळं नेमकी एकच सृष्टीनिर्मितीची कल्पना सांगणं कठीण आहे. तरी सगळ्यात लोकप्रिय असणारी एक कल्पना आपण समजून घेऊ. मनुस्मृती आणि सरस्वती पुराण यामध्ये ही कल्पना मांडली आहे. ईश्वर, ब्रह्म स्वयं निर्माण झाले. ते अप्सरांचा नाच पाहू लागले. नाच पाहता पाहता उत्तेजित झाले. त्यामुळं त्यांचं वीर्यस्खलन झालं. ते द्रोणात गोळा केलं. या द्रोणातून अगस्ती ऋषींचा जन्म झाला. हा पहिला माणूस, आदम. एकदा अगस्ती ऋषी असाच अप्सरांचा नाच पाहत होते. त्यांचंही स्खलन झालं. ते द्रोणात गोळा केलं. त्यातून सरस्वतीचा जन्म झाला. सरस्वती खूप लावण्यवती होती. तिचं, पहिल्या मानवी स्त्रीचं, लावण्य पाहून ब्रह्मदेव भाळले. ब्रह्मदेव आणि सरस्वती यांच्या मिलनातून माणूस जन्माला आला आणि पुढे या पद्धतीनं मानव जात निर्माण झाली. किमान या सृष्टीनिर्मिती कल्पनेत 'पाप', 'वासना' असे नकारात्मक शिक्के नैसर्गिक प्रक्रियेला (स्त्री-पुरुष संबंधाला) मारले नाहीत. ही किती चांगली गोष्ट आहे. आज माहीत असलेले मोठे धर्म साधारणत: अडीच ते दीड हजार वर्षापूर्वी निर्माण झाले आहेत. त्या काळात उपलब्ध असणार्या ज्ञानाच्या आधारावर 'सृष्टी उत्पन्नाची' कल्पना प्रत्येक धर्मग्रंथ लेखकानं मांडण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे या सार्या कल्पना त्या त्या ग्रंथकत्र्यांच्या उत्तम प्रतिभेचा, कल्पनाशक्तीचा आविष्कार आहे. त्याचं आपण मनापासून कौतुक केलं पाहिजे. पण खरं काय आहे?<br /><br />डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत. आपण याविषयी ऐकलं असेलच. हे<br /><br />जगन्मान्य झालेलं संशोधन आहे. याचा अर्थ वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध झालेलं संशोधन आहे. सृष्टीनिर्मितीच्या या मांडणीत एखाद्या दुसर्या गोष्टींचे तपशील, कालावधी थोडासा बदलू शकतो. नव्या पुराव्यांनुसार तो अधिक अचूक ठरू शकतो; पण मूळ उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मात्र बदलू शकत नाही, बदलणार नाही, बदलणं शक्य नाही. हे जगातील सर्वात जास्त क्रांतिकारी संशोधन होतं. या संशोधनामुळं कदाचित मानवीजीवन समृद्ध होण्यात सरळ हातभार लागला नसेल. पण मानवी जीवनातील विचारांना मात्र क्रांतिकारक बदल करण्यास भाग पाडणारं हे संशोधन आहे. साधारणत: साडेचारशे कोटी वर्षापूर्वी सूर्याच्या गोळ्यापासून पृथ्वी वेगळी झाली. पुढे ती सूर्याभोवती फिरत फिरत थंड होत गेली. वायुरूप गोळा थंड होताना, सूर्यापासून पृथ्वीचं अंतर अनुकूल असल्यामुळं पाणी-सागर निर्माण झालेत. भूकंपामुळं आतील खनिज वर येऊन पाण्याहून जास्त उंचावर स्थिरावून, पहाड-<br /><br />जमीन निर्माण झाली. साधारणत: अडीचशे कोटी वर्षापूर्वी या पृथ्वीवरील वातावरणात असे अनुकूल बदल झालेत की, त्यातून एक पेशीम आमिबासारखे प्राणी निर्माण झालेत. त्यातून आधी जलचर निर्माण झालेत. नंतर स्थलचर (जमिनीवर वावरणारे) प्राणी निर्माण झालेत. उत्क्रांतीच्या प्रक्रियेनुसार व लामार्कच्या 'विकासवादी' सिद्धांतानुसार प्राण्यांचा विकास होत गेला. ते बदलत गेले. म्युटेशनमुळं, निसर्गातील अपघातांमुळं नवनव्या प्राण्यांच्या जाती निर्माण होत गेल्या. त्यातील ज्या टिकण्यासारख्या होत्या त्या जाती जिवंत राहिल्यात. ज्या निसर्गाच्या कालचक्रात वा अपघातात टिकू शकल्या नाहीत त्या नामशेष झाल्यात. डायनासोर्स, मास्तोडॉन (महाकाय हत्तींची जात) असे कितीतरी प्राणी नष्ट झालेत. यातूनच वानर, माकड अशा दोन पायांवर चालू शकणार्या प्राणिजाती निर्माण झाल्यात. त्यातून साधारणत: 10 लाख वर्षापूर्वी जमिनीवर सरळ चालू शकणारी मानवी जात निर्माण झाली. 10 लाख वर्षापूर्वी ही मानवी जातही इतर प्राण्यांसारखीच होती. त्याच्याजवळ कपडे नव्हते, घर नव्हतं, अन्न शिजवण्याची अक्कल नव्हती. केस कापण्यासाठी कैची नव्हती. स्वत:चं संरक्षण करण्यासाठी, लढण्यासाठी दोन हात, पळण्यासाठी दोन पाय वगळता कोणतंही शस्त्र नव्हतं.<br /><br />फक्त त्याला अतिशय उत्क्रांत असा प्राणी जगतातील सगळ्यात विकसित असा मेंदू लाभला होता. या मेंदूत विचार करण्याची शक्ती होती; पण माणूस शारीरिकदृष्टय़ा मात्र दुबळा होता. त्याच्याजवळ हत्तीसारखं प्रचंड बळ नव्हतं. सिंहासारखे ताकदवान पंजे नव्हते. त्यामुळं दुबळा असणारा हा माणूस प्राणी जिवंत राहण्यासाठी झुंडीत राहू लागला. ती त्याच्या जगण्याची अपरिहार्यता होती. यातूनच तो समाजशील प्राणी बनण्याच्या दिशेनं वाटचाल करू लागला. झुंडीत, समूहात राहणार्या प्राण्यांना संवादाची गरज असते. रानटी अवस्थेत खाणाखुणांच्या भाषेनं संवाद साधणारा हा माणूस हळूहळू आवाज करण्याच्या क्षमतेतून भाषा निर्माण करू लागला. भाषानिर्मितीमुळं त्याला अधिक चांगला संवाद साधता आला. त्यामुळं समूहाची परस्परांसोबत देवाणघेवाण वाढली. त्यातून जीवन सुरक्षितता व समृद्धी वाढली. एका छोटय़ा चार-पाच लोकांच्या टोळक्याला लागलेला शोध सगळ्या टोळीचा ठरू लागला. त्या डोंगरापलीकडे खूप फळं आहेत. इकडच्या डोंगरापलीकडे खूप हिंस्र जनावरं आहेत. सगळ्यांना माहिती कळू लागली. त्यामुळं सुरक्षितताही वाढली. माणसाच्या मेंदूत विचार करण्याची क्षमता होती, म्हणून त्यानं आवाज-भाषा निर्माण केली. जसजशी भाषा विकसित होत गेली तसतशी त्याची विचार करण्याची क्षमता वाढत गेली. त्यामुळं आणखीच भाषा विकसित झाली. म्हणूनच आज कोणत्याही संस्कृतीचा विकास तिच्या भाषा समृद्धीवरून ओळखला जातो. आपल्या चिमुकल्या मेंदूचा वापर करून थंडीपासून, उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पानांपासून, प्राण्यांच्या कातडीपासून त्यानं वस्त्रं निर्माण केली. काडय़ांना अणकुचीदार दगडं बांधून भाले निर्माण केले आणि हातांची क्षमता वाढवणारी शस्त्र निर्माण केलीत. निसर्गानं निर्माण केलेल्या डोंगरातील गुहांमध्ये घरं निर्माण केलीत. निसर्गात निर्माण केलेल्या डोंगरातील गुहांमध्ये घरं निर्माण केली. निसर्गात अपघातानं लागलेल्या आगीला जपून ठेवलं. त्याचा उपयोग इतर प्राण्यांपासून संरक्षणासाठी शस्त्रासारखा केला. अन्न, मांस शिजवून ते दीर्घकाळ टिकविण्याची क्षमता प्राप्त केली. धान्याचा शोध लागल्यावर डोंगरावरून खाली पठारावर उतरून शेती करू लागला. या निसर्गातून लोखंड शोधलं. त्यातून तलवारी, भाले निर्माण केले. त्याचप्रमाणं नांगर निर्माण केले. निसर्गात सापडलेल्या कापसातून वस्त्रं निर्माण केली. समृद्ध भाषा निर्माण केली. समाज निर्माण केला. अर्थव्यवस्था निर्माण केली. संस्कृती निर्माण केली. विवाहसंस्था निर्माण केली. गाव, शहरं निर्माण केलीत. धर्म निर्माण केलेत. या चिमुकल्या मेंदूच्या भरवशावरच हा सारा प्रगतीचा आलेख माणसानं निर्माण केला आहे. प्रेम, त्याग, बंधुता, स्वातंर्त्य, समता, सत्याचा आग्रह, दया ही चांगली मूल्येही निर्माण केलीत आणि राग, असूया, द्वेष, बदला यातून युद्ध, भांडणं, मारामारीही निर्माण केली. आज मानवजातीत जे काही चांगलं आहे तेही मानवानंच निर्माण केलं आहे. आज जे काही वाईट शिल्लक आहे तेही आपणच निर्माण केलं आहे. आजही आपल्यापैकी अनेकांना वाटतं की आपण खास देवाची निर्मिती आहोत, देवाचे लाडके पुत्र आहोत. खरंच? तसं असतं तर देवानं आपल्याला जन्माला घालतानाच म्हटलं असतं, ''अरे लाडक्या मानवा, तू जंगलात जातो आहेस. खूप हिंस्र श्वापदं आहेत. जरा सोबत डबल बॅरलची बंदूक घेऊन जा. खूप थंडी आहे, जरा जाड लोकरीचे कपडे घेऊन जा.'' आणि जन्मत:च आपल्याजवळ बंदूक असती, लोकरीचे कपडे असते; पण आपण तर उघडेबोडकेच जन्माला येतो. मग? तरी?<br /><br />(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन<br /><br />समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)<br /><br />भ्रमणध्वनी- 937101483</span></td></tr>
</tbody></table>
</div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-5389744842535298622012-10-29T05:52:00.003-07:002012-10-29T05:52:30.124-07:00मुख्यमंर्त्यांचा गणपती दूध प्यायला, त्याची गोष्ट !<table style="background-color: white; font-family: arial; width: 100%px;"><tbody>
<tr><td><div class="haedlinesstory" style="font-family: Mangal, Arial; font-size: 17px; font-weight: bold; margin-left: 10px; padding: 0px;">
<br /></div>
</td></tr>
<tr><td><table align="left"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/27102012/27102012-md-ng-4-3449-1-small.jpg" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" style="cursor: pointer; font-size: 11px;" /></td></tr>
</tbody></table>
