Saturday 11 August 2012

कल्पना व अंतर्मनाच्या सामर्थ्यावर भाषणशैलीची समृद्धी


कल्पनाचित्र निर्माण करण्याचे, तर्ळीरश्रळीश करण्याचं मनाचं अद्भुत सामर्थ्य आपण गेल्या शनिवारी समजून घेतलं. यात काही लोकांना करश्रश्र्रीलळपरींळेपी होतात. हे कल्पनेतील जिवंत अनुभव असतात. मनाला सत्य अनुभव आणि हे कल्पनेतील अनुभव असा फरक करता येत नाही. यामुळे दीर्घकाळापासून माणूस याला आधिभौतिक, पारलौकिक अनुभव मानत आला आहे. कळत नकळत यामुळं माणसाची फसवणूक झाली आहे.

पण आधुनिक काळात मात्र याच तर्ळीरश्रळीरींळेप सामर्थ्याचा उपयोग अनेक विधायक कामासाठी करण्याचं तंत्र माणसानं विकसित केलं आहे.

माणसाच्या मनाचे, चळपव चे दोन भाग मानले जातात. एक बाह्य मन, उेपीलर्ळेीी चळपव. हे विचार करण्याचं, तर्क, विश्लेषण, भाषा, लेखन, गणित करण्याचं सामर्थ्य असणारं मन. याविषयी आपल्याला पूर्ण जाणीव असते. सार्‍या शरीराचं जाणीवपूर्वक हे नियंत्रण करत असतं. साधारणत: आपल्या एकूण मनाच्या दहापैकी एकपट भाग या मनानं व्यापला असावा असं मानलं जातं.

दुसरं अंतर्मन, र्डीललेपलर्ळेीी चळपव यामध्ये कल्पना करण्याचं तर्ळीरश्रळीश करण्याचं, प्रतिमा पाहण्याचं, ओळखण्याचं सामर्थ्य असतं. एकूण मनाच्या दहापैकी नऊ भाग एवढा मोठा व्याप हा मनाचा आहे असं मानलं जातं. याच मनात लहानपणापासून आपल्यावर झालेले संस्कार, नीतिमूल्य, अनुभूती, विचार करण्याची पद्धती प्रोग्राम झाली असते, रेकॉर्ड झाली असते. हे प्रोग्रामिंग म्हणजेच आपलं व्यक्तिमत्त्व. यातूनच आपला स्वभाव, कृती, भावना, अनुभव घेण्याची प्रक्रिया व विचार करण्याची (सवयीनं) प्रक्रिया निर्माण होत असते.

आता हे मन कुठं असतं? ''हाय मेरा दिल'' असं म्हणताना आपण हृदयावर हात ठेवतो व प्रेम तिथं आहे, 'तुम मेरे दिल मे बसी हो' असं दाखवतो. पण तिथे फक्त रक्ताभिसरण करणारं हृदय असतं. प्रेम वाटणारं, फील करणारं मन हे मेंदूत असतं. खरं म्हणजे माणसानं प्रेम दाखवताना डोक्यावर हात ठेवायला हवा, हृदयावर नव्हे.

मेंदूत चालणारी कार्यप्रणाली म्हणजे मनर्. ीपलींळेपळपस ेष ींहश इीरळप ळी उरश्रश्रशव चळपव ही मनाची वैज्ञानिक व्याख्या आहे. आणि या मनात जे जे रेकॉर्ड झालं आहे, जे जे प्रोग्राम झालं आहे ते म्हणजे आपलं व्यक्तिमत्त्व. यातील काही गोष्टी आपल्या नकळत निर्माण होतात. काही गोष्टी आपण प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक निर्माण करतो. एकूण व्यक्तिमत्त्व कसं निर्माण होतं ते आपण पुन्हा कधीतरी पाहू. आता अंतर्मनाच्या र्डीललेपीलर्ळेीी चळपव च्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करू.

