Tuesday 25 December 2012

ताणतणावाचं नियोजन तुमच्याच हाती

तुम्हाला जर ताणतणावरहित जगायचं असेल तर आयुष्यामध्ये रिलॅक्सेशन तंत्राची जोड देणं अपरिहार्य आहे. तुम्ही त्याकरिता साधे रिलॅक्सेशन वापरा, संमोहन उपचार वापरा, योगा किंवा मेडिटेशन वापरा किंवा इतर कोणतेही रिलॅक्सेशनचे तंत्र वापरा; पण त्याची जोड देणे नितांत गरजेचे आहे. कारण आपल्या शरीरामध्ये ज्या प्रकारची रपुळशीूं आणि ींशपीळेप निर्माण होतात, अँंड्रीनॅलीन आणि स्टीरॉईड्सचं प्रमाण साचत जातं त्याचा निचरा करण्यासाठी रिलॅक्सेशन अपरिहार्य आणि आवश्यक आहे. त्याशिवाय एवढय़ा उत्तम पद्धतीने निचराच होऊ शकत नाही हे कृपया आपण समजून घ्या. संमोहन उपचाराचा उपयोग तुम्ही व्यक्तिमत्त्व विकासाकरिता करता. इतरही अनेक गोष्टींचा उपयोग व्यक्तिमत्त्व विकासासारखा तुम्ही करू शकाल; पण रिलॅक्सेशन, संमोहनाचा उपयोग स्वत:चं शरीर उत्तम पद्धतीने रिलॅक्स करण्याकरिता जो करू शकतो त्याला मात्र दुसरा पर्याय नाही हे कृपया समजून घ्या.

आपल्या विचारप्रक्रियेमध्ये बदल केला पाहिजे - आपल्याला जर नकारात्मक विचार करण्याची सवय असेल तर सातत्याने आपण आपल्या मनामध्ये ताणतणावच निर्माण करत जाणार आहोत. त्यामुळं आपल्याला विधायक विचार करण्याची सवय निर्माण करणं नितांत गरजेचं आहे. त्याकरिता एक तर संमोहन उपचार आपल्याला वापरता येतात आणि त्यातून ही सवय निर्माण करता येते, तर दुसर्‍या बाजूने सातत्याने आपल्या कॉन्शस माईंडमध्ये स्वत:च स्वत:ला सांगून, 'अरे, मला नकारात्मक विचार नाही करायचा बरं का! आता मी सतत पॉझिटिव्ह विचार करणार आहे,' असं दरवेळी स्वत:ला दक्ष राहून सांगत जाण्यातूनसुद्धा आपल्यामध्ये बदल घडवून आणता येतो. जीवनाकडे पाहण्याचा एक व्यापक, विधायक माणुसकीपूर्ण दृष्टिकोन स्वीकारणे आपल्याला नितांत गरजेचं आहे. त्यामुळे आपण स्ट्रेस आणि इतर सगळं टेन्शन्स आपल्या जीवनातून घालवू शकतो.

आपल्या स्वभावामध्ये बदल करणं - जोपर्यंत आपण आपल्या स्वभावामध्ये विधायक बदल करू शकणार नाही, तोपर्यंत या स्ट्रेसपासून आणि टेन्शनपासून आपण कधीही स्वत:ला वाचवू शकणार नाही. अर्थात याकरिता पुन्हा संमोहन उपचार आपल्याला ताकदीने मदत करतात. स्वभावामध्ये बदल करण्यासाठी त्या पद्धतीचे बदल आपल्याला घडवून आणता येतात.

शांत, खोल आणि समाधानकारक झोप मिळाली पाहिजे - झोप हे टेन्शन-ताणतणाव याचा निचरा करणारं अतिशय उत्तम औषध आहे. जर आपल्याला रोज शांत, खोल आणि गाढ झोप लागत राहिली तर फारसे ताणतणाव शिल्लकच राहत नाहीत; पण यात एक अडचण आहे. ज्यावेळेस आपल्या मनावरच्या ताणाचे प्रमाण वाढते, टेन्शनचे प्रमाण वाढते, रपुळशीूं खूप वाढते त्यावेळेस आपल्याला झोपच येत नाही. रपुळशीूं आणि ींशपीळेप हे खर्‍या अर्थाने झोपेचे शत्रू आहेत. म्हणजे ज्यांच्यामुळे त्याचा निचरा होतो आणि आपण नॉर्मल होतो, पूर्ववत होतो, ती झोपच जर आपल्याला मिळाली नाही तर आपल्याला खर्‍या अर्थानं अतिशय कठीण समस्येला तोंड द्यावं लागतं. याकरिता पुन्हा आपल्याला संमोहन उपचारांची मदत होते. समजा एखाद दिवशी ताणाचे प्रमाण वाढलेले असल्यामुळे झोप येत नसेल, तर संमोहन उपचार करा. कॅसेट ऐका.. तुमच्या मनावरचे ताण कमी होतील. तरीही झोप आली नाही तर पुन्हा दुसर्‍यांदा ऐका, तिसर्‍यांदा ऐका! मनावरचे ताण बरेचसे कमी झाले की तुम्हाला छानपैकी झोप लागेल. त्यामुळे शांत, खोल व समाधानकारक झोप हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्थात कुणी किती तास झोपायचं हे व्यक्तिपरत्वे अवलंबून असतं. याबाबत कोणताही असा नियम सांगत नाही की सहा तास, सात तास झोप पुरेशी होते. काही माणसांना साडेसात-आठ तासांची झोप आवश्यक वाटते. काही माणसांना पाच तासातसुद्धा झोप पूर्ण होते याचे समाधान मिळते. त्यामुळे माणसानुसार, त्याच्या व्यक्तिमत्त्वानुसार, त्याच्या आवश्यकतेनुसार त्याच्या झोपेचे प्रमाण कमी-अधिक असू शकते; पण शांत, खोल आणि समाधानकारक झोप मिळणं हे मात्र नितांत गरजेचं आहे.