<span class="bodyd" style="color: #2c2c2c; font-family: arial; font-size: 14px; line-height: 24px;">तिकडे जिल्हा वाशीम 'फुलउमरी'जवळच्या 'श्याम की माता' देवीच्या डोळय़ांतून अश्रू येताना 2-4 लोकांना दिसलं. वार्यासारखी वार्ता पसरली. आधुनिक तंत्रज्ञानानं मोबाईलनं ही वार्ता वायुवेगापेक्षाही अधिक वेगानं पसरली. बंजारा समाजाचे तांडेच्या तांडे घराबाहेर आले. 'रात्रभर झोपायचं नाही. जो झोपेल तो उठणार नाही.' रात्री 'घरात थांबू नका, भूकंप येणार आहे.' विदर्भ-मराठवाडय़ातले अनेक जिल्हे, सुशिक्षित, अडाणी सारेच रात्रभर घराबाहेर जागत बसले.<br /><br />मी मुंबईत. रात्रभर कुणाचा न् कुणाचा फोन येत होता. सर्वदूर मृत्यूचं, भूकंपाचं भय पसरलं. धर्म-जात-पंथ ओलांडून पसरलं. इकडे सप्तशृंगीच्या गडावरच्या देवीच्या डोळय़ांतूनही अश्रू यायला लागले. प्रचंड गर्दी उसळली. विदर्भात पोहरा देवी अतिशय प्रसिद्ध. भारतभरातील बंजारा समाज तिच्या दर्शनासाठी येतो. पण थोडय़ाच अंतरावरच्या 'श्याम की माता' कडे मात्र लोकांचं फारसं लक्ष नाही. यानिमित्तानं 'श्याम की माता' दर्शनासाठी दिवसभरात 25 हजारांपेक्षा जास्त लोक येऊन गेलेत. 'श्याम की माता' प्रसिद्ध झाली.<br /><br />अशा अफवा का पसरतात? आसामात मुस्लिमांचं शिरकाण होतं. अफवा पसरवली जाते. मुंबईमध्ये तास-दीड तास नंगानाच चालतो. पोलिसांना नेम धरून मारलं जातं आणि काही दिवसांत इकडे देवीच्या डोळय़ातून वेगवेगळय़ा ठिकाणी एकाच वेळी अश्रू येतात. कधी कधी चर्चमधील मेरी मातेच्या डोळय़ातून अश्रू येतात आणि भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. आज मोबाईल, टीव्ही, इंटरनेट वापरणारा माणूसही या चमत्कारांना मोठय़ा प्रमाणावर बळी पडतो. अफवा पसरविण्याच्या प्रक्रियेचा सक्रिय भाग बनतो. भारतीय वातावरणात वाढलेल्या कोणत्याही धर्माचा माणूस असो, त्याला दैवी चमत्काराचं प्रचंड आकर्षण वाटतं. लहानपणापासून संस्कारातूनच हे बाळकडू त्याच्या मनात ठसलं असतं. हे चमत्कार प्रत्यक्षात घडत नाहीत. म्हणून ते घडावेत असं त्याला मनोमन वाटत असतं. त्यांच्यावर झालेल्या संस्कारांची ती गरज असते. म्हणून कोणत्याही प्रकारचा चमत्कार ऐकला रे ऐकला की त्याची मुळीच शहानिशा न करता 'आपणच तो चमत्कार प्रत्यक्ष अनुभवला' अशा थाटात तो सांगत सुटतो. मोबाईल, एसएमएस ही आधुनिक साधनं त्याच्या सांगण्याचा वेग वायुवेगापेक्षाही अधिक वाढवतात. निव्वळ चमत्कारापेक्षाही भयासोबत जुळलेला चमत्कार अधिक वेगानं पसरतो. तसं भारतीय समाजमन भित्रं आहे. संस्कारानं ते तसं बनलं आहे. एखादा राजा शिवाजी, महात्मा गांधी हे भय दूर करून काही काळ समाजमन निर्भय बनवून टाकतात. एरवी ते भय-प्रोन असतं. जेव्हा जेव्हा काहीतरी अरिष्ट येईल, आपण मरू या पद्धतीची भीती या चमत्कारासोबत जुळली असेल तेव्हा अफवा पसरवणारं हे मन जास्तच सक्रिय बनतं. 'भीती' ही भावना माणसाच्या मनाचा तत्काळ ताबा घेते. या भीतीच्या आहारी गेलेल्या माणसाला त्या अवस्थेत जे सांगितले जातं, जे तो ऐकतो वा त्याच्या मनात येतं ते एखाद्या प्रभावी सजेशनसारखं काम करतं. त्याला ते खरंच वाटायला लागतं आणि मग इतरांनी या आपत्तीला बळी पडू नये म्हणून तो सक्रियपणे ही भीती इतरांपर्यंत तत्परतेनं पोहोचवतो. 'रात्रभर झोपू नका, लहान मुलांनाही झोपू देऊ नका. शेजार्यांनाही झोपू देऊ नका. जो झोपेल तो उठणारच नाही,' हे सांगण्यामध्ये आपण इतरांचे जीव वाचवतो आहोत अशी त्याची प्रामाणिक भावना असते. अफवा पसरवणे, इतरांना घाबरवणे हा त्याचा उद्देशही नसतो आणि आपण असं काही करतो आहे याची त्याला कल्पनाही नसते. ज्या क्षणी भीती मनाचा ताबा घेते, त्या क्षणी 'लॉ ऑफ डॉमिनंट अफेक्ट' घडून येतो आणि वातावरणातील अफवा त्याच्यासाठी 'सत्य घटना' बनते. तो सामान्य माणूस या काळात 'हायली सजेस्टिबल' असतो. जर कुणी नकारात्मक सजेशन्स पेरलं, 'ते तुमचा जीव घेणार आहेत, त्यांनी तुमचा, तुमच्या मुलाबाळांचा जीव घेण्याआधीच त्यांना संपवा' तर हा सामान्य माणूस त्या विशिष्ट लोकांचा जीव घ्यायला, त्याचं घर जाळायला, खून करायला पुढे सरसावतो. याला आपण मॉब सायकॉलॉजी म्हणतो. पण ही फिअर सायकॉलॉजी असते. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी एरवी मुंगीही न मारणारा हा माणूस इतरांचे जीव घेऊन मोकळा होतो. ज्यांना हे मानसशास्त्र कळतं ते त्याचा उपयोग करून घेतात. दंगली घडवून आणतात. माणसांमधली माणुसकी उद्ध्वस्त करून टाकतात. शेजारी शेजार्याचा खून करतो. शेजारी शेजारील बाईवर बलात्कार करतो. माणसाचा जनावर बनतो. माणुसकीचा खून पाडतो म्हणून या अफवांकडं निरुपद्रवी अफवा म्हणून पाहू नये. त्यांना वेळीच सक्रियपणे अटकाव केलाच पाहिजे. 'श्याम की माता' प्रकरणातील अफवा आम्हाला आमच्या कार्यकत्र्यांना झपाटय़ानं आटोक्यात आणता आली. कारण त्या परिसरात आमचं सक्रिय काम आहे. पण सामान्य, भयग्रस्त माणूस अहेतूक अफवा पसरवीत असला तरी सुरुवातीस विशिष्ट हेतूनं अफवा पसरवणारा, एक स्वार्थी हेतू राखणारा हितसंबंधी वर्ग असतोच. हा जाणीवपूर्वक, फायद्यासाठी अफवा पसरवीत असतो. त्यामुळे दरवेळी पोलीस खात्यानं काळजीपूर्वक सखोल चौकशी करून अशी अफवा पसरवणार्यांना शोधून काढून गजाआड केलंच पाहिजे. तरच अशा अफवा पसरवणार्यांना खर्या अर्थाने अटकाव बसेल, जरब बसेल. पण या ठिकाणी आपलं पोलीस खातं फारच टची असतं. असल्या धार्मिक ठिकाणी ते बिलकूल पोलिसी डोकं वापरायला तयार नसतात. उलट अफवेपोटी उसळलेल्या गर्दीच्या बंदोबस्तासाठी मात्र त्यांना खूप मेहनत, वेळ खर्ची घालावा लागतो. कळत नकळत बदमाशांना साथ द्यावी लागते. काही वेळेस मुद्दाम चमत्कार घडवून आणले जातात. मुंबईतील गोष्ट. एका जैन मंदिरात मूर्तीवरचं चांदीचं छत आरतीच्या वेळी हलू लागलं. प्रचंड गर्दी, प्रचंड पैसा, देणग्या ओघ सुरू झाला. संबंधित पोलीस स्टेशनची मदत मागितली. त्यांनी 'नरो वा कुंजरो वा' भूमिका घेतली. मी, काही पत्रकार (त्यात म.टा.चे पत्रकार सुरेश वैद्यही होते) हा चमत्कार तपासण्यास गेलो. अतिशय उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून हा चमत्कार निर्माण केला होता. मी जयंत नारळीकरांच्या माध्यमातून त्यांनी सुचवलेल्या श्री. शर्मा नावाच्या 'अप्लाईड फिजिक्स'च्या एका शास्त्रज्ञाकडे गेलो. त्यांच्या मदतीनं आम्हाला चमत्कार कळला. आता फक्त एक छुपा जनरेटर पकडण्याची गरज होती. ते आम्हाला शक्य नव्हतं. पोलीस मदत करणार नाही हे कळत होतं. शेवटी संबंधितांना कसा चमत्कार घडवला ते जाहीर करण्याची धमकी द्यावी लागली. चमत्कार तत्काळ थांबला. पुन्हा हा चमत्कार घडवला तर रंगेहाथ पकडू अशी जाहीर धमकी दिली. गेल्या 20 वर्षांत पुन्हा असा चमत्कार घडला नाही. पण चमत्कार घडवणारे मात्र मोकळे सुटले. पण त्या मंदिराचं रिनोवेशन दिमाखात पार पडलं. यात ट्रस्टी, साधू सारेच गुंतले होते. पोलिसांनी मनात आणलं तर अशा अफवांना तत्काळ पायबंद घालण्याचं काम पोलीस खातं किती अप्रतिमरीत्या करू शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे. ते फारसं कुणाला माहीत नाही. म्हणून मुद्दाम सांगतो. गणपती दूध प्यायला लागले. तो दिवस आठवत असेल. रात्रभर प्रवास करून नागपूरहून मुंबईला नॉनस्टॉप पहाटे कारने पोहोचलो. झोपलो. सकाळी 6 वाजता फोन खणखणला. दिल्लीच्या टीव्हीच्या प्रतिनिधीचा फोन. 'तुम्हाला 7 च्या विमानानं दिल्लीत यायचं आहे. दिल्लीत रात्रभर ठिकठिकाणच्या मंदिरातील देवांच्या मूर्ती दूध पीत आहेत ते तपासायचं आहे.' कसंबसं, थोडय़ा वेळात संपर्क साधतो असं सांगून झोपलो. खूप थकलो होतो. पण थोडय़ा वेळानंतर सारखा फोन खणखणू लागला. झोपूच देईना म्हणून उचलला. एकदम करडा आवाज, 'एवढा वेळ फोन वाजतो. तासभर झाला. उचलत का नाही? बोला.. कमिश्नर साहेबांना बोलायचे आहे.' मुंबईचे अँडिशनल कमिश्नर पी.के.बी. चक्रवर्ती बोलू लागले, 'काय मानव साहेब तुम्ही झोपता आहात.' मुंबईत सगळय़ा मंदिरात रांगा लागल्या आहेत. आम्हाला भीती वाटते.. कुणी तरी मुद्दाम अफवा पसरवतो आहे. मंदिरात गर्दी गोळा करायची आणि बॉम्बस्फोट घडवायचे असं प्लॅनिंग असावं म्हणून रेड अँलर्ट घोषित केला आहे. गणपती दूध पितो हे प्रकरण तपासायचं आहे. माझ्या अधिकार्याकडे देतो त्यांना मदत करा.'<br /><br />प्रश्नाचं गांभीर्य लक्षात आलं. खडबडून जागा झालो. फोनवरच आमचं काम सुरू झालं. मी विचारलं मूर्ती बदलवल्या का?' ' नाही. जुन्याच मूर्ती आहेत. बहुदा सार्या संगमरमरी.' पोलीस अधिकार्याने माहिती दिली. माझं काम सोपं झालं. मी सूचना दिली, 'पुजार्याच्या हातून मूर्ती पुसून घ्या. निर्माल्य वगैरे काढून टाका. देव्हारा कोरडा करा. मूर्तीजवळ लेडीज कॉन्स्टेबल उभ्या करा. रांगेतील लोकांना दूध पाजताना चमचा वाकडा करू देऊ नका. थोडा वेळ तरी लोक वाकडा करतील. त्याशिवाय दूध ओघळणार नाही. 25-50 लोकांनी दूध पाजलं की खाली गाभार्यातील दूध स्पंजने गोळा करा. बादलीमध्ये सगळय़ा भक्तांसमोर स्पंज पिळा. बादलीत दूध गोळा होईल.' खरं म्हणजे माझं म्हणणं त्या पोलीस अधिकार्याला पटलं नाही. त्याच्या बायकोच्या हातानेही गणपती दूध प्यायला होता. प्रत्यक्ष डोळय़ानं पाहिलं होतं. त्यानं तसं बोलूनही दाखवलं. पण साहेबांचा आदेश म्हणून त्यांनी माझी सूचना अमलात आणायची ठरवली. नाईलाजास्तव. तासभरातच या अधिकार्यानं खूप उत्साही आवाजात फोन केला, ''मानव साहेब, दहा-एक मंदिरात प्रयोग केला. बादलीत दूध गोळा होतंय. खरंच गणपती दूध पीत नाही.'' असे बोर्ड लावता येईल का याची आम्ही चर्चा केली. 