आपण एखादी नवी कला, कौशल्य कसं प्राप्त करतो? भाषण कला शिकायची आहे. कसं शिकतो आपण? माझ्या अनुभवापासून सुरुवात करतो. आपल्यापैकी प्रत्येक जण बालवयात बोलणं सहजतेनं शिकतो. आई-वडील, लोकांकडून सहजतेनं वय वाढीसोबतच भाषा-बोलणं आत्मसात करतो. इतरांशी आपण बोलतो, भांडतो, गप्पा मारतो, अनुभव सांगतो. यात काही कठीण वाटत नाही.

पण पन्नास-शंभर लोकांसमोर माईकवर उभं राहून बोलायला सांगितलं तर?

मला वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत असं मोठय़ांपुढे बोलता येत नसे. वर्गात शिक्षकांनी प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर देण्याची हिंमत होत नसे. कधी प्रयत्न केला. तेव्हा हातपाय थरथर कापायचे. शब्द सुचायचे नाहीत. तोंडातून धड वाक्यच बाहेर पडायचे नाहीत. बहुतेकांची अशीच अवस्था होते.

वयाच्या 19 व्या वर्षी मी जयप्रकाश नारायण यांच्या तरुण शांतिसेना नामक, तरुणांच्या संघटनेत अपघातानं सामील झालो. त्यावेळी 'शिक्षणात क्रांती' नामक आमचं आंदोलन सुरू होतं. माझे ज्येष्ठ सहकारी, अशोक बंग, दीपमाला कुबडे वगैरे कॉलेजा कॉलेजात जाऊन भाषणं देत असत. मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत असे. गेली दोन वर्षे आचार्य दादा धर्माधिकारी, प्राचार्य राम शेवाळकर, नारायणभाई देसाई, आचार्य राममूर्ती असल्या दिग्गज माणसांची, वक्त्यांची भाषणं ऐकत होतो. आधीही बाबासाहेब पुरंदरे, विद्यावाचस्वती विष्णूजी क्षीरसागर, रामचंद्र घंगारे यांची भाषणं ऐकली होती. बालपणात आचार्य विनोबा भावेंची बरीच भाषणं ऐकली होती. पण मला बोलता येत नाही याची दु:खद जाणीव होती.

वध्र्याच्या सायन्स कॉलेजमध्ये असताना माझा वर्गमित्र शिरीष गोपाळ देशपांडे आणि पेंडसे सरांची मुलगी छान बोलायचे. वादविवाद स्पर्धेत बक्षीस मिळवायचे. मला सारखं वाटायचं यांच्यासारखं मला बोलता आलं पाहिजे.

एक दिवस आम्ही वध्र्याहून आर्वीला बसने जाताना अशोक बंगने आदेश दिला ''श्याम आज तुला प्रस्तावना करायची आहे. 24 मिनिट तरी बोलायचं आहे.''

माझा सारा प्रवास अतिशय टेन्शनमध्ये गेला. 'काय बोलायचं' याचीच तयारी प्रवासात मी करत होतो. आर्वीच्या आर्ट्स-कॉमर्स कॉलेजच्या दीडशे-दोनशे मुलांपुढे माझं पहिलं 5 मिनिटांचं भाषण झालं. छाती धडधडत होती, हातपाय थरथर कापत होते. पण काही तरी बोललो. ''छान! छान बोललास! पुढच्या वेळेस अधिक चांगली तयारी करून बोल.'' अशी शाबासकीची थाप अशोक बंगने दिली आणि मला बळ मिळालं. वक्तृत्व कसं शिकायचं? चांगली तयारी कशी करायची? माहीत नव्हतं. कुणी सांगितलं नव्हतं. कुणाला विचारण्याची हिंमतही झाली नाही. पण आमचे प्रशिक्षक आचार्य दादा धर्माधिकारी अतिशय उत्तम, अप्रतिम वक्ते होते. त्यांची अनेक भाषणं ऐकली. ते नेहमी बोलताना समोर चिटोरा ठेवत असत. मी त्यांना खूप प्रश्न विचारायचो. एवढे विद्वान गृहस्थ. पण कधीही माझा उत्साह त्यांनी भंग केला नाही. माझ्या बर्‍यावाईट प्रश्नांनाही ते मनापासून उत्तरं देत असत. ''तुम्हे एवढे मोठे वक्ते आहात तरी समोर चिठ्ठी कां ठेवता?'' माझा प्रश्न.