व्यायाम - नियमित आणि आवश्यक तेवढा व्यायाम जर आपण करत गेलो, तर जे अँंड्रीनॅलीन आणि स्टीरोईड्स अतिरिक्त प्रमाणात आपल्या शरीरात साचतात त्यांचा निचरा होण्यासाठी मदत मिळते. कारण व्यायाम करताना जी अँक्शन घडते त्यातून घाम येऊन पुढील क्रियेसाठी स्नायू तयार होतात आणि त्यामुळे शरीरात अतिरिक्त प्रमाणात साचलेली अँड्रीनॅलीन आणि स्टीरॉईड्स कमी होतात. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्याला कमी प्रमाणात भोगावे लागतात.

आहार - आहारसुद्धा आवश्यक आहे. योग्य आणि आवश्यक तेवढा संपूर्ण आहार नितांत गरजेचा आहे.

आपल्याला व्यसनांपासून दूर राहता आलं पाहिजे - दारू, तंबाखू, सिगारेट यासारख्या व्यसनांपासून आपण दूर राहिलो पाहिजे. मला पुन्हा एकदा प्रकर्षाने तुम्हाला जाणीव करून द्यावीशी वाटते की दारू, सिगारेट, तंबाखू अशी व्यसनं रपुळशीूं ीिेपश व्यसनं आहेत. आपल्यापैकी अनेक सिगारेट ओढणार्‍यांना असं वाटतं की सिगारेट ओढल्यानंतर रपुळशीूं निघून जाते व आपण रिलॅक्स होतो; पण ही वस्तुस्थिती नाही. सिगारेटची सवय आपल्या शरीराला लागलेली असते. त्यामुळे मुद्दाम शरीर कृत्रिम रपुळशीूं निर्माण करतं. जेणेकरून आपण सिगारेट ओढावी आणि मग सिगारेट ओढल्यानंतर आपलं शरीर थोडंसं रिलॅक्स होतं. पुन्हा रपुळशीूं लीशरींश होते. पुन्हा ताणतणाव निर्माण होतात. यातून सातत्याने ताणतणाव निर्माण करून घेण्याची सवय दारू पिणार्‍या माणसाला, सिगारेट ओढणार्‍या माणसाला, तंबाखू खाणार्‍या माणसाला लागते. तथापि या व्यसनांमुळे आपल्याला रिलॅक्सेशन मिळते हा केवळ गैरसमज आहे हे कृपया आपण समजून घ्या.

जीवनामध्ये काही अर्थपूर्ण नाती असली पाहिजेत, प्रेम असले पाहिजे - जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये प्रेम नाही, प्रेमाला वाव देणारी माणसं नाहीत तोपर्यंत आपल्या जीवनात जगण्यात अर्थ वाटत नाही आणि मग ही परिस्थिती रपुळशीूं आणि टेन्शन निर्माण करणारी परिस्थिती ठरते. म्हणून आयुष्यामध्ये चांगले मित्र असणं, चांगल्या मैत्रिणी असणं, मुलं असणं, जोडीदार असणं, इतर कौटुंबिक नाती असणं हे नितांत गरजेचं आहे.

समाधान देणारा सेक्स - खरं म्हणजे पती-पत्नीच्या संबंधांमध्ये दोघांनाही पुरेशी तृप्ती मिळाली पाहिजे. दोघांनाही समाधान देणारा सेक्स असला पाहिजे. मानवी जीवनामध्ये सेक्समधून जेवढा रपुळशीूं आणि ींशपीळेप चा निचरा होतो तेवढा सुंदर निचरा होण्याचे दुसरे उदाहरण नाही. माणूस अंतर्बाह्य सुंदर पद्धतीने रिलॅक्स होतो. भारतीय माणूस सेक्सला फार महत्त्व देत नाही. खरं म्हणजे अनेकदा पती-पत्नीसुद्धा सेक्स या विषयावर परस्परांसोबत बोलत नाहीत. त्यातल्या त्यात साधारणत: असं मानलं जातं की, पुरुषाची तृप्ती झाली की संपलं. त्यातून स्त्रियांमधलं असमाधान मात्र वाढत जातं. हा आपल्या देशामधला सगळय़ात मोठा समस्या असणारा संदर्भ अनेकांना माहीतसुद्धा नसतो. त्यामुळे दोघांचीही लैंगिक तृप्ती हा मुद्दा आहे. पती-पत्नीने हा मुद्दा समजून घेतला पाहिजे आणि नियमितपणे दोघांनाही समाधान देणारा सेक्स उपलब्ध होईल याची काळजी घेतली पाहिजे. त्यामध्ये जर काही अडचणी येणार असतील तर त्यावर मात केली पाहिजे. संमोहन उपचार पद्धती अतिशय उत्तम पद्धतीने त्यावर मात करण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात.