12 नंतर अनेक ठिकाणी बोर्ड लागले. मंदिरामंदिरात पोलीस स्पंजने दूध गोळा करत होते. किमान 15-20 लाख लोकांना मंदिरात ओढून आणणार्या अफवेला पोलिसांनी अथक परिश्रमाने, सक्रियतेने अवघ्या 8-10 तासात थिजवलं होतं. थांबवलं होतं. संध्याकाळच्या बातम्यात प्रसिद्ध झालं- ''मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या घरचा गणपती दूध प्यायला.'' पोलिसांचा पुन्हा फोन, ''मानव साहेब, गणपती दूध पीत नाही, असं तुमच्या संघटनेच्या वतीने स्टेटमेंट काढा.'' ''मी म्हणालो, 'हा चमत्कार पोलिसांनी थांबवला आहे. पोलीस कमिश्नरने वा गृहमंर्त्याने स्टेटमेंट काढलं पाहिजे. तुम्ही तसा प्रयत्न करा. नाहीतर मी गृहमंर्त्यांशी बोलतो. पोलिसांना स्टेटमेंट काढणं योग्य वाटत नव्हतं. कारण मुख्यमंत्री स्वत: या चमत्काराचं समर्थन करत होते. तसं वक्तव्य त्यांनी जाहीररीत्या टीव्हीवरून केलं होतं. पण हे स्टेटमेंट काऊंटर करणं आवश्यक होतं. उपमुख्यमंत्री श्री. गोपीनाथजी मुंडे हे गृहमंत्री असल्यामुळे मुंबईत रेड अँलर्ट घोषित झाल्यामुळं सार्या प्रकारावर लक्ष ठेवून होते. त्यामुळे त्यांना वस्तुस्थितीची नीट कल्पना असायला हवी होती. पण मित्रपक्षाच्या मुख्यमंर्त्यांचं स्टेटमेंट काऊंटर करण्याची रिस्क उपमुख्यमंत्री घेतील का? अशी शंका पोलीस अधिकार्यांना आणि मलाही वाटत होती. त्यांच्याशी त्यावेळी माझी वैयक्तिक ओळख नव्हती. जयप्रकाश आंदोलनाच्या काळापासून मित्र असलेले प्रमोद महाजन यांची मदत मिळू शकली असती. पण.. त्याची गरज पडली नाही. काही तासातच गृहमंत्री, उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे यांचं स्टेटमेंट टीव्हीवरून प्रसारित झालं. 'पोलिसांनी ठिकठिकाणी मंदिरात दूध गोळा केलं. दूध गाभार्यात जमा होत होतं, गणपती दूध पीत नाही.'<br /><br />आम्हा सार्यांचा जीव भांडय़ात पडला. पोलिसांच्या अथक परिश्रमाचं चीज झालं होतं. आजही मूर्ती दूध पिते आहे. डोळय़ातून अश्रू येताहेत अशा अफवा अधूनमधून पसरतात. पोलिसांनी ठरवलं तर ते किती प्रभावीपणे अशा दैवी वलय असणार्या अफवांनाही अटकाव करू शकतात याचा हा उत्कृष्ट वस्तुपाठ होता. पण मुंबई पोलिसांचाही तारीफ के काबील कामगिरी त्यावेळी फारशी जनतेला कळू शकली नव्हती, हेही सत्य आहे.<br /><br />(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा<br /><br />निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.)<br /><br />भ्रमणध्वनी 9371014832</span></td></tr>
</tbody></table>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-88556071850859416202012-10-21T00:33:00.004-07:002012-10-21T00:33:38.064-07:00मेडिटेशन, माईंड पॉवरच्या नावे होते फसवणूक<br /><table style="background-color: white; font-family: arial; width: 100%px;"><tbody>
<tr><td><table align="left"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/20102012/20102012-md-ng-4-3336-1-small.jpg" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" style="cursor: pointer; font-size: 11px;" /></td></tr>
</tbody></table>
<span class="bodyd" style="color: #2c2c2c; font-family: arial; font-size: 14px; line-height: 24px;">''सर, गेले अनेक दिवस मी संमोहनात सूचना देते आहे, पण मला अजून रिझल्टस् मिळतच नाहीत.'' एका मुलीचा फोनवरून आवाज आला.<br /><br />''किती दिवस झालेत? केव्हा कार्यशाळा केली?'' मी. ''सर, 15 दिवसांपूर्वी सातार्यात मी तुमची कार्यशाळा केली. 15 दिवस सूचना देते आहे,'' मुलगी.<br /><br />''पण मी महिनाभर कंपलसरी सीडीवर संमोहन-सराव करायला सांगितला होता ना? नंतरच टार्गेट निवडून सूचना द्यायच्या होत्या नां?'' मी.<br /><br />''हो पण, मला इमर्जन्सी होती म्हणून मी त्वरित स्वतंत्र सूचना द्यायला सुरुवात केली,'' मुलगी.<br /><br />''बरं ठीक आहे, पण 15 दिवसांतच तुला अपेक्षित रिझल्टस् मिळतील असं तुला कुणी सांगितलं? मी तर तसं सांगितलं नव्हतं नां? बरं काय सूचना देते आहेस?'' मी.<br /><br />''सर, माझं एका मुलावर खूप प्रेम आहे, पण तो माझ्याकडे लक्षच देत नाही. गेले 15 दिवस संमोहनात सूचना देते आहे.. माझ्याकडे पाहा, लक्ष दे, माझ्यावर प्रेम कर, खूप खूप प्रेम कर... पण सर तो साधं वळूनसुद्धा पाहत नाही.,'' मुलगी.<br /><br />मी उडालोच. माझा विश्वासच बसेना? माझ्या कार्यशाळेत शिकलेली एखादी विद्यार्थिनी असा प्रश्न विचारू शकते? असा विचार करू शकते?<br /><br />मला राहावलं नाही, मी विचारलंच, ''का गं नक्की तू माझ्याच कार्यशाळेत शिकलीस नां? पाचही दिवस पूर्ण वेळ उपस्थित होती नां?''<br /><br />''हो सर, पाचही दिवस, पूर्ण वेळ, तुमच्यासमोरच पहिल्या रांगेत बसली होती.''<br /><br />''या पाच दिवसांत कधीतरी, असं दुसर्याचं नाव घेऊन अथवा त्याची प्रतिमा पाहून दुसर्याला अशा सूचना देऊन काही परिणाम साधता येतो असं मी शिकवलं का? सांगितलं का?''<br /><br />''नाही सर, तुम्ही नाही सांगितलं. उलट असं काही करता येत नाही असंच तुम्ही सांगितलं, पण मला माहीत आहे नां! संमोहनात जाऊन अशा सूचना दिल्या की परिणाम मिळतो,'' मुलगी.<br /><br />''तुला कसं माहीत?'' मी.<br /><br />''तुमच्या आधी सातार्यात एक संमोहनतज्ज्ञ आले होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांचं व्याख्यान झालं. मी गेले होते व्याख्यानाला. त्यांनी काही संमोहनाचे प्रयोगही करून दाखवले होते. त्या वेळी त्यांनी सांगितलं होतं. आपण संमोहनात जशा सूचना देऊ तसा दुसर्यांवर परिणाम होतो. आपल्या इच्छेनुसार घडतं.''<br /><br />''मग तू त्यांची शाळा न करता माझ्या कार्यशाळेत कशी आलीस?'' मी.<br /><br />''त्यांचं व्याख्यान मला प्रभावी वाटलं नाही. तुमचं जास्त प्रभावी वाटलं. म्हणून मी तुमच्या कार्यशाळेला आले होते.''<br /><br />''तू जे ऐकलंस वा तुला जे वाटतं तो तुझा गैरसमज आहे. आपण स्वत: संमोहनात जाऊन स्वत:ला सूचना देतो, वारंवार सूचना देतो. त्या आपल्या मेंदूत ठसतात, इंप्रिंट होतात. त्यानुसार आपली नवी सवय निर्माण होऊ शकते. आपला स्वभाव बदलू शकतो. आपली वर्तणूक बदलू शकते. आपल्यात बदल होऊ शकतो. पण आपण संमोहनात जाऊन दुसर्याची प्रतिमा डोळ्यांपुढे ठेवून कितीही सूचना दिल्या. हजारो-लाखो वेळा सूचना दिल्या तरी त्याचा त्या दुसर्या व्यक्तीवर काहीही परिणाम होत नाही, होणार नाही, होणं शक्य नाही. ही केवळ अंधश्रद्धा आहे, गैरसमजूत आहे.''<br /><br />दोन वर्षापूर्वीची ही गोष्ट. पण तेव्हापासून सातत्यानं या प्रकारच्या प्रश्नांना, अंधश्रद्धांना मला तोंड द्यावं लागत आहे.<br /><br />1990-91 साली जेव्हा पहिल्यांदा 'स्वसंमोहन व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा' मुंबईतून सुरू केल्या तेव्हाही मला सातत्यानं या प्रकारच्या अंधश्रद्धांशी, समजुतींशी सारखी लढाई करावी लागली.<br /><br />संमोहन म्हणजे दुसर्याला वश करण्याचं, मोहित करण्याचं तंत्र अशीच समजूत होती. त्यामुळं सुरुवातीला काही वर्षे मोठय़ा संख्येनं पुरुष शिकण्यास येत असत, पण स्त्रियांची संख्या मात्र नगण्य, अल्प असे. माझे अनेक विद्यार्थी, विशेषत: विद्यार्थिनी म्हणत असत- ''सर, तुम्ही संमोहन न म्हणता या विषयाला मेडिटेशन म्हणा! जर दोन्ही अवस्था एकच आहेत, अल्फा रिदमच् आहेत, तर मेडिटेशन म्हणायला काय हरकत आहे? त्यामुळं सहभागींची संख्या वाढेल. मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळेल. स्त्रियाही मोठय़ा संख्येनं येऊ शकतील. एक चांगला, महत्त्वाचा विषय सगळ्यांना नीट आत्मसात करता येईल.''<br /><br />मला कळत होतं. मेडिटेशन म्हटलं तर माझं काम जास्त सोपं होणार आहे. पण हा खोटेपणा झाला असता. त्याला दोन कारणं होती. एक म्हणजे मी शिकवतो ते मेडिटेशन नव्हतं. कारण भारतीय परंपरागत मेडिटेशनमध्ये, अल्फा रिद्मच्या अवस्थेत म्हणजे मेडिटेशनच्या अवस्थेत सूचना द्यायच्या नसतात. उलट आतलं सगळं मूळ आत्मास्वरूप बाहेर येऊ द्यावं अशी अपेक्षा असते. दुसरं मेडिटेशन हे आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात वापरलं जात असल्यामुळं त्यासोबत त्या त्या कल्टसंबंधीच्या अनेक अंधश्रद्धा जुळल्या आहेत. त्यांचीही सफाई मला करत बसावी लागली असती. शिवाय मी कुणी श्री श्री, बाबा, महाराज नसल्यामुळं आणि तसं दुरान्वयानंही बनायचं नसल्यामुळं मेडिटेशन शब्द न वापरताच संमोहन शब्द वापरूनच कार्यशाळा चालवायचं ठरवलं. त्यासाठी महाराष्ट्रभर हजारो विनामूल्य व्याख्यानं आयोजित करून लाखो लोकांच्या मनातील 'संमोहन' या विषयासंबंधीचे गैरसमज दूर केले, भीती, अंधश्रद्धा दूर केल्यात.<br /><br />माझ्या आधी फक्त एक-दोघं जण संमोहनाचे स्टेज प्रोग्राम्स घेत असत. संमोहनात टाकून सूचना देत असत. त्यांनीही पुढे कार्यशाळा सुरू केल्या. त्या कार्यशाळेतही ते संमोहनात टाकून सूचना देणं आणि संमोहन प्रयोग करणं एवढंच करायचे. त्याचा 'व्यक्तिमत्त्व विकास' वगैरेशी फारसा संबंध नसे. त्यांच्या कामातूनही संमोहनासंबंधी अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा प्रसारित होत असत. पण मी ठरवलं होतं उगाच टीका करत बसण्यापेक्षा आपण या विषयासंबंधी विधायक प्रबोधन करत जायचं आणि तेच इतकी वर्षे करत आलो.