''दर भाषणाच्या आधी मी ठरवतो. काय बोलायचं, किती वेळ बोलायचं. कोणत्या मुद्यांना अधिक प्राधान्य द्यायचं. भाषणाला नीट शिस्त यावी याकरिता चिठ्ठी उपयोगी पडते,'' दादांचं उत्तर.

खरं म्हणजे तेव्हा जर मी हिंमत करून विचारलं असतं की भाषणाची तयारी कशी करावी? उत्तम वक्ता असं बनावं? तर.. दादांनी नीट मार्गदर्शन केलं असतं. कदाचित पुढे माझे प्रचंड परिश्रम वाचले असते.

मग माझी तयारी सुरू झाली. एखाद्या विषयावरचं भाषण तयार करताना भरपूर वाचायचं. त्याचे मुद्दे निवडायचे. जेवढा वेळ भाषण द्यायचं तेवढय़ा वेळेचं अख्खं भाषण लिहून काढायचं. ते बोलण्याच्या भाषेत लिहायचं. मोठमोठय़ानं वाचायचं. पुन्हा पुन्हा लिहिलेलं भाषण दुरुस्त करायचं. लिहिलेलं भाषण जमलं असं समाधान झालं की ते भाषण एका बंद खोलीत मोठमोठय़ानं म्हणायचं. जाहीर सभेत भाषण देतो आहे या आविर्भावानं खुल्या आवाजात भाषण द्यायचं. खुपदा सराव झाला की मग त्या भाषणाचे शॉर्ट पॉईन्ट्स काढायचे. ते समोर ठेवून असंच बंद खोलीत भाषण गायचं. मग पुढे प्रत्यक्ष लोकांपुढे भाषण द्यायचं.

पुढचं काम माझ्यासाठी सोप होतं. तरुण शांतिसेनेची चळवळ सुरू होती. शिबिरांमध्ये, कॉलेजमध्ये भरपूर बोलण्याची संधी मिळत असे. पुढे मी वध्र्याच्या यशवंत महाविद्यालयात आर्ट्स विषयात दाखल झालो. डिबेटिंग सोसायटीचा अध्यक्ष या नात्यानं भरपूर कार्यक्रम आयोजिण्याची संधी मिळाली. स्वत:ही कष्टसाध्य पद्धतीनं वक्ता बनलो आणि इतर अनेक सहकार्‍यांमधून वक्ते घडवले. जोपर्यंत आपण 25-50 मोठय़ा सभांमधून यशस्वीपणे बोलत नाही तोपर्यंत आपण आत्मविश्वासानं छान बोलू शकतो असा आत्मविश्वास निर्माण होत नाही. याला 'सभाधैर्य' प्राप्त करणं म्हणू या.

जेव्हा आपण प्रत्यक्ष 100-200 माणसांपुढे यशस्वीपणे, आत्मविश्वासानं बोलतो तेव्हा तो अनुभव आपल्या अंतर्मनात रेकॉर्ड होतो. या पद्धतीचे 25-50 वेळा भाषण देण्याचे अनुभव आपल्या अंतर्मनात प्रोग्राम झाले की ती आपली 'सवय' बनते. ''आपल्या अंतर्मनात एखादी गोष्ट वारंवार, वारंवार प्रोग्राम झाली की तिचं रूपांतर सवयीत होतं,'' हा एक आपल्या अंतर्मनाचा महत्त्वाचा नियम आहे. अशा आपल्या सवयी निर्माण होतात. कोणतंही कौशल्य आत्मसात करणं म्हणजे त्या कौशल्याची सवय अंतर्मनात निर्माण होईल एवढा वेळ त्या गोष्टीचा अचूक सराव करणं.