सेक्सच्या आड येणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रपुळशीूं आणि ींशपीळेप. अपुळशीूं आणि ींशपीळेप हे सेक्सचा शत्रू आहेत. समजा काही कारणामुळे पतीला किंवा पत्नीला, कोणालाही प्रचंड प्रमाणावर मनावर जर ताण निर्माण झालेला असेल, कोणत्याही एखाद्या गोष्टीमुळे ती किंवा तो अस्वस्थ असेल तर दोघांना सेक्समध्ये सहभागी होता येत नाही आणि पतीबाबत ही बाब असेल तर त्याला परफॉर्मन्स करता येत नाही. त्यामुळे दोघांमध्ये उत्तम सेक्स तर सोडाच, पण साधं सेक्श्युल लाईफसुद्धा उरू शकत नाही. त्यामुळे स्वाभाविकच यावर मात करण्यासाठी रिलॅक्सेशनचं तंत्र उपयोगी पडतं. आधी जर आपण संमोहन किंवा कोणतंही रिलॅक्सेशनचं तंत्र वापरलं तर स्वाभाविकच रपुळशीूं आणि ींशपीळेप चं प्रमाण कमी होतं आणि ते पुरेसे कमी झाल्यानंतर सेक्सचा झशीषेीारपलश उत्तमपणे साधता येतो. त्यामुळे संमोहन उपचार पद्धती सेक्सवरच्या प्रत्येक समस्येला घालवण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी आपल्याला सुंदररीत्या मदत करू शकते.

मनोरंजन - मनाला पुरेसा विरंगुळा देणारं मनोरंजन आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. आपण नाटक पाहतो. नाटकामध्ये खर्‍या अर्थाने शिरतो, समरस होतो, त्याचा आनंद आपण घेतो. त्यातून आपल्याला मनोरंजन मिळतं. सिनेमामध्ये आपण याच पद्धतीने शिरतो, खर्‍या अर्थाने त्याच्याशी तादात्म्य होतो. त्यातून आपल्याला आनंद मिळतो. डान्स आहे, गाणी आहेत, दूरदर्शन आहे. या सगळय़ाच प्रकारच्या मनोरंजनाला एक खास महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे. जर आपण यामध्ये मनापासून सहभागी झालो, तर संपूर्ण मन त्यामध्ये गुंतल्यामुळे स्वाभाविकच सगळय़ा प्रकारच्या ींशपीळेपी आणि रपुळशींळशी चा निचरा व्हायला मदत मिळते आणि पुन्हा ताजेतवाने होऊन आपण जीवनाला सुरुवात करू शकतो. यातलं सगळय़ात उत्तम जर कोणतं मनोरंजन असेल तर ते डान्स आहे. कारण डान्समध्ये तीन गोष्टी एकत्र येतात. यामध्ये रिदम-ताल, शारीरिक व्यायाम आणि गाणी या तीन गोष्टी एकत्र येतात.

महाराष्ट्रीयन माणसं याबाबतीत मात्र बरीचशी नतद्रष्ट आहेत. महाराष्ट्रीयन माणसं काय म्हणतात, तू नाच आम्ही पाहतो. ते तमासगिरांना नाचायला लावतात. थोडक्यात 'तुम्ही निरोगी रहा, आम्ही तुम्हाला पाहत पाहत रोगी बनत जातो', या पद्धतीच्या मनोवृत्तीने जगणारी आपण महाराष्ट्रीयन माणसं आहोत. नाचणार्‍यांबाबत आपण बोलतानासुद्धा 'नाच्या', 'तमासगीर' असे शब्द वापरतो. भारतामधल्याच इतर काही कल्चर आहेत, ज्यांच्या जीवनाचा 'नाच' हा अविभाज्य भाग आहे. आदिवासी, पंजाबी, गुजराती अशा बहुतांश कल्चरमध्ये 'नाच' हा त्यांच्या जीवनाचा 'अपरिहार्य आणि अविभाज्य' भाग आहे. एवढेच नव्हे तर साऊथ इंडियन्समध्येसुद्धा 'नाच' हा त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा, प्रतिष्ठेचा, सन्मानाचा भाग आहे. महाराष्ट्रीयन माणसं मात्र याबाबत नतद्रष्ट आहेत.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन

समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832

No comments:

Post a Comment