<br /><br />मोठय़ा प्रमाणावर मेडिटेशनच्या नावाखाली संमोहनाचा वापर अलीकडच्या काळात केला जाऊ लागला आहे, पण त्याची सुरुवात बर्याच वर्षापूर्वी सुरू झाली आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी या आध्यात्मिक कल्टने डायरेक्ट संमोहनाचा वापर मेडिटेशनच्या नावाखाली करायला फार पूर्वीच सुरुवात केली. त्यामुळं ही कल्ट खूप वाढली. संमोहनासारखं प्रभावी हत्यार वापरून ही कल्ट त्यांच्या साधकांचं पार ब्रेनवॉशिंग करून टाकतं.<br /><br />दुसरं उदाहरण निर्मला माताचं. त्यांनीही सक्रियपणे संमोहनाचा वापर 'सहजयोगाच्या', मेडिटेशनच्या नावाखाली केला आहे.<br /><br />या दोन्ही कल्टबद्दल, त्यांच्या ब्रेनवॉशिंगबद्दल पुढच्या लेखांमध्ये आपण विस्तारानं पाहू.<br /><br />पण सध्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या नावाखाली चालणार्या ट्रेनिंग प्रोग्राम्सच्या माध्यमातून संमोहन वा मेडिटेशनच्या नावाखाली चालणार्या बदमाशीविरुद्ध लक्ष केंद्रित करू.<br /><br />आपण आपली 'माईंड पॉवर' वापरून काहीही करू शकतो, असा दावा अनेक ट्रेनर करतात. त्यासाठी सुरुवातीला आपल्या विनामूल्य कार्यक्रमात अनेक सक्सेस स्टोरी दाखवतात. एखाद्या अपंगाचं यश, पाय नसलेला माणूस जिद्दीनं उभा कसा राहिला, सचिन तेंडुलकर, अंबानी, अमिताभ बच्चनपासून अनेक लोक कसे यशस्वी झाले. या सक्सेस स्टोरी सांगताना त्यांच्या 'माईंड पॉवर'मुळं ते यशस्वी झालेत असा आभास निर्माण केला जातो आणि मग आमच्या कार्यशाळेत या, आपली 'माईंड पॉवर' वापरा आणि सहजतेनं यशस्वी व्हा! असा उघड संदेश दिला जातो.<br /><br />'माईंड पॉवर'चं स्पष्टीकरण देताना काय सांगतात? आपण एखादी प्रबळ इच्छा केली, विल पॉवर वापरली, पुन्हापुन्हा हे घडावं अशी इच्छा धरली की, ती इच्छा फलद्रूप होते, प्रत्यक्षात येते.<br /><br />संमोहनात, मेडिटेशनमध्ये जाऊन एखादी गोष्ट घडावी अशी इच्छा केली, तसं घडताना चलचित्र पाहिलं, व्हिज्युअलाईज केलं की तसं खरंच घडतं, असं सांगितलं जातं.<br /><br />थोडक्यात एखाद्यानं संमोहनात वा मेडिटेशनमध्ये जाऊन स्वत:ला सांगितलं, पाहिलं, ''मोठ्ठा इंडस्ट्रियालिस्ट झालो. मोठ्ठा कारखानदार झालो. (वा होतो आहे).''<br /><br />असं रोज करत गेलं तर तो एक दिवस अंबानी सारखा इंडस्ट्रियालिस्ट बनेल.<br /><br />एखाद्यानं ''मी मोठा नट बनतो आहे. अमिताभसारखा यशस्वी नट, हिरो बनतो आहे.,'' अशी प्रबळ इच्छा धरली, वारंवार इच्छा धरली तर तो खरंच मोठा, यशस्वी नट बनेल.<br /><br />एखाद्यानं प्रबळ विल पॉवर वापरली तर त्याला बंगला, कारसुद्धा माईंड पॉवरमुळं प्राप्त होईल.<br /><br />हे असले 'माईंड पॉवर'चे दावे करणारे खूप भोंदू निर्माण झाले आहेत. अहमदाबादचा 'माईंड पॉवर ट्रेनर' स्नेह देसाई आणि महाराष्ट्रातला देसाईची काळी डुप्लिकेट म्हणजे 'कार्बन कॉपी' दत्ता घोडे यांच्याविषयी आधी लिहिलंच आहे. हे दोघेही महाठग आहेत. त्यांच्या 'थर्ड आय, अँस्ट्रल ट्रॅव्हल, टेलिपथी' या दाव्यांना आपण जाहीर आव्हान टाकलंच आहे. त्यांनी पळ काढला म्हणून नागपूरमध्ये पोलिसांकडे तक्रार गुदरलीच आहे.<br /><br />पण इतरही सगळ्या खोटे दावे करणार्या 'माईंड पॉवर'वाल्यांचा आपण टप्प्याटप्प्यानं भांडाफोड करणारच आहोत.<br /><br />माझा साधा प्रश्न आहे. भारतातल्या किमान पाच कोटी तरुणांना कॅटरिना कैफ वा करिना कपूर हवी आहे. अडीच, अडीच कोटी तरुणांनी जर यापैकी एकीला प्राप्त करण्यासाठी रात्रंदिवस ध्यास घेतला, मन एकाग्र केलं, व्हिज्युअलाईज केलं तर अडीच कोटी लोकांना करिना आणि इतर अडीच कोटींना कॅटरिना प्राप्त होईल का? करिना-कॅटरिनाची हाडं तरी पुरतील का? अडीच कोटी तरुणांना हे शक्य आहे? मग माईंड पॉवर काय आहे?<br /><br />(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन<br /><br />समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)<br /><br />भ्रमणध्वनी- 9371014832</span></td></tr>
</tbody></table>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-82223337538343417052012-10-18T05:35:00.002-07:002012-10-18T05:35:31.657-07:00संमोहनात दुसर्याच्या इच्छेविरुद्ध काहीही करता येत नाही<br /><table style="background-color: white; font-family: arial; width: 100%px;"><tbody>
<tr><td><table align="left"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/13102012/13102012-md-ng-4-3456-1-small.jpg" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" style="cursor: pointer; font-size: 11px;" /></td></tr>
</tbody></table>
<span class="bodyd" style="color: #2c2c2c; font-family: arial; font-size: 14px; line-height: 24px;">'संमोहन' या विषयासंबंधी अनेक प्रकारचे समज गैरसमज आहेत. वशीकरण, मोहिनी विद्या आणि संमोहन हे एकाच प्रकारचे तंत्र-मंत्रादी प्रकार आहेत, अशी सर्वसामान्य माणसांची समजूत आहे. 'डोळय़ात डोळे घालून एखाद्या व्यक्तीला संमोहित करून लुबाडलं, तिचे दागिने काढून घेतले' अशा प्रकारच्या बातम्या अधूनमधून ऐकतो, कधी कधी वृत्तपत्रातूनही वाचतो. टी.व्ही. सिरियलमधूनही संमोहनाच्या माध्यमातून असे काही प्रकार घडताना, घडवताना आपण पाहतो. स्वत:ला तज्ज्ञ म्हणवणारे तथाकथित 'संमोहन तज्ज्ञ' तोंडाला येईल ते दावे करतात. स्टेज प्रोग्राम्सच्या माध्यमातून, मनोरंजनाचे प्रयोग सादर करून या क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण करण्यात मोलाची (?) भर घालतात. या तथाकथित संमोहन तज्ज्ञांना या विषयातलं फारसं कळतं असंही नाही. त्यांना एवढंच माहीत असतं, 'धर आणि टाक संमोहनात, दे सजेशन.' बस्स. संमोहनाच्या स्टेज प्रोगाम्सच्या दरम्यान निर्माण झालेल्या समस्यासुद्धा त्यांना कळत नाहीत. मग त्या समस्या हाताळण्याची क्षमता त्यांच्याजवळ कुठून असणार?<br /><br />सध्या या विषयाचं फारसं गांभीर्य आणि ज्ञान नसणार्या संमोहन तज्ज्ञांनी व या क्षेत्रात शिरलेल्या काही भोंदूंनी या विषयासंबंधीच्या अंधश्रद्धा आणि गैरसमज मोठय़ा प्रमाणावर निर्माण करून ठेवले आहेत.<br /><br />दुसर्याच्या इच्छेविरुद्ध त्याच्या डोळय़ात डोळे घालून अथवा आवाज काढून त्याला संमोहनात टाकता येतं हेच मुळात खोटं आहे. संमोहनाच्या माध्यमातून मोहिनी घालता येते वा कुणाला वश करता येतं हेही धादांत खोटं आहे. दुसर्याच्या इच्छेविरुद्ध एखादी गोष्ट करायला लावणारं अथवा त्याला वश करणारं संमोहन, मोहिनी अथवा वशीकरण या जगात अस्तित्वातच नाही, हे सर्वप्रथम आपण समजून घेतलं पाहिजे.<br /><br />आज मी ज्या 'संमोहन' विषयासंबंधी बोलतो आहे, तो म्हणजे 'हिप्नॉटिझम' या शब्दानं ओळखली जाणारी एक वैज्ञानिक शाखा आहे. हिप्नॉटिझम शब्दाचं भाषांतर म्हणून 'संमोहन' या शब्दाचा प्रयोग आपण करतो आहोत. बाकी आपल्या मराठी भाषेत त्यानं त्याला संमोहितच करून टाकलं. म्हणजे प्रभावित केलं, वश केलं, मंत्रमुग्ध केलं वगैरे अर्थानं हा शब्द वापरला जातो तो अर्थ इथे अभिप्रेत नाही. आज वैज्ञानिक युगात 'हिप्नोथेरपी' संमोहन उपचार पद्धती ही एक उपचार शाखा आहे. जगभर अनेक देशांत या शाखांमध्ये या विषयाचा संशोधनात्मक अभ्यास केला जातो. नियमितपणे पेशंट्सवर ही उपचार पद्धती वापरली जाते. किमान अडीच हजार वर्षापासून या विषयाचा वैज्ञानिक जगताला परिचय आहे. 2450 वर्षापूर्वी औषधीशास्त्राचा जनक हिप्पोक्रेट्स 'आर्ट ऑफ हिलिंग'च्या नावाखाली या पद्धतीची प्रक्रिया वापरत असे. हजारो लोकांना रोगमुक्त करण्यासाठी या प्रक्रियेचा उपयोग करत असे. मधल्या काळात, विशेषत: मध्ययुगीन काळात, अनेक विषयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अंधश्रद्धा, चुकीच्या समजुती निर्माण झाल्यात. याही विषयाचा प्रवास असाच जादुई, चमत्कारिक, आधिभौतिक समजुतीत गुरफटला. मॅग्नेटिझम्, इथेरियल, मेस्मेरिझम असा प्रवास करत करत तो शेवटी 'हिप्नॉसिस'पर्यंत येऊन पोहोचला. प्रामुख्यानं 18 व्या शतकात डॉ. जेम्स ब्रेड या शास्त्रज्ञानं दीर्घकाळ या विषयासंबंधी संशोधन करून काही महत्त्वाचे मुद्दे सिद्ध केले. सगळ्यात प्रथम त्याने अशा प्रकारच्या विषयाला 'हिप्नॉसिस' हा शब्द वापरला. हिप्नॉस नावाची ग्रिकांची एक झोप येण्यास कारणीभूत ठरणारी देवता होती. ही प्रक्रियासुद्धा झोपेच्याजवळ जाणारी आहे असं त्याला वाटल्यामुळं त्यानं 'हिप्नॉसिस' हा शब्द वापरला. आज हा शब्द जगन्मान्य झाला आहे. 'हिप्नॉसिस' या अवस्थेला ब्रिटिश इंग्लिशमध्ये 'ट्रान्स' असा शब्द वापरला जातो. पण ब्रिटनमध्येही 'हिप्नोथेरपी' हाच शब्द या विषयाच्या उपचार पद्धतीला मात्र वापरला जातो.<br /><br />संमोहनाच्या शेकडो प्रक्रिया आहेत. मी माझ्या संमोहन उपचारक अभ्यासक्रम (क)मध्ये 50 एक पॉझिटिव्ह प्रक्रिया शिकवतो. आणखी पन्नास एक निगेटिव्ह प्रक्रिया मला माहीत आहेत. त्या मी शिकवत नाही अथवा इतरांवर उपचारांसाठी वापरतही नाही. याचाच अर्थ यापेक्षाही अधिक मला माहीत नसलेल्याही अनेक प्रक्रिया या जगात अस्तित्वात आहेत.