सराव अचूक असायला हवा. चुकीचा सराव प्रोग्राम झाला तर सवयही

डिफेक्टिव्ह निर्माण होईल.

मी आधी डिबेटर म्हणून कॉलेजमध्ये व्याख्यानाला जायचो. नंतर वक्ता म्हणून जायचो. त्या काळी 1974 ते 1990 या काळात कॉलेज विद्यार्थी कधीही भाषणं शांतपणे ऐकायचे नाहीत. येनकेनप्रकारे वक्त्यांना पळवून लावण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. पण माझ्या आयुष्यात कधीही कुणाला माझं भाषण उधळता आलं नाही. उलट भाषण उधळण्यासाठी आलेल्यांनाच मी भाषणात गुंगवून टाकायचो. त्यातूनच अनेक कार्यकर्ते सापडले आहेत.

पण समजा अशा अशांत वातावरणात दोन-चार सभा जरी विद्यार्थ्यांना उधळता आल्या असत्या तर मनात भीती निर्माण झाली असती. या भयप्रद अनुभवाचा परिणाम असा झाला असता की वक्ता म्हणून पुन्हा उभं राहिलो नसतो वा चुकीचं प्रोग्रामिंग झाल्यामुळं वाईट, अर्धवट, घाबरट बनलो असतो.

आता मी चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळं मला बोलण्याची सहज संधी मिळायची.

पण सामान्य माणसाला 25-50 भाषणं देण्याची संधी कधी मिळणार? किती वर्ष लागणार?

आज 200 माणसांसाठी भाषण आयोजित करायचं म्हटलं तरी हॉलभाडे, जाहिरात, इतर व्यवस्था खर्च असा मिळून किमान 15 ते 35 हजार रुपये खर्च येतो. पन्नास सभांसाठी 8-12 लाख रुपये खर्च शिवाय एवढा खर्च करून लोक भाषण ऐकायला येतीलच याची खात्री नाही. मग..

वक्ता कसं बनायचं?

मी सांगितलं त्याप्रमाणं सुरुवातीला भाषणाची तयारी करायची. एकदा भाषणाची पूर्वतयारी झाली, भाषण तयार झालं की सभाधैर्यासाठी नव्या तंत्राचा वापर करायचा.

संमोहनाचा वा मेडिटेशनचा वापर करून अल्फा रिदमच्या अवस्थेत जायचं. घरी बेडवर पडल्या, पडल्या कल्पना (तर्ळीरश्रळीश) करायची, ''आपण एका मोठय़ा नाटय़गृहात भाषण देतो आहोत. नाटय़गृह प्रेक्षकांनी खचाखच भरलं आहे. आपण उत्तम बोलतो आहोत. प्रेक्षक तन्मयतेनं ऐकताहेत.. टाळ्या वाजवताहेत.. यशस्वीपणे, अचूकपणे भाषण देतो आहे.. असं नीट व्हिल्युअलाईज करायचं.''

या पद्धतीनं 5-10 भाषणं वेगवेगळ्या नाटय़गृहात. काही मोठय़ा मैदानात.. पन्नासावं भाषण मुंबईच्या शिवाजी पार्कात.. लाखभर लोकांसमोर.

हा पन्नास वेळा अंतर्मनाला झालेला काल्पनिक अनुभवसुद्धा अंतर्मनात प्रोग्राम होतो. त्याची सवय निर्माण होते. पुढे प्रत्यक्ष लोकांपुढे बोलताना सहज जमतं. आत्मविश्वास वाढतो आणि कमी खर्चात, पण मनाचा सराव उत्तम करून चांगलं 'सभाधैर्य' निर्माण करता येतं. नवी सवय निर्माण होते. आत्मविश्वासानं बोलण्याची.

याप्रमाणं तर्ळीरश्रळीरींळेप तंत्राचा वापर करून काय काय करता येईल?

(लेखक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन

समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

भ्रमणध्वनी - 9371014832

No comments:

Post a Comment