<br /><br />कोणतीही प्रक्रिया वापरून माणसाची बॉडी आणि माईंड दोन्ही रिलॅक्स झालं की माणूस संमोहित अवस्थेत जातो. या अवस्थेत माणसाची सूचना स्वीकारण्याची क्षमता वाढलेली असते. माणूस एका मानसिक संतुलनाच्या अवस्थेत जातो. काही काळ 10 ते 30 मिनिटं या अवस्थेत राहिल्यास माणसाच्या मनात साचलेल्या टेन्शन्स, अँग्झायटीचा, ताणतणावांचा निचरा होतो. माणूस शांत, अधिक शांत, अंतर्बाह्य शांत बनतो. त्यामुळं तो अधिकाधिक निरोगी बनतो. त्याच्या नकारात्मक स्वभावाचे कंगोरे कमी होतात. राग, चिडचिड, भीती, टेंशन, चिंता यांचं प्रमाण कमी होतं. केवळ रोज नियमितपणे काही काळ या संमोहन अवस्थेत राहिलं तरी हे फायदे एखाद्या बायप्रॉडक्टसारखे आपल्याला प्राप्त होतात.<br /><br />शिवाय संमोहित अवस्थेत आपण 'हायली सजेस्टिबल' बनत असल्यामुळे, दिलेल्या सूचना प्रभावीपणे स्वीकारत असल्यामुळे या अवस्थेचा उपयोग आपण स्वत:चं माईंड प्रोग्राम करण्यासाठी करू शकतो. त्याद्वारा आपल्या स्वभावात, वर्तणुकीत, क्रियांमध्ये, विचार करण्याच्या पद्धतीमध्ये, भावनांमध्ये विधायक व आवश्यक ते बदल घडवून आणू शकतो. आपली व्यसनं, वाईट सवयी घालवू शकतो. नवे गुण आत्मसात करू शकतो. नवी कौशल्यं, नवे तंत्र, नव्या गोष्टी उत्तमपणे शिकण्यासाठी या प्रक्रियेचा उपयोग करू शकतो.<br /><br />संमोहन ही एक आपल्या मनाची, माईंडची नैसर्गिक अवस्था आहे. मेंदूमध्ये चालणार्या कार्यप्रणालीला माईंड, मन असं म्हटलं जातं. आपल्या मेंदूत सातत्यानं काही प्रक्रिया चालत असतात. विद्युत लहरीसारख्या निघत (अेमिट) असतात. मेंदूच्या मज्जातंतूंमधून निघणार्या या विद्युत लहरींना मोजण्यासाठी आपण यंत्राचा उपयोग करतो. त्याला ई. ई.जी. घेणं असं म्हणतात. संमोहित अवस्थेत हे ई. ई. जी. नेहमी 8 ते 12 सायकल्स पर सेकंद असतात. त्याला 'अल्फा रिदम' असं म्हणण्याचाही प्रघात आहे. म्हणून संमोहनाला अल्फा रिदमची अवस्था असंही म्हटलं जातं.<br /><br />खरं म्हणजे एकाग्रतेनं केलेल्या प्रार्थनेमुळं अथवा वेगवेगळ्या धर्मानी जोपासलेल्या मेडिटेशन्समुळं, ध्यान धारणेमुळंसुद्धा आपण या अल्फा रिदमच्या अवस्थेत जाऊन पोहोचतो. वैज्ञानिकदृष्टय़ा संमोहन, मेडिटेशन, ध्यानधारणा ह्या एकच अवस्था आहेत. या सगळ्याच अवस्थांमध्ये ई.ई. जी. नेहमी 8 ते 11 सायकल्स पर सेकंद असतात. तरी अनेक लोक मेडिटेशन म्हणजे काही तरी पवित्र आहे असं मानतात आणि संमोहन म्हणजे काहीतरी हिणकस, कमी प्रतीचं आहे असं त्यांच्यावर झालेल्या संस्कारामुळं समजत असतात.<br /><br />मेडिटेशन, ध्यानधारणा या प्रक्रिया आपल्या संस्कारामधून आल्यामुळं त्या आपल्याला जवळच्या वाटतात. पवित्र वाटतात. पण परंपरागत भारतीय मेडिटेशन्समध्ये या अवस्थेत डायरेक्ट सूचना द्यायच्या नसतात. अशा सूचना देणं चुकीचं समजलं जातं. खरं म्हणजे या अवस्थेत आपली सूचना स्वीकारण्याची क्षमता प्रचंड वाढली असते. पण परंपरागत मेडिटेशन वापरताना आपण ही सुवर्णसंधी सोडतो, गमावतो.<br /><br />भारतीय समाजात मेडिटेशन्स हे देवप्राप्तीकरिता आणि आध्यात्मिक उन्नतीकरिता वापरण्याचा प्रघात आहे. व्यावहारिक जीवनाकरिता वा व्यावहारिक उन्नतीकरिता त्याचा वापर करण्याचा प्रयत्न न झाल्यामुळे आजच्या जीवनासाठी सुसंगत असा त्यांचा विकास होऊ शकला नाही. पण संमोहनशास्त्र मात्र वैज्ञानिक पद्धतीनं अभ्यासलं जात असल्यामुळे, वापरलं जात असल्यामुळे अल्फा रिदमच्या हायली सजेस्टिबल असण्याचा उपयोग करून घेतआणि डायरेक्ट सूचना देऊन स्वत:मध्ये हवे आहे तसे बदल घडवून आणण्यासाठी माणसाच्या हाती एक प्रभावी साधन उपलब्ध करून देतं.<br /><br />शिवाय मेडिटेशनच्या प्रक्रिया जास्त कठीण आहेत. वेळखाऊ, लांबलचक आहेत. सगळ्यांनाच त्या जमत नाहीत. त्या मानानं संमोहन प्रक्रिया सोप्या, सुलभ आहेत. कमी वेळात या अवस्थेमध्ये नेणार्या आहेत. त्यामुळे सामान्य माणसाला संमोहन सुलभतेनं शिकता येतं. सहजतेनं वापरता येतं. त्याचा उपयोग करून आपलं मानसिक, शारीरिक आरोग्य सुधारता येतं. स्वत: चांगले बदल घडवून आणून ऐहिक आयुष्य संपन्न बनवता येतं. मेडिटेशन आणि संमोहनाची तुलना करताना मी नेहमी एक उदाहरण देत असतो. भरदुपारी अनवाणी पायानं एक माणूस चालत जातो. 5 हजार पायर्या चढतो. वरस्थळी पोहोचल्यावर त्याला सुंदर पक्वान्नं शिजवलेली दिसतात. पण ते न खाताच तो अनवाणी पायानं पायर्या उतरून खाली उतरतो. कारण त्याला उपवास असतो. दुसरा माणूस पायर्यांच्या बाजूनं असणार्या रस्त्यावरून मोटारसायकलने लवकर वर पोहोचतो. यथेच्छ पंचपक्वान्न खातो आणि सहजतेनं पुन्हा झरकन परत येतो. पहिला माणूस मेडिटेशन करणारा आहे तर दुसरा माणूस संमोहन वापरणारा आहे.<br /><br />(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन<br /><br />समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)<br /><br />भ्रमणध्वनी 9371014832</span></td></tr>
</tbody></table>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-66905946855851973012012-10-06T04:40:00.005-07:002012-10-06T04:40:46.989-07:00ग्रहांचे खडे : ज्योतिष्यांचा पोट भरण्याचा धंदा<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br /><table style="background-color: white; font-family: arial; width: 100%px;"><tbody>
<tr><td><table align="left"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/06102012/06102012-md-ng-4-3523-1-small.jpg" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" style="cursor: pointer; font-size: 11px;" /></td></tr>
</tbody></table>
<span class="bodyd" style="color: #2c2c2c; font-family: arial; font-size: 14px; line-height: 24px;">'' बाई, तू खरी अन्नपूर्णा! तू आहेस म्हणून हे घर, घर आहे! रात्रंदिवस तू राबराब राबतेस. दिवस पाहत नाही की, रात्र पाहत नाही. म्हणून या घराचं सारं वैभव आहे. बाई तुझ्यामुळं हे घर टिकून आहे! '' घरासमोर उभा राहून सरोदी (जोशी, गावागावांत फिरणारे ज्योतिषी) मोठय़ा आवाजात टाळी ठोकतो. घरातील बाई, हातातलं काम सोडून पदराला हात पुसत पुसत उजळत्या चेहर्यांनं दारात येते. सरोद्याला हात दाखवते.<br /><br />तिचा हात हातात घेऊन बारकाईनं पाहत निरीक्षण करत ज्योतिष्याचं पुढचं भविष्यकथन सुरू होतं, '' बाई, तू लई भाग्याची. खाऊनपिऊन सुखी आहेस. (बाईचा चेहरा, दारातून दिसणारी घराच्या आतील परिस्थिती, बाईची शरीरकाठी न्याहाळत न्याहाळत भविष्यकथन रंगत जातं.) कसली तदात नाही, पण बाई हातात धन काही थांबत नाही. तुझी धनरेषाच सांगते. तू खूप कष्ट उपसते. पण बाई, तुझ्या कष्टाची कदर नाही. ज्यानं कदर करावी, तुझी किंमत करावी त्याचं अलीकडे पुरेसं लक्ष नाही.(लग्न होऊन काही वर्षे झाली असतील. बाई स्वत:च्या राहणीमानाकडे फार लक्ष देत नाही तर नवर्याचं लक्ष कमी झालंय, हे ज्योतिष्याला बरोबर कळतं.) बाई, खूप चिंता वाटते तुझ्या मनाला. पण बाई, यात तुझा काही दोष नाही. सारा साडेसातीचा खेळ आहे. साडेसाती सुरू झाली अन् मालकाचं तोंड दुसरीकडे वळलं. घरात बाहेरचे कलह येऊ लागले. बाई, कोर्टाच्या वार्या सुरू होण्याचे लक्षणं आहेत..''<br /><br />''हो ना! यांच्या छोटय़ा चुलतभावानं कोर्टात केस घातली.'' घरधनीण माहिती पुरवते. '' पाहा बाई, मी म्हणतच होतो, हा सारा 'शनी'चा खेळ. शनीला शांत करावं लागतं. बाई मी सांगतो. ते करशील? पुढं फार बिकट वाट आहे. मोठ्ठं गंडांतर येऊ घातलं आहे..'' ज्योतिष्याची टकळी सुरूच असते. बाई पार घाबरून जाते. भीती तिच्या चेहर्यावर दिसू लागते., ''सांगानं, जोशीबुआ. काय करावं लागन?'' सावज कह्यात आल्याची खात्री पटताच ज्योतिष्याची पुढची आखणी सुरू होते. हळुवारपणे जाळं<br /><br />फेकलं जातं, '' बाई, दर शनिवारी शनिदेवाला 50 ग्रॅम तेलाचा अभिषेक घालायचा.''<br /><br />''बरं, बुआ ठीक आहे. दर शनिवारी अभिषेक घालीन.'' बाई आश्वासन देते. ''व्वा बाई, तू खरी धार्मिक! खरी भक्त आहे. म्हणूनच आजवर निभावलं. पण बाई पुढचं गंडांतर फार भयानक आहे. एखाद्याच्या जीवावर ना बेतावं म्हणजे झालं..'' मोठ्ठा पॉज घेत ज्योतिषी श्वास सोडतो. ज्योतिष्याच्या पुढच्या पॉजमुळं बाई खूपच घाबरते, मूर्तिमंत भीती, काळजी तिच्या चेहर्यावर झळकू लागते. ''बाई, शांती करावी लागते अन् ती इथे घरी करून नाही चालणार. त्यासाठी हरिद्वारला जोडीनं जाऊन शांती करावी लागते. गंगेच्या काठी असलेल्या शनिदेवासमोर शांती-पूजा करावी लागते. तरच पुढचं गंडांतर टळलं.''<br /><br />''अहो, ज्योतिषीबुआ. ते तर शक्य नाही. आमच्या ह्यांना असल्या गोष्टी आवडत नाहीत. ते कधीच सोबत हरिद्वारला येणार नाही.'' बाई खूप काकुळतीनं सांगते.<br /><br />''एक उपाय आहे, बाई. तुमच्याऐवजी दुसर्या जोडीनं, तुमच्या नावानं पूजा घातली तरी चालंल.. तुम्ही म्हणाल तर मी माझ्या बायकोसोबत जाऊन पूजा घालतो, तुमच्यासाठी. पण त्यासाठी खर्च मोठा.. दोन माणसांनी हरिद्वार जाणं, येणं. पूजा, खर्च. 10 हजारांचा तरी खर्च आहे.''<br /><br />बाई लगबगीनं आत जाते. कपाट उघडते. खूप मेहनतीनं पै पै जोडून ठेवलेले पैसे काढते व मोजते. 8 हजारच भरतात. इकडेतिकडे ठेवलेले 260 रुपये सापडतात. ते घेऊन, हिरमुसला चेहरा करून बुआकडे येते. म्हणते, '' बुआ, एवढे 10 हजार तर नाही. माझ्याजवळ 8,260 रुपये आहेत. मालकाला तर मागण्याची सोय नाही. एवढय़ात जरा जमवा ना! माझ्यासाठी एवढं करा.''<br /><br />ज्योतिषीबुआ थोडसं तोंड वेडंवाकडं करीत म्हणतो,''बाई, एवढय़ानं जमायचं नाही. पण तुमच्यावर येऊ घातलेलं अरिष्ट पाहून काळीज दुखतं. तुमची भक्ती पाहून तुमच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे असं वाटतं. ठीक आहे. गरज पडली तर स्वत:जवळची पदरमोड करीन, पण तुमच्यासाठी जोडीनं पूजा घालीन.''<br /><br />8,260 रुपये घेऊन ज्योतिषी जातो.15 दिवसांनी येऊन बाईला एक 'सुरक्षाकवच' दंडावर (बाहीच्या आत) बांधण्यासाठी देतो. त्या सुरक्षाकवचाची बाजारातील किंमत असते 5 रुपये. हा किस्सा माझ्याच जवळच्या एका नातेवाईक बाईबाबत घडलेला. अ. भा अंनिसची चळवळ सुरू झाल्यावर मी अतिशय बारकाईनं या परंपरागत, गावोगाव भटकून भविष्य सांगणार्या ज्योतिष्यांचं भविष्य कथन ऐकलं आहे. टेपरेकॉर्ड केलं आहे. कोणत्याही आधुनिक, अभ्यासू, ज्योतिष्यांपेक्षा यांची भविष्यकथन पद्धती खूप जास्त प्रभावी आहे. गिर्हाईकांचं जास्तीतजास्त समाधान करणारी आहे.<br /><br />पण सारेच ज्योतिषी 'शनी'ची साडेसाती, राहू, केतूचा कोप, ग्रहाची वक्री वा राहू काल, गंडांतर, अरिष्ट, गृहशांती सांगून समोरच्याला घाबरवितात आणि गृहशांतीच्या नावाखाली भरपूर मलिदा काढतात. तो त्यांचा खरा धंदा असतो. आजवर ग्रहशांती, गंडांतर सांगून लोकांना न लुबाडणारा व्यावसायिक ज्योतिषी मी पाहिला नाही. समजा 'शनी'ला आपण तेलाचा अभिषेक केला. कितीही तेल घातलं तरी पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर असणारा शनिग्रह कसा शांत होणार? पृथ्वीपेक्षा अनेक पटीनं, आकारानं मोठा असलेला शनिग्रह 50 ग्रॅम तेलात कसा स्नान करणार? अख्खं पृथ्वीवर उपलब्ध असलेलं तेल जरी 'शनी'वर ओतलं तरी त्याला स्नान घालता येणार नाही. एवढय़ा मोठय़ा प्रचंड आकाराचा तो ग्रह आहे. तरी आपण आजही 2012 सालात ग्रहशांती या प्रकारावर विश्वास ठेवतो. त्यापायी सातत्यानं लुबाडले जातो आणि ज्योतिष्यांची तुंबडी भरत जातो. ग्रहांचे खडे हा त्यातलाच एक प्रकार. आपल्या बोटात घातलेल्या चिमुकल्या खडय़ाचा आकाशस्थ ग्रहांवर कसा परिणाम होणार?<br /><br />हा छोटासा खडा कसं आपलं संरक्षक कवच बनणार? या खडय़ात काय शक्ती आहे? ती कुठे सिद्ध झाली आहे? कुठेच नाही. याला कोणताच वैज्ञानिक आधार नाही. फक्त ज्योतिष्याचं पोट भरण्याचा हा धंदा आहे. यापलीकडे यात कवडीचंही सत्य नाही.<br /><br />ग्रहशांती, साडेसाती, राहू काल, राशिरत्न ही सारी तुमच्या- माझ्यासारख्या सामान्य माणसाला लुबाडण्यासाठी वापरली जाणारी ज्योतिष्यांची हत्यारं आहेत.<br /><br />खिसेकापूही आपला खिसा कापतात, पण आपणास बेसावध गाठून. आपल्याला नकळत. आपल्याला कळल्यावर आपण खिसेकापूला शिव्यांची लाखोली वाहतो, पण ज्योतिषी मात्र दिवसढवळ्या समजून उमजून डोळय़ादेखत आपल्याला लुबाडतात आणि लुबाडले गेल्यावर आपण या ज्योतिष्यांचेच आभार मानतो. त्यांनीच उपकार केले असं मानतो. कारण तेही लुबाडणूक आपल्यावर झालेल्या धार्मिक संस्काराचा आधार घेऊन करीत असतात. त्यामुळं.. थोडक्यात सांगायचं तर आपणच फसायला तयार असतो. फसवणार्याला, ''ये मला फसव, माझा खिसा काप असं निमंत्रण देत असतो.'' कदाचित आपल्याला वाटत असेल की, आजचे आधुनिक सुशिक्षित ज्योतिषी असला फसविण्याचा धंदा करत नसतील. म्हणून एक जाहीर अनुभव सांगतो.<br /><br />मुंबईतील गोष्ट. माझा मित्र जगदीश काबरे आणि मी एका व्याख्यान कार्यक्रमावरून त्याच्या दुचाकीवरून परत येत होतो. तो विज्ञान शिक्षक आहे. त्याला एका मुंबईतील नामवंत संस्थेनं पुरस्कार जाहीर केला होता. रस्त्यातच ते स्थळ असल्यामुळं मीही त्याच्यासोबत गेलो. त्या ठिकाणी कालनिर्णयकार जयंत साळगावकरांचं व्याख्यान सुरू होतं. त्यांचं व्याख्यान झाल्यावर 'उत्तम विज्ञान शिक्षकाचा' पुरस्कार जयंत साळगावकर यांच्या हस्ते काबरेंना दिला जाणार असं आयोजकांनी सांगितलं. विज्ञान शिक्षकाला एका ज्योतिष्याच्या हस्ते पुरस्कार? जगदीश काबरे चिडले. त्यांनी पुरस्कार घेण्यास नकार दिला. आयोजकांनी मार्ग काढला. काबरेंना दुसर्यांच्या हस्ते पुरस्कार देऊ, असं सांगितलं. आम्ही थांबलो. भाषण ऐकू लागलो. जयंत साळगावकर सांगत होते,'' होय, ग्रहशांती करता येते. ग्रहशांतीसाठी केल्या जाणार्या पूजेमुळं ग्रहांचे होणारे दुष्परिणाम कमी करता येतात, थांबवता येतात.''<br /><br />जगदीश काबरेंनी उभं राहून विचारलं, ''हे कसं शक्य आहे? ग्रहांची भ्रमणकक्षा, अंतर ठरलेलं आहे.त्यांच्या भ्रमणानुसार, स्थानानुसार जर माणसांवर काही परिणाम होत असेल, तर ते होणारे परिणाम बदलणं शक्यच नाही. इकडे कितीही पूजा केली तरी 'शनी' वा कोणत्याही ग्रहाच्या अंतरावर वा भ्रमणावर काहीच परिणाम होणार नाही. यामुळे होणारा परिणाम बदलूच शकणार नाही. तेव्हा ग्रहशांती करणं शक्य आहे असं आपण कसं म्हणता?''<br /><br />जयंत साळगावकर या प्रश्नाचं उत्तर न देता ''श्रद्धा, धर्मश्रद्धा..''वगैरे बोलायला लागले. तेव्हा शेवटी मी उभा राहून म्हणालो, ''काबरेंच्या प्रश्नांना उत्तर द्या! धर्मश्रद्धेच्या नावाखाली टाळू नका!'' जयंत साळगावकरांनी मला नाव विचारलं. मी एकदोनदा टाळलं. कारण नाव सांगितलं असतं तर सारं वातावरण बदललं असतं. फारच आग्रह धरल्यावर मी माझं नाव सांगितलं आणि भलतंच झालं. माझं बोलणं, प्रश्न विचारणं आव्हान ठरलं. साळगावकरांचा आत्मविश्वास पार ढासळला. श्रोते घोळका करून माझ्याभोवती गोळा झाले. प्रश्नोत्तरातून ज्योतिष्याची चिरफाड सुरू झाली. हे मी मुद्दाम केलं नव्हतं. अपघातानंच झालं होतं. पण एक कळलं. जयंत साळगावकरांसारखा मोठा ज्योतिषी, कालनिर्णयकारसुद्धा ग्रहशांती सांगून लोकांना..???<br /><br />(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन<br /><br />समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)<br /><br />भ्रमणध्वनी- 9371014832</span></td></tr>
</tbody></table>
</div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-17382174263096177002012-10-06T04:40:00.003-07:002012-10-06T04:40:40.584-07:00ग्रहांचे खडे : ज्योतिष्यांचा पोट भरण्याचा धंदा<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br /><table style="background-color: white; font-family: arial; width: 100%px;"><tbody>
<tr><td><table align="left"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/06102012/06102012-md-ng-4-3523-1-small.jpg" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" style="cursor: pointer; font-size: 11px;" /></td></tr>
</tbody></table>
<span class="bodyd" style="color: #2c2c2c; font-family: arial; font-size: 14px; line-height: 24px;">'' बाई, तू खरी अन्नपूर्णा! तू आहेस म्हणून हे घर, घर आहे! रात्रंदिवस तू राबराब राबतेस. दिवस पाहत नाही की, रात्र पाहत नाही. म्हणून या घराचं सारं वैभव आहे. बाई तुझ्यामुळं हे घर टिकून आहे! '' घरासमोर उभा राहून सरोदी (जोशी, गावागावांत फिरणारे ज्योतिषी) मोठय़ा आवाजात टाळी ठोकतो. घरातील बाई, हातातलं काम सोडून पदराला हात पुसत पुसत उजळत्या चेहर्यांनं दारात येते. सरोद्याला हात दाखवते.<br /><br />तिचा हात हातात घेऊन बारकाईनं पाहत निरीक्षण करत ज्योतिष्याचं पुढचं भविष्यकथन सुरू होतं, '' बाई, तू लई भाग्याची. खाऊनपिऊन सुखी आहेस. (बाईचा चेहरा, दारातून दिसणारी घराच्या आतील परिस्थिती, बाईची शरीरकाठी न्याहाळत न्याहाळत भविष्यकथन रंगत जातं.) कसली तदात नाही, पण बाई हातात धन काही थांबत नाही. तुझी धनरेषाच सांगते. तू खूप कष्ट उपसते. पण बाई, तुझ्या कष्टाची कदर नाही. ज्यानं कदर करावी, तुझी किंमत करावी त्याचं अलीकडे पुरेसं लक्ष नाही.(लग्न होऊन काही वर्षे झाली असतील. बाई स्वत:च्या राहणीमानाकडे फार लक्ष देत नाही तर नवर्याचं लक्ष कमी झालंय, हे ज्योतिष्याला बरोबर कळतं.) बाई, खूप चिंता वाटते तुझ्या मनाला. पण बाई, यात तुझा काही दोष नाही. सारा साडेसातीचा खेळ आहे. साडेसाती सुरू झाली अन् मालकाचं तोंड दुसरीकडे वळलं. घरात बाहेरचे कलह येऊ लागले. बाई, कोर्टाच्या वार्या सुरू होण्याचे लक्षणं आहेत..''<br /><br />''हो ना! यांच्या छोटय़ा चुलतभावानं कोर्टात केस घातली.'' घरधनीण माहिती पुरवते. '' पाहा बाई, मी म्हणतच होतो, हा सारा 'शनी'चा खेळ. शनीला शांत करावं लागतं. बाई मी सांगतो. ते करशील? पुढं फार बिकट वाट आहे. मोठ्ठं गंडांतर येऊ घातलं आहे..'' ज्योतिष्याची टकळी सुरूच असते. बाई पार घाबरून जाते. भीती तिच्या चेहर्यावर दिसू लागते., ''सांगानं, जोशीबुआ. काय करावं लागन?'' सावज कह्यात आल्याची खात्री पटताच ज्योतिष्याची पुढची आखणी सुरू होते. हळुवारपणे जाळं<br /><br />फेकलं जातं, '' बाई, दर शनिवारी शनिदेवाला 50 ग्रॅम तेलाचा अभिषेक घालायचा.''<br /><br />''बरं, बुआ ठीक आहे. दर शनिवारी अभिषेक घालीन.'' बाई आश्वासन देते. ''व्वा बाई, तू खरी धार्मिक! खरी भक्त आहे. म्हणूनच आजवर निभावलं. पण बाई पुढचं गंडांतर फार भयानक आहे. एखाद्याच्या जीवावर ना बेतावं म्हणजे झालं..'' मोठ्ठा पॉज घेत ज्योतिषी श्वास सोडतो. ज्योतिष्याच्या पुढच्या पॉजमुळं बाई खूपच घाबरते, मूर्तिमंत भीती, काळजी तिच्या चेहर्यावर झळकू लागते. ''बाई, शांती करावी लागते अन् ती इथे घरी करून नाही चालणार. त्यासाठी हरिद्वारला जोडीनं जाऊन शांती करावी लागते. गंगेच्या काठी असलेल्या शनिदेवासमोर शांती-पूजा करावी लागते. तरच पुढचं गंडांतर टळलं.''<br /><br />''अहो, ज्योतिषीबुआ. ते तर शक्य नाही. आमच्या ह्यांना असल्या गोष्टी आवडत नाहीत. ते कधीच सोबत हरिद्वारला येणार नाही.'' बाई खूप काकुळतीनं सांगते.<br /><br />''एक उपाय आहे, बाई. तुमच्याऐवजी दुसर्या जोडीनं, तुमच्या नावानं पूजा घातली तरी चालंल.. तुम्ही म्हणाल तर मी माझ्या बायकोसोबत जाऊन पूजा घालतो, तुमच्यासाठी. पण त्यासाठी खर्च मोठा.. दोन माणसांनी हरिद्वार जाणं, येणं. पूजा, खर्च. 10 हजारांचा तरी खर्च आहे.''<br /><br />बाई लगबगीनं आत जाते. कपाट उघडते. खूप मेहनतीनं पै पै जोडून ठेवलेले पैसे काढते व मोजते. 8 हजारच भरतात. इकडेतिकडे ठेवलेले 260 रुपये सापडतात. ते घेऊन, हिरमुसला चेहरा करून बुआकडे येते. म्हणते, '' बुआ, एवढे 10 हजार तर नाही. माझ्याजवळ 8,260 रुपये आहेत. मालकाला तर मागण्याची सोय नाही. एवढय़ात जरा जमवा ना! माझ्यासाठी एवढं करा.''<br /><br />ज्योतिषीबुआ थोडसं तोंड वेडंवाकडं करीत म्हणतो,''बाई, एवढय़ानं जमायचं नाही. पण तुमच्यावर येऊ घातलेलं अरिष्ट पाहून काळीज दुखतं. तुमची भक्ती पाहून तुमच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे असं वाटतं. ठीक आहे. गरज पडली तर स्वत:जवळची पदरमोड करीन, पण तुमच्यासाठी जोडीनं पूजा घालीन.''<br /><br />8,260 रुपये घेऊन ज्योतिषी जातो.15 दिवसांनी येऊन बाईला एक 'सुरक्षाकवच' दंडावर (बाहीच्या आत) बांधण्यासाठी देतो. त्या सुरक्षाकवचाची बाजारातील किंमत असते 5 रुपये. हा किस्सा माझ्याच जवळच्या एका नातेवाईक बाईबाबत घडलेला. अ. भा अंनिसची चळवळ सुरू झाल्यावर मी अतिशय बारकाईनं या परंपरागत, गावोगाव भटकून भविष्य सांगणार्या ज्योतिष्यांचं भविष्य कथन ऐकलं आहे. टेपरेकॉर्ड केलं आहे. कोणत्याही आधुनिक, अभ्यासू, ज्योतिष्यांपेक्षा यांची भविष्यकथन पद्धती खूप जास्त प्रभावी आहे. गिर्हाईकांचं जास्तीतजास्त समाधान करणारी आहे.<br /><br />पण सारेच ज्योतिषी 'शनी'ची साडेसाती, राहू, केतूचा कोप, ग्रहाची वक्री वा राहू काल, गंडांतर, अरिष्ट, गृहशांती सांगून समोरच्याला घाबरवितात आणि गृहशांतीच्या नावाखाली भरपूर मलिदा काढतात. तो त्यांचा खरा धंदा असतो. आजवर ग्रहशांती, गंडांतर सांगून लोकांना न लुबाडणारा व्यावसायिक ज्योतिषी मी पाहिला नाही. समजा 'शनी'ला आपण तेलाचा अभिषेक केला. कितीही तेल घातलं तरी पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर असणारा शनिग्रह कसा शांत होणार? पृथ्वीपेक्षा अनेक पटीनं, आकारानं मोठा असलेला शनिग्रह 50 ग्रॅम तेलात कसा स्नान करणार? अख्खं पृथ्वीवर उपलब्ध असलेलं तेल जरी 'शनी'वर ओतलं तरी त्याला स्नान घालता येणार नाही. एवढय़ा मोठय़ा प्रचंड आकाराचा तो ग्रह आहे. तरी आपण आजही 2012 सालात ग्रहशांती या प्रकारावर विश्वास ठेवतो. त्यापायी सातत्यानं लुबाडले जातो आणि ज्योतिष्यांची तुंबडी भरत जातो. ग्रहांचे खडे हा त्यातलाच एक प्रकार. आपल्या बोटात घातलेल्या चिमुकल्या खडय़ाचा आकाशस्थ ग्रहांवर कसा परिणाम होणार?<br /><br />हा छोटासा खडा कसं आपलं संरक्षक कवच बनणार? या खडय़ात काय शक्ती आहे? ती कुठे सिद्ध झाली आहे? कुठेच नाही. याला कोणताच वैज्ञानिक आधार नाही. फक्त ज्योतिष्याचं पोट भरण्याचा हा धंदा आहे. यापलीकडे यात कवडीचंही सत्य नाही.<br /><br />ग्रहशांती, साडेसाती, राहू काल, राशिरत्न ही सारी तुमच्या- माझ्यासारख्या सामान्य माणसाला लुबाडण्यासाठी वापरली जाणारी ज्योतिष्यांची हत्यारं आहेत.<br /><br />खिसेकापूही आपला खिसा कापतात, पण आपणास बेसावध गाठून. आपल्याला नकळत. आपल्याला कळल्यावर आपण खिसेकापूला शिव्यांची लाखोली वाहतो, पण ज्योतिषी मात्र दिवसढवळ्या समजून उमजून डोळय़ादेखत आपल्याला लुबाडतात आणि लुबाडले गेल्यावर आपण या ज्योतिष्यांचेच आभार मानतो. त्यांनीच उपकार केले असं मानतो. कारण तेही लुबाडणूक आपल्यावर झालेल्या धार्मिक संस्काराचा आधार घेऊन करीत असतात. त्यामुळं.. थोडक्यात सांगायचं तर आपणच फसायला तयार असतो. फसवणार्याला, ''ये मला फसव, माझा खिसा काप असं निमंत्रण देत असतो.'' कदाचित आपल्याला वाटत असेल की, आजचे आधुनिक सुशिक्षित ज्योतिषी असला फसविण्याचा धंदा करत नसतील. म्हणून एक जाहीर अनुभव सांगतो.<br /><br />मुंबईतील गोष्ट. माझा मित्र जगदीश काबरे आणि मी एका व्याख्यान कार्यक्रमावरून त्याच्या दुचाकीवरून परत येत होतो. तो विज्ञान शिक्षक आहे. त्याला एका मुंबईतील नामवंत संस्थेनं पुरस्कार जाहीर केला होता. रस्त्यातच ते स्थळ असल्यामुळं मीही त्याच्यासोबत गेलो. त्या ठिकाणी कालनिर्णयकार जयंत साळगावकरांचं व्याख्यान सुरू होतं. त्यांचं व्याख्यान झाल्यावर 'उत्तम विज्ञान शिक्षकाचा' पुरस्कार जयंत साळगावकर यांच्या हस्ते काबरेंना दिला जाणार असं आयोजकांनी सांगितलं. विज्ञान शिक्षकाला एका ज्योतिष्याच्या हस्ते पुरस्कार? जगदीश काबरे चिडले. त्यांनी पुरस्कार घेण्यास नकार दिला. आयोजकांनी मार्ग काढला. काबरेंना दुसर्यांच्या हस्ते पुरस्कार देऊ, असं सांगितलं. आम्ही थांबलो. भाषण ऐकू लागलो. जयंत साळगावकर सांगत होते,'' होय, ग्रहशांती करता येते. ग्रहशांतीसाठी केल्या जाणार्या पूजेमुळं ग्रहांचे होणारे दुष्परिणाम कमी करता येतात, थांबवता येतात.''<br /><br />जगदीश काबरेंनी उभं राहून विचारलं, ''हे कसं शक्य आहे? ग्रहांची भ्रमणकक्षा, अंतर ठरलेलं आहे.त्यांच्या भ्रमणानुसार, स्थानानुसार जर माणसांवर काही परिणाम होत असेल, तर ते होणारे परिणाम बदलणं शक्यच नाही. इकडे कितीही पूजा केली तरी 'शनी' वा कोणत्याही ग्रहाच्या अंतरावर वा भ्रमणावर काहीच परिणाम होणार नाही. यामुळे होणारा परिणाम बदलूच शकणार नाही. तेव्हा ग्रहशांती करणं शक्य आहे असं आपण कसं म्हणता?''<br /><br />जयंत साळगावकर या प्रश्नाचं उत्तर न देता ''श्रद्धा, धर्मश्रद्धा..''वगैरे बोलायला लागले. तेव्हा शेवटी मी उभा राहून म्हणालो, ''काबरेंच्या प्रश्नांना उत्तर द्या! धर्मश्रद्धेच्या नावाखाली टाळू नका!'' जयंत साळगावकरांनी मला नाव विचारलं. मी एकदोनदा टाळलं. कारण नाव सांगितलं असतं तर सारं वातावरण बदललं असतं. फारच आग्रह धरल्यावर मी माझं नाव सांगितलं आणि भलतंच झालं. माझं बोलणं, प्रश्न विचारणं आव्हान ठरलं. साळगावकरांचा आत्मविश्वास पार ढासळला. श्रोते घोळका करून माझ्याभोवती गोळा झाले. प्रश्नोत्तरातून ज्योतिष्याची चिरफाड सुरू झाली. हे मी मुद्दाम केलं नव्हतं. अपघातानंच झालं होतं. पण एक कळलं. जयंत साळगावकरांसारखा मोठा ज्योतिषी, कालनिर्णयकारसुद्धा ग्रहशांती सांगून लोकांना..???<br /><br />(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन<br /><br />समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)<br /><br />भ्रमणध्वनी- 9371014832</span></td></tr>
</tbody></table>
</div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7731376933487504302.post-80793881055710380762012-10-06T04:40:00.001-07:002012-10-06T04:40:32.554-07:00ग्रहांचे खडे : ज्योतिष्यांचा पोट भरण्याचा धंदा<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br /><table style="background-color: white; font-family: arial; width: 100%px;"><tbody>
<tr><td><table align="left"><tbody>
<tr><td><img align="left" src="http://epunyanagari.com/epaperimages/06102012/06102012-md-ng-4-3523-1-small.jpg" /></td></tr>
<tr><td><img align="right" class="hand1" src="http://epunyanagari.com/images/dnsenlarge.gif" style="cursor: pointer; font-size: 11px;" /></td></tr>
</tbody></table>
<span class="bodyd" style="color: #2c2c2c; font-family: arial; font-size: 14px; line-height: 24px;">'' बाई, तू खरी अन्नपूर्णा! तू आहेस म्हणून हे घर, घर आहे! रात्रंदिवस तू राबराब राबतेस. दिवस पाहत नाही की, रात्र पाहत नाही. म्हणून या घराचं सारं वैभव आहे. बाई तुझ्यामुळं हे घर टिकून आहे! '' घरासमोर उभा राहून सरोदी (जोशी, गावागावांत फिरणारे ज्योतिषी) मोठय़ा आवाजात टाळी ठोकतो. घरातील बाई, हातातलं काम सोडून पदराला हात पुसत पुसत उजळत्या चेहर्यांनं दारात येते. सरोद्याला हात दाखवते.<br /><br />तिचा हात हातात घेऊन बारकाईनं पाहत निरीक्षण करत ज्योतिष्याचं पुढचं भविष्यकथन सुरू होतं, '' बाई, तू लई भाग्याची. खाऊनपिऊन सुखी आहेस. (बाईचा चेहरा, दारातून दिसणारी घराच्या आतील परिस्थिती, बाईची शरीरकाठी न्याहाळत न्याहाळत भविष्यकथन रंगत जातं.) कसली तदात नाही, पण बाई हातात धन काही थांबत नाही. तुझी धनरेषाच सांगते. तू खूप कष्ट उपसते. पण बाई, तुझ्या कष्टाची कदर नाही. ज्यानं कदर करावी, तुझी किंमत करावी त्याचं अलीकडे पुरेसं लक्ष नाही.(लग्न होऊन काही वर्षे झाली असतील. बाई स्वत:च्या राहणीमानाकडे फार लक्ष देत नाही तर नवर्याचं लक्ष कमी झालंय, हे ज्योतिष्याला बरोबर कळतं.) बाई, खूप चिंता वाटते तुझ्या मनाला. पण बाई, यात तुझा काही दोष नाही. सारा साडेसातीचा खेळ आहे. साडेसाती सुरू झाली अन् मालकाचं तोंड दुसरीकडे वळलं. घरात बाहेरचे कलह येऊ लागले. बाई, कोर्टाच्या वार्या सुरू होण्याचे लक्षणं आहेत..''<br /><br />''हो ना! यांच्या छोटय़ा चुलतभावानं कोर्टात केस घातली.'' घरधनीण माहिती पुरवते. '' पाहा बाई, मी म्हणतच होतो, हा सारा 'शनी'चा खेळ. शनीला शांत करावं लागतं. बाई मी सांगतो. ते करशील? पुढं फार बिकट वाट आहे. मोठ्ठं गंडांतर येऊ घातलं आहे..'' ज्योतिष्याची टकळी सुरूच असते. बाई पार घाबरून जाते. भीती तिच्या चेहर्यावर दिसू लागते., ''सांगानं, जोशीबुआ. काय करावं लागन?'' सावज कह्यात आल्याची खात्री पटताच ज्योतिष्याची पुढची आखणी सुरू होते. हळुवारपणे जाळं<br /><br />फेकलं जातं, '' बाई, दर शनिवारी शनिदेवाला 50 ग्रॅम तेलाचा अभिषेक घालायचा.''<br /><br />''बरं, बुआ ठीक आहे. दर शनिवारी अभिषेक घालीन.'' बाई आश्वासन देते. ''व्वा बाई, तू खरी धार्मिक! खरी भक्त आहे. म्हणूनच आजवर निभावलं. पण बाई पुढचं गंडांतर फार भयानक आहे. एखाद्याच्या जीवावर ना बेतावं म्हणजे झालं..'' मोठ्ठा पॉज घेत ज्योतिषी श्वास सोडतो. ज्योतिष्याच्या पुढच्या पॉजमुळं बाई खूपच घाबरते, मूर्तिमंत भीती, काळजी तिच्या चेहर्यावर झळकू लागते. ''बाई, शांती करावी लागते अन् ती इथे घरी करून नाही चालणार. त्यासाठी हरिद्वारला जोडीनं जाऊन शांती करावी लागते. गंगेच्या काठी असलेल्या शनिदेवासमोर शांती-पूजा करावी लागते. तरच पुढचं गंडांतर टळलं.''<br /><br />''अहो, ज्योतिषीबुआ. ते तर शक्य नाही. आमच्या ह्यांना असल्या गोष्टी आवडत नाहीत. ते कधीच सोबत हरिद्वारला येणार नाही.'' बाई खूप काकुळतीनं सांगते.<br /><br />''एक उपाय आहे, बाई. तुमच्याऐवजी दुसर्या जोडीनं, तुमच्या नावानं पूजा घातली तरी चालंल.. तुम्ही म्हणाल तर मी माझ्या बायकोसोबत जाऊन पूजा घालतो, तुमच्यासाठी. पण त्यासाठी खर्च मोठा.. दोन माणसांनी हरिद्वार जाणं, येणं. पूजा, खर्च. 10 हजारांचा तरी खर्च आहे.''<br /><br />बाई लगबगीनं आत जाते. कपाट उघडते. खूप मेहनतीनं पै पै जोडून ठेवलेले पैसे काढते व मोजते. 8 हजारच भरतात. इकडेतिकडे ठेवलेले 260 रुपये सापडतात. ते घेऊन, हिरमुसला चेहरा करून बुआकडे येते. म्हणते, '' बुआ, एवढे 10 हजार तर नाही. माझ्याजवळ 8,260 रुपये आहेत. मालकाला तर मागण्याची सोय नाही. एवढय़ात जरा जमवा ना! माझ्यासाठी एवढं करा.''<br /><br />ज्योतिषीबुआ थोडसं तोंड वेडंवाकडं करीत म्हणतो,''बाई, एवढय़ानं जमायचं नाही. पण तुमच्यावर येऊ घातलेलं अरिष्ट पाहून काळीज दुखतं. तुमची भक्ती पाहून तुमच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे असं वाटतं. ठीक आहे. गरज पडली तर स्वत:जवळची पदरमोड करीन, पण तुमच्यासाठी जोडीनं पूजा घालीन.''<br /><br />8,260 रुपये घेऊन ज्योतिषी जातो.15 दिवसांनी येऊन बाईला एक 'सुरक्षाकवच' दंडावर (बाहीच्या आत) बांधण्यासाठी देतो. त्या सुरक्षाकवचाची बाजारातील किंमत असते 5 रुपये. हा किस्सा माझ्याच जवळच्या एका नातेवाईक बाईबाबत घडलेला. अ. भा अंनिसची चळवळ सुरू झाल्यावर मी अतिशय बारकाईनं या परंपरागत, गावोगाव भटकून भविष्य सांगणार्या ज्योतिष्यांचं भविष्य कथन ऐकलं आहे. टेपरेकॉर्ड केलं आहे. कोणत्याही आधुनिक, अभ्यासू, ज्योतिष्यांपेक्षा यांची भविष्यकथन पद्धती खूप जास्त प्रभावी आहे. गिर्हाईकांचं जास्तीतजास्त समाधान करणारी आहे.<br /><br />पण सारेच ज्योतिषी 'शनी'ची साडेसाती, राहू, केतूचा कोप, ग्रहाची वक्री वा राहू काल, गंडांतर, अरिष्ट, गृहशांती सांगून समोरच्याला घाबरवितात आणि गृहशांतीच्या नावाखाली भरपूर मलिदा काढतात. तो त्यांचा खरा धंदा असतो. आजवर ग्रहशांती, गंडांतर सांगून लोकांना न लुबाडणारा व्यावसायिक ज्योतिषी मी पाहिला नाही. समजा 'शनी'ला आपण तेलाचा अभिषेक केला. कितीही तेल घातलं तरी पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर असणारा शनिग्रह कसा शांत होणार? पृथ्वीपेक्षा अनेक पटीनं, आकारानं मोठा असलेला शनिग्रह 50 ग्रॅम तेलात कसा स्नान करणार? अख्खं पृथ्वीवर उपलब्ध असलेलं तेल जरी 'शनी'वर ओतलं तरी त्याला स्नान घालता येणार नाही. एवढय़ा मोठय़ा प्रचंड आकाराचा तो ग्रह आहे. तरी आपण आजही 2012 सालात ग्रहशांती या प्रकारावर विश्वास ठेवतो. त्यापायी सातत्यानं लुबाडले जातो आणि ज्योतिष्यांची तुंबडी भरत जातो. ग्रहांचे खडे हा त्यातलाच एक प्रकार. आपल्या बोटात घातलेल्या चिमुकल्या खडय़ाचा आकाशस्थ ग्रहांवर कसा परिणाम होणार?<br /><br />हा छोटासा खडा कसं आपलं संरक्षक कवच बनणार? या खडय़ात काय शक्ती आहे? ती कुठे सिद्ध झाली आहे? कुठेच नाही. याला कोणताच वैज्ञानिक आधार नाही. फक्त ज्योतिष्याचं पोट भरण्याचा हा धंदा आहे. यापलीकडे यात कवडीचंही सत्य नाही.<br /><br />ग्रहशांती, साडेसाती, राहू काल, राशिरत्न ही सारी तुमच्या- माझ्यासारख्या सामान्य माणसाला लुबाडण्यासाठी वापरली जाणारी ज्योतिष्यांची हत्यारं आहेत.<br /><br />खिसेकापूही आपला खिसा कापतात, पण आपणास बेसावध गाठून. आपल्याला नकळत. आपल्याला कळल्यावर आपण खिसेकापूला शिव्यांची लाखोली वाहतो, पण ज्योतिषी मात्र दिवसढवळ्या समजून उमजून डोळय़ादेखत आपल्याला लुबाडतात आणि लुबाडले गेल्यावर आपण या ज्योतिष्यांचेच आभार मानतो. त्यांनीच उपकार केले असं मानतो. कारण तेही लुबाडणूक आपल्यावर झालेल्या धार्मिक संस्काराचा आधार घेऊन करीत असतात. त्यामुळं.. थोडक्यात सांगायचं तर आपणच फसायला तयार असतो. फसवणार्याला, ''ये मला फसव, माझा खिसा काप असं निमंत्रण देत असतो.'' कदाचित आपल्याला वाटत असेल की, आजचे आधुनिक सुशिक्षित ज्योतिषी असला फसविण्याचा धंदा करत नसतील. म्हणून एक जाहीर अनुभव सांगतो.<br /><br />मुंबईतील गोष्ट. माझा मित्र जगदीश काबरे आणि मी एका व्याख्यान कार्यक्रमावरून त्याच्या दुचाकीवरून परत येत होतो. तो विज्ञान शिक्षक आहे. त्याला एका मुंबईतील नामवंत संस्थेनं पुरस्कार जाहीर केला होता. रस्त्यातच ते स्थळ असल्यामुळं मीही त्याच्यासोबत गेलो. त्या ठिकाणी कालनिर्णयकार जयंत साळगावकरांचं व्याख्यान सुरू होतं. त्यांचं व्याख्यान झाल्यावर 'उत्तम विज्ञान शिक्षकाचा' पुरस्कार जयंत साळगावकर यांच्या हस्ते काबरेंना दिला जाणार असं आयोजकांनी सांगितलं. विज्ञान शिक्षकाला एका ज्योतिष्याच्या हस्ते पुरस्कार? जगदीश काबरे चिडले. त्यांनी पुरस्कार घेण्यास नकार दिला. आयोजकांनी मार्ग काढला. काबरेंना दुसर्यांच्या हस्ते पुरस्कार देऊ, असं सांगितलं. आम्ही थांबलो. भाषण ऐकू लागलो. जयंत साळगावकर सांगत होते,'' होय, ग्रहशांती करता येते. ग्रहशांतीसाठी केल्या जाणार्या पूजेमुळं ग्रहांचे होणारे दुष्परिणाम कमी करता येतात, थांबवता येतात.''<br /><br />जगदीश काबरेंनी उभं राहून विचारलं, ''हे कसं शक्य आहे? ग्रहांची भ्रमणकक्षा, अंतर ठरलेलं आहे.त्यांच्या भ्रमणानुसार, स्थानानुसार जर माणसांवर काही परिणाम होत असेल, तर ते होणारे परिणाम बदलणं शक्यच नाही. इकडे कितीही पूजा केली तरी 'शनी' वा कोणत्याही ग्रहाच्या अंतरावर वा भ्रमणावर काहीच परिणाम होणार नाही. यामुळे होणारा परिणाम बदलूच शकणार नाही. तेव्हा ग्रहशांती करणं शक्य आहे असं आपण कसं म्हणता?''<br /><br />जयंत साळगावकर या प्रश्नाचं उत्तर न देता ''श्रद्धा, धर्मश्रद्धा..''वगैरे बोलायला लागले. तेव्हा शेवटी मी उभा राहून म्हणालो, ''काबरेंच्या प्रश्नांना उत्तर द्या! धर्मश्रद्धेच्या नावाखाली टाळू नका!'' जयंत साळगावकरांनी मला नाव विचारलं. मी एकदोनदा टाळलं. कारण नाव सांगितलं असतं तर सारं वातावरण बदललं असतं. फारच आग्रह धरल्यावर मी माझं नाव सांगितलं आणि भलतंच झालं. माझं बोलणं, प्रश्न विचारणं आव्हान ठरलं. साळगावकरांचा आत्मविश्वास पार ढासळला. श्रोते घोळका करून माझ्याभोवती गोळा झाले. प्रश्नोत्तरातून ज्योतिष्याची चिरफाड सुरू झाली. हे मी मुद्दाम केलं नव्हतं. अपघातानंच झालं होतं. पण एक कळलं. जयंत साळगावकरांसारखा मोठा ज्योतिषी, कालनिर्णयकारसुद्धा ग्रहशांती सांगून लोकांना..???<br /><br />(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन<br /><br />समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)<br /><br />भ्रमणध्वनी- 9371014832</span></td></tr>
</tbody></table>
</div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/02141345648191496161noreply@blogger.com0